पांढरकवड्यात अल्पवयीनचा विनयभंग, आरोपी वर गुन्हा दाखल

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पांढरकवडा (पिसगांव) येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना (ता.२७) मार्च रोजी दुपारी २:३० वाजता सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बुधवारी दि. ३० मार्च रोजी मारेगाव पोलीस ठाणे गाठुन सदर आरोपी विरोधात तक्रार दिली. त्या नुसार पोलिसांनी विनयभंग, पोस्को नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला.
 
सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव) येथे एक अल्पवयीन मुलगी आरोपीच्या चुलत बहिणीच्या घरी पाणी पित असतांना अक्षय रवींद्र गोलर (२४) याने पीडितेला स्पर्श करीत वाईट भावनेने विनयभंग केला. शिवाय आरोपीने पीडितेला 'तु जर कुणाला सांगशील तर तुला सोडणार नाही' अशी धमकी दिली. भेजारलेल्या पिडीतेने सर्व आपबीती आपल्या आईला सांगितली, त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी ३५४ भांदवी, पास्को, गुन्हा दाखल करून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.


कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वन्य कायदा विषयावरती व्याख्यान

रवि घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागा तर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्याना करीता प्रा. डी. एन. वाताखरे, विज्ञान महाविद्यालय, सावली हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. त्यांनी वन्य कायदा या विषया वरती व्याख्यान दिले.

या कार्यक्रमला प्रा. डॉ. गजानन सोडनर, इतिहास विभाग प्रमुख यांनी अध्यक्ष भूषविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विनोद एन. चव्हाण, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख यांनी तर प्रा. स्नेहल भांदक्कर यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. तानुरकर, डॉ. कुळकर्णी, प्रा. देशमुख, डॉ. पवार, डॉ. परदेशी, डॉ. चिरडे, प्रा. जेणेकर, प्रा. आत्राम, प्रा. शेंडे, प्रा. भगत, श्री. आकाश कुमरे व श्री. पंढरपुरे इत्यादी मंडळी उपस्थित होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी कार्यक्रम घेण्यास परवानगी देऊन सहकार्य केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. माकडे व प्रा. डॉ. अडसरे यांनी परिश्रम घेतले.

अनु. जमातीचे यादीत ईतर कोणतीही जात समाविष्ट करु नये


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत धनगर समाजाला अनु. जमातीचे यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली. सदर मागणी ही अयोग्य असून धनगर समाजात आदिवासीचे संस्कृती, बोलिभाषा, पेहराव, व देवदेवता यांचे कुठेही संबंध जुळून येत नाही धनगर हे आदिवासी नाहीत म्हणून धनगर समाजाला अनु. जमातीचे यादीत समाविष्ट करण्यात येऊ नये.

आधीच आदिवासी समाज अशिक्षित असून आर्थिक व शेक्षणिक दृष्टया कमकुवत आहे. त्यात प्रत्येक क्षेत्रात बोगस आदिवासी बनावट जातींचे दाखले तयार करून खऱ्या आदिवासीचे जागेवर नोकरीला लागलेले आहेत खरे आदिवासी आज देखील लाखोंचे संख्येने बेरोजगारीने वन वन फिरत आहेत. अनेक वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयात बोगस आदिवासी विध्यार्थी आदिवासीचे जागेवर प्रवेश घेऊन डॉक्टर, इंजिनिअर झालेले आहेत. आणि आज देखील होत आहेत. आदिवासीचे विद्यार्थी मात्र आपल्या हक्का पासून वंचित आहेत. त्यात आणखी ईतर जमातींचा जर समावेश केला तर ते आदिवासी जनतेवर अन्याय होईल म्हणून या पुढे आदिवासीचे यादी मध्ये ईतर जातींचा समावेश करण्यात येऊ नये.या आशयाचे निवेदन नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन यवतमाळ यांचे वतीने भारताचे मा.प्रधानमंत्री  यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी आदिवासी पीपल्स फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सिडाम, सचिव लक्ष्मण कुळसंगे,उपाध्यक्ष गुलाबराव मसराम,एम्प्लॉईज फेडरेशन चे केंद्रीय सदस्य पवनकुमार आतराम, राज्यउपाध्यक्ष गुलाबराव कुडमेथे, महासचिव किशोर उईके,ट्रायबल टायगर फोर्स चे विकास कुळमेथे, जि. प. कर्मचारी पतसंस्थेचे संचालक शंकर कोटनाके, बाबाराव कुळसंगे,नरेश उईके, रामभाऊ तोडासे, गणेश धुर्वे, प्रकाश उईके,शहर अध्यक्ष संजय मडावी,अविनाश कुळमेथे,माणिक मडावी इत्यादि सभासद उपस्थित होते.

दुकान गाळ्याचे वाढीव भाडे कर रद्द करा - प्रमोद उरकुडे

रुस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : दुकान गाळेचे वाढीव भाडे कर रद्द करावे , कोरोना च्या काळातील दुकान, (गाळे) भाडे कर माफ करावे तसेच दुकान भाडे कर भरण्यास काही महिन्या करिता सवलत द्यावी इत्यादी मागणीच्या संदर्भात व्यापारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी नगर पंचायत कळंब यांना निवेदन सादर करण्यात आले.

कोरोना प्रतिबंधक उपायोजना (लॉक डाऊन) काळात सर्व व्यापार, प्रतिष्ठान बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दुर्बल होऊन व्यवसाय डबघाईत आला आहे.

त्यामुळे वरील मागणीच्या संदर्भात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद उरकुडे यांनी व्यापारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी नगर पंचायत कळंब यांच्याशी चर्चा करून वरील मागणीच्या संदर्भात तातडीने योग्य निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी मागणी या प्रसंगी केली .

या पूर्वी नगर पंचायत कळंब यांना निवेदन दिले होते, 
परंतु निवेदनातील विषयाच्या संदर्भात गांभीर्याने दखल घेण्यात आली नसून त्या बाबत अजून पर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्राप्त झाला नाही.

मात्र दुकान गाळे भाडे कर ची वसुली सक्तीने करण्यात येत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात असंतोष पसरलेला आहे.

सदर मागणीच्या संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक भूमिका घेतली गेली नाही ,तर जन आंदोलन करण्यात येईल त्या वेळी संवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्यास याला नगर पंचायत प्रशासन जबाबदार राहील असा तीव्र इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. .

निवेदन देते वेळी मुस्ताक शेख, शैलेश नक्षणे, दीपक कुटेमाटे, राफे खतीब, संजय कुबडे, आदि गुल्हाने, प्रशांत कडूकर, सुशील खिरटकर, प्रवीण चांदोरे, यशवंत एकूणकार, किसन निलजकर, साहिल शिरभाते जानराव पोटे, रुस्तम शेख (प्रतिनिधी), अनुप साळवे (पत्रकार) इत्यादी बहुसंख्या व्यापारी उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच पदाधिकारी (लोकप्रतिनिधी) यानी व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आमचे प्रतिनिधी रूस्तम शेख यांच्या कडे व्यापारी बांधवांनी व्यक्त केली आहे.

संपात सहभागी का होत नाही म्हणून बस चालकाला मारहाण

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

वणी : एकशे पन्नास दिवस होत आहे तरी संपा सुरूच आहे. त्यामुळे संपात सहभागी का होत नाही, या कारणावरून एका चालकाला शिवागीळ करत लाथा बुक्क्यानी मारहाण केल्याची घटना येथील बस स्थानकासमोर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भाऊराव चरणदास पेंदोर असे तक्रारकर्त्या चालकाचे नाव आहे तर, बंडू खडसे व विष्णू चिलईकर अशी आरोपिंची नावे आहेत. यातील विष्णू चिलईकर हा वांजरी येथील रहिवाशी असून तो चिमूर बस आगारात चालक म्हणून कार्यरत आहे. बंडू खडसे हा भाऊराव पेंदोर यांना संपात सहभागी का होत नाही, तुझ्यामुळे आम्हाला ड्युटीवर घेत नाहीये, असे म्हणून बंडू व विष्णू यांनी भाऊराव ला शिवागीळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
(जाहिरात)

याबाबत तक्रार करण्यासाठी गेले असता, आगार प्रमुखांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप पेंदोर यांनी केला.
(जाहिरातीसाठी संपर्क : 7218187198)