शेतकरी बांधवांनसाठी शितगृह (cold storage) जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीने उभारावे - गजानन बेजंकीवार सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (०१ संप्टें.) : जिल्हातील अनेक शेतकरी फळ बागायती व भाजीपाला उत्पन्न घेत आहेत त्यांना शितगृह (cold storage)ची व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्याचे पिक कमी दरात विकावे लागते किंवा पिक सडून जात आहे. आपल्या जिल्ह्यातील शेतकरी करीता शितगृह ची व्यवस्था केल्यास अनेक शेतकरीना त्याचा फायदा होईल व उत्पन्नात वाढ होईल यासाठी गजानन बेजंकीवार यांनी मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी केली होती. त्या अनुषंगाने दि. २५/८/२१ रोजी चे पत्राद्वारे मा प्रकल्प संचालक (आत्मा) यवतमाळ यांनी जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीना प्रस्ताव सादर करण्याचे कळविले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील प्रस्ताव सादर करण्यार् या कृषि उत्पन्न बाजार समिती ना शितगृह उभारण्यासाठी कृषि पायाभूत सुविधा अंतर्गत २ कोटी रूपये पर्यन्त कर्ज 3% व्याज दराने ७ वर्ष मूदती पर्यन्त मिळणार असून ६०% अनुदान स्मार्ट प्रकल्प अंतर्गत व ३५% अनुदान राष्ट्रीय फलोत्पादन कडून मिळणार आहे.तरी जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीने आपले प्रस्ताव त्वरीत सादर करावे असे गजानन बेजंकीवार सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा यांनी आव्हान केले आहे.

कोंघारा येथे पशु लसीकरण व मार्गदर्शन शिबीर

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
नागपूर, (०१ संप्टें.) : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलंग्रित असलेल्या कृषी महाविद्यालय केळापूर (पांढरकवडा) तालुक्यातील कोंघारा येथील चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी शुभम सुरेशराव आगरकर यांनी राज्यस्तरीय पशू वैद्यकीय दवाखाना थाटूरवाडा यांचा हस्ते भिष्णूर येथे शेतकऱ्यांच्या जीवनात गुरा ढोरांचे महत्व काय आहे व लसीकरण या बाबद मार्गदर्शन केले.

या वेळी पशू वैद्याकिय अधिकारी डॉ. पी.वी. सोणारे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला उपस्थित श्री. छत्रपती जालित पशुधन परिवेक्षक, श्री.वासुदेव सेवतकर, प्रफुल्ल नासरे, जयुर कलंभे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राठोड सर व पशुविज्ञान व दुग्धविज्ञान विभागाचे प्रमुख दत्ता जाधव सर यांनी केले.

चाळीस वर्षापासून पाण्यासाठी वंचित असलेल्या शेतकर्‍यांना न्याय मीळेल का?


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (०१ संप्टें.) : विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी जास्तीत जास्तं जमीन सिंचनाखाली घेण्यासाठी शासन कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करीत आहे शेत तळे, विधंन विहीर, बोअरवेल, लिफ्ट ऐरीगेशन, सामुहिक शेततळे ईत्यादी बाबीवर कोट्यावधी खर्च होत आसतांना महागाव तालुक्यातील १९८० च्या दशकात हरीत क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव जी नाईक साहेब यांच्या दूरदृष्टीने व प्रयत्नाने निर्माण झालेल्या अधर प्रकल्पाचे पाणि आध्यापही शेवटच्या टप्प्यातील शेतजमीनीला मीळत नाही. चाळीस वर्षात केवळ चाळीस कि.मीटर सुध्दा पाणी देवु शकलेले नाहीत. वास्तविक या पुसप्रकल्पाचे डाव्या कालव्याची लांबी ५० की.मीटर आहे. व वितरीकेचे काम १२ कि.मीटर केल्याचे नमूद आहे. मात्र महागाव तालुक्यातील भोसा, पोहंडुळ, तीवरंग, धनोडा, कोनदरी, वाकान याच लाभक्षेत्रातील शेतजमिनीला पाणी आजवर देऊ शकले नाही. ते शेतकरी सुध्दा ओरड करत आहेत. आर्णी तालुक्यातील ५ गावातील २७ वर्ष संघर्ष करणाऱ्या संघर्ष समितीने आखेर जमीन परत करण्याची मागणी रेटुन धरली असुन सतत पाठपुरावा करुन सुध्दा आद्याप कोणत्याही राजकीय पक्षांनी किवा लोकप्रतिनिधीनी यात लक्ष घातले नाही. आखेर ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या समस्या ची जाण असणार्या ना. बच्चु कडु यानां आप बीती कथन केल्यानंतर लगेचच संबधीत विभागास आदेश देऊन तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे मागील ३९ वर्षापासून संघर्ष करत आसलेल्या समीतीला थोडा दिलासा मिळाला असून त्यांच्या आजपर्यंत च्या संघर्षाला फलप्राप्ती चा योग जवळ येत आसल्याचे दिसुन येत आहे. २००९ मध्ये माहितीच्या आधीकारात प्राप्त झालेल्या संबंधित सिचंन विभागाच्या अधिकार्‍यांनी पाणी देण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट पत्रक समिती जवळ असून हा या अहवालातील मुख्य पुरावा आहे. प्रत्यक्ष मोका पाहणीत सुध्दा कालव्याचे पाणी मागील चाळीस वर्षात कधी गेले नाही आणि जमीन हस्तांतरण केली. तिथपर्यंत कालव्याचे काम सुध्दा आजपर्यंत झाले नाही हे वास्तव चित्र असताना एकदंरीत या ५२ शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांची जमीन अल्प मोबदल्यात संपादीत करुन पाणी मिळणार या आश्वासनातुन त्यांची फसवणुक केली. आज पर्यंत जिथ पर्यंत कालव्याचे काम झाले तिथपर्यंत सुध्दा पाणी  नेण्यास असमर्थ आसलेल्या सिंचन विभागाने नाहक त्रास देऊन काय साध्य करावयाचे असेल ? असा प्रश्न संघर्ष समितीचे अध्यक्ष विवेक दहीफळे, प्रशांंत जाधव, विवेक पांडे, नारायण व्यवहारे व पाच गावातील शेतकरी करीत असुन शासनाने आता लक्ष न घातल्यास टोकाची भूमिका घेण्याचे ठरविले आहे. मा.मुख्यमंत्री यांना रीतसर सामूहीक आत्महत्येची परवानगी सुध्दा मागीतलेली आहे. यावरून ना. बच्चु कडू यांनी गंभीर दखल घेत यावर शेतकर्‍यांना, या जाचातुन लवरात लवकर सोडवण्याचे तडक आदेश अमरावती येथील सुनावणी दरम्यान दिले आहेत. आता तब्बल चाळीस वर्षातील संघर्षाला यामुळे नक्कीच दिलासा मिळणार असल्याने प्रकल्प पिडीत शेतकरी आशा दर्शवित आहे.

वरोऱ्यातील मनसेचा दहीहंडी कार्यक्रम ठरला लक्षवेधी


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (०१ संप्टें.) : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य तसेच केंद्र सरकारने सर्वच धार्मिक सामाजिक उत्सव व कार्यक्रमावर प्रतिबंध लावल्याने यावर्षी दहीहंडी कार्यक्रम होणार नाही हे निश्चित होते, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दहीहंडी कार्यक्रम उत्सवात करा आपण नंतर बघून घेऊ असा आदेश दिला होता. मात्र स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मनसे पदाधिकाऱ्यांना आलेल्या नोटीसा आणि त्यानंतर मुंबई ठाणे येथील मनसे पदाधिकारी यांच्यावर अटकेच्या झालेल्या कारवायां बघता महाराष्ट्रातील मुंबई ठाणे व इतर काही ठिकाण वगळता मनसे तर्फे दहीहंडीचे कार्यक्रम घेण्यात आले नाही परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरीत जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या नेत्रूत्वात स्थानिक आंबेडकर चौकात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाचे वारंवर मनसे पदाधिकाऱ्यांना फोन जायचे पण तरीही तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या नियोजनात शेवटी दहीहंडी कार्यक्रम काल दि. ३१ ऑगस्ट ला उत्सवात व थाटात साजरा करण्यात आला.

राज्य सरकारने हिंदूंच्या दहीहंडी कार्यक्रमावर बंदी का आणली? जिथे राजकीय मेळावे सुरू आहे. भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. शिवसेनेचे राणे विरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. रेल्वेत गर्दी आहे बाजारात गर्दी उसळली असताना फक्त हिंदू सणावरच बंदी का? हा प्रश्न हिंदूव बांधवांसमोर असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या स्टाईल ने परत एकदा बंदी झुगारून दहीहंडी चा कार्यक्रम केला असल्याने हजारो लोक दहीहंडी च्या या कार्यक्रमाला आले होते.
दहीहंडी कार्यक्रमात सरकारचा केला निषेध.

राज्य सरकारने केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करत राज्यात दहीहंडी कार्यक्रम होऊ नये, यासाठी दहीहंडी कार्यक्रमावर बंदी आणली होती व मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन दहीहंडी कार्यक्रम करू नका अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र, तरीही हिंदूंच्या सणावर सरकारने आणलेली बंदी झुगारून मनसे तर्फे दहीहंडी होणार म्हणजे होणार असा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता, मात्र कडक पोलिस बंदोबस्त असल्याने मनसेने एका छोट्या गोविंदामार्फत प्रतीकात्मक दहीहंडी फोडून सरकारचा जाहीर निषेध केला. त्यानंतर उंच बांधलेली दहीहंडी सुद्धा बालगोपाळ यांच्या हातात काठी देऊन फोडण्यात आली. 

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते रमेश राजूरकर, शिव प्रतिष्ठान चे अध्यक्ष अनिल वरखडे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, किशोर माडगूळवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, मनविसे विधानसभा संघटक राहुल खारकर इत्यादींची प्रामुख्याने मंचावर उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या नेत्रूत्वात मनसे शहर अध्यक्ष राहुल लोनारे, शहर उपाध्यक्ष कुणाल गौरकार, श्रीकांत तळवेकर,शहर संघटक हर्षद घोडिले, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, तालुका सचिव कल्पक ढोरे, विक्रम चंदनखेडे, शंकर क्षीरसागर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष मुज्जमील शेख तालुका अध्यक्ष म्हणून अभिजित आस्टकार, शहर अध्यक्ष अनिकेत पुरी, मनविसे शहर संघटक संदेश तामगाडगे, तालुका संघटक तुषार केदार, शहर उपाध्यक्ष धीरज गायकवाड, प्रितम ठाकरे, चेतन निकोडे, संकेत पिपरे, तालुका उपाध्यक्ष शुभम कोहपरे, सचिन मांडवकर गणेश खडसे, विभाग अध्यक्ष कुणाल देवतळे राजेंद्र धाबेकर समीर तूरानकर यांनी अथक परिश्रम घेतले.

अखेर त्याला झाली अटक, गेल्या २५ दिवसांपासून मारेगाव पोलीस होते फरार आरोपीच्या मागावर


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (०१ संप्टें.) : शहरातील फरार आरोपी विक्की उर्फ प्रीतम मोहितकर (३५) रा.प्रभाग क्रं.४ मारेगाव याला अखेर दि.३० ऑगस्ट रोजी वणी नांदेपेरा चौफुली वरून अटक करण्यात आली. त्याच्यावर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून ३५४,३५४(अ),(१),(२), (४)३२३,५०६ अंतर्गत गुन्हा नोंद होता. त्यानुसार गेल्या २५ दिवसांपासून मारेगाव पोलीस त्याच्या मागावर होते.

सविस्तर असे की, मारेगावातील एका ३० वर्षीय महिलेला त्याने शरीर सुखाची मागणी करून जीवे मारण्याची धमकी देत तिच्या दारात जाऊन अश्लील भाषेचा वापर करीत विनयभंग केल्याची घटना ५ ऑगस्टच्या रात्री सुमारास घडली होती. हादरलेल्या पीडितेने आपल्या जीवाला धोका असल्याचे लक्षात घेत, संशयित आरोपी विरुद्ध मारेगाव पोलिस स्टेशन ला जाऊन तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून विक्की मोहितकर हा फरारीत होता.
गेल्या २५ दिवसांपासून मारेगाव पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो चकमा देत होता. अखेर त्याला ३१ ऑगस्ट ला रात्री ८ वाजताच्या दरम्यान, वणी नांदेपेरा चौफुलीवरून आरोपीला मोठया शिताफीने अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार वणी व मारेगाव पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आनंद आचलेवार, नितीन खांदवे, पो स्टे मारेगाव व नापोका विजय वानखेडे, आशिष टेकाम, उप विभागीय पो. अ.पथक वणी यांनी केली.