उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या वाहणाला भीषण अपघात


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (३१ ऑगस्ट) : वणी येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांचा राळेगाव ते वडकी मार्गावरील सावंगी टर्निंग जवळ भीषण अपघात झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार आपले कार्यालयीन काम आटपुन यवतमाळ वरून राळेगाव मार्गे वणीकडे निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे वाहन चालक परेश मानकर व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार हे वाहनांनी प्रवास करीत होते. समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती राळेगाव येथील ठाणेदार मुडे यांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि अपघातात जखमी झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांना यवतमाळ येथील संजीवनी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. बातमी लिहेपर्यंत हा अपघात कशामुळे झाला. अजून पर्यंत माहिती मिळाली नसुन, समोरील तपास राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.

कळंब शहरात अभ्यासिका सुरू करा - राष्ट्रवादी युवती काँग्रेसची मागणी

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (३० ऑगस्ट) : शहरात व तालुक्यात MPSC व UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी यांची संख्या जास्त वाढत असून, त्यांना सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिका हवी आहे. अशा मागणीचे पत्र देण्यात आले. सदर निवेदन राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या जिल्हा अपाध्यक्षा शुभांगी चांदोरे, व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर अध्यक्ष नंदिनी शेंडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा मनीषा ताई काटे (भोसले), स्वेता माहुरे, राणी दर्वे, वैशाली गुलाने, वृषाली टेकाम, कल्याणी बुल्ले, सोनाली विधाते, आरती कोडापे, सागर सहारे, वैभव वाटकर, प्रज्वल डगवार, मोठया संख्यने विद्यार्थी उपस्थित होते.

पडोलीच्या विकासासाठी सदैव कटीबध्द - आ. किशोर जोरगेवार


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : पडोली हे चंद्रपूरचे स्वागतद्वार आहे. चंद्रपूरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा पडोलीतून जातो. त्यामूळे या भागाचा सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहे. येथील विकासासाठी आपण ७६ लाखांचे कामे मंजूर केले असून येथील विकासासाठी मी सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
     
काल रविवारी पडोली येथील शेकडो युवकांच्या उपस्थितीत आमदार जोरगेवार यांच्या हस्ते यंग चांदा ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यंग चांदा ब्रिगेडचे नेते राकेश पिंपळकर, विक्की रेगन्टीवार, नकुल वासमवार यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
      
आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडमध्ये मोठ्या संख्येने युवक शामील होत आहे. सामाजिक क्षेत्रात संघटना उल्लेखनीय कार्य करीत आहे मात्र या सोबतच या संघटनेच्या माध्यमातून नागरिकांचे अधिकाधिक प्रश्न सोडविण्याचा आमचा मानस आहे. पडोली येथील यंग चांदा ब्रिगेडची शाखा सुरु होत आहे. या शाखेच्या माध्यमातून या भागातील नागरिकांच्या अडचणी माझ्या पर्यंत पोहचाव्यात असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
          
पडोलीचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे या निधीतून येथील सिमेंट काँक्रिटचे मार्ग, स्मशानभूमी, यासह इतर विकासाचे कामे केल्या जाणार आहे. पूढे ही या भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी माझे प्रयत्न असणार असल्याचे ते यावेळी बोलतांना म्हणाले. या भागात लाईट नसल्याने येथे हायमास्क असला पाहिजे अशी मागणी आली होती. ती पण आपण पुर्ण केली आहे. आज त्याचे लोकार्पणही संप्पन्न झाले. येथे स्वर्गरथची मागणी आली असून या स्वर्गरथसाठी मी १५ लक्ष रुपये देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच या चौकाचे सौदर्यीकरण करणे व येथील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठीही येत्या काळात निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले,  
गणेश पाचभाई, राहूल सोनकुसरे, राजा शेख, अमोल आमटे, रुपेश गावतुरे, संजू गोलवंशी, राकेश केळकर, बाबा शेख, शेखर मेश्राम, रितेश केळकर, रितीक यादव, चंद्रकांत शेलोटे, निक्की यादव, अमिर शेख, बबलू काजी, सलीम काजी, भाग्यवान गनफुले, दिपक मिश्रा, शुभम ठेमस्कर, अयाम कच्ची, साहिल शेख, रजा शेख, सुरज साव, मुर्तजा शेख, शारुख शेख, अमोल चौधरी, गणेश देशमूख, मुकेश लाळसे, सोनू गुरुनुले, प्रमोद शेंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती.

चंद्रपूरात निघाला आक्राेश माेर्चा: जननायक बिरसा मुंडा स्मारकाच्या पुनर्स्थापनेसाठी आदिवासी बांधव उतरले आज रस्त्यावर !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : चंद्रपूरात निघाला आक्राेश माेर्चा जननायक बिरसा मुंडा स्मारकाच्या पुनर्स्थापनेसाठी आदिवासी बांधव उतरले आज रस्त्यावर ! 

चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : आज दुपारी १.१५ वाजता आदिवासी बांधवांचा भव्य आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकला. सदरहु मोर्चा शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पुजन करून स्मारकापासुन निघुन चंद्रपूर महानगरपालिकेवर पाेहचला.

महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत स्मारक उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत अशोक तुमराम, जितेश कुळमेथे, किशोरभाऊ पोतनवार, प्रदिप गेडाम, नरेन गेडाम, जमुना तुमराम, रंजना किन्नाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आयुक्तांसोबतच्या या चर्चेतुन अजुनही काही फलित हाती येण्याची अपेक्षा नाही अशी उदासवाणी भाषा काही कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केली आहे. 
हा आक्रोश मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मुख्य मार्गावरून पुढे निघत बस स्थानकासमोर १० मिनिटांसाठी मुख्य रस्त्यावर बसुन संपुर्ण रहदारी थांबवण्यात येऊन जाेरदार घोषणाबाजी करण्यांत आली. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला असतांना पाेलिस प्रशासनातर्फे थांबवण्यांत आला. येथे मोर्चाचे जाहिर सभेत रूपांतर होऊन यात प्रामुख्याने नरेनजी गेडाम, अंकुशजी वाघमारे, जितेश कुळमेथे, रवी मेश्राम, हिराचंदजी बोरकुटे, प्रल्हादभाऊ कोटनाके व अशोक तुमराम यांची समयोचित भाषणे झालीत. यानंतर एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांनी स्मारक उभारणी संदर्भात उद्या मंगळवारी दोन वाजता बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या मोर्चात बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी जमुना तुमराम, प्रिती मडावी, वैशाली मडावी, मंगला बुरांडे, ताराबाई आत्राम, जितेश कुळमेथे, अशोक उईके, गोकुल मेश्राम, पुरूषोत्तम सोयाम, पराग खोब्रागडे, बाबा महेशकर व अशोक तुमराम यांनी अथक परिश्रम घेतले. या आक्राेश माेर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधव सहभागी झाले हाेते. दरम्यान आज प्रशासना तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, मनपा कार्यालय ठिकाणी, व शहरातील काही मुख्य चाैकात पाेलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला हाेता.

काँग्रेस प्रदेश कार्यकारणीत कासावार व काळे यांची निवड


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
यवतमाळ, (३० ऑगस्ट) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेत काँग्रेस रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यातूनच महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात वणीचे माजी आमदार वामनराव कासावार व वसंत जिनींग चे अध्यक्ष देविदास काळे यांची वर्णी लागली आहे.
वामनराव कासावार यांची प्रदेश कार्यकारिणीत सरचिटणीस म्हणून निवड झाली, तर देविदास काळे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली. कासावार यांनी वणी विधानसभेचे चार वेळा नेतृत्व केले असून, विधानसभा क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे, तसेच यापूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची ही धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती. याच कार्याची दखल घेऊन त्यांचा प्रदेश कार्यकारिणीत समावेश केला आहे. तसेच देविदास काळे यांनी ही वसंत जिनींगच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळताच कायापालट केला. त्यामुळे त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसून येत आहे.