वणी आगाराला नवीन लालपरी बस मिळण्याकरिता सोमवारपासून मानवी ह‌क्क ‌सुरक्षा परिषदेचे आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी आगाराला नवीन लालपरी बस मिळण्याकरिता मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने परिवहनमंत्री मा. प्रताप सरनाईक यांचेकडे १५ दिवसापुर्वी मागणी करण्यात आली त्या निवेद‌नामध्ये १५ दिवसात लालपरी उपलब्ध न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता परंतु जनहितार्थ दिलेल्या निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्यामु‌ळे व आजपावेतो वणी आगाराला नवीन बस न उपलब्ध झाल्यामु‌ळे सोमवार ५ मे पासुन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार मानवी हक्क सुरक्षा परिषद हे आमरण उपोषण करणार आहे.

आता फक्त अवघे काही दिवस उरलेत, आपल्या वणी शहरात खादी कॉटन महोत्सव सेल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : मंडळी उन्हाळ्यात प्युअर खादी कापड घालून कुठलाही कार्यक्रम, लग्न सोहळा, पार्टी खास करायचा असेल ना तर मग ही बातमी तुमच्या साठी नक्की फायद्याची आहे. नवीन स्टॉक, उत्तम क्वालिटी, खादी कॉटन महोत्सव सेल एकाच छताखाली भरपूर व्हेरायटी तुम्हाला ह्यांच्या कडे मिळणार आहे आणि तेही अगदी 200 ते 900 रुपये च्या स्टार्टींग रेंज पासून आणि मग जशी कपडे घ्याल तशी प्राईसेस चेंज होत जाणार आहे. 

प्युअर खादी हाफ शर्ट (₹250/300), खादी फुल शर्ट ((₹250/300), नेहरू लॉन्ग कुर्ता (₹400/500), संग्राम (पठानी- ₹350/400), शॉर्ट कुर्ता (बंडी- ₹350/400), पेजामा ₹350/400, जॅकेट (₹700/900), जूट खादी (₹500), पेपर खादी (₹500) खादी सलवार, खादी दुपट्टा, खादी टॉवेल व रुमाल, खादी टॉप, साऊथ कॉटन गाऊन, लेडीज साठी फॅन्सी जुडबॅग व खादी कॉटन पॅन्ट अशा अनेक उत्तम क्वालिटी च्या खादी कॉटन महासेल सेल आपल्या शहरात उपलब्ध आहे. अवघे काही दिवस उरले असून आपल्या वणी शहरातून सेल बाहेर जाणार आहे. त्यामुळे वणीकरांनी ही सुवर्ण संधी सोडूच नये."यह हैं गर्मी का फंडा, पहनो खादी थंडा" या मथळ्याखाली खादी कॉटन महोत्सव सेल आपल्या सेवेत सुरु आहे. 

भारतीय उद्योगाला चालना मिळण्यासाठी हातभार लावा. सर्व नवीन स्टॉक,त्वरा करा...वेळ सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत असून जैताई मंदिर, यवतमाळ रोड, साई मंदिर चौक, वणी या पत्यावर तुम्ही व तुमच्या मित्र परिवारासह अवश्य भेट द्यावे...


विचोडा (बू) येथे विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

चंद्रपूर : अँड्रॉइड युगातही विद्यार्थ्यांना ऑफलाईन अभ्यासाची सवय, गोडी कायम राहण्यासाठी अभ्यासिका ची गरज होती. विद्यार्थ्यांची ही गोष्ट लक्षात घेऊन, विचोडा (बु) येथील विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करू शकतील, असा सुसज्ज अभ्यासिका तयार करण्यात आली असून सामाजिक कार्यकर्ता अनिल डोंगरे यांच्या पुढाकारातून आज 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त चांदसुर्ला, विचोडा (रई) येथील पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, टिफिन बॉक्स इत्यादी भेटवस्तू दिल्या आहेत.
या अभ्यासिकेचे उद्घाटन चंद्रपूर उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उपजिल्हाधिकारी व्यवहारे यांनी अभ्यासिकेचे महत्त्व विशद करून ही एक संधी आहे, याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी अनिल डोंगरे हे चंद्रपूर जिल्ह्यात व्यसनमुक्तीचे उत्कृष्ट कार्य करत असून आता त्यासोबत विद्यार्थी शिक्षणात मागे पडला नाही पाहिजे, त्यांना आपली कुठेतरी गरज आहे. यासाठी अभ्यासिका सारखे समाज उपयोगी कार्यासोबत विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून समोर येत आहे, असेही ते म्हणाले. 

याप्रसंगी विद्यार्थी, पालक तसेच गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

18 वर्षीय युवतीवर बळजबरी, महाराष्ट्र दिनी घटना

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : 18 वर्षीय युवती वर झालेल्या शारीरिक व अनैसर्गिक अत्याचारच्या घटनेने वणी हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे दिवसा वणी शहरातील गॅस गोडाऊनचे मागे गांधी नगर परिसरातील तळ्या जवळ हा लाजिरवाणा प्रकार घडल्याची माहिती आहे. 

पीडित युवती विटा भट्टी कडे तुटलेल्या विटा गोळा करण्यासाठी जात असता तिला अनोळखी आरोपीने मागून जोरात पकडून तिला लाथाबुक्याने मारहाण करून त्यानंतर तिला बाजूला नेऊन तिच्यासोबत बळजबरी केल्याचा आरोप आहे. ही घटना 1 मे रोजी दुपारी बारा ते एक वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

पीडितेच्या जबानी रिपोर्ट वरून आज दि. 2 ला अनोळखी इसमावर सदरचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोउपनि धनंजय रत्नपारखी हे करत आहे.

धाकधूक वाढली : मे महिन्यात १० वी-१२ वीचा निकाल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी झ्र बारावीच्या २१ लाख विद्यार्थ्यांच्या निकालाबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. १० वी-१२ वीच्या विद्यार्थांचा लवकरच निकाल लागणार आहे. मे महिन्यात या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुस-या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आली. या निकालाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. १५ मे पर्यंत निकाल लागू शकतो. मात्र यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांचीही धडधड वाढली आहे. यावर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत १२ वीची परीक्षा झाली होती.

यंदा एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली. ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. तर इयत्ता १० वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुरू झाली ती १७ मार्चपर्यंत होती. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा, या हेतूने बोर्डाने यंदाच्या वर्षी परीक्षा आधीच घेतल्या आणि निकालही लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मे महिना संपायच्या आतच दोन्ही (१० वी, १२ वी) इयत्तांचे निकाल लागणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठीही पुरेसा वेळ मिळेल.

लवकर निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला वेळेवर सामोरे जाण्यास मदत होणार आहे. यापूर्वी, निकाल उशिरा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया आणि पुरवणी परीक्षांसाठी कमी वेळ मिळत असे. मात्र यंदा तसे होणार नाही.

२१ लाख विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी झ्र बारावीच्या २१ लाख विद्यार्थ्यांच्या निकालाबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. १० वी-१२ वीच्या विद्यार्थांचा लवकरच निकाल लागणार आहे. मे महिन्यात या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुस-या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आली. या निकालाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. १५ मे पर्यंत निकाल लागू शकतो. मात्र यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांचीही धडधड वाढली आहे. यावर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत १२ वीची परीक्षा झाली होती.

यंदा एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली. ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. तर इयत्ता १० वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुरू झाली ती १७ मार्चपर्यंत होती. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा, या हेतूने बोर्डाने यंदाच्या वर्षी परीक्षा आधीच घेतल्या आणि निकालही लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मे महिना संपायच्या आतच दोन्ही (१० वी, १२ वी) इयत्तांचे निकाल लागणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठीही पुरेसा वेळ मिळेल.

लवकर निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला वेळेवर सामोरे जाण्यास मदत होणार आहे. यापूर्वी, निकाल उशिरा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया आणि पुरवणी परीक्षांसाठी कमी वेळ मिळत असे. मात्र यंदा तसे होणार नाही.