महाराष्ट्र दिनानिमित्त मनसेकडून गरजूंना इलेक्ट्रिक पंखे वाटप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून परसोडा येथील श्री. बाजीराव महाराज वृद्धाश्रम व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढत्या तापमानापासून बचाव व्हावाथंड वातावरण मिळावे यासाठी इलेक्ट्रिक पंखे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष मोठ्या प्रमाणात करा असा आदेश राज ठाकरेंनी दिल्यानंतर वणीत मनसेकडून ३० एप्रिलच्या रात्री फटाक्याच्या आतिषबाजी करण्यात आली. तर काल ( १ मे) ला सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून परसोडा येथील वृद्धाश्रमात वृद्धांना व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना महाराष्ट्र दिनानिमित्त इलेक्ट्रिक पंखे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. सध्या उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. तर अवेळी वीजेच्या लपंडावामुळे नागरिकांना गरमीशी सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मनसे वणी विधानसभे तर्फे वृद्धाश्रमात व रुग्णालयात जाऊन पंख्यांचे वाटप केले. सदर पंख्यात चार्जिंगची व्यवस्था असून यामध्ये दिवा सुद्धा उपलब्ध आहे. 
यावेळी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, मयूर गेडाम, मयूर घाटोळे, विलास चोखारे, विजय चोखारे, शंकर पिंपळकर, अमोल मसेवार, गोविंदराव थेरे, बंडु येसेकर, दिलीप मस्के,मयूर मेहता, मनोज नवघरे, हिरा गोहोकार, जुबेर खान, यांच्या सह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मानले जेष्ठ नागरिकांनी आभार..
"मनसेने दिलेल्या पंख्यांमुळे आम्हाला खूप मदत झाली आहे. उन्हाळ्यात पंख्यांशिवाय राहणे खूप कठीण होते. मनसेचे आम्ही आभारी आहोत,"

भुमीअभिलेख कार्यालयात शिवसैनिकांनी वाचला समस्याचा पाढा


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगावयेथील भुमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचुन शिवसेना (उबाठा) स्टाईलने जवाब मागितला असुन या अभिनव प्रकाराने कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण पसरले होते.

बहुचर्चित असलेल्या मारेगाव भुमीअभिलेख कार्यालयात नागरिकांना विहीत मुदतीत सेवा मिळत नसल्याने कार्यालयाचे विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्याच्या तक्रारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे नागरिकांनी केल्या होत्या, त्याची दखल घेत शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कार्यालयाला भेट दिली होती. भुमीअभिलेख कार्यालयाचे अधिक्षक जाधव यांना शिवसेना स्टाईलने जवाब मागितला होता.
मात्र, समाधानकारक उत्तरे मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे शिवसैनिकांनी जाधव यांची चांगलीच कान उघडणी केली होती. जमीनीची मोजणी,यासह ईतर कामे वेळेवर होत नसल्याचा मुद्दा शिवसैनिकांनी मांडला होता. मात्र, प्रश्नाचे समाधान कारक उत्तर न देता जाधव यांनी वाद करण्याचा प्रयत्न केला. अपमानजनक शब्दप्रयोग होत असल्याचे पाहुन शिवसैनिक चांगलेच भडकले होते. तहसीलदार उत्तम निलावाड यांनी मध्यस्थी करुन पेटलेले वातावरण अखेर थंड करण्यात यश मिळविले आहे. प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढून नागरिकांना नियमीत सेवा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी सुधीर थेटे, शिवसेनेचे पुरुषोत्तम बुटे, राजु मोरे, सुभाष बदकी, देवा बोबडे, अनंता निब्रड, सोमेश्वर गेडेकर, संजय लांबट, प्रणय उईके, दिवाकर सातपुते, यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

आमदार देवराव भोंगळे यांच्या पुढाकाराने राजुरा-गडचांदूर-कोरपना मार्गे कोळशी-वेळाबाई-मुकुटबन बस सेवा सुरू...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आगारामार्फत नवी बस सेवा स्थापन करण्यात आली असून, ती दररोज सकाळी ८ वाजता राजुरा येथून गडचांदूर, कोरपना, कोळशी, वेळाबाई, फाटा, मोहदा, नेरड, पुरड मार्गे मुकुटबनकडे रवाना होईल. तसेच सकाळी १० वाजता ही बस पुन्हा राजुराकडे परत येईल.

या मार्गावर अनेक लहान गावांचा समावेश असून, नागरिकांना शासकीय कामासाठी, शिक्षणासाठी, तसेच आरोग्य सेवेसाठी तालुका ठिकाणी दररोज ये-जा करावी लागते. मात्र, बससेवेअभावी विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना व सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या गरजेला ओळखून क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते मुक्तानंद भोंगळे, राहूल पावडे, धिरज भोयर, संदेश शंभरकर यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे सदर मागणी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार भोंगळेनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर यांना योग्य त्या निर्देशांनी ही सेवा सुरू करण्यास भाग पाडले.

या नव्या बस सेवेमुळे राजुरा, कोरपना, झरी, वणी व मारेगाव या पाच तालुक्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, शेकडो लोकांना दररोज सहज प्रवास करता येणार आहे.

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे वतीने डॉ. आंबेडकर अभ्यासिकेला ग्रामपंचायत तर्फे पुस्तके भेट

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

राजुर कॉलरी : जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंचा सौ. विद्याताई डेव्हिड पेरकावार यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजारोहण करण्यात आले तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राला ग्रामपंचायत तर्फे पुस्तके भेट देण्यात आली.

राजुर ग्रामपंचायत द्वारे चालविल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रात येथील विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येऊन अभ्यास करून यश मिळवित आहेत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन आणि त्यांना लागणारी लेटेस्ट पुस्तके ग्रामपंचायत द्वारे उपलब्ध करून देण्यात आले.

या दोन्ही प्रसंगी प्रामुख्याने मा. अशोकभाऊ वानखेडे, मा. अशोकभाऊ भगत, मा. सौ. प्रणिताताई मो. असलम, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा. पं. सदस्य, मा. सौ. पायलताई अनिल डवरे ग्रा. पं. सदस्य, मा. कु. चेतनाताई यशवंत पाटील ग्रा. पं. सदस्य, मा. सौ. बबिताताई रामेश्वर सिंह, ग्रा. पं. सदस्य, मा. डॉ. तेजस आस्वले, वैद्यकीय अधिकारी. प्रा. आ. केंद्र राजूर, मा. डेव्हिड भाऊ पेरकावार, मा. कुमारभाऊ मोहरमपुरी, मा. अनिल डवरे, मा. रामलुअण्णा बोलगमवार, मा. यशवंत पाटील, मा. गोवर्धन दुर्योधन, मा. पुरुषोत्तम फुलेझेले, सचिव ग्रा. पं. राजूर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे विद्यार्थी व गावातील ग्रामस्त उपस्थित होते.

कानडा येथे थाटात पार पडला ग्राम जयंती महोत्सव

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म दिवस ग्रामजयंती म्हणून देशभरात साजरी करण्यात येते. अशीच "ग्राम जयंती" कानडा येथे गट ग्रामपंचायत कानडा चे वतीने 'एक पाऊल गावांसाठी' या मथळ्याखाली दि. २४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत साजरी करण्यात आली. 

महाराजांनी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना ग्रामगीता हा ग्रंथ लिहून अर्पण केला व ग्रंथामधे अग्रस्थानी शेतकरी शेतमजूर व गावं हेच अग्रस्थानी आहे.

सर्व ग्रामासी सूखी करावे | अन्न वस्त्र पात्रादि द्यावे|| 
परी स्वताची दूख भोगावे| भूषण तूझे ग्राम नाथा||  
असा उल्लेख केला. यामधे ग्रामस्वच्छता करण्यात आली. शेतीविषयक मार्गदर्शन, गांडूळ खत निर्मिती याबाबत आशिष लोडे यांनी मार्गदर्शन केले. वृक्षसंवर्धन विषयांवर जनजागृती, हागणदारीमुक्त गाव, महिला सक्षमिकरण, ग्रामसभा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. 
खरे काम निष्काम हि ग्रामसेवा | 
झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा || 
कळो हे वळो देह कार्यी पडू दे| 
घडू दे प्रभू एवढे हे घडू दे|| 
असा संकल्प केला. त्यानंतर सामूदायिक प्रार्थना व मनोगत व्यक्त करण्यात आले.

हा कार्यक्रम संरपच सौ सुषमा रूपेश ढोके यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य कविता झिले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र चामाटे, गूरूदेव सेवा मंडळाचे पंढरी येवले, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोसाई आत्राम, माजी सरपंच प्रमोद धोबे, अरूण आस्कर, वंदना येवले, संगीता येवले व गावातील नागरिक उपस्थित होती. संचालन ग्रामधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी, प्रास्ताविक रूपेश ढोके तर, आभार सुरज येवले यांनी मानले.