राजूर येथे क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य एक दिवसीय कार्यक्रम संपन्न


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : आदिवासी जनजागृती युवा संघटना व वीरांगना राणी दुर्गावती महिला संघटना यांचे विद्यमाने दिनांक 05 एप्रिल 2025 रोज शनिवारला राजूर येथील बिरसा भूमी येथे क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्र्वर शेडमाके व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
सकाळी 9 वाजता आदिवासी संस्कुती नुसार आदिवासी समाज बांधवानी निसर्ग पूजन म्हणून गोंगो पूजा व आदिवासी सप्तरंगी ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर साय. 7 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटक मा. संजयभाऊ देरकर आमदार वणी विधानसभा यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा डॉ सुनीलकुमार जुमनाके बालरोग तज्ञ तथा संचालक सुगम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वसंत जिनिंग चे अध्यक्ष मा. अशिषभाऊ खुलसंगे व प्रमुख पाहुणे म्हणून मा संघदीप भगत माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ, सौ अश्र्विनीताई प्रकाश बल्की उपसरपंच ग्रामपंचायत राजूर, मा प्रनिताताई मो. असलम माजी सरपंच ग्रामपंचायत राजूर, डॉ. गोपणे, वामन पा. बल्की पोलीस पाटील राजूर,  मा. विजयभाऊ पेंदोर सामाजिक कार्यकर्ता व सौ. मंजुषाताई सिडाम सदस्य ग्रामपंचायत राजूर यांचे उपस्थितीत संपन्न झाला. 
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष मारोती आत्राम होते, प्रास्ताविक संघटनेचे मुख्यसंघटक ॲड अरविंद सिडाम यांनी केले, सूत्रसंचालन सविता येलादे यांनी केले व आभार संघटनेचे सचिव रामकृष्ण सिडाम यांनी मानले. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर आधारित एकपात्री प्रयोग मा रामचंद्र आत्राम सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा विहिरगाव यांनी उत्कृष्ट रित्या सादरीकरण केले. त्यानंतर साय. 8 वाजता गोंडी व भीम गीताचा संगीतमय कार्यक्रमाने आदिवासी गोंडी ऑर्केस्ट्रा बल्लारपूर व संच यांनी विविध गोंडी, कोलामी भाषेत व भीम गीते गाऊन प्रेक्षकांचे प्रबोधन व मनोरंजन केले. 
या कार्यक्रमांत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, राजूर गावातील व परिसरातील लोक हजर होते. या कार्यक्रमास यशस्वी बनविण्याकरिता आदिवासी जनजागृती युवा संघटना व विरांगणा राणी दुर्गावती महिला संघटना यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ता ॲड अरविंद सिडाम, मारोती आत्राम, रामकृष्ण सिडाम, रोहित कीनाके, संदीप सिडाम, राजू पंधरे, कृष्णा मेश्राम, रमेश येडसकर, उज्वल कुमरे, रुपेश नैताम, सुदर्शन कुमरे, रजत आत्राम, शिरेष कुमरे, आदित्य येलादे, किसन किणाके, विजय उईके, लकी सुरपाम, सागर किनाके, जगण सुरपम, विजय गडे, चेतन केरम, गणेश कोवे, हरिदास कोडापे, अजय कदम, राजेश उईक, सहील किनाके, पियूष घोडाम, सहिल मेश्राम, सूरज पेंदाम, किसन किनाके, सानिका नैताम, श्रावणी मेश्राम, स्वेता टेकाम, गायत्री कनाके, धनश्री पंधरे, अंकीता उईके, अंजली ऊईके, निशा कुमरे, खुशी येलादे, तनु टेकाम, लकी सुरपाम, सागर किनाके, जगन सुरपाम, नागेश किनाके, चेतन केराम, नागेश कोडापे, गायत्री कनाके, लक्ष्मी कनाके, शुभांगी कनाके, सुरज आत्राम, विजय गडे व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई आत्राम यांनी केले वस्त्रदान

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : विविध सणांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई अत्रम यांनी वस्त्रदान केले. यासाठी त्यांना माणुसकीची भिंत, त्यांचे चिरंजीव तुरुंगाधिकारी वैभव आत्राम, आकाशवाणी अधिकारी राहुल आत्राम आणि कविता आत्राम यांचे विशेष सहकार्य लाभले. 

पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या कुवारा भीवसेन देवस्थानाच्या प्रांगणात त्यांनी गरजूंना कपडे वाटले. या वस्त्रदानाचा लाभ बहुसंख्य फिरस्ती फकीर आणि गरजूंनी घेतला. 

यावेळी पी. डी. आत्राम, प्रमोद चांदवडकर व मान्यवर उपस्थित होते. पुष्पाताई आत्राम ह्या विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करतात. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी सेवक पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळालेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

वणीत राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी तुर्नामेंट घेण्याचा मानस – खा.प्रतिभा धानोरकर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : स्व. बाळूभाऊ धानोरकर हे क्रीडाप्रेमी होते. ते खासदार असताना त्यांनी वरो-यापासून कबड्डी खेळाचे भव्य सामने घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांचाच कित्ता गिरवत यंदा वणीत कबड्डीचे तुर्नामेंट सुरु करण्यात आले आहे. भविष्यात मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कबड्डी तुर्नामेंट सुरु करण्याचा मानस आहे. वणीला यावर्षी राज्यस्तरीय स्पर्धा झाली. वणीतील स्पर्धेला मिळालेला प्रेक्षक व संघांचा प्रतिसाद पाहून पुढल्या वर्षी वणीत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्याबाबत नक्कीच विचार केला जाईल, असे वचन खा. प्रतिभा धानोरकर यांनी वणीकरांना दिले. रविवारी वणीतील शासकीय मैदानावर खासदार चषकाचा बक्षिस वितरण सोहळा झाला. यावेळी त्या बोलत होत्या.

खा. प्रतिभा धानोरकर यांच्या संकल्पनेतून वणीत खासदार चषकाचे आयोजन कऱण्यात आले होते. शुक्रवारी दिनांक 4 एप्रिल ते 6 एप्रिल अशा तीन दिवस राज्यस्तरीय कबड्डीचा थरार रंगला. यात मुंबई, नागपूर, बारामती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. मॅटवर खेळण्यात आलेल्या या सामन्यांना प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अंतिम सामना श्रीराम कबड्डी संघ बारामती व दु. पु. मध्य रेल्वे नागपूर यांच्यात झाला. यात बारामती संघाने नागपूरच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. तर नागपूरचा संघ उपविजेता ठरला. 

तिस-या स्थानासाठी टाकळी येथील संदीप बुरेवार व भारत स्पोर्टिंग क्लब उमरेड यांच्यात लढत झाली. टाकळी येथील संघाने उमरेडच्या संघावर मात करीत तिसरे स्थान पटकावले तर उमरेडच्या संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला 1 लाख रोख, उपविजेत्या संघाला 71 हजार रोख, तृतिय विजयी संघाला 51 हजार तर चतुर्थ विजयी संघाला 31 हजारा रोख बक्षिस देण्यात आले. याशिवाय वैयक्तिक बक्षिसांमध्ये बारामतीचा खेळाडू शुभम दिडवाघ याला उत्कृष्ट ऑलराउंडर, नागपूरचा वंश मुदलीयार याला बेस्ट रायडर, नागपूरचा राहुल कांबळे बेस्ट डिफेन्डर तर बारामतीच्या शुभम गायकवाड हा मॅन ऑफ दी सिरीज ठरला.

बक्षिस वितरण सोहळ्याच्या अध्यक्ष खा. प्रतिभा धानोरकर होत्या. तर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, एसडीपीओ गणेश किंद्रे, तहसिलदार निखील धुळधर, तालुका क्रीडा अधिकारी चैताली राऊत, माधव शिंदे, किशोर गज्जलवार, सचिन गाडे, देविदास काळे, टिकाराम कोंगरे, संजय खाडे, दिलीप मालेकर, घनश्याम पावडे, अलका महाकुलकर, शामा तोटावार, प्रमोद लोणारे, मोरेश्वर पावडे, भाउराव कावडे, जय आबड, वंदना आवारी यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून सोहळ्याला उपस्थिती होती.

आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पहापळे व सचिव योगेंद्र शेंडे, प्रवीण काकडे, ओम ठाकूर, पलाश बोढे, मुरलीधर भोयर, सतिश लडके, राजू अंकतवार, नरेश मोरस्कर, गणेश आसुटकर, देवानंद अवताडे, उमेश कुमरे, नरेंद्र सपाट, सुरेश डाहुले यांच्यासह युवा नवरंग क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

महिलेच्या गळ्यातील 12 ग्रॅमचा सोन्याचा गोप ओढून लांबवला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : किर्तन संपले महाराजांचे दर्शन घ्यावे म्हणून श्रद्धालू महिला त्यांचे जवळ दर्शनासाठी जावून खाली वाकताच महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गोफ कोणीतरी अज्ञाताने ओढून नेल्याची तक्रार वणी पोलिसात देण्यात आली आहे. ही घटना श्री जगन्नाथ महाराज मंदिर, भांदेवाडा येथे रविवार दि. 6 एप्रिल रोजी घडली.
वणी तालुक्यातील भांदेवाडा येथे रविवार ला जगन्नाथ महाराज मंदिरात किर्तनाचा कार्यक्रम सुरु होता. शारदा गुलाबराव मेहपुरे (वय 55) रा. नेहरू वार्ड, ता. चिमूर जि. चंद्रपूर ह्या सुद्धा दर्शनसाठी आल्या होत्या. मंदीराचे बाजुला प्रकाश भोयर महाराज यांचे किर्तन सुरु असल्याने सर्वजन तीथे किर्तन ऐकण्याकरीता बसले होते.शारदा गुलाबराव मेहपुरे सुद्धा तिथेच होत्या. दुपारी 1.00 वा. चे सुमारास महाराजांचे किर्तन संपल्याने शारदा मेहपुरे ह्या प्रकाश भोयर महाराज बसलेल्या ठिकाणी गेल्या व महाराजांचे दर्शन घेण्याकरीता त्या खाली वाकले असता फिर्यादीचे गळ्यात असलेला गोफ कोणीतरी अज्ञात ईसमाने ओढल्यसारखे वाटले, त्यांना गळ्यात गोफ दिसला नसल्याने फिर्यादीने याबाबत सोण्याचा गोफ वजन 12 ग्रॅम किंमत 5860 प्रती ग्रॅम असा एकुण 69,600/-रु. कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरुन नेला अशा प्रकारची जबानी रिर्पोट वरुन पोलिसांनी कलम 304 BNS गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन वणी करत आहे.

बाबाराव मडावी यांचा भाकर कथासंग्रह गडचिरोली विद्यापिठात अभ्यासक्रमात

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

यवतमाळ : येथील प्रख्यात साहित्यीक बाबाराव मडावी,आकांतकार यांचा भाकर कथा संग्रह गडचिरोली विद्यापिठात एम.ए.मराठी चे अंतिम वर्षाला अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आला.त्यांचे आत्मकथन आकांत चा ही या विद्यापिठात एम.ए.भाग१ चे अभ्यासात समावेश करण्यात आला आहे.बाबाराव मडावी यांचे कथासंग्रह, आत्मकथन, कादंबरी,कविता अभ्यासक्रमात पुणे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, अहमदनगर, गडचिरोली विद्यापिठात एम.ए, बी.ए. ला समाविष्ठ झाले. बाबाराव मडावी यांचे साहित्य वाचनिय तथा अभ्यासनिय ठरले असुन सर्वञ आनंद व्यक्त करण्यात येत असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सर्व सामाण्या तळागाळातील जीवन जगणारा माणुस केंद्रबिंदु समजुन त्यांचा विविध अंगाचा आलेख बाबाराव मडावी यांचे साहित्यातुन पहायला मिळतो.भाकर कथासंग्रहातील कथा सर्वसामाण्य माणसाच्या हक्कासाठी झुंजणा-या आहेत.त्यांच्या जगण्यातील व्यथा वेदना आक्रोश करीत विद्रोही रुप धारण करतात.व्यवस्थेला प्रश्न करीत जीवनाचा आदर्श छातीठोकपणे जगाला समजावुन सांगतात.घामावरची या कथासंग्रहातील दुनिया झोपडीच्या दारातुन ऊगवते.या कथासंग्रहातील माणसं केवळ आपलं दुःखच सांगत बसत नाहीत तर परिवर्तनाची अपेक्षा करतात.भाकरीसाठी तडफडणारी माणसं कष्टाचं प्रामाणिक त्यांचं जीणं हृदयाला हलवून सोडतं.या कथा संग्रहाच्या दोन आवृत्त्या निघाल्यात.