मुंबई महानगरात भाडेतत्वावर राहणाऱ्या कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मुंबई अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सुविधांमध्ये निवारा हा महत्त्वाचा घटक असून तो आम्हाला मिळालाच पाहिजेत . यासाठी मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाच्या वतीने संविधानात्मक मार्गाने महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वात नुकतेच आझाद मैदानात धरणे आंदोलन केले असून यामध्ये प्रामुख्याने" केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे " या धोरणाची घोषणा केली त्याची अंमलबजावणी मुंबई महानगरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अर्थमंत्री अजित पवार, यांच्याकडे मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी रीतसर करून त्यासाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
       
त्यानुसार मुंबई महानगरातील भाडेतत्त्वावर राहणारे शेकडो महिला आझाद मैदान मध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या असून आपल्याला हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त करत होता. यावेळी संघाचे संस्थापक जगदीश भाई कुमार इंगळे यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात आपल्याला जे काही अधिकार मिळाले आहेत त्याकडे सरकार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेले असताना आपल्याला राहण्याची हक्काचे घर नाही यापेक्षा दुसरी कोणती शोकांतिका नाही त्यासाठीच मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वात आंदोलन उभे केले.शासनाने जर दखल घेतली नाही तर संपूर्ण मुंबई महानगरात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे करण्याचा इशारा आंदोलनातून दिला आहे.
      
केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या सर्व येथे घरे योजनेची अंमलबजावणी होत नसल्यामुळे गरजवंतांना घराचा लाभ मिळत नाही त्यामुळे शासनाने गंभीर बाबीचा विचार करून मुंबई महानगरातील बेघर नागरिकांना शासनाच्या "सर्वांसाठी घरे" योजनेची त्वरित अंमलबजावणी करून सर्व भाडेकरूंना घरकुलाचा लाभ मिळवून देण्याच्या धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय त्वरित काढून भाड्याने राहणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना हक्काचे घर देण्यात यावे असा इशाराही मुंबई भाडेकरू रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे व मुंबई प्रदेशाध्यक्ष गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे व मुंबई जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे यांनी आंदोलनातून देण्यात आला आहे.. 
   
या आंदोलनाच्या निमित्ताने पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकर कांबळे व मुंबई जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे यांनी गृहनिर्माण उपसचिव अजित कवडे यांची भेट घेऊन आंदोलनाची पार्श्वभूमी सांगून निवेदन देण्यात आले. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून आपला प्रश्न सोडवण्यात येईल ज्यांना भारतात/महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे घर नाही अशा बेघर कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे देण्यात येतील असेही आश्वासन दिले.
        
या आंदोलनात मुंबई महानगरातील मुंबई जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे सचिव कविता निकाळजे, कल्पना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी, भांडुप, सायन, मानखुर्द, घाटकोपर, कल्याण, टिटवाळा, बदलापूर, उल्हासनगर, भागातून भाडेकरू रहिवासी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

स्वरांगण तबला विद्यालय मारेगाव तर्फे गुढी पाडवा व रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा...!

गुढी पाडव्याच्या व रमजान ईद च्या स्वरांगण तबला विद्यालय मारेगाव तर्फे हिंदू मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा...!

-रवि घुमे
उच्च शिक्षित तबला शिक्षक
तबला विशारद, तबला भास्कर व पत्रकार

मांडोस निमित्त गोंड पंच कमिटी माथार्जुन गोणा बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : आदिवासी बहुल असलेल्या तालुक्यामधील माथार्जुन या गावामध्ये पारंपारिक गोंड पंच कमिटी यांची सभा पिढीन पिढी चालवत येत असलेले या परंपरा आपल्या पिढीसमोर आदर्श ठेवण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली.

महत्त्वाचं म्हणजे गोंड पंच कमिटी मध्ये एक न्याय करते म्हणून चार लोक निवडले जातात त्यामध्ये घटया महाजन कारभारी व भूमक यांचे कार्य समाजामध्ये वादविवाद असल्यास एक गोणा बैठकीमधून निर्णय लावण्यात येते. सांस्कृतिक,लग्न,समारंभ देव कार्य मृत्यक कार्य व देवकार यांच्या समक्ष केल्या जातात..समाजाचे संपूर्ण कार्य हे पंच कमेटीनुसार करण्यात येतो.

पारंपारिक चालत येत असलेल्या गोंड पंच कमेटी गोंड समुदायाच्या लोकांमधून लोकशाही पद्धतीने घटया, महाजन, कारभारी व भूमक निवडण्यात येते.
 
पारंपारिक रूढी परंपरानुसार चालत येत असलेल्या माथार्जुन येथे घटया पदी संतोष तुमराम. महाजन पदी मनोहर मेश्राम,कारभारी पदी अरविंद नैताम, तर भूमक या पदी धर्मा गेडाम, यांची गोंड पंच कमेटी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

अपघातात दोघे गंभीर जखमी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने मोटरसायकल चालकाला बेधडक दिली. या अपघातात दोन युवक गंभीर झाल्याची घटना दि. 29 मार्च रोजी सायंकाळी 6.15 वाजता राज्य महामार्गावरील घोगुलदरा फाट्यानजीक घडली. दरम्यान दूचाकीस्वाराला अक्षरशः चारशे मिटर फरफटत नेत कारवाला पसार झाला. 
वणी-मारेगाव वरून भरधाव करंजी दिशेने हे अज्ञात वाहन जात होते. याच दिशेने दुचाकीस्वार मारेगाव तालुक्यातील वाघदरा येथील सतीश झिगूं आत्राम व निलेश तुकाराम दडांजे हे जात असतांना राज्यमहामार्गांवर असलेल्या घोगुलदरा फाट्या पासून अज्ञात कार ने अक्षरशः दुचाकीला फरफटत तब्बल तीनशे ते चारशे मिटर वरील बोटोणी नजीक सराटी फाट्यापर्यंत नेले. हा थरार येथील अनेकांनी प्रत्यक्षात बघीतला. येथे गतिरोधक असल्याने दुचाकी कडेला पडली यात दुचाकीस्वार दोघेही गंभीररित्या जखमी झाले. मात्र, हे अज्ञात वाहन धारकांनी वाहणासह घटनास्थळावरून पोबारा केला.
गंभीर जखमी दुचाकीस्वार सतीश व निलेश यांना करंजी येथील प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथे हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

गुढी आनंदाची....

गुढी आनंदाची

सण आला हा पाडव्याचा 
घेऊन नवचैतन्य उत्साहाचा 
ध्यास असू द्या मनी प्रेमाचा
 आनंद हा नववर्षाचा,

फुलवा नात्यांचा गोडवा 
द्वेष मत्सराची गुंतागुंत सोडवा 

गुढी उभारा मनी प्रेमाची 
जणू पालवीच्या नवपर्णाची,
 
आसमंत गेला भरुनी 
वसंताच्या निर्मळ स्पर्शाने 
हिरवळ परिमळ झाली सृष्टी पशुपक्ष्यांची कोमलदृष्टी,

कलारव किलबिलांचे गुंजन
 गगन गेले सप्तसुरांनी रंगून 

जीवनी तुमच्या आनंद वसु दे 
हीच सदिच्छा मनी असू दे.

    
मंजुषा राजेंद्रप्रसाद पांडे