३२ वर्षानंतर इयता १० वीतील वर्गमीत्र दोनदा आले एकत्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : सन १९९२-९३ ला दहावीत पंचशिल हायस्कुल नांदेपेरा येथे एकत्र शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम मागील वर्षी वनोजा देवी येथे घेण्यात आला होता. व त्या मध्ये काही विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे येवू शकले नव्हते, त्यामुळे त्यांना सुध्दा भेटने आवश्यकच असल्यामुळे यावर्षी श्री गजानन महाराज मंदीर, जैताई नगर, वणी येथे दिनांक ०९/०३/२०२५ रोज रविवारला स्नेहमिलनाचा कार्यक्रम पार पाडला. विशेष म्हणजे या स्नेहसंम्मेलनाच्या कार्यक्रमात मागील वर्षी आलेले व जे विद्यार्थी मागील वर्षी नव्हते ते सुध्दा आलेले दिसून येते. त्यामुळे कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली होती.

पंचशिल हास्कुल नांदेपेरा येथे सन १९९२-९३ मध्ये १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या या वर्गमीत्रांची भेट झाल्याने सर्वांनी आपला जिवन परीचय देत विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले. त्यामध्ये विविध प्रकारचे खेळ लहानपणीचे खेळ्यात आले. खेळा मध्ये सर्वांनी सहभाग घेतला, तसेच काहींनी गाने म्हणून मनोरंजन केले, व काहींनी जुन्या आठवणी काढून लहानपण जागे केले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री. क्षिरसागर सर होते व प्रमुख पाहुने श्री. श्रध्दानंद हेपट व सौ बोढेताई उपस्थित होत्या यावेळी पाहुन्यांनी मार्गदर्शन केले व हा एक आदर्श वर्ग असल्याचे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन कु. छाया केळकर हीने व प्रास्तावीक भाषण श्री. हरी आनंदराव आसुटकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ. भाग्यश्री ठावरी हीने केले.

गेट टु गेदर कार्यक्रमाला सौ. वैशाली श्रध्दानंद हेपट, श्री. किशोर हेपट, श्री. वियज शेडामे, श्री. राजु दुमोरे, श्री. कवड्डु माथनकर यांनी व उपस्थित सर्वानी विशेष परिश्रम घेतले.ह्या प्रकारे ३२ वर्षानंतर दोनदा कार्यक्रम पार पाडून आर्दश निर्माण केला.


खैरी अपघातातील दुचाकीस्वार चेतन आय सी यू मध्ये भरती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

राळेगाव : खैरी येथील टर्निंगवर एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला उडवले, यात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. सदर घटना ९ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान, घडली होती. 

चेतन कवडू माथनकर (वय २७) रा.बोरी (बु.) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मोटरसायकल क्र.एम.एच.२९ ए.जे. ८१६२ ने चेतन खैरीकडुन माढाळीकडे जात असतांना माढेळी मार्गे येत असलेले स्विफ्ट कार (क्र.एम.एच.२९ बि.पी.१४२६) या गाडीने खैरीकडे येत असतांना खैरी गावाच्या टर्निंग नमूद कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली, यात दुचाकीस्वारच्या डोक्यात गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर नागपुरात उपचार सुरु आहे. विशेष उल्लेखनीय की, ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी त्याने अपघातग्रस्ताला माणुसकी न दाखवता किंबहुना दवाखान्यात न नेता घटनास्थळावरून पळ काढला, असं प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. दरम्यान घटनास्थळावर अपघातग्रस्त व्यक्ती हा अर्धतास पडून असल्याने खुप रक्तस्त्राव झाला असं समजत. तो तीन दिवसापासून आयसी यू मध्ये असून नागपूर येथील न्युरोन हास्पिटलमध्ये त्याचेवर उपचार सुरु आहे.

दरम्यान, सदर घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना मिळताच त्यांनी खैरी बिट जमादार अविनाश चिकराम व आकाश कुंदुसे यांना तातडीने घटनास्थळी पाचरण करून घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.

मूळ कर पावती त्वरित द्या,सामाजिक कार्यकर्ते गजानन चंदनखेडेंचे प्रशासनाला निवेदन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : येथील नगर पंचायत प्रशासनाकडून मालमत्ता कर भरल्यावर कार्बन कॉपी पावती दिली जात आहे. परंतु ही संगणकीकृत मूळ पावती उपलब्ध नसल्याने नागरिकांना भूखंड खरेदी-विक्री आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे मूळ पावतीमध्ये दुरुस्त्या करून ती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन चंदनखेडे यांनी केली आहे. 

सामाजिक कार्यकर्ते गजानन चंदनखेडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यात तत्काळ सुधारणा करावी आणि कराची मूळ पावती प्रत नागरिकांना देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मात्र,कर भरल्यानंतर, मूळ पावतीकडे दुर्लक्ष करून नगर पंचायत प्रशासन लाभार्थ्यांना कार्बन कॉपी देत ​​आहे. या प्रकारची फसवणूक गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असल्याचा ठपका लगावला आहे. दरम्यान, प्रशासनावर संतापही व्यक्त केला जात आहे. परिणामी मुख्याधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक ह्यांची भूमिका निष्प्रभ ठरत आहे. त्यामुळे त्रासलेल्या नागरिकांकडून प्रशासनाला दोष दिला जात आहे.

त्यामुळे त्यात त्वरित सुधारणा करून कराची मूळ पावती प्रत नागरिकांना देण्यात यावी, असे न झाल्यास नगर पंचायत कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.


विकसित महाराष्ट्र साकारणारा, लोकाभिमुख अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मुंबई : विकसित भारतासोबतच, विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा, लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसुत्री आहे. संतुलित अशा या अर्थसंकल्पाला अनुसरून आमची पुढील वाटचाल, असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. 

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधान सभेत सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.

महाराष्ट्राचा विकास दर सर्वाधिक
राज्याचा हा अर्थसंकल्प संतुलित स्वरुपाचा आहे. यात राजकोषीय तूट २.७ टक्क्यांपर्यंत राखण्यात यश आले आहे. सरत्या वर्षात ही तूट २.९ टक्क्यांपर्यंत होती. महसुली जमा आणि खर्च यांचा उत्तम ताळमेळ राखला गेला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाचे आकारमान आता सात लाख कोटींवर पोहचले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे आता लोकसंख्येच्य तुलनेत उत्तर प्रदेशचा अपवाद केल्यास, सर्वात मोठा अर्थसंकल्प असणारे राज्य ठरले आहे. महाराष्ट्राची जीएसडीपी (सकल राज्य घरेलू उत्पादन) वाढ चांगली आहे. गेल्या दहा वर्षात हे प्रमाण ७.५ टक्क्यांवर पोहचले आहे. हे उत्पादन पाच ते दहा लाख कोटींनी वाढले आहे. त्यामुळे या प्रमाणात आपली कर्ज घेण्याची मर्यादाही वाढली आहे. त्यामुळे आपण विहीत कर्ज मर्यादेचे उल्लंघन केलेले नाही, हे देखील उल्लेखनीय आहे. 

उद्योग क्षेत्राची भरारी
आपल्या उद्योग क्षेत्रानेही भरारी घेतली आहे. कोविड काळाचा अपवाद वगळल्यास हा वाढीचा दर चांगला आहे. आपले राज्य स्टार्टअपमध्ये क्रमांक एकवर आहे. जीसएसटी कर संकलनातही महाराष्ट्र पुढे आहे. राष्ट्रीय कर संकलनाच्या तुलनेत आपण सात टक्क्यांहून अधिक म्हणजे दिड लाख कोटींच्या पुढे आहोत. इतर राज्ये आपल्या मागे आहेत. औद्योगिक वाढ, विदेशी गूंतवणूक आणि स्टार्टअप आणि जीएसटी मुळे महाराष्ट्र यापुढेही अग्रेसर राहील, हा विश्वास आहे.

पायाभूत सुविधांचे प्रभावी नियोजन
राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये रस्ते विकास हा महत्वाचा विषय आहे. आपल्या अर्थसंकल्पात रस्त्यांचा विकास हा पुढील वीस वर्षांचा विचार करून, नियोजनबद्धरित्या करण्यावर भर दिला गेला आहे. यामुळे रस्त्यांचा आराखडा गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत एक समान पद्धतीने होणार आहे. या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी आपण बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून निधी उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. वर्ल्ड बँक, एशियन बँक, न्यु डेव्हलपमेंट बँक आणि नाबार्डच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभरले जात आहे. यामुळे आपल्या राज्यात बंदरे, विमानतळांच्या विकासासाठीही मोठी गुंतवणूक येणार आहे.

घर बांधणीत महाराष्ट्रच अग्रेसर..
महाराष्ट्राने घर बांधणीच्या क्षेत्रात मोठी मजल गाठली आहे. या क्षेत्रातही मोठी गूंतवणूक आली आहे. विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेतून आपण आता वीस लाख घरांचा टप्पा गाठत आहोत. यातही केंद्र आणि राज्य यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधीचा ओघ राहणार आहे. यातील घरांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून वीजेसाठी स्वयंपूर्ण केले जाणार आहे. याशिवाय ज्या घरांचा वीज वापर तीनशे युनीटहून कमी असेल, त्यांनाही या योजनेतून वीज देण्याचे सुतोवाच आजच्या अर्थसंकल्पात केली गेली आहे. 

शेती, सिंचन क्षेत्रालाही प्राधान्य
या अर्थसंकल्पात कृत्रिम बृद्धिमता- एआय आणि बायोटेक, ड्रोन टेक्नॉलॉजी सारख्या उत्पादन खर्च कमी करणाऱ्या आणि शेतीतील नफा वाढवणाऱ्या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. एआयद्वारे माती परिक्षण ते फुल-फलधारणा यापर्यंतच्या टप्प्यांचे नियोजन करता येणारे शक्य आहे. त्याबाबतचे नियोजनही केले गेले आहे. जलयुक्त शिवार टप्पा दोन आणि नदिजोड प्रकल्पासाठी भरीव तरतुद केली गेली आहे. 

लाडक्या बहिणी ते लखपती दिदी...
लाडक्या बहिणींसाठी निधी कमी पडणार नाही, असे नियोजन केले गेले आहे. याशिवाय या योजनेतून बहिणी आर्थिक स्वावलंबी व्हावेत असे नियोजन आहे. काही बहिणींनी या पंधराशे रुपयांतून सोसायटी स्थापन केल्या. या सोसायट्यांचे जाळे निर्माण करून, राज्यस्तरीय अपेक्स अशी सोसायटी स्थापन केली जाईल. याशिवाय आपल्याला लखपती दीदी या महिलांच्या स्वयंरोजगाराच्या संकल्पनेलाही पुढे न्यायचे आहे. आतापर्यंत आपण २३ लाख लखपती दीदींचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. आणखी २४ लाखांचे उद्दीष्ट्य साध्य करून एक कोटी लखपती दीदींचे लक्ष्य गाठायचे आहे. 

सामाजिक न्याय, आदिवासींचाही विकास
सामाजिक न्याय, आदिवासी विभागांच्या तरतूदीत भरीव वाढ करण्यात आली असून ती प्रत्येकी 43 व 40 टक्के एवढी आहे. सामाजिक न्यायाच्या धोरणाला बळ मिळेल. यात वैयक्तीक लाभाच्या योजना राबवल्या जाणार असल्यामुळे अनेक कुटुंबांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यासंदर्भातील लाभ निश्चितच होतील. 

विकासाकडे जाताना रोजगार संधीवर भर देणारा अर्थसंकल्प आहे. यापुर्वी अर्थमंत्री म्हणून १३ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम दिवंगत शेषराव वानखेडे यांच्या नावावर होता. वित्त मंत्री श्री. पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. यापुढील वाटचालीत ते देखील हा विक्रम पूर्ण करून, अर्थसंकल्प सादर करतील, असा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद करून वित्त मंत्री श्री. पवार आणि वित्त राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांचे अभिनंदन केले.

वडिलांच्या हस्ते‎ प्रतिष्ठानचे उदघाटन: गारवा फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : येथील पंढरी लांबट, विनीत जयस्वाल, रोशन आवारी, रघुवीर कारेकर यांनी एकत्र येत मारेगाव मेन रोडवर सुरु केलेल्या "गारवा" फॅमिली रेस्टॉरंटचे उद‌्घाटन‎ आमलकी एकादशीच्या पर्वावर दि.१० मार्च रोजी‎ करण्यात आले. 
भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट व प्रगतशील शेतकरी पंढरी लांबट यांचे वडील देविदासजी यांच्या हस्ते फित कापून रेस्टॉरंटचा भव्य उदघाटन सोहळा पार पडला.‎ 
याप्रसंगी नरेंद्र ठाकरे, संजय खाडे,‎ खालिद पटेल, ज्ञानेश्वर चिकटे, अनिल देरकर, सौ.शालिनी दारुंडे, उदय रायपरे, नायब तहसीलदार विवेक पांडे, पत्रकार दीपक डोहणे, अमोल कुमरे, प्रतिभा तातेड, दिलदार शेख, पवन ढवस, संजय जिवणे, चंद्रकांत धोबे, प्रसाद ढवस, विशेष म्हणजे रिल्स स्टार विलास झट्टे यांसह विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.‎ 
पंढरी लांबट यांनी मारेगाव येथे फॅमिली रेस्टॉरंट सुरू केले. यावेळी अनेकांनी अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी अल्पहार ग्रहण करून ओपनिंग मेनूचा भरभरून आस्वाद घेतला हे विशेष...