संत नगाजी महाराज मंदिराच्या नियोजित जागेवर रोवली पताका


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : "ऐशा संता शरण जावे" अशा ओळी जनाबाई लिहून गेल्या तर "आजी दिवाळी दसरा, सेना म्हणे संत एती घरा " हा सेना महाराजांचा अभंग.

मारेगाव संत सेनाजी नगाजी महाराजांच्या मंदिराला जागा देण्यात येऊन कित्तेक वर्ष निघून गेली, मात्र मंदिराच्या जागेवर आजतागायत कुठलीच हालचाल झाली नाही. कित्तेक वर्षानंतर युवा पिढी जागृत झाली व मंदिर बांधण्याच्या हालचालीन्ना वेग आला. अणेक बैठका झाल्या. सलून व्यवसायिक व काही इतर नाभीक बांधव दर शनिवारला जागेवर सकाळी एकत्र येऊन त्या जागेवरचा कचरा साफ करू लागली. त्यातील एखादा पुढाकार घेऊन स्वखर्चाने नास्ता देऊन एकत्र येण्याचा व जागेची साफसफाई करण्याचा कार्यक्रम पावसाळ्यापूर्वी नित्य सुरु होता.

मात्र,गेल्या दहा - बारा दिवसापासून एक तेजस सुधाकर मांडवकर नावाचा युवा नाभीक बंधू झपाटल्यागत त्या जागेवर मला भजन करायचं असा आग्रह करू लागला. समाज माध्यमावर सगळ्या बांधवांना सोबत घेऊन त्याने इच्छा प्रकट केली व स्वतः मंदिराच्या जागेवरील कचरा साफसफाई करून जागा स्वच्छ केली.

इंदिरा एकादशीचे अवचित्त साधून त्याने स्वखर्चाने महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून नियोजित जागी पताका रोवली,भजन केले व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी मारेगाव व आजूबाजूच्या गावातील नाभीक बांधवानी व महिला मंडळींनी उपस्थिती दर्शवून सहकार्य केले. व तेजस चे कौतुक केले.

शब्दांकन : रवि घुमे

राजूर येथे भगतसिंग जयंती साजरी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राजूर कॉलरी : देशाला निव्वळ इंग्रजांपासून स्वातंत्र्यच नाही तर या देशाला शोषण विरहित समाजव्यवस्था असलेली समाजवादी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे ह्या साठी लढा देत जनतेमध्ये जागृती करण्यासाठी सातत्याने वृत्तपत्रात लिखाण करणे, रॅली चे आयोजन करणे, जातीभेद नष्ट करण्यासाठी वर्ग जागृती करणे, युवकांचे संघटन बांधणे, त्यांना संघर्षासाठी तयार करणे आदी कार्ये भगतसिंग वयाचा २० व्या वर्षी करीत होते. हे सर्व करीत असताना त्यांना इंग्रजांनी पकडून वयाचा २३ व्या वर्षी फासावर लटकाविले. अश्या या महान शहीद-ए-आझम भगतसिंग ह्यांची जयंती दिनांक २८ सप्टेंबर ला राजूर येथील शहीद भगतसिंग चौकात साजरी करण्यात आली.

शहीद भगतसिंग चौकातील त्यांचा प्रतिमेला गावातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करुन साजरी करण्यात आली. 

या जयंती कार्यक्रमाला कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. नंदकिशोर लोहकरे, प्रीतम हनुमंते, विनोद इंगळे,आशिष पाटील, चैलेश आरमोरिकर, अमर चीटपल्लिवार, स्वप्नील हस्ते, माणिक खैरे, पप्पू भगत, भोला दाढे, लड्डू दुर्गमवार, पोयाम, राजू हिकरे, मास्टर हीकरे आदी गावातील तरुण उपस्थित होते.

सरपंच शुभम भोयर यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांची खा. धानोरकर यांच्याकडे मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पावसाचे पाणी गावाबाहेर जाण्यासाठी भुमिगत नाली बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच शुभम भोयर यांनी खा.प्रतिभा धानोरकर यांच्याकडे केली आहे.
 
मारेगाव तालुक्यातील किन्हाळा ग्रामपंचायत अंतर्गत येणारी गावाच्या बाहेरील भूमिगत नाली ही पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असून गावाबाहेरील पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात संपूर्ण पावसाचे पाणी हे गावामध्ये येत असल्याने ते पाणी गावातील घरांमध्ये शिरल्यामुळे गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकार दरवर्षीच घडत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढून गावकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गावालगत भुमीगत नाली बांधकाम करणे आवश्यक असल्याने या कामासाठी आपल्या स्थानिक विकास निधी मधुन निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी खा. प्रतिभा धानोरकर यांच्याकडे किन्हाळा गावाचे सरपंच शुभम भोयर यांनी केली आहे. 

यावेळी उपसरपंच प्रशांत तोरे, भास्कर कपाळकर, रतन आत्राम, धीरज डांगाले, बंडू क्षीरसागर, विशाल सोमटकर, अनंता काथवटे, पुष्पराज गानफाडे, राजू शास्त्रकार, प्रवीण काकडे, संजय टोंगे, योगेश काथवटे, नितेश भोयर, गुणवंत येरमे, अनंता आसेकर तसेच इतर गावकरी उपस्थित होते.

आशा व गटप्रवर्तकांचा मेळावा यवतमाळ येथे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : आशा व गटप्रवर्टकांना वेतन न देता तटपुंजे मानधन देऊन त्यांच्याकडून आरोग्याची महत्त्वाची कामे करवून घेतली जात आहेत. किमान वेतन कायदा हा मानव म्हणून जगत असताना त्याला मूलभूत असणाऱ्या किमान मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी आजचा घडीला किमान 26000 रुपये मान्य केलेले असताना आशा कर्मचाऱ्यांना वेतन न देता मानधन का दिल्या जाते, असा प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारने घोषित केलेला 15000 हजार रुपये मानधन हा 18 हेड कामे पूर्ण करण्याची सक्ती करणारा शासन निर्णय उलट मानधनात कपात करण्याचा असून हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी ह्या आशा व गटप्रवर्तक संघटना (लाल बावटा) संलग्न सी आय टी यू च्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य जिल्हा मेळाव्यात करण्यात आली.

सीटू संलग्न असलेल्या आशा व गटप्रवर्तक संघटना (लाल बावटा) च्या वतीने यवतमाळ येथील सहकार सांस्कृतिक भवन येथे भव्य मेळावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचा राज्य महासचिव कॉ. पुष्पा पाटील, तर उद्घाटक म्हणून किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके होते. कॉ. मनीष इसाळकर, कॉ. अनिता खुनकर, कॉ. रमेश मिरासे, कॉ. प्रीती करमरकर, निर्मला मेश्राम, विजया शिसले, शिला खेडकर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

या मेळाव्याचे संचालन व प्रास्ताविक संघटनेचा जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे यांनी केले तर आभार कॉ. प्रीती करमरकर यांनी मानले. या मेळाव्याला जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक कामगारांनी भाग घेतला.

पटवारी यांच्या रजा आंदोलनामुळे सामान्य जनतेला मिळत आहे सजा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

झरी : महसूल विभागात पटवारी हा अतिशय महत्वाचा घटक आहे परंतु त्यांच्या मागण्या संदर्भात मागील पाच दिवसांपासून पटवारी संघटनेचा रजा आंदोलन सुरू करण्यात आले असुन त्याची सजा सामान्य जनतेला मिळत आहे म्हणून बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख नेतृत्त्वात झरि तहसील कार्यालयाकडे अर्धवन येथील बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे सदस्य विठ्ठल भाऊ गेडाम यांनी निवेदन सादर केले सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की तालुक्यातील मौजे अर्धवन , रायपूर, दुर्बा कमळवेळी, राजनी सहीत इतरही गावातील वन जमिन धारक शेतकऱ्याचे सन 2024 च्या खरिप हंगामात पेरणी केलेल्या पिकांच्या नोंदी, पंचनामे, स्थळ निरीक्षण, प्रत्यक्ष मोका पाहणी करून पेरणी केलेल्या जमिनीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले असताना पटवारी दिपक मोरे यांनी कारवाई केली नाही आता तर रजा आंदोलनाचे निम्मित सांगून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बिगर सातबारा शेतकरी संघटना ने निवेदनातून केला आहे पटवारी दिपक मोरे हे आदिवासी लोकांसोबत फोन वर व्यवस्थित बोलत नाही, सादर केलेल्या निवेदनानुसार कारवाई करत नसल्यामुळे मौजे रायपूर येथील आदिवासी समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी चा सन 2023 च्या खरीप हंगामात पेरणी केलेल्या जमिनीचा अहवाल सादर केला नाही असे अनेक प्रकार पटवारी दिपक मोरे यांच्या बाबतीत आहेत तरी सुद्धा पटवारी संघटनेच्या रजा आंदोलनाले शामादादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने जाहीर समर्थन करीत असल्याचे मत प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी व्यक्त केले यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सुखदेव कांबळे,अर्धवन सहीत तालुक्यातील बिगर सातबारा शेतकरी उपस्थीत होते.