सरपंच शुभम भोयर यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांची खा. धानोरकर यांच्याकडे मागणी
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : पावसाचे पाणी गावाबाहेर जाण्यासाठी भुमिगत नाली बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच शुभम भोयर यांनी खा.प्रतिभा धानोरकर यांच्याकडे केली आहे.
मारेगाव तालुक्यातील किन्हाळा ग्रामपंचायत अंतर्गत येणारी गावाच्या बाहेरील भूमिगत नाली ही पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असून गावाबाहेरील पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात संपूर्ण पावसाचे पाणी हे गावामध्ये येत असल्याने ते पाणी गावातील घरांमध्ये शिरल्यामुळे गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकार दरवर्षीच घडत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढून गावकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गावालगत भुमीगत नाली बांधकाम करणे आवश्यक असल्याने या कामासाठी आपल्या स्थानिक विकास निधी मधुन निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी खा. प्रतिभा धानोरकर यांच्याकडे किन्हाळा गावाचे सरपंच शुभम भोयर यांनी केली आहे.
यावेळी उपसरपंच प्रशांत तोरे, भास्कर कपाळकर, रतन आत्राम, धीरज डांगाले, बंडू क्षीरसागर, विशाल सोमटकर, अनंता काथवटे, पुष्पराज गानफाडे, राजू शास्त्रकार, प्रवीण काकडे, संजय टोंगे, योगेश काथवटे, नितेश भोयर, गुणवंत येरमे, अनंता आसेकर तसेच इतर गावकरी उपस्थित होते.