सरपंच परिषदेतर्फे PSI प्रफुल भोयर चे जल्लोषात स्वागत व अभिनंदन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील गौराळा गावातील प्रफुल प्रभाकर भोयर याने पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे त्याच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल त्याचे अखिल भारतीय सरपंच संघटना, मारेगाव तर्फे जल्लोषात स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे. 

एका अल्पभूदारक शेतकऱ्याच्या मुलाने जिद्दीने चिकाटीने हे करून दाखवलं. आई वडिलांच्या कष्टाचं चीज झाले. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे भोयर यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पास केली.
बालपणापासूनच पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणारा प्रफुल याने आपल्या अफाट मेहनत आणि स्व:कर्तृत्वाने हे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशाने केवळ त्यांचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण तालुका व गौराळा गाव गौरवान्वित झाले आहे. मुलगा एक दिवस पोलीस अधिकारी बनेल, असे स्वप्न त्याच्या वडिलांचे होते. हे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार झाले आहे. प्रफुल यांनी वडिलांचे स्वप्न लहानपणापासूनच डोळ्यासमोर ठेवून मेहनत केली आणि आज त्यांनी ते पूर्ण करून दाखवले असे मत सरपंच परिषदेचे ता. अध्यक्ष अविनाश लांबट यांनी "सह्याद्री चौफेर"ला बोलताना व्यक्त केले.या प्रसंगी वडिलांचे सुद्धा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. भविष्यात चांगल्या कामगिरीसाठी अखिल भारतीय सरपंच परिशदेतर्फे शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी पंचायत समिती मारेगावचे गट विकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, अ.भा स.प.सचिव सुरेश लांडे, सरपंच प्रवीण नान्हे, सरपंच संदीप कारेकर, सरपंच चंदू जवादे, सरपंच राहुल आत्राम, सरपंच चंद्रकांत धोबे, सरपंच ललिता तुराणकर, सरपंच निलेश रासेकर,सरपंच गोवर्धन तोडासे, उपसरपंच प्रशांत भंडारी, उपसरपंच महेश आत्राम, उपसरपंच सुनील देऊळकर, सरपंच सुरेखा चिकराम, रोजगारसेवक खुशाल येरगुडे, वंचित चे ता.अध्यक्ष गौतम दारुंडे, मारोती तुराणकर,आदींची उपस्थिती होती.

ईश्वर संजय खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


अ|भि|ष्ट|चिं|त|न | वा|ढ|दि|व|स 

तुमचा वाढदिवस प्रेम, हास्य आणि चांगल्या मित्रांच्या सहवासाने भरलेला जावो." या जन्मदिनी आशीर्वाद आणि साहसांचे आणखी एक वर्ष साजरे जावोत."  

आपल्या आजपर्यंत सामाजिक कार्याचा आलेख तर सर्वांना माहीतच आहेच...येणाऱ्या काळात आपल्या प्रगतीचा आलेख गगनाला गवसणी घालो.
लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थाचे उपाध्यक्ष श्री. ईश्वर भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. “तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच निर्मिकाकडे मित्र परिवाराकडून प्रार्थना" 💐

शुभेच्छुक :- 
ईश्वर खाडे मित्र परिवार, वणी 


आगामी विधानसभेसाठी दोन मतदान केंद्रांची वाढ; मारेगाव तालुक्यात नऊ केंद्राचे मतदारांच्या सोयीसाठी विभाजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या दृष्टीकोनातून मतदारांच्या सोयीसाठी तालुक्यात दोन केंद्रात वाढ केली आहे तर, सहा केंद्रात मागणी नुसार विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांना आता मतदान करणे पूर्वी पेक्षा जवळ सोयीचे होणार आहे.
              
तालुक्यातील काही गावातील मतदारांना मतदान केंद्रावर पाच ते सात किमी चे अंतर पार करुन मतदान करायला जावे लागत होते. त्यामुळे मतदान करायला जाणे गैरसोयीचे होत असल्याने याचा परिणाम मतदानावर होत असे. त्यामुळे कमी अंतरावर मतदान केंद्र द्यावे, अशी मागणी मतदारांनी केली होती. याबाबत आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती गौरकार, भाजप तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक डिमन टोंगे आदींनी तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 76 वणी विधानसभा मतदार संघांचे उत्तम निलावाड यांच्या कडे करण्यात आली होती. 

आलेल्या सूचनाचा विचार करून मा. उपविभागीय अधिकारी वणी तथा मतदार नोंदणी अधिकारी, 76 वणी विधानसभा मतदारसंघ यांचे मार्गदर्शनखाली तहसीलदार मारेगांव यांनी खैरगाव बुटी आणि मेंढणी या गावात नवीन मतदान केंद्र निर्माण केले आहे. तर नरसाळा येथील दोन केंद्रा पैकी घोडदरा येथे एक केंद्र देण्यात आले आहे. मच्छिन्द्रा येथील दोन केंद्रा पैकी एक 'डोलडोंगरगाव, गौराळा येथील दोन केंद्रा पैकी एक वरुड, नवरगाव येथील दोन केंद्रा पैकी एक टाकरखेडा, बुरांडा (ख) येथील दोन केंद्रा पैकी एक हटवांजरी,तर सिंधी (म) येथील दोन केंद्रा पैकी एक केंद्र महागाव येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
          
तर दापोराचे मतदार बोरी (बु) येथून काढून चिंचमंडळ येथे, खापरीचे मतदार करणवाडी केंद्रातून काढून बुरांडा (ख) येथे तर, आवळगाव येथील मतदार जळका येथून काढून खैरगाव भेदी येथील मतदान केंद्रात जोडण्यात आले आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी मागणी केली त्यांच्या मागणीला यश आले असून ज्या ज्या गावांना सोयीचे झाले त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. यासाठी महसूल प्रशासनाने हे काम अतिशय तातडीने तडीस लावले असून नव्या बदलाची मतदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 76 वणी विधानसभा मतदारसंघ उत्तम निलावाड यांनी केले आहे.

शाळांची अवस्था बिकट; विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटई भेट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सरकारी शाळांमध्ये कमी होणाऱ्या पटसंख्येमागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरिता शासनाकडून पुरेशा सुविधा नसल्याने सरकारी शाळा ओस पडत आहे. मात्र, जे विद्यार्थी शाळेत आहे त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील यासाठी नगर परिषद शाळा (वणी) क्रमांक ५ येथील शिक्षक विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे चित्र संजय खाडे यांना दिसले. 

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे वणी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. गरिबांना मदत असो, शिक्षणासाठी मदत असो किंवा शेतकऱ्यांना कोणती अडचण असेल तर ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशावेळी संजय खाडे यांनी नगर परिषद शाळा क्रमांक ५ ला भेट दिली. शाळेची अवस्था व्यवस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान शाळेचे दार, खिडक्या तुटलेले, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, फरशी फुटलेली, अशा नानाविध समस्या तिथे होत्या. तिथे शाळेच्या विद्यार्थ्यांना बसण्याकरिता चटई ची आवश्यकता असल्यामुळे संजय खाडे यांनी ताबडतोब विद्यार्थ्यांकरीता चटई देण्याचे आश्वासन दिले आणि लगेचच दोन दिवसात शाळेच्या विद्यार्थ्यांना बसण्याकरिता चटई भेट स्वरूपात दिली. 

यावेळी त्यांच्यासोबत प्रशांत गोहकार, प्रा. शंकर वऱ्हाटे, पुरुषोत्तम आवारी, अरुण चटप, तेजराज बोढे, अंकीतवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्री.खाडे यांच्या हस्ते चटई भेट स्वरूपात स्वीकारताना शाळेच्या मुख्यद्यापिका मिना काशीकर, सहाय्यक शिक्षिका रजनी पोयाम, कोंगरे, डंबारे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


नितेश प्रकाश उईके सेट उत्तीर्ण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील छोट्याशा खैरगाव गावातील प्रकाश मोतीराम उईके यांचा मुलगा नितेश उईके हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र राज्य सहा प्राध्यापक पात्र परिक्षा (सेट) ७ एप्रिल २०२४ घेण्यात आली होती. यात त्याने घवघवीत यश संपादन केले आहे. या परिक्षेचा निकाल दि.५ ऑगस्ट २०२४ ला याचा निकाल लागला असून वाणिज्य शाखेतून नितेश उईके हा उत्तीर्ण झाला आहे. 

त्याचे शिक्षण एम कॉम असुन त्याचेवर अभिनंदन सह कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई दुर्गा व वडील प्रकाश यांना दिले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रा. अविनाश घरडे, डॉ. संतोष गायकवाड, कुलकर्णी सर, तानोरकर मॅडम, खाडे सर, पवार सर, गुंडावार सर, अंदूरकर सर व मित्र परिवारांनी कौतुक केले आहे.