गोदावरी अर्बन वणी शाखेत 'डॉक्टर्स डे' साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसेवा 

वणी : गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को. ऑप.सोसा. लि. नांदेड, कडुन संस्थेचे संस्थापक हेमंत पाटील, अध्यक्षा राजश्रीताई पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, डी जी एम (DGM) सुरेखा दवे,ए जी एम (AGM) विजय शिरमेवार, रवी इंगळे आणि मार्केटिंग मॅनेजर महेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनात शाखा वणीच्या वतीने जागतिक "डॉक्टर्स डे" चे औचित्य साधुन वणी ग्रामिण रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसर डॉ. भक्ती काकडे यांचा सन्मान वणी शाखेत करण्यात आला. 
      
दरम्यान, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन डॉ. भक्ती काकडे यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. काकडे मॅडम यांचे आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
    
यावेळी वणी शाखेतील शाखा व्यवस्थापक विजय मोडक, सहायक शाखा व्यवस्थापक सुनील चिंचोळकर, तुषार ठाकरे, कनिष्ठ अधिकारी सौ प्रांजली ठाकरे, सुरज चाटे, मंगेश करंडे, अमोल देऊळकर, आतिष बुरेवार, जयवंत ओचावार उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत शासन प्रशासन किती गंभीर आहे हे एका पिडीत तरुणीच्या तक्रारी वरून समोर आले आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल असूनही त्यांना अजून पर्यंत पोलिसांनी अटक केली नाही. पोलीस प्रशासनाच्या विरोधात आदिवासी टायगर सेना च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 

आदिवासी टायगर सेना चंद्रपूर च्या वतीने आदिवासी तरुणीवर अत्याचार व फसवणूक प्रकरणाचा पाठपुरावा करीत असताना अत्यंत धक्कादायक बातमी मिळाली की, आरोपींनी पिढीत मुलीच्या बाबतीत कुठलीही हयगय न करता, अश्लील शिवीगाळ, अंगावर हात टाकून तिचे केस पकडून मारहाण करण्यात आली. पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे सुद्धा तिची तक्रार घेतल्यानंतर तीन दिवसांनी तिची FIR घेऊन तिला रात्री एकटीला १ वा.घरी पाठविण्यात आले.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन सुद्धा, ४० दिवसानंतर ही पोलिस विभाग अटक करायला तयार नाही, तेच आरोपी पिढीत मुलीला धमकी देत असतात की, तू कुठंही गेली तरी तुला काही मिळणार नाही. आम्ही पोलिसांना पैसे देऊन आहोत, तू केस वापस घे अश्या प्रकारच्या धमकी बद्दल पिडी त मुलींनी उपविभागीय पोलिस अधिकारी ह्यांना सांगितले असता, उडवा उडवी चे उत्तर पोलिस उप विभागीय अधिकारी देत आहे अशी माहिती पिढीत मुलींनी दिली आहे.
   
आदिवासी टायगर सेना चंद्रपूर च्या वतीने पोलिस अधीक्षक चंद्रपूर, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रपूर, ह्यांच्या भेटी देऊन प्रकरणाचा गांभीर्य समजवून सांगितले. तरीही पोलिस विभागाला जाग येत नाही असे दिसताच आज दिनांक ५/७/२०२४ रोजी जिल्हाधिकारी ह्यांच्या कार्यालय समोर पोलिस विभागाविरुध्द एक दिवसीय धरणे आंदोलन देण्यात आले.

या एक दिवसीय धरणे आंदोलनास विविध सामाजिक संघटना चा पाठिंबा देण्यात आला. त्यात, ओबीसी सेवा महासंघ चे नेते सचिन राजूरकर, भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस चे कादर शेख, इरफान शेख, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे प्रमोद बोरीकर, कृष्णा मसराम, बिरसा क्रांती दल चंद्रपूर ओंकार गेडाम, राजेंद्र धुर्वे, बिरसा सेनेचे कमलेश आत्राम, सोशल एज्युकेशन मुमेंट चे भास्कर मून, ह्यांनी पिढीत मुलीला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व सामाजिक संघटना च्या वतीने रस्ता रोको आंदोलन व चक्का जाम आंदोलन करू असा गर्भीत इशाराही देण्यात आला आहे.

या समोरही आम्ही सर्व आदिवासी टायगर सेना च्या पाठीशी राहून पिढीत मुलीला न्याय मिळून देऊ अशी माहिती सर्व सामाजिक संघटना च्या पदाधिकारीनी यावेळी दिली.
   
या आंदोलनात आदिवासी टायगर सेनाचे अ‍ॅड. संतोष कुळमेथे, विदर्भ अध्यक्ष, जितेश कुळमेथे विदर्भ महासचिव, सुमित्रा आलाम विदर्भ महा, माया पेण्डोर विदर्भ प्रवक्त्या, इंजी. अभिलाष परचाके विदर्भ युवा अध्यक्ष, आयुष मडावी युवा उपाध्याय, निशीगंधा मडावी विदर्भ उपाध्यक्ष युवती, आकाश गेडाम विदर्भ प्रसिध्दी प्रमुख,प्रा.हितेश मडावी जिल्हा अध्यक्ष, वैशाली मेश्राम जिल्हा अध्यक्ष कामगार महिला,माजी सैनिक ड्रेफुल आत्राम जिल्हा उपाध्यक्ष, यशोधरा उईके जिल्हा महासचिव, सोज्वळ कुमरे जिल्हा उपाध्यक्ष, दीपक पेंदोर जिल्हा युवा उपाध्यक्ष, प्रियांका मडावी जिल्हा युवती अध्यक्ष, रंजीत मडावी जिल्हा युवा अध्यक्ष, राहुल पेंदाम जिल्हा युवा उपाध्यक्ष, विराज सुरपाम जिल्हा महासचिव, दामिनी मडावी जिल्हा युवती तालुका अध्यक्ष बल्लारपूर, रज्जु कुळसंगे जिल्हा युवती उपाध्यक्ष, भाग्यश्री कुमरे जिल्हा कोष्याध्यक्ष महिला, सावन ऊईके जिल्हा सदस्य, बाळू कुळमेथे जिल्हा सदस्य, सूरज गावडे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

मार्डी येथील आरोग्य शिबिरात पाचशे रुग्णांनी घेतला लाभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मार्डी येथे त्रिमूर्ती मंगल कार्यालयात दिनांक 4 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत स्व.पारसमल चोरडिया फाऊंडेशन, वणी यांच्या विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

वणी उपविभागीय क्षेत्रात गेल्या 30 वर्षांपासून जनसेवेचे कंन्कर बांधलेले विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायीत्वातुन कस्तुरबा हास्पीटल, सेवाग्राम व चोरडीया हास्पीटल, वणी येथील तज्ञ डॉक्टरांकडुन आरोग्य तपासणी करण्यात आली. 40 पेशंट ऑपरेशन साठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पाठवण्यात आले. शिबिरात बीपी, शुगर, इसीजी व फिजिकल चेकअप 400 रुग्णांचे करण्यात आले आहे. व रुग्णांना औषधी वाटप करण्यात आली असून 450 रुग्णांना दि.16 जुलै 2024 ला मार्डी येथील महादेव मंदिरात चष्मा वाटप करण्यात येणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते विजय बाबू चोरडिया यांनी सांगितले.

दरम्यान,आरोग्य शिबिरात आलेल्या सर्व रुग्णांसह सोबत आलेल्यांना श्री.चोरडिया यांच्या तर्फे चाय, नास्ता व भोजन व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. मंचावर विजय चोरडिया डॉ. हेडगे, सौ. प्रतिभा तातेड (पत्रकार), कु. स्वाती ठेंगणे (सामाजिक कार्यकर्त्या), प्रशांत भंडारी (उपसरपंच वनोजा), भास्कर धानफुले सर, डॉ. रोहीत चोरडिया, मंगेश देशपांडे, उपस्थित होते. या शिबिराचे आयोजक विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वणी, पांढरकवडा, यवतमाळ, व चोरडिया हॉस्पिटल, वणी यांनी केले होते.

शेतकरी व सर्वसामान्यांसाठी संजय खाडे यांची हेल्पलाईन सुरु

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणीशेतकरी, महिला व सर्वसामान्यांसाठी विविध योजनेसाठी लागणा-या मदतीसाठी वणीत चालतं-फिरतं जनहित केंद्र सुरु करण्यात आले. गुरुवारी दिनांक 4 जुलै रोजी दु. 12 वाजता खाती चौक येथील कार्यालयात या केंद्राचे थाटात उद्घाटन झाले. दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरु करण्यात आला. फक्त एक कॉलवर या जनहित केंद्राद्वारे सर्वसामान्यांना मोफत शासकीय योजनेसाठी लागणारी मदत केली जाणार आहे. खा. प्रतिभा धानोरकर व वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनातून व संजय खाडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.   
सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर शेतकरी व मान्यवरांच्या हस्ते फित कापून जनहित केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकरी, विद्यार्थी, महिला, दिव्यांग, निराधार यांची होणारी धावपळ, योजनेचा लाभ घेण्यासंबंधी असलेली अपुरी माहिती. तांत्रिक अडचणी यामुळे अनेक लाभार्थी हे वंचित राहतात, ही समस्या लक्षात घेऊन हे जनहित केंद्र सुरु करण्यात आले आहे, असे मनोगत संजय खाडे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. देविदास काळे होते. जनहित केंद्राचा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे ते लाभा पासून वंचित राहणार नाही, असे मनोगत काळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. यावेळी जयसिंग गोहोकार, घनश्याम पावडे, संध्या बोबडे, काजल शेख इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला सुरेश काकडे, प्रा. शंकर व-हाटे, राजेंद्र कोरडे, पुरुषोत्तम आवारी, अल्का महाकुलकर, विवेक मांडवकर, सुनील वरारकर, अनिल देरकर, तेजराज बोढे, अशोक नागभिडकर, अशोक चिकटे, प्रफुल्ल उपरे, मंदा बांगरे, संगिता खाडे, निलीमा काळे, प्रमिला चौधरी, किरण कुत्तरमारे, संगिता मांढरे, डेव्हिड पेरकावार, डॅनी संड्रावार, महादेव तडेवार, अनंतलाल चौधरी, विकेश पानघाटे, प्रमोद लोणारे, विलास चिकटे, संजय सपाट, सुरेश बनसोड, प्रदीप खेकारे, अशोक पांडे, विठ्ठल पिंपळे, प्रेमनाथ मंगाम, नागोराव आवारी, कुणाल पिंपळे, प्रवीण बदमवार, देवराव देउळकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रमोद वासेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मदत झालेले लाभार्थी, मदतीसाठी आलेले लाभार्थी यांच्यासह सर्वसामान्यांची उपस्थिती होती.

काय आहे चालतं-फिरतं जनहित केंद्र?
शासनाच्या विविध योजनेचा लाभ कसा घ्यावा? त्यासाठी कोणती कागदपत्र जोडावी, ऑनलाईन अप्लाय कसे करावे? याची पद्धत व तांत्रिक माहिती अनेक लाभार्थ्याला नसते. अशा लाभार्थ्यांना हेल्पलाईनवर (9637375455) संपर्क साधावा लागणार आहे. संपर्क करताच जनहित केंद्राची टीम त्या गावात किंवा लाभार्थी राहत असलेल्या ठिकाणी पोहोचणार व लाभार्थ्यांला मदत करणार. याशिवाय खाती चौक येथील कार्यालयात देखील लाभार्थ्यांना मदतीसाठी संपर्क साधता येणार आहे. 

निवृत्त होणाऱ्या सदस्यांची वरिष्ठ सभागृहाचा नावलौकिक उंचावणारी कामगिरी पुढील पिढ्यांना प्रेरणादायी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून त्याचा नावलौकिक उंचावणारी कामगिरी आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी केली आहे. या कामगिरीची दखल विधिमंडळाच्या कामकाजाच्या रुपाने इतिहास म्हणून नोंदवली गेली आहे, या सदस्यांचे कार्य इथे येणाऱ्या नवीन सदस्यांना कामकाजाच्या नोंदीवरून अभ्यासून त्यातून प्रेरणा घेता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना आज निरोप देण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल पाटील, अॅड. अनिल परब, महादेव जानकर, डॉ. मनिषा कायंदे, विजय ऊर्फ भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. मिर्झा वजाहत, डॉ. प्रज्ञा सातव, जयंत पाटील या विधानपरिषद सदस्यांना निरोप देण्यात आला. 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राचे हे वरिष्ठ सभागृह वैशिष्ट्यपूर्ण असून देशात सहा राज्यातच हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाकडे आदरानं पाहिलं जातं. या देशाला संसदीय कार्य प्रणालीचा आदर्श घालून देणारी व्यक्तिमत्वं अनेक दिग्गज, विद्वान या सभागृहाचे सदस्य होऊन गेले आहेत. या सभागृहातूनच महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत महत्वाचे असे कायदे केले गेले आहेत. 

आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी या सभागृहाच्या परंपरेला पुढे नेण्याचे काम केले आहे. राज्याच्या वरीष्ठ सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करुन जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम या सर्व सदस्यांनी केले. आपल्या कामातून या सर्वांनी वरीष्ठ सभागृहाचा लौकिक वाढवला असून जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे, असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच यावेळी निवृत्त होणाऱ्या सदस्यांना पुढील वाटचालीसाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
०००