तेली समामाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे 

राळेगाव : सन २०२४ मध्ये १० वी १२ वी मध्ये गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा हा दि २२ जुन २०२४ ला रोज शनिवारी तेली समाज तालुका राळेगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. अंतरगाव येथील कु.रिया विलास रेवतकर चिखली येथील अनुज धीरज उमाटे, श्रद्धा नंदकुमार भटकर, जान्हवी भोजराज रहाटे, वनोजा येथील पवन सुधीर बुरले, कार्तिक विजय बेलखेडे, अपर्णा प्रभाकर दांडेकर दापोरी येथील, वेदांत विठ्ठल चांभारे,धानोरा येथील कु.वेदिका बालाराम घीणमिने, समीक्षा किशोर फटिंग, तन्मय शंकर डफ, हर्षल गजानन घीणमिने, खैरी येथील ओम विनोद माहुरे, पिंपळगाव येथील कु.अनुश्री धनराज मसुरकार, कु.अनुष्का हेमंत गुजरकर,झरगड येथीलकु जान्हवी रमेश राडे राळेगाव येथील कु.सोनल सुनील साठोणे,हिमांशू प्रदीप पावडे उपरोक्त यादीतील विद्यार्थी यांचा सत्कार तेली समाज राळेगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आला. 

यावेळी अशोक काचोळे जिल्हा उपाध्यक्ष तेली समाज, निलेश गुजरकर तातेश्वर पिसे अध्यक्ष राळेगाव तालुका तेली समाज, ज्ञानेश्वर नावाडे उपाध्यक्ष , संदीप क्षीरसागर उपाध्यक्ष उपाध्यक्ष, गणेश बुरले उपाध्यक्ष, अभय मासुरकर उपाध्यक्ष, सुरेश पाटील उपाध्यक्ष, सचिन राडे उपाध्यक्ष, घनश्याम फटिंग सचिव, विनोद नरड सहसचिव, विनोद माहुरे प्रसिद्धी प्रमुख, बाळुभाऊ धुमाळ राळेगाव शहर अध्यक्ष, निलय धिनमिने युवा आघाडी अध्यक्ष, चंदुभाऊ उगेमुगे कोषाध्यक्ष ,मयुर जुमळे सचिव, सचिन शेंडे सहसचिव,सुनिल सावरकर प्रसिद्धी प्रमुख, निखिल बावणे कोषाध्यक्ष, शुभम बेलखेडे सदस्य ,दुर्वेश उमाटे, सदस्य, प्रमोद ढाले सदस्य, रुपेश लाकडे सदस्य, सचिव चंदेनखेडे, सदस्य ,अक्षय जयसिंकर सदस्य,प्रणव देवतळे सदस्य, सुनिल क्षीरसागर सदस्य, पंकज पाटील सदस्य,अभिनव देवतळे. संजय कारवटकर, अँड संदीप राडे, वाल्मिक मुंडे , किशोर फटींग, गोपाल भटकर, सुरज गुजरकर,प्रदीप पावडे,व आदी राळेगाव तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कत्तलखाण्याकरिता वाहून नेणाऱ्या 12 जनावरांची सुटका

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यात अवैध धंदे फोफावले असून अशा अवैध धंद्याना उधळून लावण्यासाठी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. रविवारी सायंकाळी नाकाबंदी करून मुकुटबन मार्गावर 23 लाख 58 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 
दिनांक 23 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी शहरात पेट्रोलिंग करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली की,काही इसम त्यांचे वाहनात जनावरे (गोवंस) कोंबून वाहतूक वरोरा-वणी मुकुटबन मार्गे आदिलाबाद कडे घेऊन जात आहे. खबऱ्याच्या माहितीवरून स्थागुशा पथकाने मुकुटबन मार्गावरील पेटूर गावाजवळ नाकाबंदी करून सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान भरधाव येणाऱ्या चार वाहनांना थांबवून पंचा समक्ष या वाहनाची तपासणी केली असता प्रत्येक वाहनांमध्ये जनावरे (बैल) एकमेकांच्या पायाला आखूड दोरीने बांधून निर्दयीपणे चारा पाण्याची व्यवस्था न करता कोंबलेल्या स्थितीत दिसून आले. बेलोरा पिकप वाहन क्रमांक (MH 29 BE- 6324), चालक अक्षय अनिल करलुके (वय 28) रा. पूरड-नेरड (ता. वणी), वाहन क्रमांक (MH 32 O- 0237), चालक नितेश रवींद्र किनाके, (वय 22) रा.वंधली ता. वरोरा जिल्हा. चंद्रपुर, वाहन क्रमांक (MH 07 P- 36 68), चा चालक निलेश बंडुजी कोल्हे, 28 वर्ष रा.लोणाराता.ता. समुद्रपुर जिल्हा. वर्धा, बेलोरा पिकप विना नंबर च्या गाडीचा चालक सय्यद शाकीर सय्यद मेहमूद 28 वर्ष रा. चिखलवर्धा ता. घाटांजी जिल्हा यवतमाळ, यांचे ताब्यातील चार वाहनातून 12 बैल व चार वाहन असा एकूण 23 लाख 58 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीकडून चौकशी केल्याने सदर जनावरे सय्यद खय्यम सय्यद गफार रा. मुकुटबन (ता. झरी जामणी) यांच्या सांगण्यावरून वाहतूक करीत असल्याचे सांगितले. सदर जनावरे श्री गुरु गणेश गौशाला, वणी येथे व्यवस्था करण्याकरिता ठेवण्यात आले. आरोपी विरुद्ध वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. 
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अप्पर अधीक्षक पियुष जगताप, स्था.गु.शा. पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात सपोनी अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडूरे, पोलिस अंमलदार उल्लास कुरकुटे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, सतिश फुके सर्व स्था.गु.शा.यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

मंगी वासियांचे आमदार प्रा. अशोक उईके यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राळेगाव : तालुक्यातील मंगी येथील नागरिकांनी राळेगाव विधासभेचे आमदार प्रा. अशोक उईके यांना गावातील विविध समस्यांचे निवारण करण्याबाबत निवेदन देण्यात आले. ते सध्या मतदार संघातील गावागावात भेट देत आहे, गावाकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहे. उईके यांनी मंगी येथेही सदिच्छा भेट दिली, यावेळी शुभम पायघन, स्वप्नील शिंदे, धीरज झाडे, पंढरी रोगे, प्रशांत खडसे, अभिषेक खडसे, नितेश रोगे यासह असंख्य गावकरी उपस्थित होते. 

निवेदनात मंगी डिगडोह ते नागपूर हैद्राबाद महामार्ग ला जोडणारा रोड मागील 10/15 वर्षांपासून नादुरुस्त आहे, तो लवकरात लवकर दुरुस्त करावे, गावातील स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक समस्या येतात विशेषतः पाण्याची समस्या आहे त्या पूर्ण करणे, गावातील जि.प. शाळा अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, त्यासाठी आजतागायत शासनाची मदत मिळाली नाही, उलट गावाकऱ्यांनी लोकवर्गणीतून शाळेची डागडुग्गी केली. त्यासाठी आपण स्वतः पाहणी करून शक्य तेवढ्या लवकर पूर्तता करणे, तसेच महत्वाचे म्हणजे शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे ती अडचण तातडीने सोडवणे, वन्य प्राण्यांचा शेतात हैदोस घालून शेत मालाचे नुकसान होत आहे,आपण लोकप्रतिनिधी या मतदार संघांचे असल्यामुळे ह्या समस्यांचे निवारण करण्यात यावे असे दिलेल्या निवेदनातून मागणी केली जात आहे. 

पुढे निवेदनात असंही म्हटलं आहे की, आपल्या पक्षाच्या आणि आमदार साहेबांच्या प्रचारासाठी आम्ही झटलो परंतु आमच्या शेताचा माल शेतातून घरी आणण्यासाठी चांगला रस्ता नाही, आमच्या पिढ्यानं पिढ्या शेती करित आहे तरी देखील शेतात जाण्यासाठी धड रस्ता नाही, शेती साठी पाणी मिळत नाही, विजपूरवठा नाही, साहेब तुम्ही आमचे भाग्य विधाते आहात परंतु आपले गरीब जनतेकडे फारसे लक्ष नाही, आम्हाला न्याय द्यावा व निवेदनाची दखल घेऊन उपाय योजना कराव्यात अशी ग्रामवासियांकडून आग्रही मागणी करण्यात आली आहे. 

केळापूर येथे बिगर सातबारा शेतकरी संघटनेची महत्वपूर्ण बैठक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा : दलीत, आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या वनजमिनधारकांच्या न्याय हक्कासाठी संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संविधानात्मक मार्गाने पाठपुरावा करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी संघटना बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने केळापूर येथे खरिप हंगामात पेरणी करिता संरक्षण बाबत बैठक बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा तथा शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांच्या अध्यक्षेतेखाली केळापूर येथील जगदंबा संस्थान येथे नुकतीच संपन्न झाली असुन या महत्वपूर्ण बैठकीला संघटनेचे नेते भाई जगदीश कुमार इंगळे उपस्थित होते.

या बैठकीला मार्गदर्शन करताना भाई म्हणाले की,शासनाने हस्तलिखित सातबारा उतारा लिहणे बंद करून संगणकीय प्रणाली मध्ये विकसित केला.परंतु दलीत आदिवासी समाजाच्या लोकांनी महसूल व वन भूमीवर शेतीसाठी अतिक्रमण केले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मशागत व पेरणी करनार आहेत,परंतु पटवारी पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 17प्रमाणे आंदोलनात्मक भूमिका घेऊन पाठपुरावा करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून आंदोलनाची जबादारी दलीत पँथर चे केंद्रीय कार्य अध्यक्ष तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या कडे सोपविण्यात आली आहे. 

मार्गदर्शन करताना भाई म्हणाले की, प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू आहे परंतु महसूल व वन भूमी वर पेरणी केलेल्या पिकांच्या नोंदी घेऊन पिक विमा भरून घेणे अपेक्षित असताना पिकांचा विमा भरून घेतल्या जात नाही म्हणजे सरकार जाती जाती मध्ये माणसा माणसा भेदभाव करत होते परंतु आता पिकासोबत सुद्धा भेदभाव करत असल्याचा आरोप करून विमा हा पिकांचा आहे मग ते पिक बिगर सातबारा जमिनीवरील असो की, सातबारा असलेल्या जमिनी वरील पिक हे पिकचं असते. परंतु पिकसोबत भेदभाव होत असल्यामुळे त्यासाठी सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही असे भाई जगदीश कुमार इंगळे यांनी सांगीतले तसेच ज्या लोकांचा वर्षानुवर्ष जमिनीवर कब्जा आहे अश्या जमिनीवर खड्डे खोदून जमीन निष्कासित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर सुद्धा गांभीर्याने विचार करावा लागेल असे भाई नी बैठकीत सांगीतले.

यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष अजय भाऊ मंडपे, युवा नेते अजय भाऊ खाडे उपस्थित होते. या बैठकीला बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते उरकुडा गेडाम, मानवी हक्क सुरक्षा दलाच्या राष्ट्रीय कार्य अध्यक्ष डॉ रेखा मॅडम यानी व्हिडिओ कॉन्फर्सद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी बैठकीचे आभार प्रदर्शन पुरुषोत्तम कोडपे यांनी केले असुन झारी (जामणी) तालुका व केळापूर तालुक्यातील अनेक गावचे बिगर सातबारा शेतकरी महिला पुरुष सहभागी होते.

शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरू -मनसे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : प्रशासन व वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने तालुक्यात शेतकरी त्रस्त आहे. “शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्यांना खपवून घेणार नाही”,शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरू, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी पत्रपरिषदेत खडसावून सांगितले.

मारेगाव शासकीय विश्राम गृहामधील आयोजित पत्रपरिषदेत बोलताना उंबरकर म्हणाले, एकीकडे शेतकऱ्यांवर चहूबाजूंनी संकट येत असतानाच पेरणी करण्यासाठी बियाणे खरेदी केल्यानंतर मात्र, काही बियाणे बोगस निघत आहेत. बेरोजगारी वाढली आहे, महावितरण चा भोंगळ कारभार सातत्याने सुरूच आहे, वनविभाग, कृषी विभाग, व तहसील यांचे जनतेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच आता राजू उंबरकर यांनी पत्र परिषद घेऊन तालुक्यातील समस्या उजागर करण्यासाठी सुरुवात केली आहे. विद्यमान लोकप्रतिनिधिवर ताशेरे ओढत लोकप्रतिनिधीचे उदासीन धोरण येथे कारणीभूत ठरत असल्याचा आरोप यावेळी उंबरकर यांनी केला.

तालुक्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असतानाच मनसेसैनिक रस्त्यावर उतरून प्रशासनाचा खरा मुकुट जनतेसमोर आणण्याचं कामं करणार असल्याचा गर्भीत ईशारा देण्यात आला.

या परिषदेत पक्ष नेते राजू उंबरकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, महिला तालुका अध्यक्ष उज्वला चंदनखेडे, उपाध्यक्ष उदय खिरटकर, शेख नबी, आदी तालुक्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.