विवाहित इसमाने केली विहिरीत उडी घेऊन आत्महत्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील प्रभाग क्रमांक 1 मधील एका विवाहिताने काल मंगळवार च्या रात्री विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

विजय नामदेव काळे (54) असे विहिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपवलेल्या इसमाचे नाव आहे. त्यांनी अंतिम टोकाचे पाऊल उचलत मारेगाव शिवारात असलेल्या ठाकूर यांचे शेतातील विहिरीत उडी घेतली.

मंगळवारी रात्री 8 वाजताचे दरम्यान, घडलेली घटना उघडकीस आल्यावर मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरारीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. विजय यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगी व मुलगा असा बराच आप्त परिवार आहे.

चक्क...चालल्या कारने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : दी बर्निंग ट्रेन नावाचा हिंदी चित्रपट 1980 मध्ये आला होता त्या सिनेमात चालती ट्रेन जळत अख्खा सिनेमा दी एंड बघितला असेल असेच दृश्य मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वाहनाला बर्निंग दृश्या प्रमाणे अचानक आग लागल्याने वाहन रस्त्यावर जळू लागले. कारला आग लागल्यानंतर कार चालवणाऱ्यानी 'दी एंड' बघितला. मात्र, कार मधील व्यक्तीसह अन्य काही सदस्यांनी कारमधून आधीच आपला जीव वाचवला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच आगीने संपूर्ण वाहनावर नियंत्रण मिळवले आणि काही कळण्यापूर्वी वाहनाने पेट घेतला,आग इतकी वेगाने पसरली की कार पूर्णपणे जळून खाक झाली.

प्राप्त माहिती नुसार मारेगाव वरून खंडणी कडे जात असताना मारुती अल्टो कारने अचानक पेट घेताच गाडीमधील पवन नक्षणे व त्यांची पत्नी व लहान बाळ समयसुचकतेने गाडीबाहेर पडले. सुदैवाने समोरील अनर्थ टळला. अवघ्या काही वेळात कारला आगीने कवेत घेत कार क्र. (एम एच 34 एफ 3898) जळून खाक झाली.

तालुक्यातील खंडणी येथील पवन यदुनंदन नक्षणे सह त्यांच्या पत्नी आणि दीड वर्षाचा चिमुकला हे तिघे बोटोणी येथून खंडणीकडे निघाले. काही वेळातच खैरगांव फाट्यानजिक कारला अचानक आग लागली. आग लागताच गाडीतील तिघेही कारच्या बाहेर पडले. काही समजण्यापूर्वी आगीने कार पूर्णतः जळून खाक झाली. दरम्यान दी बर्निंग ट्रेन सिनेमाचा सिन प्रमाणे प्रवाश्यासह कार मालकाने अनुभवला.. हे विशेष 

जयंता उर्फ खुशाल कातोरे यांचे अपघातात निधन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वरोरा-वणी राज्यमार्गावर सोमवारी एका सुपरिचित व्यक्तिचा अपघाती निधन झाल्याचे माहिती समोर आली असून जयंता उर्फ खुशाल महादेव कातोरे (56) असे त्याचे नाव आहे. ते शहरातील एका खासगी कामावर कार्यरत होते. 

मृतक खुशाल हे पत्नी सह 22 एप्रिल 2024 रोजी वरोऱ्याला आई ची तब्बेत बघण्यासाठी गेले, आईची भेट घेतली दिवसभर गप्पागोष्टी केल्या आणि त्यानंतर ते परत वणी च्या दिशेने निघाले असता सायंकाळी साडेसात वाजताचे सुमारास अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने खुशाल यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना गणपती मंदिर वणी-वरोरा बायपास जवळ घडली. 

शहरातील एका खासगी कामावर सुपरिचित असलेले सर्वांशी आदराने संवाद साधणारे मनमिळाऊ स्वभावाचे कर्तव्यदक्ष समजल्या जाणाऱ्या खुशाल महादेव कातोरे यांचे असे अकाली निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जयंता उर्फ खुशाल त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व असा आप्त परिवार असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

इंडिया आघाडी ही डुप्लिकेट आघाडी आहे-देवेंद्र फडणवीस


सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

राळेगाव : एकीकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांची ओरिजनल आघाडी आहे तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना उबाठा, शरद पवार गट यांची डुप्लिकेट आघाडी आहे. ही आघाडी देशाचा कुठलाही विकास करू शकणार नाही, त्यामुळे मतदारांनी ओरिजनल आघाडीलाच मतदान करून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगाव येथे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील
यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये केले.

रविवारी (ता.२१) गांधी ले-आउट येथे ही प्रचार सभा झाली. सभेला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार अशोक उईके, संदीप धुर्वे, संजयरेड्डी बोदकुरवार, नामदेव ससाने, भीमराव केराम, कृष्णराव पांडव, आशिष जयस्वाल, वसंत घुईखेडकर, राजू उंबरकर, जीवन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे असे म्हणाले होते, ज्या दिवशी काँग्रेससोबत युतीची वेळ येईल, त्या दिवशी शिवसेनेचे दुकान मी बंद करेल. पण उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची काँग्रेसशी युती करीत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले. सोबतच राज्यानेसुद्धा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले.

गडचिरोलीत लोकशाहीचा विजय

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

गडचिरोली… दुर्गम, वनाने वेढलेला, आदिवासी आणि मागास अशी ओळख असलेला जिल्हा. खरे तर विपुल वनसंपदा, खनिजसंपत्ती, नद्यांचा प्रदेश आणि आदिवासी संस्कृतीचे जतन करणारा यासोबतच लोकशाहीवर विश्वास ठेवणारा अशी या जिल्ह्याची ओळख असायला हवी.

येथे 19 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा-2024 च्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 72 टक्के मतदारांनी लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी दर्शवित मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य चोखपणे बजावले. मागील दोन्ही लोकसभा निवडणूकीत देखील हा मतदार संघ मतदानाच्या टक्केवारीत राज्यात अग्रेसर होता. राज्यात इतर मतदार संघापेक्षा येथील मतदानाचे प्रमाण नेहमीच सर्वाधिक राहीले आहे. उल्लेखनीय म्हणजे इतर ठिकाणापेक्षा या जिल्ह्यात मतदानाची वेळ तीन तासांनी कमी होती, यासोबत दुर्गम आणि वनांच्छादित भागातील वाहतुकीच्या अडचणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंडखोरांकडून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या धमक्या या सर्वांना न जुमानता तळपत्या उन्हात नागरिकांनी रांगा लावून मोठ्या संख्येने मतदान केले.

मतदारांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद दबावाला बळी न पडता मतदानाचा मूलभूत हक्क बजावण्याचा नागरिकांचा अढळ निर्धार अधोरेखित करतो. येथील भरीव मतदान हे लोकशाही प्रक्रियेवरील सामूहिक विश्वासालाही पुष्टी देते. गडचिरोलीच्या नागरिकांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत निवडणूक व्यवस्थेचे पावित्र्य राखले आहे. धमक्यांना धैर्याने झुगारून आणि आपला निवडणूक हक्क सांगून त्यांनी लोकशाहीच्या तत्त्वांप्रती आपली अतूट बांधिलकी दाखवून दिली आहे. गडचिरोलीच्या मतदारांनी दाखवलेले धैर्य आणि मतदानाप्रतिची दृढ भूमिका ही प्रतिकूल परिस्थितीत लोकशाही टिकून राहण्याचा आणि लोकांचा आवाज भीतीने किंवा जबरदस्तीने बंद करता येत नसल्याचा महत्त्वपूर्ण संदेश देते.

निवडणूक सुरळीतपणे घेण्यासाठी जिल्हा प्रशासन देखील दिवस-रात्र राबले. विशेष म्हणजे जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हा निवडणूक अधिकारी श्री संजय दैने हे देखील निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच बदलीने येथे आले होते. त्यातच निवडणुकीच्या चार दिवसांपूर्वी त्यांचे वडील वारले तरी देखील वैयक्तिक दुःख बाजूला सारून त्यांनी निवडणुकीच्या राष्ट्रीय कामात स्वतःला झोकून दिले. त्यांचा पूर्वानुभव दांडगा असल्याने निवडणूक यंत्रणेकडून त्यांनी तत्परतेने कामे करून घेतली. निवडणूक काळात जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण आव्हान अनुभवी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी लीलया पेलले. गडचिरोलीत आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या शांततापूर्ण वातावरणात निवडणुका कधीच पार पडल्या नव्हत्या. यासाठी श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात तब्बल 16 हजार जवानांची फौज येथे जीवाची जोखीम पत्करून खडा पहारा देत होती. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांनी देखील आपल्या यंत्रणेचा पुरेपूर वापर करत ग्रामीण भागातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले होते.

देशात सर्वत्र लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना त्यात गडचिरोलीतील मतदारांनी धैर्य आणि अडथळ्यांना तोंड देऊन निवडणूक प्रक्रियेशी निभावलेली दृढ वचनबद्धता हा लोकशाहीवरील विश्वासाचा आणि पर्यायाने लोकशाहीचा विजयच म्हणावा लागेल.