संभाजी ब्रिगेडच्या समर्थनाने आ.प्रतिभा धानोरकरांचे पारडे जड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 मारेगांव : लोकशाही महोत्सवाची पहिल्यां टप्प्याने सुरुवात केली आहे. बुधवार 27 मार्चला उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख होती आणि या अंतिम तारखेला महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर तथा वंचीत बहुजन आघाडी चे अधिकृत राजेश बेले यांचे सह विविध उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. 26 मार्च ला भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला होता.सर्वच उमेदवारांनी आप आपल्या समर्थका सह शक्ती प्रदर्शन केले आहे.मात्र शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल करणाऱ्या कांग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना सभाजी ब्रिगेडनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ताईच्या रॅलीचे पारडे जड झाल्याचे दिसून आले आहे.

यावेळी उबाठा शिवसेनेसोबत युती असलेली संभाजी ब्रिगेडचे हजारो कार्यकर्ते वणी विधान सभेतून प्रतिभाताई धानोरकर यांच्या समर्थनार्थ चंद्रपूर येथील मिरवणूकीत दाखल झाली होती. जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी घोषना देत आसमंत दणानुन सोडला होता.विशेष म्हणजे आघाडीतील सर्वच नेते मंडळी एकजुटीने सहभागी झाली होती.उमेदवारी मागे घेण्याच्या तारीखे नंतर रंगतीची ताकत स्पष्ट होणार आहे.सध्याच्या परिस्थिती मध्ये सभाजी ब्रिगेडने आपली दाखवलेली राजकीय प्रशिक्षित पणाची झलक सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.

लोकसभा निवडणूकीचा धुमधडाका चालु असून या निवडणूकीत कोण बाजी मारेल सांगणे कठिण असले तरी शक्ती प्रदर्शनातून माहोल निर्माण करणे प्रचाराचे माध्यम ठरत आहे.या रॅलीच्या प्रचाराची धुरा करण्यात सभाजी ब्रिगेडने खांद्यावर घेतली होती.त्यामुळे माहोल तयार करण्यात मोठा हातभार लागला आहे.मात्र हा माहोल कायम मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकल्यास उमेदवाचा विजय निश्चित मानल्या जाते असे कार्यकर्ते आपला अनुभव कथित करीत आहे.दि.खा.बाळूभाऊ धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाची सहानुभूती मतदार संघात कायम असून या सहानुभूतीचा काही प्रमानात फायदा हा उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना होईल अशी शक्यता वर्तीविली जात असतानाच सभाजी ब्रिगेड या प्रशिक्षित पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्यामुळे गर्दीत भर पडली असून ग्रामीण भागात या रॅलीने त्यांच्या प्रचाराचे वातावरण गरम केले आहे.

36 उमेदवारांनी दाखल केले लोकसभेसाठी 48 नामांकन

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरिता नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. 27) 29 उमेदवारांनी 37 नामनिर्देशनपत्र दाखल केली. त्यामुळे अर्ज भरणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या 36 तर दाखल नामांकन पत्रांची एकूण संख्या 48 झाली आहे.

बुधवारी नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या आ.प्रतिभा धानोरकर यांनी 3. वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले यांनी 3, विद्यासागर कासर्लावार यांनी 1, भीमसेना पक्ष 1 अर्ज अपक्ष म्हणून, नामदेव माणिकराव शेडमाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) यांनी 2 अर्ज, जावेद अब्दुल कुरेशी यांनी १ अर्ज, अपनी प्रजा हित पार्टी 1, रमेश मडावी यांनी 1, बहुजन समाज पार्टीनी 1 नामांकन अर्ज दाखल केला आहे. याशिवाय पूर्णिमा घनमोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), दिवाकर गुलाब पेंदाम (विरों के वीर इंडियन पार्टी), मोरेश्वर बडोले (अपक्ष), मिलिंद दहिवले (अपक्ष), सेवकदास बरके (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक), अमोल कोमावार (हिंदू राष्ट्र संघ), राजेंद्र रामटेके (बहुजन समाज पक्ष), राजेंद्र हजारे (अपक्ष), दिनेश मिश्रा (अपक्ष), वनिता राऊत (अखिल भारतीय मानवता पक्ष), जावेद मजिद अब्दुल (अपक्ष), विकास लसंते (सन्मान राजकीय पक्ष), संदीप वाघमारे (अपक्ष), प्रमोद देठे (अपक्ष), संजय गावंडे (अपक्ष), संजय टेकाम (अपक्ष), राजेश घुटके (अपक्ष), शेख वजीर (अपक्ष), सूर्या अडबाले (अपक्ष), अनिल डहाके (अपक्ष), दिवाकर उराडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), दिलीप माकोडे (अपक्ष), गीता मेहर (अखिल भारतीय परिवार पार्टी) यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सात उमेदवारांनी 11 नामांकने दाखल केली होती.

ट्रॅक्टरवर टाकला महसूल विभागाने छापा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील कानडा परिसरात ट्रॅक्टरने अवैध रेती वाहतूक करीत असतांना महसूल विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकत एका ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई मंगळवारला मध्यरात्री केली. त्यामुळे कमालीचे तस्कर दहशतीत आले आहे.

मारेगाव तालुक्यात वाळू तस्करांचे जाळे फोफावले असतांना येथील तहसीलदार उत्तम निलावाड हे स्वतः एक्शन मोडवर येत पथक कार्यान्वित केले. यात मागील दोन महिन्यात अनेक वाहनावर धडक कारवाई करून तस्करांचे मनसुबे हाणून पाडले. त्यामुळे त्यांच्या प्रशासकीय सेवेतील पारदर्शकतेच्या मूल्यमापनाचा आलेख दिवसागणिक वाढत आहे.

दरम्यान, सातत्याने अवैध रेती तस्करांवर केल्या गेलेल्या कारवाईनंतरही रेती तस्करांची अवैध चोरी कायम असतांना मंगळवारला रात्री कानडा मुकटा पांदण रस्ता येथे मध्यरात्री रेतीचे ट्रॅक्टर अवैध वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच महसूल पथक घटनास्थळी दाखल होऊन जप्तीची दोन वाजता कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अमोल गुघाने, तलाठी शिंगणे, कुडमेथे, सोयाम, मडावी यांनी केली.

उष्माघात सारख्या समस्या टाळण्यासाठी हे उपाय करा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या आहेत. कमाल तापमानात वाढ झाली आहे. मार्च महिन्यातच कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. तापमान वाढल्यामुळं स्ट्रोकसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे ते हायड्रेट राहणे. भरपूर पाणी पिणे. प्रवास करताना डिहायड्रेश जाणवत असेल तर लिंबू पाणी प्यावे. पण शक्यतो अशावेळी पाणीसोबतच असू द्यावे. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे घरगुती पेयच प्या. सैल व सुती कपडे घाला. 

उष्माघाताची कारणे
भर उन्हात अतिकष्टाची कामे करणे, तापमान जास्त असणाऱ्या ठिकाणी काम करणे, घट्ट कपडे वापरणे

उष्माघाताची लक्षणे काय?
मळमळ, नैराश्य, डिहायड्रेशन, ब्लड प्रेशर वाढणे, चक्कर येणे, ताप येणे, भरपूर घाम येणे. 

काय काळजी घ्याल?
- अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करा. 
- सफेद किंवा सौम्य रंगाचे कपडे घाला. शक्यतो कॉटनचे कपडे घ्या. 
- भरपूर पाणी प्या, लिंबू-पाणी, लस्सी, ताक, नारळपाणी पित राहा. 
- उन्हात बाहेर पडताना गॉगल, टोपी, छत्री, इत्यादी घेऊनच बाहेर पडा. 
- उन्हात पार्क केलेल्या गाडीत मुलांना व प्राण्यांना बसवू नका.


टी एस सी मिर्ची व हळद पावडर शॉपी शुभारंभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मेघदूत कॉलनी (चिखलगाव) येथे टी एस सी मिर्ची पावडर व हळद पावडर शॉपीचे भव्य शुभारंभ दि.22 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वा. संपन्न झाला आहे.
टी एस सी नवीन प्रतिष्ठानचे उदघाटक मा.श्री. रमेशजी मडावी (अध्यक्ष क्रांतिवीर बिरसा मुंडा सार्व. वाचनालय वणी) यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी तिरु.शंकर किनाके, प्रा. डॉ. अजय देशपांडे, डॉ गुलशन कुथे, प्रा. व्यास, प्रा. जंत्रे, मुकेश वाढई, सामाजिक कार्यकर्ता लीलाधर आरमोरीकर, रामदासजी गेडाम, वसंतराव चांदेकर, कृष्णाजी मडावी, भाऊरावजी मडावी, पत्रकार कुमार अमोल, महेश आत्राम, पुरुषोत्तम सोयाम, आदींची कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होती.
अल्पोपहार नंतर या प्रसंगी टी एस सी मिर्ची पावडर व हळद पावडर शॉपीचे संचालक श्री चांदेकर बंधू यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व पाहुण्यांचे तसेच महिला भगिनींचे सुद्धा मनःपूर्वक आभार मानले.