संभाजी ब्रिगेडच्या समर्थनाने आ.प्रतिभा धानोरकरांचे पारडे जड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 मारेगांव : लोकशाही महोत्सवाची पहिल्यां टप्प्याने सुरुवात केली आहे. बुधवार 27 मार्चला उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख होती आणि या अंतिम तारखेला महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर तथा वंचीत बहुजन आघाडी चे अधिकृत राजेश बेले यांचे सह विविध उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. 26 मार्च ला भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला होता.सर्वच उमेदवारांनी आप आपल्या समर्थका सह शक्ती प्रदर्शन केले आहे.मात्र शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल करणाऱ्या कांग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना सभाजी ब्रिगेडनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ताईच्या रॅलीचे पारडे जड झाल्याचे दिसून आले आहे.

यावेळी उबाठा शिवसेनेसोबत युती असलेली संभाजी ब्रिगेडचे हजारो कार्यकर्ते वणी विधान सभेतून प्रतिभाताई धानोरकर यांच्या समर्थनार्थ चंद्रपूर येथील मिरवणूकीत दाखल झाली होती. जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी घोषना देत आसमंत दणानुन सोडला होता.विशेष म्हणजे आघाडीतील सर्वच नेते मंडळी एकजुटीने सहभागी झाली होती.उमेदवारी मागे घेण्याच्या तारीखे नंतर रंगतीची ताकत स्पष्ट होणार आहे.सध्याच्या परिस्थिती मध्ये सभाजी ब्रिगेडने आपली दाखवलेली राजकीय प्रशिक्षित पणाची झलक सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.

लोकसभा निवडणूकीचा धुमधडाका चालु असून या निवडणूकीत कोण बाजी मारेल सांगणे कठिण असले तरी शक्ती प्रदर्शनातून माहोल निर्माण करणे प्रचाराचे माध्यम ठरत आहे.या रॅलीच्या प्रचाराची धुरा करण्यात सभाजी ब्रिगेडने खांद्यावर घेतली होती.त्यामुळे माहोल तयार करण्यात मोठा हातभार लागला आहे.मात्र हा माहोल कायम मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकल्यास उमेदवाचा विजय निश्चित मानल्या जाते असे कार्यकर्ते आपला अनुभव कथित करीत आहे.दि.खा.बाळूभाऊ धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाची सहानुभूती मतदार संघात कायम असून या सहानुभूतीचा काही प्रमानात फायदा हा उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना होईल अशी शक्यता वर्तीविली जात असतानाच सभाजी ब्रिगेड या प्रशिक्षित पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्यामुळे गर्दीत भर पडली असून ग्रामीण भागात या रॅलीने त्यांच्या प्रचाराचे वातावरण गरम केले आहे.