वणी येथे T-10 चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्दघाटन


सह्याद्री चौफेर | दिगांबर चांदेकर 

वणी : पारसमल प्रेमराज ज्वेलर्स वणी प्रस्तुत T-10 चॅम्पियन लीग 2024 टेनिस बाॅलचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यवतमाळ जिल्ह्यातील क्रिडा विश्र्वाच्या इतिहासात सर्वात स्पर्धेचे उदघाटन नुकतेच वणी येथील शासकिय मैदान (पाण्याच्या टाकीजवळ) येथे करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्दघाटन भाजपाचे प्रदेश सदस्य विजय चोरडिया, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, T-10 लीग चे कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड.कुणाल विजय चोरडिया, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अजित जाधव यांच्या प्रमूख व मान्यवरांच्या उपस्थितीत सौ.ख्याती कुणाल चोरडिया यांच्या हस्ते फीत कापून पार पडले.

यावेळी टी-10 चॅम्पीयन लीगचे पदाधिकारी व सदस्य,टीम मालक आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी वणी,मारेगाव,झरी तालूक्यातील नामवंत खेळाडूचा सहभाग असल्यामूळे अतिशय उत्कृष्ठ असे क्रिकेट लीग चे आयोजन केल्याबद्दल परिसरातील सर्व क्रिकेटप्रेमींनी आयोजक समितीचे कौतुक केले आहे. या स्पर्धेला वणी, मारेगाव व झरी तालूक्यातील क्रिडाप्रेमी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

कबड्डीची लोकप्रियता ग्रामीण भागामुळे टिकून - संजय खाडे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला, वाढलेला खेळ आहे. आज जगभरातील 40 पेक्षा अधिक देशांमध्ये कबट्टी हा खेळ खेळला जातो. ग्रामीण भागाने कबड्डीची लोकप्रियता टिकवून ठेवली असून ग्रामीण भागातच या मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात. प्रो- कबड्डीने हा खेळ देशातील घरोघरी पोहोचवला. त्यामुळे या खेळाला ग्लॅमर प्राप्त झाले आणि यात व्यावसायिकता आली. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनी या खेळाकडे आता करिअर म्हणून पाहायला पाहिजे. असे मनोगत रंगनाथ निधी अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय खाडे यांनी केले, भालर येथील सिताई नगरी येथे कबड्डीच्या खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी या स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले, अध्यक्षीय भाषणात ते बोलत
होते.

दीप प्रज्वलन करून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या हस्ते महिला व पुरूष कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, किरण देरकर, संजय देठे, सुनील वरारकर, जगन जुनगरी, वसंत जिनिंग अँड प्रेसिंगचे अध्यक्ष आशिप खुलसंगे, फैजल बशीर खान, विनोद दुमणे, अंकुश बोढे, हसेन बाशा, बाबाराव हेपट, मोईन खान, भगवान मोहिते, मनिष बतरा, विलास कालेकर, बनन वाटेकर यांच्यासह परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती. उद्घाटन पर सामना महिला गटातील खैरगाव विरुद्ध भालर यांच्यात झाला. खैरगाव येथोल महिला संघाने विजयी सलामी दिली. महिलांचे सामने दोन दिवस रंगले, सोमवारी रात्री टीएसओ वणी आणि भोपाळ यांच्यात अंतिम सामना रंगला. यात टीएसो वणी संघ बाजी मारत विजेता ठरला. तर भोपाळ संघ उपविजेता ठरला. तिस-या क्रमांकावर देवठाणा वाशिम, तर चौथ्या क्रमांकावर मुंबईचा संघ राहिला. या स्पर्धेत देशभरातील 16 महिलांचे संघ सहभागी झाले आहे. मंगळवार दिनांक 2 जानेवारीपासून पुरुषांच्या खुल्या गटातील स्पर्धेला सुरुवात झाली. आणखी तीन दिवस
कबड्डीचा थरार रंगणार आहे.

तीन गटात ही स्पर्धा होत असून यातील पहिला गट हा खुला पुरुष गट आहे. दूसरा गट 60 किलो पुरुष गट तर तिसरा गट हा महिलांचा आहे. खुल्या गटात पहिले बक्षिस है 40 हजार, दुसरे बक्षिस 30 हजार, तिसरे बक्षिस 20 हजार तर चौथे बक्षिस 10 हजार रुपये आहे. 60 किलो पुरुष गटासाठी अनुक्रमे 30 हजार, 20 हजार, 15 हजार व 10 हजार तर महिला गटासाठी अनुक्रमे 20 हजार, 15 हजार, 10 हजार व 7 हजारांचे रोख बक्षिस दिले जाणार आहे. जय गुरुदेव सेवा मंडळ भालर यांच्या वतीने, बाबा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था भालर यांच्या सहकार्यातून व स्व. हेमंत खंगार यांच्या स्मृती प्रित्यर्थ या टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा मंडळाचे सदस्य, पदाधिकारी व भालर ग्रामवासी परिश्रम घेत आहे.

त्या कायद्याविरोधात मारेगाव ऑटो चालक-मालक संघटनेचे निवेदन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : केंद्र सरकारने लागु केलेल्या हिट अँड रण कायद्या अंतर्गत दोषी आढळल्यास 10 वर्षांची शिक्षा व 7 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सदर कायद्याविरोधात मारेगाव येथे ऑटो चालक-मालक संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष उमर शरीफ यांच्या नेतृत्वात 'हिट अँड रण' कायद्याच्या निषेधार्थ तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

अपघात घडल्यास जखमींना मृत्युच्या दारी सोडून पळून जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे मुळीच नाही. परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जन्मजात असल्याकारणाने आणि आपल्या भारत देशामध्ये दलित आणि आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरतूद आहे. अशा एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हर ला नसल्याकारणाने चालक हा केवळ स्वतःच्या जिवाच्या भितीने अपघात स्थळावरून पलायन करतो.

केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकर व आटो सह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप करत राज्यातील अनेक भागात वाहनचालकांनी आंदोलन केलं. याच अनुषंगाने मारेगाव येथे तहसील कार्यालयाला संघटनेच्या वतीने त्या कायद्याचा जाहिर निषेध करत निवेदन देण्यात आले.

चालक सुरक्षा कायद्याची प्रथमतः अंमलबजावणी करावी व 7 लाख रु. दंड व 10 वर्षे शिक्षा हा कायदा रद्द करावा अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी शहर अध्यक्ष कपिल सहारे, संदीप ताजणे, सलीम अहमद, धिरज सिडाम, आनंद गोवारदीपे, साहिल कुरैशी, राजू मडावी, निखिल सिडाम, ईश्वर जीवतोड़े, बशीर पठाण, अफरोज खान, पवन गेडाम, सतीश ताठे, अनिकेत कुरेकार, अकील कुरैशी, नवाज शरीफ, अदनान खान, आदि ऑटो संघटनेचे चालक-मालक उपस्थित होते.

अंगणवाडी सेविका मदतनीसची 13531 पदांची होणार भरती..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

गावोगावी सुरू असलेल्या अंगणवड्या म्हणजे चिमूरड्यांचे हक्काचे खेळण्याचे, शिकण्याचे व भरपेट खाण्याचे ठिकाण. गावासह अगदी वाडी-वस्तीवरही अंगणवाडी सुरू आहेत....

याच अंगणवाडीमध्ये काम करण्याऱ्या सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केल्यावर अखेर त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. मागील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Anganwadi Bharati कडे सर्वांचे लक्ष 
एकात्मिक बाल विकास सेवेतील 13 हजार 11 मिनी अंगणवाडी यांना श्रेणीवर्धन करण्याचा हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये प्रत्येकी एक मदतनीस म्हणजे 13 हजार 11 पदांची भरती या निर्णयामुळे होणार आहे. तसेच प्रत्येक 25 अंगणवाडी केंद्रासाठी 1 मुख्यसेविका आणि पर्यवेक्षक अशा पद्धतीने 520 पदांची भरती केली जाणार आहे. एकूणच यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. याद्वारे राज्यात तब्बल 13 हजार 531 पदांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हा श्रेणीवर्धन आणि नव्याने पदाची भरती करण्याचा निर्णय घेतानाच मदतनीस यांना साडी व गणवेश खर्च आणि औषधोपचार खर्च असेही सहाय्य केले जाणार आहे. त्यासाठी तब्बल 116 कोटी 42 लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी कधी आणि केंव्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


जातीयवादी समाजकंटकांकडून तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : भद्रावती तालुक्यातील विजासन बुद्ध लेणी येथील तथागत भगवान गौतम बुद्ध रूपाची विटंबनेचा मारेगाव येथील फुले,शाहू,आंबेडकर विचार मंच च्या वतीने निषेध व्यक्त करीत समाजकंटकांना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती विजासन बुद्ध लेणी जगात प्रसिद्ध आहे. येथील लेणीत असलेल्या अखिल विश्वाला शांती, मैत्री, करुणेचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांच्या मूर्तीची जातीयवादी समाजकंटकाकडून 1 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री विटंबना करण्यात आली. सकाळी आंबेडकरी अनुयायांच्या ही बाब निदर्शनास येताच संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचे मारेगाव येथे पडसाद उमटून जाहीर निषेध करण्यात आला.

मारेगावचे ठाणेदार जनार्धन खंडेराव यांचे मार्फत यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात हेतु पुरस्पर केलेल्या विटंबनेचा तिव्र निषेध करून जातीय सलोखा बिघडवून समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई व मारेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि बुद्ध विहाराला संरक्षण पुरविण्यात यावे मागणी करण्यात आली.

यावेळी विलास रायपुरे, गजानन चंदनखेडे, ज्ञानेश्वर धोपटे,चांद बहादे, राजू बदकी, शब्बीर खान पठाण, साहेबराव नागोसे, प्राणशिल पाटील, गणेश सोयाम आदींची उपस्थिती होती.