आज 1 जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांनी पुकारला बेमुदत संप...


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षांपासून बेमुदत संपावर गेले आहेत. 1 जानेवारी 2024 पासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप होणार आहे.

 विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहेत. त्यामुळे येत्या 1 जानेवारीपासून मारेगावसह महाराष्ट्रातील रेशनदुकानदार बेमुदत संपावर आहेत. 

या मागण्यासाठी रेशन दुकानदारांनी पुकारला संप
● रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50 हजार करा
● मार्जिन मनी 300 रुपये करा
● टू जी (2G) ऐवजी फोर जी (4G) मशीन द्या
● कालबाह्य नियम बदला

एकंदरीत, विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये आता अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने उडी घेतली आहे. त्यामुळे येत्या 1 जानेवारीपासून राज्यातील सर्वच रेशनदुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत. आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा, यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.


सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...



नववर्षाभिनंदन 2024

माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून सर्वांना व तुमच्या संपूर्ण परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
HAPPY NEW YEAR

शुभेच्छुक :- अतुल पचारे
राष्ट्रवादी युवक काँग्रेस ता. अध्यक्ष मारेगाव
भोई समाज तालुका अध्यक्ष, मारेगाव 

गणेशपूर (वणी) येथे ३ जाने २०२४ ला होणार सावित्रीबाई फुले यांच्या लेकीचा जागर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महिला समारोह समिती व छत्रपती महोत्सव समिती च्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ तसेच कवीयित्री असलेल्या सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानली जाते. पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत त्यांनी भारतातील महिलांचे हक्क मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जाती आणि लिंगांवर आधारित लोकांवरील भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक दूर करण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीत त्यांना एक महत्त्वाचे स्थान आहे.
सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी 1884 मध्ये पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली भारतीय मुलींची शाळा सुरू केली. महिलांसाठी शिक्षणाचे द्वार उघडणाऱ्या अशा या महान क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३जानेवारीला गणेशपुर येथे सकाळी ९.३० वा. भव्य मिरवणुक व वेशभुषा स्पर्धा आयोजित केलीआहे. यात विशेषतः गुणवंत पचारे सर संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. छत्रपती स्मारक येथून गावातील प्रमुख मार्गाने ही मिरवणूक निघणार आहे.
सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे उदघाट्क प्रतिभाताई धानोरकर आमदार, भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्र विशेष अतिथी सिता वाघमारे प्रभारी सहा निरीक्षक वाहतूक विभाग वणी मायाताई चाटसे सहायक पोलिस निरीक्षक वणी, किरणताई देरकर संस्थापिका सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन, संगीताताई संजय खाडे अध्यक्ष श्री लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था मर्या वणी , प्रमुख पाहुणे, आशाताई मनोज जुनगरी सरपंच गणेशपुर, विना पावडे , ॲड. रुमेरा शेख, विजयाताई ठाकरे, सुनिता बोढे, रुपाली आवारी, मनिषा घोटकर, विद्या विधाते, सुरेखा बलकी, विद्या भगत, करिश्मा आसुटकर, वर्षा घाटे, उपस्थित राहणार आहे.
उद्घाटनिय समारंभा नंतर जाहिर व्याख्यान सुजाता गुरनुले, कु. अमीषा गहूकार, कार्यक्रम आयोजित केला आहे.
सायं. ६.०० वा. समाज प्रबोधनपर क्रांतीताई काळे यांचे जाहिर किर्तन , प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमाला तमाम जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला समारोह iसमिती, सन्मान स्त्रीशक्ती फाऊंडेशन, गणेशपुर छत्रपती महोत्सव समिती व मित्र परिवार गणेशपुर यांच्या वतीने करण्यात आले आहे*

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


2024
"नववर्षाभिनंदन"

माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून मारेगाव तालुक्यातील तमाम जनतेला नवीन वर्षाच्या....
हार्दिक शुभेच्छा...

नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
🇮🇳HAPPY NEW YEAR 2024🇮🇳

शुभेच्छुक :- प्रवीण बलकी
शिवसेना तालुका संघटक, लाखापुर, मारेगाव 

आधी मोठमोठ्या फेकून केले वशीकरण, आता मात्र जनतेला लुटून होतेय फसवीकरण - मारोती गौरकार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : केंद्र सरकारच्या योजनांच्या प्रचारासाठी भाजपाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकास योजनांचा गवगवा करणाऱ्या रथाला ठिकठिकाणी विरोध होत आहे. तालुक्यातील पिसगांव येथे हा रथ पोहोचला असता ग्रामस्थ संतप्त झाले. नागरिकांनी संकल्प रथ आणणाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत रथाला गावातून पिटाळून लावले. याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
मारेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला हमीभाव, बेरोजगारी, महागाई, खड्डेमय रस्ते अशा अनेक समस्या आहेत. त्यात पिकविमा भरपाईही मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यातच मोदी सरकारचा संकल्प रथ तालुक्यातील गावा गावात जाऊन 'अच्छे दिन' आणल्याचा बाबुलबुवा करत आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून रथ आणणाऱ्यावर प्रश्नांचा भडिमार केला. आधी मोठमोठ्या फेकून वशीकरण केले, आता मात्र जनतेला लुटून फसवीकरण केले जात आहे. आम्ही वैतागलो या फेकू सरकार ला असा आरोप येथील शेतकरी मारोती गौरकार यांनी केला आहे.
तालुक्यातील समस्या सोडविण्याऐवजी मृगजळी विकास झाल्याचा भास जनते समोर ठेवत असल्याने पिसगांव व किन्हाळा येथील नागरिकांनी गावातून 'रथ यात्रा' पिटाळून लावले आहे. पिसगाव येथील शेतकरी मारोती गौरकार यांनी पुढाकार घेत रथ आणणाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. ही यात्रा भारत सरकारची की मोदी सरकारची आहे? असा सवाल त्यांनी केला. नागरिकांच्या प्रश्नांमुळे सैरभैर झालेल्या रथ आणणाऱ्यांनी अखेर गावातूनच पळ काढला.