29 वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांना सहवासातून मिळाला नवचैत्यनाचा अविस्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मित्रांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि बालपणीचे मित्र एकत्रित आल्यानंतर कोणती नवउर्जा देऊन जातात व नवचैतन्याचा अविष्कार कसा होतो, याचा प्रत्यय 29 वर्षांनंतर मारेगाव येथील बदकी भवन सभागृहात काल रविवारी एकत्रित आलेल्या मित्रांना झाला, या स्नेहमिलनातून मित्र वर्गांना मिळाला एक सुखद अनुभव जो सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

आजच्या धकाधकीच्या जीवनात एक समाधानकारक
सहवास देण्याची संधी उपलब्ध करून देतात ते मित्र म्हणूनच म्हणावं लागतं 'दोस्ती खून के रिश्ते से भी काफी गहरी होती है' कारण दोन दशकांपूर्वी एकत्रित शिक्षण घेणारे किशोर वयीन मित्र व्यवहाराच्या व कौटुंबिक जगात आज रोजी पुर्णतः गुंतले आणि एवढया प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा 29 वर्षांपूर्वीचे मित्र भेटलेत तेव्हा सर्वांना प्रत्यय आला की, मित्र हा रखरखत्या वणव्यामध्ये गार गारव्याचा सुखद अनुभव देणारा असतो. उपरोक्त ठिकाणी मित्रांनी एकत्र येऊन उपस्थित मान्यवरांचा सहृदय सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.महेश बदकी, मा. बंडुजी देरकर (चंद्रपूर), मा. अमोल कुमरे, मा.सुरेंद्र भालेराव (झरी जामणी), मा, चेतन बोढाले, मा. मारोती पाचभाई, मा. युगल नागरकर, यशराज भंडारी, समारंभाला उपस्थित होते.

उपस्थित सर्व मित्र वर्गांच्या परिचय सत्राचा आवर्जून उल्लेख करतांना आज जे आपण आहात किंवा जे आपण कमावलं आहे ते आमच्या करिता गौरवास्पद आहे. आयोजकांनी सत्कार अधोरेखित करून मैत्री भाव वाढविण्याचे आवाहन केले तर संचालन करतांना प्रशांतकुमार भंडारी, व कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंदा आसुटकर (गुरुजी) यांनी मित्र हे जीवनाची संजीवनी आहे, आपण त्यांना जपले पाहिजे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्यात तसेच सहभागी मित्रांनी हा आदर्शवत व अविस्मरणीय असा स्नेहमिलनाचा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल आभार व्यक्त केले.

याप्रसंगी भंडारी याने मित्रत्व कायम असावे या यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करून सर्वांची एकत्र मोट बांधली. या वेळी प्रांजली बदकी, दमयंती देरकर, अनामिका बेगानी, गजानन दुमोरे यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना नवीन वर्षाच्या आनंददायी शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी जगन सुरशे, प्रविण बलकी, रुदा सातपुते,  आकाश भोसले, प्रांजली बदकी, शाबान शेख, शाम ठावरी, नंदकिशोर चव्हाण, प्रवीण मिलमिले, मीना चरडे, अनामिका दुग्गड, गजानन दुमोरे, विलास वाटेकर, कमलाकर परचाके, कंचना चहानकर, नरेश निखाडे, गोविंदा आसुटकर, प्रशांतकुमार भंडारी, संगीता ठेंगणे, वंदना टोंगे, नलिनी बदखल, सुनील कुचनकर, तुकाराम माथनकर, दमयंती चिकटे, संगीता खंडाळकर अरविंद आसेकर, चिंतामण भोसले, मंगेश खारकर, यांनी हजेरी लावली. समारोपीय कार्यक्रमात मनोगत, कथाकथानक इत्यादी मधून 29 वर्षांपूर्वीच्या आठवणीना उजाळा देण्यात आला.

याप्रसंगी नागपूर, खामगाव, चंद्रपूर, वर्धा, पांढरकवडा, समुद्रपूर, वरोरा, झरी जामणी, मारेगाव, पुरड (पुनवट), एकार्जुना, वणी, डोलडोंगर गाव, लाखापूर, वांजरी, वनोजा, नांदेपेरा आदी गाव शहरांमधून अनेक वर्ग मित्र-मैत्रिणी सहभागी झाले होते.

वणी येथे मुस्लिम जोडप्यांचा निकाहचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी येथील आशियाना हॉल मध्ये 30 डिसेंबर रोज शनिवार ला शहरातील सुपरिचित आमेर बिल्डर अँड डेव्हलपर व्यावसायिक जमीर खान उर्फ जम्मूभाई यांच्या पुढाकारातून मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक निकाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात एकूण 21 तरुण-तरुणींचे जोडपे विवाहबध्द होणार आहे.

या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी जमीर खान, हाजी रफिक शेख इब्राहीम, रज्जाकभाई पठाण, हाजी असलम चिनी, मो.एजाज, बबलू दिवाण, हाजी निसार अहेमद, हाजी ईसराईल खॉ शाबान खॉ, अकरमभाई, सुलेमान खान, हबीबभाई, शमशेर खॉन, सैय्यद अतिक, अशफाक खॉ मेहबूब खॉ, अन्वर अयाती, मुन्ना खॉन, साकीब इकबाल यांच्या सह मुस्लिम समाज बांधव परिश्रम घेत आहे.

दबावात शांततेत निर्णय घेणे हे बुद्धीबळ शिकवते - संजय खाडे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : बुद्धीबळ हा प्राचिन आणि अस्सल भारतीय खेळ आहे. बुद्धीबळ एकाग्रता, सर्जनशीलता, आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. दबावात देखील शांतपणे नियोजन करणे आणि निर्णय घेणे हे बुद्धीबळ शिकवते. असे प्रतिपादन रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमीटेड,चे अध्यक्ष संजय खाडे यांनी केले. ते विदर्भस्तरीय बुद्धीबळ 2023 या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

मानवी जीवनात बळासोबत बुद्धीला देखील तेवढेच महत्त्व दिले आहे. मैदानी खेळ बळ वाढवते तर बुद्धीबळ हे मानसिक स्वास्थ उत्तम ठेवतं. कोणत्याही वयाचा मनुष्य हा खेळ खेळू शकतो. त्यामुळे बुद्धीबळ सारख्या खेळांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

रविवारी येथील शेतकरी मंदिरात सकाळी 10 वाजता मास्टर चेस अकादमी, वणी द्वारे विदर्भस्तरीय बुद्धीबळ 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतं, या स्पर्धेचे उद्घाटन संजय खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री. खाडे म्हणाले की, वणीत विदर्भस्तरीय स्पर्धा होणे ही एक अभिमानाची बाब आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आवारी, वासेकर, राजेंद्र कोरडे, अशोक नागभीडकर, रामदास कांबळे, महादेव सोनटक्के, भास्कर ढवस यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. 

विदर्भस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा 2023 ही खुल्या गटात होत आहे. या स्पर्धेतील सर्वात वयोवृद्ध स्पर्धक हा 85 वर्षाचा असून सर्वात लहान स्पर्धक हा अवघ्या 5 वर्षांचा आहे. या स्पर्धेत विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यातील एकूण 190 स्पर्धक सहभागी झाले आहे. 8 राउंड मध्ये ही स्पर्धा होणार असून आंतरराष्ट्रीय नियम या स्पर्धेला लागू राहणार आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश ठावरी यांनी केले, तर संचालन संतोष बेलेकर यांनी केले. मास्टर चेस अकाडमीचे संचालक मारोती कांडागुर्ले यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अकाडमीची टीम परिश्रम घेत आहे.

समाज जोडायचा असेल, तर समाजात जात नसली पाहिजे - डॉ. राजरत्न आंबेडकर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : समाज जोडायचा असेल, समाज म्हणून निर्माण व्हायचं असेल तर, पहिली गोष्ट समाजात जात नसली पाहिजे असे प्रतिपादन दी बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी केले, ते मारेगावातील धम्मक्रांती मेळावा आयोजित कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या विदर्भ मराठवाड्यात अजूनही पोटजातींचे राजकारण चालतं,असेही ते म्हणाले. 

परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त मारेगाव येथील बदकी भवन मध्ये धम्म क्रांती मेळाव्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी अभिवादन केले.

यावेळी बोलताना पणतू डॉ. आंबेडकर म्हणाले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जात नष्ट करायला सांगितली, जात हिंदू धर्मात राहून नष्ट होणार नाही हे बाबासाहेबांना माहित होतं, त्यामुळे त्यांनी तो धर्म त्याग केला. आणि असा धर्म शोधून काढला ज्यात जात येत नाही. देशातील इतर धर्म बाबासाहेब यांना विनंत्या करित होते, सर्व काही द्यायला तयार होती, मात्र त्यांनी सर्व काही नाकारले. आणि बौद्ध धर्म स्वीकारला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भन्ते धम्मजोती, प्रमुख अतिथी राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य संघटक वैभव धबडगे, राज्य सचिव सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा अध्यक्ष सतीश इंगोले यांचेसह विजय भरणे, विजय लेले, विशाल इंगोले, अर्जुन बरडे तसेच मारेगाव तालुक्यातील बौद्धजन उपस्थित होते.

धम्म मेळाव्याचे संचालन संगीता कयापाक यांनी केले. प्रास्ताविक स्मिता पुनवटकर तर उपस्थितांचे आभार तेजस्विनी शंभरकर यांनी मानले.

धक्कादायक..जिवंत तारेचा स्पर्श होताच तरुण कामगाराचा मृत्यू


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये मिस्त्री चे काम करत असताना एका 32 वर्षीय विवाहित कामगारांचा हाय होल्टेज च्या विद्युत प्रवाहाशी संपर्क आल्याने मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दि.23 डिसेंबर ला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रफुल्ल विठ्ठल तिवाडे (वय 32) रा. मांगरुळ असे मृतकाचे नाव आहे. वाहिद शेख यांचे घरी संडास आणि बाथरूम चा स्लॅब टाकण्यासाठी काही मजूर कार्यरत होते.त्यात प्रफुल्ल हा संडास वर सळाख टाकत असतांना वरती असलेल्या 11 केव्हीच्या विद्युत पुरवठा होत असलेल्या जिवंत तारांना स्पर्श होताच विजेचा धक्का लागून प्रफुल्ल याला झटका लागला. दरम्यान, त्याला ताबडतोब मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी अंती प्रफुल यास मृत घोषित करण्यात आले.

मृतक प्रफुल याच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.घरावरील जिवंत विद्युत तारा प्रफुल च्या आयुष्याच्या कर्दनकाळ ठरला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.