आज मारेगावात मनसेचा MSEB कंपनी विरोधात "झटका मोर्चा"


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज मारेगाव येथे महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने "झटका मोर्चा" तहसील कार्यालयावर हजारों शेतकऱ्यांना घेऊन पक्ष नेते राजू उंबरकर हे सकाळी 11 वाजता धडकणार आहे.

तालुक्यातील सध्यस्थितीत शेतकऱ्यांची रब्बी हंगामची पिके उभे असून सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी वीज पुरवठा अत्यंत गरजेचा आहे. त्याच बरोबर हा पुरवठा सुरळीत होण्यासाठी या भागात ट्रान्सफार्मर, विजेचे खांब आणि वाहिन्या असणे महत्वाचे आहे. परंतु अशी कुठलीही परिस्थिती तालुक्यात नाही. 2018 पासून ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले. त्यांची जोडणी अद्यापही झालेली नाही. याच बरोबर उच्चदाब आणि कमी दाबाच्या कारणाने अनेक ट्रान्सफार्मर जळालेले आहे. हे ट्रान्सफार्मर बदलून त्याऐवजी दुसरे ट्रान्सफार्मर बसवून देण्यासाठी शेतकरी वारंवार लेखी व मौखिक तक्रारी करतात. मात्र, यांना महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत असतात. याच समस्येला घेऊन तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांनी मनसेचे नेते राजु उंबरकर यांची भेट घेतली होती. आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. या मागणीला घेत आज 28 नोव्हेंबर रोजी मनसेच्या मारेगाव तालुक्याच्या वतीने झटका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते राजु उंबरकर करतील.

 महावितरण कंपनीकडून बऱ्याच समस्या असल्याने या सर्व बाबीचे परिणाम कृषी फिडर आणि गावठाण फिडर वर होत असून यामुळे अघोषित भारनियमन शेतकऱ्यांवर आणि जनतेवर लादले जात आहे. शेतकऱ्यांसाठी विद्युत पुरवठा करणारी स्वतंत्र महाराष्ट्र कृषी वीज वितरण कंपनी स्थापन करू अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना किंमान 8 तास विज पुरवठा सुद्धा होत नाही. महाराष्ट्र कृषी पंप वीज धोरण 2020 नुसार शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला 8 तास वीजपुरवठा करणे बंधनकारक आहे. मात्र, येथील अधिकारी व कर्मचारी आपला मनमानी कारभार चालवत वाटेल तेव्हा पुरवठा चालू आणि बंद करत आहे. जितका वेळ पुरवठा बंद करण्यात येते त्यावेळीचा शिल्लक पुरवठा उर्वरित वेळेत देणे बंधनकारक आहे. कधी कधी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विजेच्या जोडण्या उलट्या केल्या आहेत त्यामुळे मोटार पंप जळतात. असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ह्या सर्व बाबींमुळे शेतीतील सद्यस्थितीतील पिके जळून जात आहे. हीच परिस्थिती गावठाण फिडर वर सुद्धा आहे.

गावातील वीज पुरवठा वाट्टेल तेव्हा बंद करून सर्वसामन्यांना नाहक त्रास महावितरण कंपनी देत आहे, याचा परिणाम गाव खेड्यातील गावकऱ्यांच्या दैनदिन जीवनावर होत आहे. पिठाच्या गिरण्या, पाण्याच्या बोरवेल, शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास, विद्युत उपकरण, मोबाईल चार्जिंग यासारख्या सुविधांवर होत आहे. महावितरणच्या या मुजोर आणि ढेपाळलेल्या कारभाराविरोधात आज मंगळवार ला सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तहसिल कार्यालयावर झटका मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसेचे नेते राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात मार्डी चौक ते तहसिल कार्यालयावर हजारों शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या मोर्चास तालुक्यातील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी हजर राहावे असे, आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांनी केले आहे.

वणी वरून गृहरक्षक दलाचे जवान तेलंगणा येथे रवाना

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : होऊ घातलेल्या तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुक असुन, येत्या 30 नोव्हेंबर रोजी येथील मतदान पार पडणार आहे.

आज सोमवार दि. 27 नोव्हेंबर ला दुपारी तेलंगणा येथील बंदोबस्त साठी तेलंगणा येथूनच आलेल्या महामंडळाच्या 3 बसेस ने महाराष्ट्राचे गृहरक्षक दलाचे जवान रवाना झाले असल्याची अशी माहिती आहे.

होऊ घातलेल्या तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र गृहरक्षक दलाचे जवान वणी मारेगाव, मुकुटबन, शिरपूर, पाटण येथून तेलंगणा कडे रवाना झाले आहेत. 

भाडे करार करायचाय? काळजी करू नका, घरबसल्या ऑनलाईन प्रकारे 'असा' करा भाडे करार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

हल्ली भाडेकरू ठेवताना घर मालक कराराशिवाय घर भाड्याने देत नाहीत. तसेच पोलीस प्रशासनाने भाडेकरूंसाठी ठेवलेल्या काही अटींमुळे अनेकदा भाडेकरू ही मिळत नसल्याच्या समस्या जाणवतात. मात्र या सगळ्यावर मुद्रांक शुल्क विभागाने मार्ग काढला आहे. त्यामुळे घर मालकांनाही मोठा दिलासा मिळला आहे. आता घरमालक आणि भाडेकरू यांच्यात ऑनलाइन भाडेकरार झाल्यानंतर घरमालकांना प्रत्यक्षात पोलिस ठाण्यांत जात माहिती देण्याची गरज नसणार आहे. तसेच, नोटरी अथवा ऑफलाईन कटकटी दुर झाल्या आहेत. 

राज्याच्या ऑनलाईन नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे भाडेकरार नोंदविल्यानंतर त्याची माहिती क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क आणि सिस्टीम्सद्वारे पोलिसांना ऑनलाइन मिळत आहे. त्यामुळे पूर्वीसारखे शंभर किंवा पाचशे रुपयांच्या मुद्रांकावरील भाडेकरार आता कालबाह्य होताना दिसतायेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे नोंदवण्यात येणारे ऑनलाइन भाडेकरार कायदेशीर करण्यात आले आहेत. 

घर भाड्याने घेते/देते वेळी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं घरमालक आणि भाडेकरूसाठी आवश्यक असतं. रेंट अ‍ॅग्रीमेंट अर्थात भाडे करार हा त्यापैकीच एक भाग होय. रेंट अ‍ॅग्रीमेंट करण्यासाठी खूप धावपळ आणि मेहनत करावी लागते. यामुळे घरमालक आणि भाडेकरू अशा दोघांचाही वेळ आणि पैसा खर्च होतो. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता रेंट अ‍ॅग्रीमेंट अगदी घरबसल्या करता येणार आहे.

या प्रकारे करा ऑनलाईन भाडे करार :
● सर्व प्रथम यासाठी भाडेकरू/जमीनमालकांनी ई-फायलिंग वेबसाइट https://efilingigr.maharashtra.gov.in/ereg/ भेट देऊन प्रोफाइल तयार करावे लागेल. 
● प्रोफाईल तयार केल्यानंतर मालकाने मालमत्तेची संपूर्ण माहिती प्रविष्ट करावी. 
● यामध्ये वापरकर्त्याचे गाव, तहसील, मालमत्ता व्यावसायिक आहे की निवासी अशी सर्व माहिती द्यावी लागेल.


बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; वाढलेली धोकादायक झाडे, झूडुपे देताहेत अपघातास निमंत्रण

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यातील रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही वाढलेली झुडपे मृत्यूचे सापळे बनले असल्याने या विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशी संताप व्यक्त करित आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वणी-नांदेपेरा-मार्डी मार्गांवरील बहुतांशी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपामुळे रस्ते अरुंद होत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहनधारक तसेच नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या कसरतीत अनेकवेळा अपघात ही घडले आहेत तर काही जणांना जीवाला मुकावे लागले आहे. असे असतानाही या गंभीर विषयाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सध्या वातावरणात बदल होत असल्याने वळणावरील काही रस्त्यावर मोठी धोकादायक ही काटेरी झूडुप,झाडे समोरून येणाऱ्या वाहणाचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वळण घेतांना वाहनधारकांना धाकधूकीत वाहतूक करावी लागत असून नांदेपेरा - वनोजा देवी मार्गांवरील कडेला वाढलेली काटेरी झुडपे ही वाहनधारकांना अपघातास निमंत्रण देत आहेत. या गंभीर विषयाकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवाश्यातून बोलले जात आहे. 

सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणाऱ्या संजय खाडे यांचा अभिनव उपक्रम

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

वणी : मागील कित्येक वर्षापासून समाजात आपली वेगळी छाप निर्माण करुण, समाजातील प्रत्तेक घटकापर्यंत पोहचून त्यांना आपल्या परिने जमेल ती मदत करण्याचा मानस रंगनाथ स्वामी अर्बन निधीचे अध्यक्ष संजय खाडे यांनी केला असल्याचे दिसून येत आहे.

नुकतेच शहरातील गौशाळेला 51 हजाराची आर्थिक मदत, रंगनाथ स्वामी अर्बन निधीचे अध्यक्ष संजय खाडे यांनी केली होती, असाच समाज उपयोगी उपक्रम शहरातील नृसिंह व्यायाम शाळेत दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री. रंगनाथ स्वामी अर्बन निधी वणीचे अध्यक्ष संजय खाडे व त्यांचे चिरंजीव धनंजय खाडे उपस्थित होते. यानिमित्ताने नृसिंह व्यायाम शाळेच्या लाठीकाठी व कबड्डी चमुनी पुष्पगुच्छ देऊन संजय खाडे व धनंजय खाडे यांचा सन्मान केला, याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना संजय खाडे म्हणाले, नृसिंह व्यायाम शाळा फार जुनी असून या संस्थेने अनेक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवले आहे. व्यायाम शाळा ही आरोग्य हीच धन संपदा आहे. शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ असते. तरच आपण सर्वच क्षेत्रात काम करू शकतो असे मत यावेळी संजय खाडे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी संजय खाडे यांच्या तर्फे नृसिंह व्यायाम शाळेला 21 हजार रुपयांची देणगी देण्यात आली. यावेळी नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, सचिव पुरुषोत्तम आक्केवार, सहसचिव पांडुरंग ताटेवार, कोषाध्यक्ष रमेश उगले, संचालक दिलीप येमुलवार, रमेश शर्मा, विलास आसुटकर, सूर्यकांत मोरे, कन्हैया पारखी, नरसिंह भाई पटेल, इब्बू शेख, मुन्नाभाई शेख, राजकुमार मोरे, प्रेम मेश्राम, देवा राठोड, कुणाल ठोंबरे, यश काकडे, सुजल गाडगे, फैय्याज अली, सय्यद समीर, बंडू निंदेकर, वैष्णवी चामुलवार, कु.आयु उगले, अन्वी इंगोले, गौरी पिदूरकार, संकेत आक्केवार, सागर डोंगरे, समीर सय्यद, कु. छकुली वाढई, राज जमदाडे, डॅनिश पठाण, दुशांत आवारी, माई बोढे, श्रावणी आवारी, डिंपल बदखल, काजल गाडगे, शीतल आडे, बोढे, दोडके उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे आभार सूर्यकांत मोरे यांनी मानले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नृसिंह व्यायाम शाळेच्या सदस्यांनी सहकार्य केले.