मारेगावात धूम स्टाईल रेसिंग करणाऱ्यांचा उच्छाद आवरा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : शहरात सध्या भरधाव रेसिंग फॅडने मारेगावकरांची झोप उडवली आहे. शहरातील रस्ते मोकळे असो की, गजबजलेले असो. स्टंटबाजी करत भरधाव रेसिंग करण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. त्यामुळे हे वेळीच थांबवा अशी मागणी केली जात आहे.
मारेगावात दिवसेंदिवस रेसर बाईक ची संख्या वाढत चालली असुन, सदर रेसर बाईक चालकाकडे कोणत्याही प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स नसुन विनाकारण सुसाट बाईक चालवुन हौदोस निर्माण करीत आहे. परिणामी भरधाव बाईक चालवतांना समोर कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या संदर्भात काही रेसर बाईक चालकांना संघटनेकडुन जॉब विचारणा केली असता, त्यांना कोणत्याही प्रकारची उत्तरे मिळाली नाही. उलट निमूटपणे बाईक धारक 'धूम' ढोकत निघून जातात. हे सर्व प्रकार मारेगांव शहरात ट्राफीक पोलीस नसल्याकारणाने या रेसर बाईक धूम ढोकणाऱ्याना कसल्याही प्रकारची भिती नसल्याची निवेदनात नमूद आहे. 
ज्यामुळे मारेगावकरांना त्रास होतोच आहे. मात्र, या स्टंटबाज आणि भरदिवसा रेसिंगने पादचारी यांच्याही नाकात दम केला. अनेक वेळा याबाबत माध्यमातून वृत्त प्रकाशित करून देखील हे स्टंटबाज आणि भरधाव रेसिंग सुरूच आहेत. आता त्यांच्या मुळावरच घाल घाला व त्यांचा हैदोस आवरा यासाठी जय जगन्नाथ चालक मालक संघटनेच्या वतीने पोलिसात एक निवेदन देऊन मागणी केली आहे. 
निवेदन देताना सचिन देवाळकर, साजीद शेख, किशोर तूरणकर, बन्सी पाटील, बबन पाटील, दत्ता डावरे, प्रफुल उरकुडे, पंकज एम्बडवार, प्रल्हाद कनाके, पवन नक्षणे आदींची उपस्थिती होती. 

वणी येथे बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शिव महोत्सव समिती वणी द्वारा "बळीराजा" व्याख्यानमालेचे दिनांक 27 व 28 ऑक्टोबर रोज शुक्रवार व शनिवारला सायंकाळी 6: 30 वा. बाजोरिया लॉन,वरोरा रोड, वणी येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
शिवमहोत्सव समिती वणीच्या वतीने दरवर्षी दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. व्याख्यानमालेचे हे नववे वर्ष आहे. यावर्षी वक्ते म्हणून मुंबई येथील प्रख्यात व्याख्याते, पत्रकार- संपादक,नाट्यनिर्माते,नट -गायक आणि विचारवंत अशी विविधांगी ओळख लाभलेले तथा मराठीतील सर्वाधिक खपाच्या साप्ताहिक "चित्रलेखा"चे संपादक मा. ज्ञानेश महाराव उपस्थित राहणार आहे.
शुक्रवार दि.27 ऑक्टोबर रोजी स्मृतीशेष सांबशिव नारायणराव देवडे यांचे स्मृतीप्रीत्यर्थ "फक्त राष्ट्रभक्तांसाठी" हा व्याख्यानाचा विषय असून शनिवार दि. 28 ऑक्टोबर रोजी स्मृतीशेष रामचंद्र जागोजी सपाट यांचे स्मृतीप्रित्यर्थ "शाहिरांची लोकशाही"हा व्याख्यानाचा विषय आहे.
   
या व्याख्यान मालेत यापूर्वी मा. गंगाधर बनबरे, कॉम्रेड स्मिता पानसरे, मा. विजय जावंधिया, डॉ.मंजुश्री जयसिंगराव पवार, मा.उत्तम कांबळे, मा. चंद्रकांत वानखेडे, मा.साहेब खंदारे, डॉ. प्रल्हाद लुलेकर इत्यादी नामवंत वक्त्यांची व्याख्याने झालेली आहेत.
     
वणी शहर व परिसरातील साहित्यप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब व इष्टमित्रांसह उपस्थित राहून व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा, असेआवाहन शिव महोत्सव समिती,वणीच्या वतीने करण्यात येत आहे.

या धान्याच्या भाकरी आहे मधुमेहावर रामबाण उपाय! रोज बदलून खा, वाढणार नाही शुगर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

डायबेटीस झाल्यास रक्तातील साखरेचे म्हणजेच ग्लुकोजचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. याचे कारण म्हणजे स्वादुपिंडाद्वारे तयार होणाऱ्या इन्सुलिन हार्मोनचे कमी उत्पादन. इन्सुलिन ग्लुकोज शोषून घेते आणि त्याचे ऊर्जेत रूपांतर करते. परंतु इन्सुलिनच्या अभावी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढू लागते. हा ग्लुकोज रक्तात तरंगत राहतो आणि रक्तवाहिन्यांद्वारे शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचू लागतो.

गव्हाच्या पिठात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. म्हणजेच ते साखरेचे प्रमाण वाढवते. त्यामुळे या पिठाला पर्याय म्हणून अशा पिठाच्या भाकरी खाव्यात, ज्यामुळे साखर वाढत नाही आणि कमी होते.
नाचणीच्या पिठाची भाकरी :
नाचणी (फिंगर बाजरी) आजकाल पोषक तत्वांच्या बाबतीत सोन्याची झाली आहे. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, नाचणी हे फायबरने भरलेले धान्य आहे. त्याच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी रक्तातील ग्लुकोजची पातळी कधीही वाढू देत नाहीत. ज्यांना मधुमेह नाही त्यांनी आठवड्यातून दोन-तीन दिवस नाचणीच्या रोट्या खाल्ल्या तर त्यांनाही मधुमेह होत नाही. नाचणीमध्ये असलेल्या फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वजनही कमी होते. नाचणीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यास मदत करतात.
राजगिरा भाकरी :
राजगिरा ही नाचणीसारखी बाजरी आहे. राजगिरा एक तृणधान्य वनस्पती आहे, ज्यामध्ये लाल रंगाचे धान्य असतात. लापशी राजगिरा पासून बनवली जाते. अलीकडील संशोधनात असे आढळून आले आहे की, राजगिरामध्ये मधुमेहविरोधी आणि अँटीऑक्सीडेटिव्ह गुणधर्म आहेत. म्हणजेच ते साखर वाढू देत नाही आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते. आजकाल राजगिरा खूप लोकप्रिय झाला आहे. राजगिरा भाकरी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.

बार्ली रोटिस :
जव हे भरड धान्यांच्या श्रेणीत येते. बार्ली हे धान्य आहे, जे फायबरच्या मुबलक प्रमाणासाठी ओळखले जाते. यासोबतच यामध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे ते चयापचय वाढवणाऱ्या हार्मोन्सचे प्रकाशन वाढवते. अशा प्रकारे ते इन्सुलिन वाढवण्यास मदत करते. बार्ली कमी दर्जाची जळजळ देखील कमी करते, ज्यामुळे शरीराला अनेक रोगांपासून संरक्षण मिळते.


साधक बाधक चर्चानंतर अखेर काँग्रेसचे "आमरण उपोषण" मागे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : शहरातील पोलीस वेलफेयर असोसिएशनचे भारत पेट्रोलियम समोर MSEB विभागाकडून तालुक्यात सुरु असलेली अघोषित लोडशेडींग व शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर वीज पुरवठा देण्यात यावा, यासह इतर मागण्या घेऊन मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीने दि.23 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरु केले. 

माजी सभापती नरेंद्र पा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार, युवक ता. अध्यक्ष आकाश बदकी व काँग्रेस समर्थक अंकुश माफूर यांच्या सहकार्याने तालुक्यातील शेतकरी व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले. दसऱ्या आपल्या साठी अतिशय महत्वाचा सण. या महत्वाच्या सणाला बाजूला ठेऊन जनतेच्या हितासाठी वीज वितरण कंपनी च्या मनमानी कारभार विरोधात आमरण उपोषण करण्यात आले होते. अनेक राजकीय, सामाजिक तथा गावागावात पुढारी,नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते महिला संघटना, पुरुष मंडळींनी उपोषण मंडपी भेट देऊन आपली समस्या मांडून या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. हे आमरण उपोषण काँग्रेसचे जरी असले तरी ते शेतकरी व जनतेच्या हितासाठी आणि शासन प्रशासनाला जागे करण्यासाठीचा हा एकमेव उद्देश होता आणि म्हणून या आमरण उपोषणाला अखेर सर्वांच्या सहकार्याने घवघवीत यश आले. असे उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले. अधिकाधिक मागण्या जवळपास महावितरण अधिकाऱ्यांनी मान्य करण्याचे आश्वासन नरेन्द्र कटारे कार्यकारी अभियंता, पाटील साहेब उपअभियंता, खंगार मुख्य अभियंता यांनी दिले. 

महावितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांना तीन दिवसाचा अल्टीमेटम दिल्यानंतर सोमवार (ता.23) पासून बसलेल्या आमरण उपोषणास आज बुधवार ला सायंकाळी 6.15 वाजता उपोषणकर्ते ता. अध्यक्ष मारोती गौरकार, सभापती गौरी शंकर खुराणा, नगरसेवक आकाश बदकी, अंकुश माफूर यांना जूस पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, नरेंद्र पा ठाकरे, वसंत जिंनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, यांनी आमरण उपोषण मागे घेण्यात आल्याचे जाहीर करून मारेगाव तालुक्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे या उपोषणास दिलेल्या सर्व मान्यवरांचे धन्यवाद व आभार मानले. त्यामुळे या उपोषणाचा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठया प्रमाणात फायदा निश्चित होणार आहे असे एकंदरीत चित्र दिसून आले.

यावेळी जयकुमार आबड, घनश्याम पावडे, डॉ महेंद्र लोढा, कुंभा सरपंच अरविंद ठाकरे, यु. कॉ.शहराध्यक्ष समीर सय्यद, महिला ता.अध्यक्ष मायाताई गाडगे, सरपंच तुळशीराम कुमरे, सरपंच रविराज चंदनखेडे, प्रफुल विखणकर, सरपंच रामचंद्र जवादे, ट्रायबल सेल अध्यक्ष समिर कुळमेथे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष आकाश भेले, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष शाहरुख शेख, जनहित कल्याण उपाध्यक्ष रॉयल सय्यद, आदी सह सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर वर्गाचा अलोट जनसमुदाय उपोषण मंडपी पाहायला मिळाला.

उपोषण कर्त्यांच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे 

1) लोड शेडींग पूर्णतः बंद करण्यात यावी. 2) शेतकऱ्यांच्या सिंचना करिता 24 तास विज उपलब्ध करून देण्यात यावी. 3) मारेगाव तालुक्यात 132 के. वि. चे नवीन उपकेंद्र लवकर तय्यार करण्यात यावे. 4) ग्राहकांची संख्या लक्षात घेता नवीन विद्युत केंद्राची मान्यता देण्यात यावी. 5) 33 के. वि. चे नवीन वनोजा (देवी), कुभां, वेगाव, रोहपट येथे उपकेंद्र करण्यात यावे. 6) मारेगाव तालुक्यात सोलर प्लांट तयार करून जास्तीची विद्युत तयार करण्यात यावे. 7) शेतकऱ्यांचे विज बिल पूर्णतः माफ करण्यात यावे. 8) बेमाप विज बिल व पठाणी वसुली त्वरित थांबविण्यात यावी. 9) ग्रामीण भागातील गांवठाण वरील विद्युत तारा व पोल देखभालचे काम त्वरित सुरु करण्यात यावे. 10) शेतकऱ्यांचे नवीन A. G. चे कनेक्शन त्वरित जोडणी करून देण्यात यावी.

वीज वितरण कंपनी कडून दिलेले आश्वासन 

एकुण दहा मागण्यांसाठी तीन दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. आज त्या दहाही मागण्या मान्य झाल्या आहेत. काँग्रेस चे मोठे यश मानले जात आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना होणार असल्याचे निश्चित बोलल्या जात असताना 24 तास विज पुरवठा करण्यात यावा ही प्रमुख मागणी होती. त्यामध्ये 6 तास विज पुरवठा देण्यात येईल त्यात 5 तास दिवसा आणि 3 तास सायंकाळी अशी 8 तास साठी विजपुरवठा करण्यात येणार.
132 केव्ही चा प्रस्ताव वरीष्ठाकडे मंजुरी साठी पाठविण्यात येणार. मुद्दा क्रमांक चार नविन विद्युत केंद्रास मान्यता देण्यात येईल. व, दोन सोलर प्लॅन मंजूर. याप्रमाणे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

विजेचा लपंडाव व लोडशेडींग विरोधात आमरण उपोषण सुरु असलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : तालुक्यात वारंवार विजेचा लपंडाव आणि अघोषित लोडींग, यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगलाच फटका बसत आहे. शेतातील उभे पिक सुकत आहे. विजेवरील छोटे-मोठे उद्योगही सणासुदीच्या पर्वावर मोकळीस पडतांना दिसत आहे. परिणामी शेतकरी, लघु उद्योगदार आर्थिक अडचणींचा सामना करित असताना याबाबत शेतकऱ्यांनी महावितरण कंपनी ला निवेदन सादर करून विजेचा पुरवठा 24 तास, लोड शेडींग बंद करण्याची मागणी केली होती, यासह इतरही मागण्या होत्या. परंतु जगाच्या पोशिंद्यच्या मागणीला केराची टोपली दाखवल्याने अखेर काँग्रेस कमिटीच्या वतीने 23 ऑक्टोबर पासून स्थानिक महावितरण कंपनी च्या विरोधात मार्डी चौकातील पेट्रोल पंपासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र, संबंधित विभागाने तीळमात्र दखल घेतली नसल्याने उपोषण आणखी लांबले असताना काल रात्री त्यातील उपोषणकर्ते तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांची प्रकृती खालावली, त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे माहिती आहे. त्याच बरोबर कृ. उ. बा. समितीचे सभापती गौरी शंकर खुराणा यांची सुद्धा प्रकृती खालावण्याचे संकेत आहे. परिणामी हे आमरण उपोषण आणखी न लांबता ताबडतोब संबंधित विभागाने दखल घेऊन मागण्या मंजूर कराव्या,असे मत जण सामान्यांतून उमटत आहे.
दरम्यान, तीन दिवसापासून सुरु असलेल्या आमरण उपोषणास अनेक राजकीय सामाजिक तथा सामान्य नागरिक या उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवीत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कुंभकर्णी महावितरण कंपनी ला जागे करण्यासाठी आज तिसऱ्या दिवशी सुद्धा आमरण उपोषण सुरु असताना असंख्य शेतकरी शेतमजूर ओघ उपोषण मंडपी भेट देऊन आपला रोष महावितरण विरोधात व्यक्त करत जाहीर पाठिंबा दर्शवित आहे.