जिल्हयातील सर्व खाजगी व शासकीय रूग्णालयात दर्शनी भागात रूग्ण हक्क सनदची माहिती लावा : रूस्तम शेख यांची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी व खाजगी रुग्णालयाने रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राइट्स) ची माहिती दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयामध्ये रुग्णाच्या हक्काची सनद दर्शनी भागात लावलेली निदर्शनास येत नाही, या बाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जून २०१९ मध्ये सर्व राज्यांमध्ये रुग्ण हक्काचे सनद खाजगी व सरकारी रुग्णालया मध्ये दर्शनी भागात लावण्याचे आदेश जारी केले होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सप्टेंबर २०२० आणि मे २०२१ मध्ये या विषयी आदेश, निर्णय निर्गमित केले आहे. 

कोरोना काळात खाजगी रुग्णालया मधील गैरप्रकार व रुग्णांचे झालेले शोषण आदिची दखल सरकारने घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्व जिल्ह्यांना आदेश दिले होते. 

रुग्ण हक्काच्या सनद मध्ये रुग्णाला प्राप्त असलेला अधिकार, आजाराच्या प्रकाराची माहिती मिळण्याचा हक्क, तपासण्याचे तपशील, उपचारांचे परिणाम, अपेक्षित खर्च, तपासण्याचे अहवाल, व सविस्तर बिले मिळण्याचा हक्क, यासारखे अनेक रुग्ण हक्काचा सदर सनद मध्ये समावेश आहे.

परंतु अजुन पर्यंत बहुसंख्य सर्व नोंदणीकृत सरकारी व खाजगी रुग्णालयात रुग्ण हक्काची सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शनी भागात लावण्यात आलेली नाही त्या मुळे रूग्ण त्यांचे हक्क व अधिकार याची माहिती पासुन वंचित आहे.

 रूग्णांना त्यांचे हक्क व अधिकार याची जाणिव व्हावी व त्यांचे आर्थिक शोषण होऊ नये,या उद्देशाने जिल्हयातील सर्व खाजगी व शासकीय रूग्णालयात रुग्णाचे हक्क सनद चे फलक रूग्णालयाच्या दर्शनी भागा वर लावण्या संबधी निर्देश द्यावे,अशी मागणी रूस्तम शेख यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

पुरड येथील तरुणाने विष प्राशन केले

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : काल रविवारला पुरड (नेरड) येथील रहिवाशी एका इसमाने विष प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि.1 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता घडली. त्याने महाकालपूर फाटा (ता वणी) येथे विष प्राशन केल्याची उघडकीस आले. त्याच्या अशा अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हितेश बंडू कांबळे (अंदाजे वय 27) असे विष प्राशन करून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हितेश यास प्रथम ग्रामीण रुग्णालय कायर येथे भरती करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी वणीतील एका खासगी दवाखान्यात दाखल केले व त्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

हितेशने विषारी द्रव्य का घेतले या मागील कारण अस्पष्ट असून कांबळे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

चलो मारेगाव: आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष आक्रोश मोर्चा...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आरक्षण मिळेपर्यंत धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या योजना लागू करणार अशी मुख्यमंत्री यांनी घोषणा केली, सरकारच्या सकारात्मक भूमिकेबाबत आदिवासी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली, समाजात तेढ निर्माण करण्याचं काम विद्यमान सरकार करित असल्याने आदिवासी विरोध मुख्यमंत्री शिंदे सरकारचा निषेध आणि धनगर यांना आदिवासी समाजात समाविष्ट करू नये, पेसा कायदा अधिक कडक करण्यात यावा,यासाठी मारेगावात ३ ऑक्टोबर रोजी भव्य 'आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष' आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.३ ऑक्टोबर २०२३ रोज मंगळवारला स्थानिक नगर पंचायत, कार्यालय मारेगाव येथे सकाळी १० वाजता सर्वांनी हजर राहावे, त्या नंतर आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाला मा. श्री लेतुजी जुनगरे (केंद्रीय अध्यक्ष शा. को. संघटना, मारेगाव), मा श्री. गीत घोष (राष्ट्रीय अध्यक्ष सं.ह.प.महाराष्ट्र), मा. श्री.अरविंद कुळमेथे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बिरसा ब्रिगेड, यवतमाळ), मा श्री.बळवंत मडावी (प्रदेश अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी) यांचे मार्गदर्शन करणार आहे. 

अनुसूचित जमातीच्या (एस टी) आरक्षणाला धक्का लागल्यास सर्व समाज बांधव त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, हक्कासाठी धक्का दिला जाईल. हे सरकारने लक्षात घ्यावं, असा सूचक ईशारा आदिवासी बांधवाकडून देण्यात येत आहे. 

मंगळवारी मारेगाव येथे होणाऱ्या आंदोलनात तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या सर्व आदिवासी बांधवानी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे, जाहीर आवाहन सर्व पक्षीय आदिवासी पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेमध्ये असणारे नेते, व महिला पुरुष, युवक युवती तथा आदिवासी समाज बांधवाना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आदिवासी बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वच्छता पंधरवाडा उपक्रमांतर्गत मारेगाव ग्रामीण रुग्णालयात 'एक तारीख, एक तास श्रमदान' उपक्रम संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज दि. रविवार १ ऑक्टोबर रोजी मारेगाव  ग्रामीण रुग्णालय येथे 'एक तारीख, एक तास श्रमदान' हा उपक्रम राबविण्यात आला. आरोग्य विभाग, भारत सरकार यांनी निर्देशित केल्यानुसार या कालावधीत संपूर्ण देशामध्ये स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून एक तारीख, एक तास श्रमदान हा उपक्रम ग्रामीण रुग्णालयामध्ये राबविण्यात आला. रुग्णालयातील परिसर व रुग्णालया जवळील परिसराची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. तसेच रुग्णालयातल्या प्रत्येक खोलीची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक साहेब मा. डॉ. सुभाष इंगळे, इन्चार्ज सिस्टर निता कोवे, डॉ. नागभीडकर सर, डॉ. अश्विन सर, डॉ. राजेश सर, डॉ. जवादे मॅडम, खामनकर सर, तावडे सर, कल्याणकर सर, रामटेके सर, जयश्री इंगोले, प्रणाली राऊत, कायसी साखरे, रेवती गोचडे, योगिता कुकुर्डे, प्रिती कुळसंगे ,भाग्यश्री सवाई, पूजा सौदे, नेहा मेंगेवार, माधुरी ब्राह्मणे, सुरेश लिहितकर, सागर चिंडाले, सुमित ब्राह्मणे, संतोष सारवान, रंजीत मडावी, अनंता पाचपोहर, राजकिरण राठोड, सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सत्तेचा विचार हुकुमशाही निर्माण करतो तर विचारांची सत्ता लोकशाही निर्माण करते- प्रा. डॉ. संतोष डाखरे

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : सत्तेचा विचार हुकुमशाही निर्माण करतो तर विचारांची सत्ता लोकशाही निर्माण करते. लोकशाहीमधे राजसत्ता ही सर्वोच्च सत्ता असल्याने ती संपादन करण्याकरीता विचारी व बुद्धिजिवी युवकांनी राजकारणात यावे, असे आवाहन स्तंभलेखक प्रा.डॉ. संतोष डाखरे यांनी केले. 

लढा संघटनेच्यावतीने आयोजित "आजची राजकीय परिस्थीती व युवक" या विषयावरील जाहीर व्याख्याना प्रसंगी ते बोलत होते. 

शहिद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमात डॉ. डाखरे यांनी वर्तमान राजकीय परिस्थतीवर परखड भाष्य केले. राजकारण हे वाईट, घाणरेडे व धनिकांचे आहे, अशी टिपणी करण्यापेक्षा निवडणूकीच्या माध्यमातून व्यवस्थेमधे सहभागी होऊन छत्रपती शिवराय, भगतसिंग आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडविण्याकरीता युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर आशिष खुळलंगे, संजय खाडे, प्रा.डॉ. दिलीप मालेकर, वैभव ठाकरे अजय धोबे उपस्थित होते. संचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लढा संघटनेचे प्रविण खानझोडे, विकेश पानघाटे, अॅड. रुपेश ठाकरे, ललीत लांजेवार, अजय धोबे, राहुल झट्टे, अमोल लांबट, विवेक ठाकरे, इम्मामुल हुसेन, सुभाष लसंते, शरद खोंड, राजू पिंपळकर यांनी परिश्रम घेतले.