विजयबाबू चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध स्पर्धाचं आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आज रविवार दिनांक 3 सप्टेंबर ला शहरातील अमृत भवन येथे लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रदर्शनी व आनंदमेळा देखील आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 2 वाजता पासून तर सायं. 6 वाजेपर्यंत बालगोपाल साठी विविध स्पर्धा घेण्यात येणार असून, रात्री 9 वाजे पर्यंत प्रदर्शनी व आनंदमेळा असणार आहे.

काल वणी येथील जैताई मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा मोफत लाभ हजारो नागरिकांनी घेतला. यामध्ये मारेगाव, कायर येथील रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. वणी विधानसभा क्षेत्रात गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक कार्याचा वारसा जपत विजयभाऊ चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने श्री कृष्ण जन्माष्टमी समिती व विजय चोरडिया मित्र परिवाराच्या विद्यमाने शहरातील प्रतिष्ठित विजयबाबू चोरडिया यांच्या अभिष्टचिंतन पर्वावर मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात येत आहे. या शिबिराचा वणी विधानसभा क्षेत्रातील हजारों नागरिकांनी लाभ घेतला. याचे समाधान चोरडिया यांनी व्यक्त केले व आभार मानले.

तसेच सोमवारी 4 सप्टेंबर ला "मुझे चढ गया भगवा रंग" फेम प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा वणीत प्रथमच हिंदी मराठी सदाबहार भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भजनसंध्याचे आयोजन केले आहे. यामधून गायिका शहनाज अख्तर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. यावेळी त्यांच्या देशभरात गाजलेल्या गाणी त्यांच्याच सुमधुर आवाजातून प्रेक्षकांना थेट ऐकायला व थिरकायला मिळणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ता तथा भाजपा नेते विजय चोरडिया यांनी केले आहे.

आयुष्यमान भव: कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आनंदोत्सवात साजरा

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : आज दिनांक २ सप्टेबर २०२३ ला आयुष्यमान भव: या कार्यक्रमाचे उद्घाटन ऊपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उत्साहात करण्यात आले. आयूष्यमान भव: हा केंद्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी आरोग्यविषयक मोहीम आहे. ती तळागाळातील लोकांपर्यंत, प्रत्येक व्यक्ती पर्यंत मोफत आरोग्य सेवा पोहचावी हा उद्देश साध्य करण्यासाठी आयुष्यमान भव: ही मोहीम हाती घेण्यात आली. ही मोहीम १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जाणार आहे. 
   
हा कार्यक्रम मा.डॉ हेमचंद कन्नाके निवासी वैद्यकीय अधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.श्रीमती शिवनंदा लंगडापुरे उपविभागीय अधिकारी वरोरा म्हणून लाभल्या. प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री सुभाष दांदडे आमदार प्रतीनिधी वरोरा, तसेच मा.डाॅ रामटेके साहेब डिस्ट्रिक्ट ट्रेनर आॅफिसर, मा.डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक डॉ बोरकर तालुका अधिकारी, डॉ भगत वैद्यकीय अधीकारी, सौ वंदना बरडे सह.अधीसेविका इत्यादी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
      
सर्व मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून सरस्वती देवीच्या फोटोंचे पुजन व माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात पोषण आहार गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात आयुष्यमान भव: कार्यक्रमांची रुपरेषा समजावून सांगितली आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
 
मा.श्रीमती शिवनंदा लंगडापुरे माॅडम यांनी हा कार्यक्रम जनमानसात पर्यंत पोहोचला पाहिजे असे प्रयत्न करायला पाहिजे असे सांगितले कार्यक्रमांची माहिती दिली आणि भरभरून शुभेच्छा दिल्या. मा.सुभाषभाऊ दांदळे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच रूग्णालयातील परिसेविका, अधिपरिचारीका व कर्मचारी यांच्या कामांचे कौतुक करून या कार्यक्रमांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कळविले.
    
मा.डॉ.किन्नाके साहेब यांनी आयुष्यमान भव कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. पोषण आहार सप्ताह व महिना यांची माहिती दिली तसेच खानपान विषयी माहिती दिली. आभा कार्ड, त्याचबरोबर आयुष्यमान कार्ड विषयी सुद्धा माहिती दिली आणि जनजागृतीपर अध्यक्षीय मार्गदर्शन केले. सौ. सोनाली राईसपायले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सह. अधीसेविकावंदना बरडे यांनी कार्यक्रमाच्या आयूष्यमान भव: कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले आणि आपल्या आभारप्रदर्शनात या वर्षाच्या पोषण आहार सप्ताह व महिना यांच्या थीम विषयी माहिती दिली. भरडधान्य, त्रुणधान्य हे कमी खर्चाचे आणि जास्त उत्पादन देणारे व सर्व पोषक तत्वयुक्त आहे हे समजून सांगितले. तसेच शेती ही रासायनिक खतांच्या वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करण्याचे आवाहन केले. जर जमीन सुपीक असेल तर उत्पादन पोषणयुक्त होईल म्हणून शेती सेंद्रिय पध्दतीने करावी तसेच फास्ट,फुड डब्बा बंद अन्न टाळावे हे समजावून सांगितले आणि सर्वांचेच मनःपूर्वक आभार मानले व कार्यक्रमांची सांगता त्यांनी 
  "झाले गेले विसरून जावे
   पुढे पुढे चालावे"
  "जीवन गाणे गातच राहावे
 जीवन गाणे गातच राहावे"
                                   कवितेच्या दोन ओळीने केली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व परिसेविका व अधिपरिचारीका व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाला सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच लाभार्थीही रुग्ण व नातेवाईक होते.सर्वांनी शैल्फि पाईन्टला सर्व मान्यवरांनी फोटो काढले.आणी मान्यवरांनी आहार प्रदर्शन, पोस्टर,बाॅनर यांच्या प्रदर्शनाला भेट दिली आणि भरभरून शुभेच्छा दिल्या.

बोरगाव (में) येथे वीज पडून शेतमजूर ठार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शेतात काम करत असताना वीज पडून शेतमजूर ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 5. वाजताच्या दरम्यान बोरगाव (में.) येथे घडली. या घटनेने पहूरकर कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

संजय दिवाणजी पहूरकर (45) असे या मृत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. बोरगाव (में) येथील कपिल प्रदीप बलकी यांच्या शेतात काम करित असताना अचानक वीज पडून संजय पहूरकर यांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक चौकशीनुसार कळले. 

सदर शेत मजूर भूमिहीन असून त्याच्या पाठीमागे पत्नी दीपा पहूरकर, मुलगी कशिश पहूरकर, आई शोभा पहूरकर असा बराच मोठा आप्त परिवार आहे. 

हजारों नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील प्रतिष्ठित तसेच सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेले, भाजप नेते मा श्री विजयभाऊ चोरडिया यांच्या जन्मदिनाचे औचित्त साधून वणी उपविभागीय क्षेत्रातील मारेगाव, कायर, वणी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
आज वणी येथील जैताई मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला. यामध्ये मारेगाव, कायर येथील रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर आज वणी येथील जैताई मंदिर येथे रुग्णांनी मोफत नेत्र तपासणी केली गेली यात सुद्धा हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घेतला. गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक कार्याचा वारसा जपत विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे.

चोरडियाजी यांच्या सामाजिक कार्याचा आलेख मोठा असून रंजले गांजल्याना ते सैदव धाऊन जाण्यात त्यांचा मुळ स्वभाव आहे. प्रसिद्धी च्या कोसोदूर राहून कुठलाही गाजावाजा न करता, दिनदुबळ्यांना मदतीचा हात पुढे करण्यात त्यांचा प्रांजळपणे सरसावत असतो. वणी-मारेगाव-कायर येथे संपन्न झालेल्या शिबिरातील रुग्णांच्या डोळ्याची तपासणी करुन, चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांना सेवाग्राम येथे आज 2 सप्टेंबर (शनिवार) ला रवाना करण्यात येणार आहे. असे आयोजकांच्या वतीने माहिती देण्यात आली.
सेवाग्राम येथील संपूर्ण खर्चाची जबाबदारी विजय चोरडिया यांनी घेतली असून रुग्णांना कुठलाही त्रास होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी विजय चोरडिया मित्र परिवार घेणार आहे. यावेळी जैताई मंदिर परिसरात नेत्र तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांसाठी, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी श्रीकृष्ण जन्माष्ठमी समिती बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तसेच उमेश पोद्दार मित्रपरिवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

कुमारी सेजल गांजरे हिचे सुयश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कै. अण्णाभाऊ साठे कनिष्ठ महाविद्यालय कुंबेझरी ता जिवती जिल्हा चंद्रपूर येथील प्रा. जगदीश गांजरे मुळ गांव मच्छिन्द्रा येथील रहिवाशी असून यांची कन्या कुमारी सेजल गांजरे हिने फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) या अखिल भारतीय स्तरावरील झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिने फॅशन डिझाईन या चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमासाठी  (NIFT) कॉलेज भोपाळ (मध्यप्रदेश) येथे प्रवेश घेतलेला आहे.

तिने डिग्रीसाठी फॅशन कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम निवडलेला असून, भविष्यात फॅशन डिझायनर होण्याची इच्छा "सह्याद्री चौफेर" ला बोलताना व्यक्त केली. तिचे बारावी विज्ञानचे शिक्षण खेमाजी नाईक कनिष्ठ महाविद्यालय पिट्टीगुडा येथे पूर्ण केलेले असून, या यशाचे श्रेय ती संस्थेचे सचिव श्री तुकारामजी पवार, प्राचार्य राठोड सर व इतर प्राध्यापक यांना देते, तसेच तीच्या या यशात आई- वडीलांचा सिंहाचा वाटा असून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन सदैव लाभले आहे.

तीच्या या यशाबद्दल मारेगाव तालुक्यातील संपूर्ण आप्तेष्टमंडळीच्या वतीने कौतुकासह अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.