इस्रोमध्ये करिअर करायचे? तर निवडा 'हे' कोर्स


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

इस्रोमध्ये वैज्ञानिक नोकरी ही मुख्य नोकरी आहे. इस्रो वैज्ञानिक असणं म्हणजे फक्त उत्तम करिअर नसून एक सामाजिक प्रतिष्ठादेखील आहे या करिअरमधून देशाची सेवा करण्याची संधी मिळते. इस्रोमध्ये वैज्ञानिक होण्यासाठी थेट भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. या व्यतिरिक्त इतर भरती देखील होतात.

इस्रोमध्ये हे आहात करिअरचे पर्याय :

Aerospace Engineering
स्पेसेसशिपमधील किंवा उपग्रहांमधील प्रणालीचे एकीकरण आणी कार्यप्रणालीवर नजर ठेवण्याचे कामही एरोस्पेस इंजिनिअरिंग करतात. शिवाय, अत्याधुनिक वैमानिक वाहनांचे डिझायनिंग आणि उत्पादन हाही यातील मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगचाच एक भाग आहे.

Avionics Engineering
एव्हीओनिक्स इंजिनिअरिंग केलेली व्यक्ती नवनवीन डिझाईन्स विकसित करणे आणि त्यांची चाचणी करण्याचे काम करतात. ISRO मधील एव्हीओनिक्स अभियंते विमान आणि अंतराळ यानाचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करणार्‍या इलेक्ट्रॉनिक प्रणालींचे काम सुरळीतपणे सुरु असल्याचे सुनिश्चित करण्याची जबाबदारी ही यांच्यावर असते.

Geospatial Engineering
भौगोलिक डेटा गोळा करणे, विश्लेषण करणे आणि त्याचा अर्थ लावणे म्हणजे भौगोलिक अभियांत्रिकी. ISRO भूस्थानिक अभियंते मॅपिंग, नेव्हिगेशन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. रिमोट सेन्सिंग आणि जीआयएसचा वापर करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील डेटा गोळा आणि विश्लेषण करण्यासाठी केला जातो. 

Remote Sensing
इस्रो रिमोट सेन्सिंग शास्त्रज्ञ उपग्रह आणि इतर रिमोट सेन्सिंग डेटा गोळा आणि विश्लेषण करतात. ते पृथ्वीची जमीन, समुद्र, वातावरण आणि नैसर्गिक संसाधनांबद्दल डेटा गोळा करण्यासाठी ऑप्टिकल आणि रडार सेन्सर वापरतात. हा डेटा हवामानाचा अंदाज, कृषी निरीक्षण आणि पर्यावरणीय मूल्यमापनासाठी महत्त्वपूर्ण ठरतो.

कशी होते इस्रोमध्ये वैज्ञानिकांची भरती:
इस्रोचे वैज्ञानिक बनणे हा एक उत्तम करिअरचा पर्याय मानला जातो. इस्रोमध्ये वैज्ञानिक होण्यासाठी थेट भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. इस्रो सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्ड (ICRB) द्वारे इस्रोच्या विविध अंतराळ केंद्रे आणि विभागांसाठी शास्त्रज्ञांची भरती वेळोवेळी केली जाते. या रिक्त पदांसाठीची अधिसूचना मंडळाने इस्रो वेबसाइटच्या करिअर विभागात शेअर केली आहे. ही isro.gov.in/Careers वेबसाइट आहे. उमेदवार येथे दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सबमिट करू शकतात.

पात्रता काय असावी ?
इस्रोच्या विविध केंद्रांसाठी शास्त्रज्ञ पदांच्या थेट भरतीसाठी, उमेदवारानं भरतीशी संबंधित विषयात किमान 65% गुणांसह BE/B.Tech किंवा इतर कोणतीही पदवीधर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना (SC-ST, OBC, EWS, दिव्यांग इ.) केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

आदिवासी खेळांचा क्रीडा विभागाच्या स्पर्धेत समावेश करण्यात येणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : आदिवासी युवक विविध कसरतीचे खेळ खेळतात. या खेळांमधील काही खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. आणखी काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाशी सुसंगत खेळांचा समावेश क्रीडा स्पर्धेत करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हंजे, सहसंचालक सुधीर मोरे हे उपस्थित होते.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, खेळाडूंना केंद्रस्थानी मानून क्रीडा विभागाचे निर्णय घेण्यात येत आहेत. सर्वसामान्य, होतकरू आणि गरीब कुटुंबातील खेळाडूंना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी जे आवश्यक असेल ती मदत त्यांना सराव आणि स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

राज्यातील तालुका, जिल्हा आणि विभागीयस्तरावरील विविध क्रीडा संकुलांची बांधकामे सुरू असून ती दर्जेदार करून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे. तसेच ती कामे नियोजित वेळेत पूर्ण करून घ्यावीत. खेळाडूंना सरावासाठी देण्यात येणारा निधी कमी पडणार नाही आणि वेळेत मिळेल यासाठी लक्ष द्यावे.

विभागाकडे निधी विषयी मंजुरीसाठी प्रस्ताव असतील, तर ते तत्काळ सादर करावेत. नवीन योजना आणण्यासाठी खेळाडूंची बाजू समजावून घेण्याकरिता अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. यावेळी त्यांनी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सर्व योजनांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. विभागात अधिकाधिक नवीन योजना राबविण्यात येणार असून त्यासंबंधी लवकर प्रस्ताव सादर करावेत. राज्याला क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त प्रगतीकडे घेवून जाण्यासाठी कसलीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे सांगून विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना मंत्री श्री. बनसोडे यांनी दिल्या.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. कुलगुरूंची नेमणूक करण्यात आली आहे. सुरूवातीला साधनसामुग्री असलेल्या ठिकाणी विद्यापीठ सुरू करावे. इमारतीसह पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध होतील त्या ठिकाणी स्वतंत्र्यरित्या सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतला विविध विभागाचा आढावा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी आज (ता.30 ऑगस्ट) मारेगाव तहसील कार्यालयाच्या विविध विभागातील कामाचा आढावा घेतला. त्यात पंचायत समिती, कृषी, पोलीस स्टेशन, नगरपंचायत, आरोग्य विभाग, सा. बां.विभाग मारेगाव, वनविभाग, भूमिअभिलेख, सहाय्यक निबंधक, दुय्यम निबंधक, म.रा.वि.म., जिप बांधकाम उपविभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, मृदू व जलसंधारण उपविभाग,व सर्व मंडळ अधिकारी इत्यादिंचा समावेश होता.
आज सकाळी 11 वाजता येथील महसूल भवन येथे विविध विभागातील अद्यावत माहितीचा आढावा घेण्यात आला. अमोल येडगे यांच्या जागेवर डॉ पंकज आशिया यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर प्रथमच वणी उपविभागावात त्यांनी दौरा केला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या या बैठकी आढावात तालुका स्तरावरील उपविभाग, कार्यालयाच्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये मा.तहसीलदार निलावाड, गटविकास अधिकारी श्री. पद्माकर मडावी, कृषी श्री निकाळजे, ठाणेदार खंडेराव, नप मुख्याधिकारी श्री भगत साहेब (प्रभारी), ता. आरोग्य अधिकारी देठे मॅडम, सा बा अधिकारी श्री.आसूटकर, वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. हटकर, उपअभियंता श्री पाटील, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे श्री.कळमकर,सहाय्यक निबंधक च्या वरवाडे मॅडम, जि प बांधकामचे श्री. उमाटे, व नमूद विभागातील अधिकारी आदी न चुकता बैठकीला उपस्थित होते.
यावेळी विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मारेगाव च्या विद्यार्थिनींनी मारेगाव तहसील कार्यालयात मा. जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार, नायब तहसीलदार यांना "रक्षाबंधन" च्या निमित्ताने राखी बांधुन रक्षाबंधन साजरा केला. त्यानंतर ते आपल्या ताफ्यासह वणी कडे रवाना झाले. 

सद्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांचा वाढता कल- खारकर पाटील

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

दिवसेंदिवस शेतकरी आणि विक्रेता यांचा परस्पराकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखी चिघडण्याची चिन्हे दिसत आहे, आज शेतकरी कोणत्याही कनेंट molecule चा अभ्यास न करता मेंढरागत तेलंगणातील औषधी चा सर्रास वापर करित आहे. 

शेतकऱ्यांनी कोठून औषधे घ्यावीत, कोणती औषधें फवारावीत हा त्यांचा अधिकार आहे. परंतु कोणत्या औषधाने काय फायदा होतो,त्याचे पिकावर नुकसान आहे का? हे जाणून घेणे गरजेचे नाही का? वाढीच्या अवस्थेत जर कपाशीवर एखादे औषध फवारल्यास कपाशीची वाढ होत असेल तर त्यात काय फार मोठी बाब नाही ते कार्य आपण २४५/- रुपयाच्या नॅनो युरिया ने सुद्धा करू शकतो. त्या साठी इतका खर्च का करतो शेतकरी? पराटी ची पाने धोप्यागत करू शेतकरी काय हेतू साध्य करणार आहे,? ज्या औषधा मध्ये कोणत्याही molecule चे वर्गीकरण नाही. केवळ जैविक औषधी च्या नावाखाली शेतकरी औषधी घेत असेल तर ते स्वतःची फसगत करून घेत आहे असे वाटत नाही का? cotton ची वाढ ही ५५ ते ६० दिवसापर्यंत होते हे सर्वांना माहिती आहे. मग नुसत्या वाढी साठी पाने धोप्या सारखी होण्यासाठी एवढा अट्टाहास का? बरे. त्यात पैसे वाचतात असेही काही नाही तेवढ्याच पैशात दर्जेदार औषधे बाजारात उपलब्ध आहेत. आपण असली औषधें वापरून बोंड अळी, पर्ण सन्भार वाढल्यामुळे पांढरी माशीचा वाढता प्रादुर्भाव हे त्याचेच मूर्तिमंत उदाहरणं आहे. (सध्या परिस्थितीत सोयाबीन वर yellow vain mozaik, व कपाशीवर पाढऱ्या माशीचा प्रादुर्भावं वाढला आहे) बोंडातील अंतर वाढत आहे, तसेही आज पर्यंत विक्रेत्यांचा शेतकऱ्यावर असणारा विस्वास कमी होत चालला आहे. आतापर्यंत शेतकरी नगदी उधारी मध्ये विस्वास असलेल्या दुकानातून माल खरेदी करत होता,आता उधारी दुकानात, नगदी बेल्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याविषयी अविस्वासाची भावना निर्माण होत आहे, (यात सर्वच शेतकरी आहे, असे माझे मत नाही) दिवस कसा येईल कोणालाच माहिती नाही.

पिकेल तर ठीक पण नाही पिकले तर? शेतकऱ्याच्या पाठीशी असणारा विक्रेता हा आधारस्तंभ आता राहणार नाही आणि शेतकरी नेहमी साठी नगदी स्वरुपात खरेदी करेल यातही शंकाच आहे, त्यामुळे शेतकरी वर्गामागे उभा असलेला विक्रेता वर्ग सारे दिवस का? पाठीशी राहील हाही प्रश्नच आहे.

मा. विठ्ठल पा. खारकर
संचालक तथा मार्गदर्शक सुमेध ऍग्रो ट्रेडर्स,वरोरा
संपर्क : 9421722604
 
 
 
 

 

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीने राज्याच्या योजनांचा घेतला आढावा

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई, : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण विषयक संसदीय समितीने आज राज्याच्या अनुसूचित जाती, जमातीबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. ही बैठक खासदार किरीट सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण संसदीय समितीची हॉटेल ताज येथे आज बैठक झाली. या बैठकीस समितीचे सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. तर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून समितीस दिली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या होणाऱ्या स्मारकाबाबत माहिती देणारी चित्रफित सादर केली.

या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर- सिंह, कौशल्य विकास विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, अपर पोलिस महासंचालक (नाहसं) श्री. सुखविंदर सिंग तसेच मंत्रालयीन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.