सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
दिवसेंदिवस शेतकरी आणि विक्रेता यांचा परस्पराकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखी चिघडण्याची चिन्हे दिसत आहे, आज शेतकरी कोणत्याही कनेंट molecule चा अभ्यास न करता मेंढरागत तेलंगणातील औषधी चा सर्रास वापर करित आहे.
शेतकऱ्यांनी कोठून औषधे घ्यावीत, कोणती औषधें फवारावीत हा त्यांचा अधिकार आहे. परंतु कोणत्या औषधाने काय फायदा होतो,त्याचे पिकावर नुकसान आहे का? हे जाणून घेणे गरजेचे नाही का? वाढीच्या अवस्थेत जर कपाशीवर एखादे औषध फवारल्यास कपाशीची वाढ होत असेल तर त्यात काय फार मोठी बाब नाही ते कार्य आपण २४५/- रुपयाच्या नॅनो युरिया ने सुद्धा करू शकतो. त्या साठी इतका खर्च का करतो शेतकरी? पराटी ची पाने धोप्यागत करू शेतकरी काय हेतू साध्य करणार आहे,? ज्या औषधा मध्ये कोणत्याही molecule चे वर्गीकरण नाही. केवळ जैविक औषधी च्या नावाखाली शेतकरी औषधी घेत असेल तर ते स्वतःची फसगत करून घेत आहे असे वाटत नाही का? cotton ची वाढ ही ५५ ते ६० दिवसापर्यंत होते हे सर्वांना माहिती आहे. मग नुसत्या वाढी साठी पाने धोप्या सारखी होण्यासाठी एवढा अट्टाहास का? बरे. त्यात पैसे वाचतात असेही काही नाही तेवढ्याच पैशात दर्जेदार औषधे बाजारात उपलब्ध आहेत. आपण असली औषधें वापरून बोंड अळी, पर्ण सन्भार वाढल्यामुळे पांढरी माशीचा वाढता प्रादुर्भाव हे त्याचेच मूर्तिमंत उदाहरणं आहे. (सध्या परिस्थितीत सोयाबीन वर yellow vain mozaik, व कपाशीवर पाढऱ्या माशीचा प्रादुर्भावं वाढला आहे) बोंडातील अंतर वाढत आहे, तसेही आज पर्यंत विक्रेत्यांचा शेतकऱ्यावर असणारा विस्वास कमी होत चालला आहे. आतापर्यंत शेतकरी नगदी उधारी मध्ये विस्वास असलेल्या दुकानातून माल खरेदी करत होता,आता उधारी दुकानात, नगदी बेल्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याविषयी अविस्वासाची भावना निर्माण होत आहे, (यात सर्वच शेतकरी आहे, असे माझे मत नाही) दिवस कसा येईल कोणालाच माहिती नाही.
पिकेल तर ठीक पण नाही पिकले तर? शेतकऱ्याच्या पाठीशी असणारा विक्रेता हा आधारस्तंभ आता राहणार नाही आणि शेतकरी नेहमी साठी नगदी स्वरुपात खरेदी करेल यातही शंकाच आहे, त्यामुळे शेतकरी वर्गामागे उभा असलेला विक्रेता वर्ग सारे दिवस का? पाठीशी राहील हाही प्रश्नच आहे.
मा. विठ्ठल पा. खारकर
संचालक तथा मार्गदर्शक सुमेध ऍग्रो ट्रेडर्स,वरोरा
संपर्क : 9421722604