पुरुष कर्मचाऱ्यांनाही मुलांच्या संगोपनासाठी 730 दिवसांची रजा : जितेंद्र सिंह

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपनासाठी विशेष रजा देण्यात येते. आता हीच रजा पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना देखील मिळणार आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी काल (दि. 9) लोकसभेत याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांनी स्त्रियांपाठोपाठ एकट्या पुरुषाला देखील 730 दिवसांची बाल संगोपन रजा देण्यात येणार, अशी घोषणा केली. 

सरकारी कर्मचाऱ्यांपैकी महिला कर्मचारी वर्गाला मुलांच्या संगोपनासाठी रजा देण्याबाबत तरतुद होती. त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी ही रजा घेण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला होता. काल याबाबत एक मोठी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. केंद्रिय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी एकट्या पुरुषाला 730 दिवसांची रजा देण्यात येईल असे लोकसभेत सांगितले आहे.

सरकारी नियम काय आहेत?
काल (दि.9) लोकसभेत लेखी उत्तर देत जितेंद्र सिंह म्हणाले की, 18 वर्षांपर्यंतच्या दोन मोठ्या मुलांच्या काळजीसाठी, संपूर्ण सेवेदरम्यान जास्तीत जास्त ७३० दिवसांपर्यंत रजा मंजूर करण्याची तरतूद आहे. ते म्हणाले की, दिव्यांग मुलाच्या बाबतीत वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.

 केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, केंद्रीय नागरी सेवा (रजा) नियम, 1972 च्या नियम 43-सी अंतर्गत महिला सरकारी नोकरदार आणि केंद्रीय नागरी सेवा आणि पदांवर नियुक्त केलेल्या एकल पुरुष सरकारी सेवकांना बाल संगोपन रजेसाठी (CCL) पात्र आहेत.


शिवसेनाच्या वतीने भव्य डोळ्यांचा साथ रोग निदान शिबिर सपन्न...


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सध्या डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात आहे. याचा त्रास लोकांना खूप सहन करावा लागत आहे, त्यात राजुर येथे खूप रुग्णांची संख्या असल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) द्वारे भव्य डोळ्याचा साथ निवारण शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे मुख्य अतिथी शिवसेना नेते तथा उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संजयभाऊ देरकर हे होते. तसेच सहसंपर्क प्रमुख संतोषभाऊ माहूरे, विजय पानघंटीवार सदस्य खरेदी विक्री संघ, झरी, बालाजी मिलमीले, मो. अस्लमभाई,  भगवान मोहिते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या शिबिराला नेत्ररोगतज्ञ डाॅ. स्वप्निल गोहोकर यांनी रूग्ण तपासून उपचार केले. शिबिराला अमृत फुलझेले युवासेना शहर प्रमुख, अभिजीत सुरशे उपशहर प्रमुख, प्रणीता असलम शेख माजी सरपंच, दिशा फुलझेले ग्रा. प.सदस्य, प्रेमा धानोरकर माजी सरपंच भांदेवाडा, सतीश तेवर, सय्यद मोसीम, अनुराग सिंग, अमित सिंग, जय चौहान, सुशिल आडकीने इत्यादीचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.

विशेष परिश्रम फैजल बशीर खान संचालक वणी नागरी सहकारी बँक लिमिटेड वणी यांनी घेतले. शिबिराला शिवसेना (उबाठा), संजयभाऊ देरकर मित्र परिवार आणि राजूर शहर परिसरातील नेत्र गरजू रुग्णांनी लाभ घेतला.

नावीन्यपूर्ण उपक्रम...काँग्रेसचा डोळ्यांचे साथ रोग नियंत्रण शिबिर संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील कुंभा, मारेगाव, मार्डी व नवरगाव येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने डोळ्यांचा साथ रोग नियंत्रण शिबिर सप्ताह, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.

तालुक्यात डोळ्यांच्या साथ रोगाने थैमान घातला आहे. यावर आळा घालण्यासाठी व जनतेच्या मागणीला मान देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या पुढाकारातून कुंभा येथे 6 ऑगस्ट, मारेगावात 8 रोजी, मार्डी येथे 9 रोजी तर, नवरगावात 10 ऑगस्ट रोजी डोळ्यांचा साथ रोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा जनहितार्थ उपक्रम चारही ठिकाणी उत्स्फूर्तपणे पार पडलेल्या शिबिराचा परिसरातील जवळपास सातशे च्या वर गरजू रुग्णांनी लाभ घेतला.
या शिबिरात प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्निल गोहोकार, डॉ अनिकेत अलोणे, निशा गेडाम, प्रथम महाकुलकर, लोकेश छाजेड, विजया कांबळे यांनी रुग्णांची तपासणी करुन त्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले. कुंभा,मारेगाव,मार्डी व नवरगाव येथील काँग्रेस कमिटीचे विजय घोटेकर, मारोती मत्ते, देवा गोहणे विजय बोथले, प्रभाकर घोटेकर, वरूण ठाकरे, आकाश भेले, सुमन ठाकरे, राजू महाजन, कवड अंडस्कर, पिंटू डाखरे, वनिता घोटेकर, उज्वला डाहुले, विठ्ठल डुकरे,

शाहरुख शेख, समिर कुळमेथे, युनूस शेख, रॉयल सय्यद, समीर शेख, मुरलीधर बिलबिले, शरद पावनकर, चरण वाढई, महादेव सोनुले, सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंच सुधाकर डाहुले, गंगाधर ठावरी, राजकुमार पाटील, सुरज पंडिले, बंडू आसुटकर, नयन आसुटकर, बंडू पुनवटकर, भास्कर धांडे, अजय आसूटकर, राजकुमार पाटील, ईश्वर बोबडे, सरपंच सुचिता कुमरे, सागर लोणारे, मारोती सोमलकर, योगवश्वर गौरकार, युवराज भोसले आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, तालुकाध्यक्ष मारोती गौरकार, सय्यद समिर, अंकुश माफुर, आकाश बदकी, प्रफुल्ल विखनकर, आदी उपस्थित होते.

तलाठी व्हायचंय ना? 'या' पद्धतीनं करा अभ्यासाचे नियोजन; यश हमखास मिळेल..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येणारी तलाठी भरतीची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. ही तलाठी भरती 4644 जागांसाठी होणार आहे. यासाठी तब्बल 13 लाख अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता अभ्यास कसा करावा? अभ्यास करताना कोणत्या विषयावर भर द्यावा? तसेच पेपर सोडवताना काय काळजी घ्यावी याबद्दलच महाराष्ट्र राज्य प्रमाण लेखन निश्चिती समिती सदस्य बाळासाहेब शिंदे यांनी माहिती दिली आहे.

अशी करा परीक्षेची तयारी..!
तलाठी भरती परीक्षेला दिवस कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आता नोट्स न काढता वाचनावर जास्त भर द्यावा. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी होक्याब्लरीवर जास्त भर द्यावा. यामध्ये ग्रामर शब्दसंग्रह, शुद्ध-अशुद्ध शब्द यांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. 

 विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम TCS, IBPS आणि MPSC यांच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवाव्यात यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. 

या क्रमाने सोडवा पेपर..
परीक्षा पेपर कॉम्युटरवर असल्यामुळे आपल्याकडून काही गडबड होवू नये म्हणून पेपरच्या आधी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका आपण कॉम्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती सोडवण्याचा प्रयत्न करावा. पेपर सोडवताना सर्वप्रथम मराठीचे प्रश्न सोडवावे. त्यानंतर GS सोडवावे नंतर इंग्रजी सोडवावे आणि सगळ्यात शेवटी बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सोडवावे.

या क्रमाने जर तुम्ही पेपर सोडविला तर तुम्ही सगळे प्रश्न हे सोडवू शकता, असं बाळासाहेब शिंदे सांगतात. TCS पॅटर्नमध्ये जास्तीत जास्त हे बुद्धिमत्तेवरती प्रश्न आधारित असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवावेत. त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करावा. पेपर देताना विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह विचार मनात ठेवून पेपर द्यावा. मनात कोणती शंका न ठेवता पेपर द्यावा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न हे तुम्ही सोडू शकता आणि तुमच्याकडून कोणतीही गडबड होणार नाही. 

या ट्रिक्स तुम्ही पेपर देताना फॉलो करू शकता.

परीक्षेसाठी 13 लाख फॉर्म आले म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये जे विद्यार्थी आधीपासून अभ्यास करतात त्यांचं सिलेक्शन या परीक्षेमध्ये नक्कीच होईल, असं बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

मच्छिन्द्रा येथे मणिपूर घटनेचा निषेध करत जागतिक आदिवासी दिन साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिसुर्य बिरसा मुंडा युवासेने च्या वतीने बुधवार दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता येथील बस स्थानक चौकात मणिपूर घटनेचा निषेध करत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असीम श्रद्धा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि अत्युच्च प्रामाणिकपणा व पारंपरिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर 09 ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा करण्यात येतो. हा दिवस तालुक्यातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे. यावर्षी मारेगाव येथे संपूर्ण आदिवासी समाज बांधवाच्या वतीने मणिपूर, पहापळ येथील बलात्कार, जिवती तालुक्यातील मतिमंद युवती वर अतिप्रसंग,एरंडोल (जि जळगाव) येथे वसतिगृहातील मुलीवर लैंगिक शोषण, सांगली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान तोडण्यात आली अशा अनेक घटना देशातील आदिवासी समाजावर घडत आहे याचा निषेध, सरकार चा निषेध म्हणून काल आक्रोश मोर्चा काढण्यात आला.  
मच्छिन्द्रा येथे मणिपूर घटनेसह वरील नमूद सर्व घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमास गावातील आदिवासी समाज बांधव इतर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थ‍ित होते.