अधिकारी वर्गात येवून देश सेवा करावी- न्यायधीश निलेश वासाडे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : ज्यांना चांगले गुण मिळाले नाही त्या विदयार्थ्यांनी खचून न जाता चांगला अभ्यास करावा, गुण कमी अधिक होत असते याचा अर्थ आपण काहीच करू शकत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. कमी गुण घेणारे विदयार्थी सुद्धा प्रयत्न करून उंच शिखर गाठू शकतात सर्वानी अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी चांगले मार्क घेऊन अधिकारी वर्गात येऊन देशाची राज्याची सेवा करावी असे, प्रतिपादन मारेगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायधीश निलेश वासाडे यांनी केले. ते मारेगाव येथील विदयार्थी गुण गौरव सोहळ्याचे विशेष अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे होते तर या सोहळ्याचे उदघाटन वर्धमान फाउंडेशनचे अध्यक्ष विजय चोरडिया यांनी केले व पेसा अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष भैय्याजी कनाके हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सन २२२-२३ या शैक्षणिक सत्रात १० वी,१० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विदयार्थ्यांचा गुण गौरव सोहळा सावित्रीबाई फुले गुण गौरव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. शेतकरी सुविधा केंद्रात पार, पडलेल्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद्माकर मडावी,मारेगाव वनपरीक्षेत्राधिकारी शंकर हटकर,नायब तहसीदार ओसिन मडकाम,तालुका वैदकीय अधिकारी अर्चना देठे,कला,महिला व बालकल्याण चे विस्तार अधिकारी दिपक कळमकर,जेष्ठ समाजसेवक पुंडलिक साठे उपस्थित विशेष कार्य करणाऱ्याचा ही गौरव करण्यात आला. यामध्ये पत्रकार माणिक कांबळे, सरपंच तुळशीराम कुमरे पोलीस पाटील मुकिंदा बदखल, तलाठी राजू डवरे, ग्रामसेवक जयंत फुलझेले, वनरक्षक प्रेमीला सिडाम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अर्चना देठे, वेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रश्मी आडे, पहापळ जि.प.शाळेचे, मुख्याध्यापक नत्थु चौधरी,अंगणवाडी सेविका, आशा खामणकर, कुमार कॉम्पुटर टायपिंग इन्स्ट्युटचे संचालक राजेश घुमे,संगणक मार्गदर्शक अभिषेक कनाके,युवा उद्योजक निलेश भगत, इत्यादीचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत भंडारी यांनी केले, सूत्रसंचालन सौ, स्नेहलता चुंबळे यांनी केले तर आभार आयोजक प्रतिभा तातेड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमार अमोल कुमरे, पंकज साठे, बेबी आत्राम, मनिषा मोहुर्ले, गणेश तातेड, कवडू मोहुर्ले, आदेश तातेड, पंकज नेहारे, आदींनी अथक मेहनत घेतली.

 

नगरपरिषदचे 2 अधिकारी अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB) च्या जाळ्यात अडकले


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : बिल काढून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या वणी नगर परिषदचे दोन अधिकारी यांना अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB) विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई यवतमाळ रोडवरील खरेदी विक्री कार्यालयाच्या बिल्डिंग मध्ये असलेल्या गजानन भोजनालयात आज मंगळवारी 1 ऑगस्ट ला दुपारी 2:30 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी केली. यात एक आरोग्य निरीक्षक तर दुसरा पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता असे दोन अधिकारी एसीबी (ACB) च्या जाळ्यात अडकले आहे. या खळबळजनक घटनेने उपविभागात एकच उडाली. 

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 26 जुलै 2023 रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे येउन नगर परिषद वणी येथील लोकसेवक जय अशोक उंटवाल, (44) आरोग्य निरीक्षक व लोकसेवक शुभम अनंता तायडे, (26) कनिष्ठ अभियंता जलपुर्ती विभाग यांनी लाच मागणी केल्याची लेखी तक्रार, तक्रारदारांनी दिली. सदर लेखी तक्रारी वरून दिनांक 26 जुलै 2023 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक जय उंटवाल आरोग्य निरीक्षक यांनी स्वतः करीता तक्रारदार यांना त्यांचे माहे जुन महिण्याचे देयकावर सही केल्याचा मोबदला व सदर कामात भविष्यात त्रास होऊ नये म्हणुन 20 हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. तसेच आरोपी लोकसेवक शुभम तायडे, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता यांनी स्वतः करीता तक्रारदार यांना त्यांनी नगर परिषद वणी अंतर्गत वणी शहरातील घनकचरा संकलन, घनकचरा विलगीकरण, वाहतुक करणे, शौचालय सफाईचे कामपुर्ण केल्याचे एप्रील ते जुन महिण्याचे देयके तयार करून दिल्याचा मोबदला म्हणुन 20 हजार रूपये प्रमाणे मागील तिन महिण्याचे एकुण 60 हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी आयोजीत केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान, आरोपी लोकसेवक जय उंटवाल आरोग्य निरीक्षक यांनी गजानन भोयजनालय येथे स्वतः करीता 20 हजार रूपये लाच रक्कम तक्रारदार यांचे कडुन पंचासमक्ष स्विकारली असता जय अशोक उंटवाल, आरोग्य निरीक्षक व शुभम अनंता तायडे, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता यांना रंगेहात पकडण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. श्री.मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, श्री. देविदास घेवारे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्री. उत्तम नामवाडे, पोलीस निरीक्षक श्री. विनायक कारेगावकर पोलीस निरीक्षक श्री. अमित वानखडे आणि पोलीस अंमलदार सचिन भोयर, महेश वाकोडे , अतुल मत्ते, अब्दुल वसिम, राकेश सावसाकडे , राहुल गेडाम, सुधीर कांबळे, सुरज मेश्राम व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे व सुधाकर कोकेवार सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केली.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दुरध्वनी क्रमांक 07232-244002 तसेच टोल फ्रि क्रमांक 1046 वर संपर्क करण्याचे आव्हान पोलीस उप-अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केले आहे.

पेसा समिती अध्यक्ष भैय्याजी कनाके यांचा वाढदिवस उत्स्फूर्तपणे साजरा ...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पेसा समिती अध्यक्ष तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे कार्याध्यक्ष भैय्याजी कनाके यांचा वाढदिवस उमेद,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान टीम अंतर्गत साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त उमेदचे गायकवाड मॅडम, काकडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाले.

स्थानिक पातळीवर निष्ठावतांपैकी एक भैय्याजी कनाके आहेत. ते धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. पहापळ पेसा समिती अध्यक्ष तथा ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे कार्याध्यक्षांचा वाढदिवस विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे साजरा केला जात असतांना आज उमेद सह त्यांच्या मित्र परिवारानी केक कापून त्यांचा जन्मदिन साजरा करून त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी गायकवाड मॅडम, काकडे सर, स्वाती कोल्हे, ज्योती मुसळे, विद्या लांबट, छाया कनाके, उज्वला चंदनखेडे, माला शेडमाके, प्रेमीला मडावी, वनिता मांढरे, आशा काळे, मंगला गौउत्रे, लक्ष्मी गेडाम, संजय येरमे आदींची उपस्थिती होती 

शामादादा कोलाम यांना स्मृतिदिन निमित्त सरपंच तुळशीराम कुमरे यांचे अभिवादन

           
                  
                --:|| विनम्र अभिवादन ||:--

शामादादा कोलाम यांना पुण्यतिथीनिमित्त सरपंच तुळशीराम कुमरे यांनी आज विनम्र अभिवादन केले.

सरपंच श्री. कुमरे यांनी आपल्या निवासस्थानी शामादादा कोलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

'गोरगरिबांच्या न्यायासाठी लढणारे क्रांतिवीर, असे जुलमी गुलामीच्या बेड्यातून मुक्त करणारे शामादादा कोलाम यांनी इंग्रजांची जुलमी राजवट आणि गरीब समाजाला लुटणाऱ्या धनाढ्य सावकारांच्या तावडीतून जनतेची सुटका करून घेण्यासाठी त्याने बंड पुकारले. श्रीमंत सावकारांना लुटून ती संपत्ती तो गोरगरिबांत वाटायचा. अशा या भारत मातेच्या सुपुत्राला विदर्भ रॅबिनहूड शामादादा कोलाम यांना पुण्यथितनिमित्त विनम्र अभिवादन..!

जाणीव एक हात मदतीचा संस्थेने दिले ६ फुटावरील अजगराला दिले जीवदान

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख

कळंब : कळंब तालुक्यातील राजुर या गावालगतच्या शेतात सोयाबिन पिकात भल्ला मोठा 6.5 फूट लांबीचा अजगर दिसताच मजुरांची ताराबंळ उडाली. त्याच वेळी शेत मालक दिनेश भाऊ बोभाटे यांनी जाणीव एक हात मदतीचे वन्यजीव रक्षक अब्दुल कलाम व सय्यद तौसीफ यांना माहिती दिली.

यावेळी क्षणाचा विलंब न करता राजुर येथील शेतात जाऊन सुरक्षितरित्या त्या अजगराला रेस्क्यू करून सापा विषयी जनजागृती करून आपल्या परिसरात कुठेही वन्य प्राणी जखमी किंवा कोणत्याही संकटात दिसल्यास त्याला न मारता जवळच्या वन्यजीव रक्षक (सर्प मित्रा) ला बोलवण्याचे आवाहन केले.

दरम्यान, काही अंतरावर असलेले पोटगव्हाण बिट मध्ये त्या अजगराला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. 
यावेळी वन विभागाचे वनरक्षक कु. एन. वि. ढोरे, पोटगव्हाण बिटचे वनरक्षक कु. बि.एस डुकरे, वनरक्षक एस. यु. राठोड, वनरक्षक एस.एस. राठोड व जाणीव एक हात मदतीचे अब्दुल कलाम, नदिम शेख, सय्यद तौसिफ उपस्थितीत होते.