जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मनसेचा विराट जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ मदत जमा करण्याची मागणी !


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी महोदयांना विविध मागण्यांचे निवेदन देत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ मदत करण्याची मुख्य मागणी मनसेने केली.

अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांतील विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ मदत करण्याची मुख्य मागणी, दिलेल्या निवेदनातून करण्यात आली शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, तूर, सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी, हळद आदी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून ते चिंताग्रस्त स्थितीत आहेत.
जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील १४ तालुक्यांमध्ये ही भयंकर अतिवृष्टी झाली. यात ७७ महसूल मंडळे ३१६ ते १५० मिमी पर्यंतच्या पावसाने बाधित झाले. या पावसाने शेतकरी पूर्णत: हतबल असून, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पुनः उभे करणे आवश्यक असून अतिवृष्टीने बाधित झालेले शेतकरी, घरे व उध्वस्त झालेल्या कुटुंबीयासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे.अन्यथा पूर्वीच खचलेला शेतकरी पुढील अनेक वर्षात उभा होऊ शकणार नाही.
जुलै च्या अतिवृष्टीमुळे शेतकरीच नव्हे, तर स्थावर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही फटका बसला आहे. या मुसळधार पावसामुळे नदी व नाल्या काठच्या पिकांचे तर, नुकसान झालेच मात्र शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. त्या शेतामध्ये फक्त दगड धोंडे उरले आहेत. म्हणजे त्या जमिनींवर शेती करायचे म्हटले, तरी पुढील ३-४ वर्षे शेती करता येणार नाही अशी भयाण अवस्था आहे. शेतीसह घरेदारांची परझड झाली. एकीकडे शेतीचे नुकसान झाले, तर दुसरीकडे गावकरी उद्ध्वस्त झाले आहे. विशेष म्हणजे आता शेतकऱ्यांकडे दुबार पेरणीचीही संधी नाही. केवळ रब्बी हंगामाच्या माध्यमातून शेतकरी लागवडीचा दुसरा डाव मांडू शकतात; मात्र त्यासाठीही कर्जपुरवठा हे नवे संकट राहणार आहे. जुने कर्ज फेडायचे कसे? हा देखील गंभीर प्रश्न आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकरी चौफेर संकटाच्या चक्रात अडकला असून शासनामार्फत त्वरित सानुग्रह अनुदान म्हणजेच आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना जी हेक्टरी १० हजार रुपये अशी मदत विधिमंडळात जाहीर झाली ती मदत २४ तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते परंतु जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहे. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली असून त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरी अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी मागणी मनसेने केली. यावेळी मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या सह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मारेगावात असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाची मालिका पुन्हा सुरू झाली आहे. भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, बीजेपी जिल्हा सचिव शंकर लालसरे यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या उपस्थितीत शहरी तथा ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज रविवारी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. 

अविनाशभाऊ लांबट यांनी मोठा निर्णय घेतला, अखेर त्या निर्णयावर आज शिक्का मोर्तब झाले. यात मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सरपंच परिषदेचे ता.अध्यक्ष अविनाश लांबट, डोमाजी भादीकर (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, मारेगाव), दीक्षित मोरे (युवा सामाजिक कार्यकर्ते), श्रीकांत गौरकार (सरपंच कोथुर्ला), चंद्रकांत धोबे, (माजी उपसरपंच गौराळा), तथा यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच, मनोहरराव गेडाम (गोंडबुरांडा सोसायटी सदस्य), प्रदिप डाहूले (ग्राम.सदस्य, सिंधी), प्रविण बोथले (सामाजीक कार्यकर्ते कुंभा), दिलीप आत्राम, (उपसरपंच मांगली), दिनेश गेडाम, (ग्रा.पं.सदस्य सिंधी), नरेश चौधरी (ग्रा.पं. सदस्य दापोरा), गणेश खुसपुरे (सामाजिक कार्यकर्ते, महागाव), प्रशांत चौधरी (कुंभा), आशीष खंडाळकर (रामेश्वर), गोपाल ढाकणे (कोथुर्ला), मुरलीधर बलकी (महागांव), सुमीत जुनगरी (देवाडा), गणेश वांढरे (कोथुर्ला), सचिन गौरकार (मांगरूळ), संजय तुराणकर (महागांव), अनिल पारखी (गोडबुरांडा), विजय दानखेडे (गोडबुरांडा), विनोद चहानकर, (रामेश्वर सोसायटी सदस्य), राहुल पोतराजे, कैलास ठाकरे, सुहास वरारकर (सामाजिक कार्यकर्ते), प्रसाद राजापूरे, विघ्नेश दुर्गे, आदित्य डाखोरे, आयुष्य आसुटकर, या सर्वांनी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रवेश केला आहे.

मारेगाव भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर, युवा मोर्चाचे ता अध्यक्ष गणेश झाडे व इतर पदाधिकारी यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा मारेगाव विश्राम गृह येथे पार पडला. या पक्ष प्रवेशामुळे मारेगांव शहर तसेच ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका मध्ये याचा मोठा फायदा पक्षाला होईल असा विश्वास आमदार बोदकुरवार यांनी व्यक्त केला.

यावेळी दिनकरराव पावडे, भाजपा जिल्हा सचिव, तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, ता. सरचिटणीस पवन ढवस, वैभव पवार नगरसेवक, शशिकांत आंबटकर, मंगेश देशपांडे, जयंत ठेपाले, बोबडे गुरुजी, प्रसाद ढवस, शेखर काळे, राहुल राठोड, नगर उपाध्यक्ष सौ. हर्षा महाकुलकर, नगरसेवक भादेकर काकू, रवि टोंगे, जगदीश ठेंगणे (सरपंच मांगरूळ), आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.




आमदार बोदकुरवार यांनी केली मारेगावतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान ग्रस्त भागाचा दौरा वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विविध गावांना भेट देत पाहणी केली. 
दोन दिवसापूर्वी झालेल्या ढग फुटी नंतरच्या अतिवृष्टीने अनेकांना फटका बसला आहे. घराची पडझड झाल्यामुळे वास्तव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तसेच संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे खराब झाली आहे. अनेकांची संसार उघड्यावर आली आहे. त्यामुळे रात्रीची झोप घ्यायची कुठे असा प्रश्न नुकसानग्रस्ता समोर निर्माण झाला आहे.
शेतकऱ्याची शेतीपिके खरडून गेली आहे. यामध्ये वनोजा (देवी) बामर्डा, मार्डी, खैरगांव, दापोरा, कोसारा, केगांव, चानोडा आपटी, दांडगाव, शिवणी, यासह अनेक गावाचा नुकसान नुकसानग्रस्त गावा मध्ये समावेश आहे. या सर्व नुकसान ग्रस्त गावांना आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली आहे.त्यांच्या सोबत भाजप चे दिनकर पावडे, ज्ञानेश्वर चिकटे, प्रसाद ढवस,नगरसेवक वैभव पवार,मंगेश देशपांडे,सुधाकर बोबडे,प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी त्यांनी बामर्डा वनोजा येथील उपसरपंच प्रशांत भंडारी, बामर्डा येथील धनंजय आसुटकर, सरपंच सोयाम, मार्डी येथील सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंच सुधाकर डाहुले, सदस्य सुरेश चांगले, सूरज पंडिले, गणेश कनाके यांची भेट घेतली व गावकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या.

नुकसान भरपाई तात्काळ मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेला घटनास्थळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. घराच्या नुकसानीसाठी त्यांना ५ हजारावरून १० हजार रुपये शासनाने वाढवून दिले आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाच अर्थ सहाय्य देण्यात येईल. शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना प्रतिहेक्टरी मदत लवकर मिळेल.
-आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
 विधानसभा मतदार संघ वणी

नगर उपाध्यक्षा हर्षा अनुप महाकुलकर यांनी मानले आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांचे आभार


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : शहरातील नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे. या वाढलेल्या भागात अनेक नागरी समस्या निर्माण होतात. त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या भागाचे लोकप्रिय आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार म्हणून व त्यानंतर सुद्धा मारेगावच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे भविष्यात सुद्धा हीच भुमीका आपली असुन शहरांचा विकास ही निरंतर प्रक्रिया आहे,असे माध्यमातून नगर उपाध्यक्षा हर्षा अनुप महाकुलकर यांनी सांगितले. व आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांचे आभार मानले.
मारेगाव शहराच्या विकासासाठी ३ कोटीपेक्षा वर निधी मंजूर,खालीलप्रमाणे होणार विकास कामे 

प्रभाग क्रमांक सहा,सोनुले यांचे घरापर्यंत डांबरीकरण रस्ता, नाली बांधकामासाठी प्रभाग क्रमांक सहा मधील जुमनाके ते वांढरे व सोनुले ते कोलगांव रोड, सुभाष मत्ते ते राजु थाटे, विलास पोटे ते, निलेश भेंडे व निकम ते आष्टकर, मेन रोड डॉ. महाकुलकर ते सतिश पांडे, यांचे घरापर्यंत डांबरीकरण रस्ता, नाली बांधकाम करणे. प्रभाग क्रमांक तीन मधील महादेव मंदिर ते मार्डी रोड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे.
प्रभाग क्रमांक पंधरा मधील विविध विठ्ठल आटा चक्की ते डोमाजी भादिकर यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता, भूमीगत नालीचे बांधकाम करणे. प्रभाग क्रमांक पंधरा, अनंता भोयर ते डोमाजी भादिकर, सुरेश वांढरे ते दासरवार साहेब, सोनटक्के, शरद खापने, माटे ते केळकर, सोमलकर ते धोपटे यांचे घरापर्यंत भूमीगत नालीचे बांधकाम करणे.
प्रभाग क्रमांक सोळा मधील चिकटे ते मुन, प्रमोद जांभूळकर ते आशिष आस्कर, खंडारे ते देवाळकर, विठ्ठल ठक ते अनिल देहांडे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता व भूमीगत नालीचे बांधकाम करणे. प्रभाग क्रमांक सोळा मधील विविध ठिकाणी गणेश गोहोकार ते टायगर झाडे, देविदास खोले ते आनंद झोडे, धोपटे ते दरेकार, काटकर ते गाणार, ठक ते आनंद झोडे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. असे ३.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने शहराचा विकास साधता आहे. 
वणी मतदार संघांचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या आमदार निधीतून तब्बल ३ कोटी पेक्षा वर निधीच्या पायाभुत विकास सुविधांकरिता मंजूरी मिळाल्याने या माध्यमातून मारेगाव शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे, इतरही सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचे मत नगर उपाध्यक्षा हर्षा अनुप महाकुलकर यांनी व्यक्त केले आहे.

साहेबांनी मागणीची दखल घेत मारेगाव शहराच्या विकासासाठी भरगोस निधी उपलब्ध करुन दिल्याने आमदार बोदकुरवार यांचे  मारेगाव नगर पंचायतच्या नगर उपाध्यक्षा हर्षां महाकुलकर यांनी आभार मानले. 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “जनसेवा सप्ताह”


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात “जनसेवा दिन सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत संपूर्ण आठवडाभर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
आज (दि.२९) ला जनसेवा दिन सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील आपादग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली. भद्रावती तालुक्यातील वाघेडा येथील मनोज टोंगे यांचे गोठ्याला आज (दि.२९) च्या रात्री एक वाजताच्या सुमारास आग लागली. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही. गावकऱ्यांच्या अथक परिश्रमाने सुमारे चार तासात आग विझविण्यात आली. तसेच गोठयातील बैलजोडी सुखरुप वाचविण्यात यश आले. वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांना ही घटना कळताच रात्रीच वाघेडा येथे आपतकालीन मदत पोहचविण्यात आली.
वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी वाघेडा येथे मनोज टोंगे यांची स्वत: वैयक्तीक भेट घेतली व वास्तविक परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांना तात्काळ मदत केली.

या प्रसंगी हनुमान टाले, मनोज कसारे, राकेश बोथले बंडु काकडे, प्रफुल थेरे, मंगेश भोयर व गावकरी मंडळी घटनास्थळी उपस्थित होते. सोबतच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे, मिथुन खोब्रागडे, अक्षय बंडावार यांची घटनास्थळी उपस्थिती होती.

यावेळी वाघेडा येथील ग्रामस्थ सुरेश महादेव वराटे व देवराव गणपत टाले यांचे बैल अनुक्रमे सर्पदंशाने व विद्युत करंटने मृत्युमुखी पडले, हे समजल्यावर त्यांनासुध्दा तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली.

शिवसेना (उबाठा) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तथा पक्षाच्या विचारधारेला प्रेरीत होवून पक्षप्रवेश सुरू

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन भद्रावती तालुक्यातील बेलगाव (भु.), नेताजी नगर, विंजासन आणि गौतम नगर येथील युवकांनी व महिलांनी शिवबंधन बांधून शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला.

वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत या तरुणांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. याप्रसंगी भद्रावती शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख व नगरसेवक नरेंद्र पढाल यांच्या नेतृत्वात बेलगाव (भू.) ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर गाडगे, शिवसेना उपशहर प्रमुख अरुण घुगुल यांच्या नेतृत्वात सचिन पाचभाई, सुनील पायघन, नरेश कचाटे, सुरज बावणे, विकास बावणे, कृष्णा मोहितकर, रामा टाले आणि भावना खोब्रागडे यांच्या नेतृत्वात व्यंकट रमण, सुरेश पेटकर, शामलता पेटकर अश्विनी टिकले, वनमाला टिकले यांचा शिवबंधन बांधून पक्षप्रवेश करण्यात आले. 

या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) महिला जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, विधानसभा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना भद्रावती तालुका अध्यक्ष राहुल मालेकर, प्रशांत कारेकर, रोहीत वाभिटकर, संतोष माडेकर, गोपाल सातपुते व पदाधिकारीसह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.

वरोरा-भद्रावती शिवसेना (उबाठा) तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व स्वागत करण्यात आले आहे.