वरुड पाठोपाठ देवाळा येथील नागरिकांची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : शाळेला शिक्षक मिळाला पाहिजेत यासाठी तालुक्यातील वरुड पाठोपाठ देवाळा येथील नागरिकांनी आज सोमवारला मारेगाव पंचायत समिती वर धडक देत मागणी लावून धरली आहेत. या गंभीर विषयासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

तालुक्यातील 11 गावात एकही शिक्षक नाही तर अनेक गावात एकच शिक्षकाच्या भरवश्यावर संपूर्ण शाळेची जबाबदारी सोपवण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. असा आरोप करित देवाळा येथील नागरिकांनी गटशिक्षणाअधिकारी कांडूलवार (पं. स.मारेगाव) यांना निवेदन देऊन किमान दोन तरी शिक्षकांची व्यवस्था करण्याची आग्रही मागणी केली. यावेळी गावातील महिला पुरुष तथा ग्रामपंचायत पदाधिकारी सहभागी होऊन एकच मागणी लावून धरली.

देवाळा जि.प. शाळेमध्ये एकूण 1 ते 8 वर्ग असून आज रोजी शाळेत 40 पटसंख्या असून, त्यामध्ये एकच शिक्षक कार्यरत आहे. शिक्षणाचा खेळखंडोबा होत असून,विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता ढासळत असल्यामुळे तात्पुरता का? असेना दोन तरी शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी गटशिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली.

उपसरपंच सुरेश लांडे, कुमुद रोगे, लताबाई रामटेके, प्रवीण रोगे, कवीता लोणारे, ज्योती सिडाम,
भास्कर निखाडे, अनंता बोकडे, रंजना कोंचाळे, अशोक साठे, महादेव गाणफाडे, आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. 



पालकांनी भरवली पंचायत समितीच्या आवारात शाळा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वरूड (सालेभट्टी) गट ग्रामपंचायत येथील ग्रामस्थ, शिक्षण सुधार समिती, व पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन पंचायत समितीच्या आवारात शाळा भरवून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यात आले. चक्क! प्रशासनाच्या आवारात शाळा भरल्याने शासन प्रशासनाचा भोंगळ कारभार व शिक्षणाचा खेळखंडोबा चहाट्यावर आला आहे. दरम्यान, तोबा बघ्यांची गर्दी दिसून आली.
वरुड येथील ग्राम. शिक्षण सुधार समिती व ग्रामपंचायत सदस्य तसेच पालकांनी मारेगाव पंचायत समितीच्या आवारात शाळा भरवून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज सोमवारी शाळा भरवली. येथील जिल्हा परिषद शाळेला 1 ते 7 वर्ग असून 43 विद्यार्थी संख्या आहे. मात्र, शाळेला केवळ एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
शाळेत एकच शिक्षक आणि विद्यार्थी 43 संख्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्जनात अडचण होत असल्यामुळे पालक तथा ग्राम., शिक्षण समिती च्या वतीने पंचायत समितीचे आवारात "क्लास" भरवून अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास तात्काळ गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन मंगळवारला शिक्षक उपलब्ध करून देण्याची लेखी हमी दिली. आणि आंदोलन मागे घेण्यात आले.
मात्र, उदया दि.4 जुलै रोजी शिक्षक उपलब्ध, शाळेवर शिक्षक हजर न झाल्यास आम्ही पालक व ग्रामस्थ पुन्हा पंचायत समिती च्या आवारात शाळा भरवण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला. यावेळी देविदास भट, राजू घोसरे, प्रमोद काकडे, रानु नावडे, प्रफुल काकडे, शरद पवार, प्रफुल भोकरे, कवडू चहानकार, गजानन भोभर, दिनेश झट्टे, संतोष पवार, सुधाकर लोंढे, अशोक टोंगे, सिमा पवार, सीमा पवार, किर्तीमाला घोसरे, देवका पवार, संजय पवार, लता घोसरे, उषा पवार, ज्ञानेश्वर जगताप, शंकर भोकरे, महादेव घोसरे, आदींची उपस्थित होती. 

दोन गटात तुंबळ हाणामारी,पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : व्यावसायिक स्पर्धेच्या कारणावरून शनिवारी रात्री मेघदूत कॉलनी चिखलगाव येथे कोळसा व्यापाऱ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे मेघदूत कॉलनीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी कोळसा व्यावसायिक तिरुपती बकय्या लकमावार यांच्या फिर्यादीवरून 12 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील 5 जणांना रविवारी सकाळी अटक करण्यात आली, तर इतर फरार आहेत. तिरुपती बकय्या लकमावार (वय 35, रा. चिखलगाव, मेघदूत कॉलनी). तो कोळसा वाहतुकीचा व्यवसाय करत असून लाल पुलिया परिसरात बालाजी ट्रान्सपोर्ट नावाची प्रतिष्ठान आहे. तर आरोपी मतीन खान (वय 35, रा. चिखलगाव), अन्वर खान (41) रा. राजूर कॉलरी आणि बाबू उर्फ ​​नासीर खान रा. राम शेवाळकर परिसर वाणी असल्याची माहिती आहे. त्यांचे के.जी. एन. ट्रान्सपोर्ट नावाची प्रतिष्ठान आहे. ते कोळशाची वाहतूकही करतात.
शनिवारी 1 जुलै रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास आरोपी बोलेरो (एमएच 34 बीआर 8787) व दोन काळ्या-पिवळ्या वाहनांसह मेघदूत कॉलनी येथील तिरुपती यांच्या घरासमोर गेले. सर्व आरोपी काठ्या आणि रॉडसह कारमधून उतरले आणि मारहाण करण्यासाठी तिरुपतीच्या घरी पोहोचले. दरम्यान तिरुपती तेथून पळून गेला. दोन्ही समूहांनी एकमेकांवर लाठ्या काठ्या उगारल्या. हा राडा सुरु असतांनाच पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. राडा घालणाऱ्यांपैकी काही जन पळत सुटले तर पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींमध्ये मतीन अहेमद (35) रा. बोधे नगर चिखलगाव, अनवर खान (42), मो. अतिक (26), मो. जमीर (२१), तिघेही राहणार राजूर, मो. आरिफ सगीर (27) रा. माजरी यांचा समावेश असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम 173, 174, 147, 148, 149, 504, 506 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटना स्थळावरून पळून गेलेल्या आरोपींचाही पोलिसांनी शोध लावला असून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सपोनि आशिष झिमटे करीत आहे.

संतोष भाऊ रोगे मनसे जिल्हाउपाध्यक्ष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

                      जीवेम शरद: शतम् 

      शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
      कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
      तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
      तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
      तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..

निर्भीड दिलखुलास मोकळ्या‌ मनाचे मनमिळाऊ स्वभावाचे सदैव, मैञीचा भाव ठेवणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे, सामाजिक राजकीय कार्यात अग्रेसर असणारे युवानेते, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस...जिल्हाउपाध्यक्ष (मनसे) मा श्री संतोष भाऊ रागे भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा....!

आजच्या खास दिनी आपणास मनापासून शुभेच्छा! हसत राहा तू सदैव तू, चमकत राहा सदैव तू, जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तूम्ही उजळत राहा, खूप खूप शुभेच्छा! तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो, आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत हिच ईश्वर चरणी, आई जगदंबे चरणी प्रार्थना...

     सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य
     आरोग्य तुम्हाला लाभो
     जन्मदिवसाच्या तुम्हाला अगणित खूप खूप शुभेच्छा 

या प्रगटदिनी वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा...!

शुभेच्छुक :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तालुका मारेगाव 

विकास ग्रुप व कवितेचे घर शेगांव (बु) यांच्या वतीने डॉ. रवींद्र शोभणे यांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

 वरोरा : अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सर्व संमतीने ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाल्याबद्दल विकास ग्रुप व कवितेचे घर, शेगांव (बु ) यांच्या वतीने सन्मानचिन्ह, शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. 
     
याप्रसंगी विकास ग्रुपचे समन्वयक व कवितेच्या घराचे संकल्पनाकार किशोर पेटकर, कवितेच्या घराचे कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे, विकास ग्रुपचे सदस्य नितीन वैद्य, नागपूर येथील निवृत प्राचार्य श्रावण सूरंशे, शार्दुल पेटकर, प्रामुख्याने उपस्थित होते.
    
सत्कार प्रसंगी बोलताना प्रा. प्रमोद नारायणे म्हणाले, डॉ. रवींद्र शोभणे यांच्या रूपाने विदर्भाच्या मातीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार व कथाकार मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला मिळालेला आहे. त्यांच्या सर्वच कादंबऱ्या लक्षवेधी आहे. त्यांनी आपल्या कादंबऱ्यामधून सामाजिक वास्तवाबरोबरच राजकीय व्यवस्थेवर भाष्य केले आहे. त्यांच्या कथांना ग्रामीणतेचा स्पर्श झालेला आहे आणि शहरातील घुसमटही या कथा प्रभावीपणे मांडत आहेत. डॉ. रवींद्र शोभणे यांच्या निवडीमुळे साहित्य सेवा करणारा योग्य साहित्यिक संमेलनाला अध्यक्ष म्हणून मिळाला असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांचे साहित्य उत्तरोत्तर बहरत जावो अशा सदिच्छा सुद्धा त्यांनी विकास ग्रुप व कवितेचे घर शेगांव ( बु ) यांच्या वतीने व्यक्त केल्या.
 
किशोर पेटकर म्हणाले, डॉ. रवींद्र शोभणे यांच्या कथा आम्ही विविध वृतपत्रातून आणि मासिकांमधून वाचत असतो. त्यांच्या कथांनी मानवी जीवनाचे विविध कंगोरे मांडलेले आहेत. समाजातील विसंगती त्यांनी साहित्यातून टिपलेली आहे. त्यांचे साहित्य म्हणजे घटना प्रसंगांची फक्त गुंफणच नाही, तर वाचकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे मूल्यद्रव्य होय. त्यामुळे डॉ. शोभणे यांच्या साहित्याची मौलिकता अपार आहे असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य श्रावण सुरंशे यांनी डॉ. रवींद्र शोभणे यांच्यांशी त्यांच्या साहित्याच्या अनुषंगाने संवाद साधताना उत्तरायण, पडघम, पांढर आणि होळी या कांदबऱ्यांच्या निर्मिती प्रकियेविषयी व त्यातील कथासूत्राविषयी विविध प्रश्न विचारले.
     
डॉ. रवींद्र शोभणे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, जीवनातील अघटित घटणारी घटना ही माझ्या मनाला चटका देऊन जाते आणि त्याला साहित्य रूप देण्याचा मी प्रयत्न करतो, त्यातून माझ्या कथा साकार होतात. कादंबरीसारखा साहित्य प्रकार लिहिताना बराच अवधी द्यावा लागतो. चिंतन करावे लागते. जीवनाचे योग्य रितीने आकलन व्हावे लागते, उत्तरायण ही कादंबरी लिहायला मला दहा वर्षे लागली, या कादंबरीतील पौराणिक पात्रांना समजून घेऊन त्यांना मानुष पातळीवर आणण्याची मी धडपड केली. पडघम कांदबरी बऱ्याच वर्षांने आली. त्यामुळे साहित्य लेखनासाठी लेखकाला असे स्वतःत मुरवावे लागते असे सांगून त्यांनी यथोचित सत्कार केल्याबद्दल विकास ग्रुपचे व कवितेच्या घराचे आभार मानले व अध्यक्षपदाला योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले. संचालन नितीन वैद्य यांनी तर आभार शार्दुल पेटकर यांनी केले.