वरुड पाठोपाठ देवाळा येथील नागरिकांची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : शाळेला शिक्षक मिळाला पाहिजेत यासाठी तालुक्यातील वरुड पाठोपाठ देवाळा येथील नागरिकांनी आज सोमवारला मारेगाव पंचायत समिती वर धडक देत मागणी लावून धरली आहेत. या गंभीर विषयासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

तालुक्यातील 11 गावात एकही शिक्षक नाही तर अनेक गावात एकच शिक्षकाच्या भरवश्यावर संपूर्ण शाळेची जबाबदारी सोपवण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. असा आरोप करित देवाळा येथील नागरिकांनी गटशिक्षणाअधिकारी कांडूलवार (पं. स.मारेगाव) यांना निवेदन देऊन किमान दोन तरी शिक्षकांची व्यवस्था करण्याची आग्रही मागणी केली. यावेळी गावातील महिला पुरुष तथा ग्रामपंचायत पदाधिकारी सहभागी होऊन एकच मागणी लावून धरली.

देवाळा जि.प. शाळेमध्ये एकूण 1 ते 8 वर्ग असून आज रोजी शाळेत 40 पटसंख्या असून, त्यामध्ये एकच शिक्षक कार्यरत आहे. शिक्षणाचा खेळखंडोबा होत असून,विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता ढासळत असल्यामुळे तात्पुरता का? असेना दोन तरी शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी गटशिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली.

उपसरपंच सुरेश लांडे, कुमुद रोगे, लताबाई रामटेके, प्रवीण रोगे, कवीता लोणारे, ज्योती सिडाम,
भास्कर निखाडे, अनंता बोकडे, रंजना कोंचाळे, अशोक साठे, महादेव गाणफाडे, आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. 



Popular posts from this blog

तरुण विवाहितची गळफास घेऊन आत्महत्या,मारेगाव येथील घटना

लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे चिंतातूर महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

भीषण अपघातात तरुण ठार,वणी-वरोरा महामार्गवरील घटना