शेतकऱ्याच्या मुलीने JEE B मध्ये मारली बाजी.


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील मुकटा येथील कु.प्रणाली विजय ढवस हिने JEE B arch परीक्षेत 99.73 टक्के टाईल घेऊन देशातुन 47 वा नंबर.प्राप्त करून गावासह तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.

कु.प्रणाली ही आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे 12 व्या वर्गात विज्ञान शाखेत मागच्या वर्षी शिकत होती.तीला 86.83 टक्के मार्क होते.तिचा कॉलेज मधुन 3 रा नंबर होता.तिचे 10 वी पर्यंतचे शिक्षण हिरालाल लोया विद्यालय वरोरा येथे झाले. 

तालुक्यातील मुकटा येथील शेतकऱ्यांच्या मुलीने JEE B arch परीक्षेत घेतलेली ही भरारी खरंच कौतुकास्पद आहे.आई-वडील शेतकरी असून त्यांचे कडे 7 एकर शेती आहे.घरात कुणीही जास्त प्रमाणात सुशिक्षित नसताना दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या प्रणाली चे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

प्रणाली हीचा भाऊ लोकेश विजय ढवस हा 8 व्या वर्गात वरोरा येथे शिक्षण घेत आहे.प्रणाली हे श्रेय आई वडीला सह आजी आजोबांना व कॉलेजचे प्राचार्य व प्राध्यापक यांना देत आहे.

जमिनीचे आरोग्य तपासुया... मातीचे भाग्य उजळूया

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी देश आणि वैयक्तिक पातळीवर आपण जमिनीत मोठ्या प्रमाणावर रसायनं, औषधं आणि यांत्रिकीकरणाचा वापर केला. यामुळे जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ तर झालीच, पण दुसरीकडे मातीचं आरोग्य ढासळत गेलं. जमिनीचा पोत बिघडत गेला आणि तिची सुपीकता कमी झाली. ज्या ज्या वेळेस आपण शेतकऱ्यांशी त्यांच्या उत्पन्नाबद्दल चर्चा करतो, त्या त्या वेळी एक उत्तर हमखास ऐकायला मिळतं. ते म्हणजे, पूर्वी ज्या शेतात एका एकराला १० ते १२ क्विंटल कापूस व्हायचा, तिथं आता ७ ते ८क्विंटलच कापूस होतो. पण, हे असं का झालं, तर यामागे एक प्रमुख कारण सांगितलं जातं ते म्हणजे जमिनीची उत्पादकता कमी होणे. त्यामुळे मग आता गरज निर्माण झालीय, ती जमिनीचं आरोग्य तपासायची. म्हणजे आपण ज्या जमिनीत पीक पिकवतो, तिथल्या मातीत कोणती मूलद्रव्ये किती प्रमाणात आहे, ते जाणून घेण्याची आणि त्यानुसार जमिनीतील मूलद्रव्यांचं प्रमाण संतुलित ठेवण्याची. सध्या खरीपाच्या कामांची सुरूवात शेत-शिवारांमध्ये झाली आहे, सध्या ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेच्या निमित्तानं आपण जमिनीचे आरोग्य म्हणजे काय? माती परीक्षणाद्वारे जमिनीची आरोग्य पत्रिका कशी काढायची? ती काढण्यासाठी मातीचे नमुने कसे घ्यायचे? या पत्रिकेचे फायदे काय आहेत? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जमिनीचं आरोग्य

जमिनीचं आरोग्य हे जमिनीत असणारे घटक आणि जमिनीचे गुणधर्म यावर अवलंबून असतं. जमिनीमध्ये असणारी खनिजद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ, जल आणि वायू हे चारही घटक पिकांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं.जमिनीचं आरोग्य चांगलं असेल तरच ती चांगल्या प्रमाणात उत्पादन देते. नत्र, स्फुरद, पालाश की जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये आहेत. तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये आहेत. याशिवाय जस्त, लोह, तांबे, मंगल, बोरॉन आणि मॉलेब्डेनम ही सूक्ष्म अन्नद्रव्येही जमिनीत असतात. या सगळ्या अन्नद्रव्यांचं जमिनीतील प्रमाण तपासणं यालाच माती परीक्षण असं म्हणतात. माती परीक्षण करण्यासाठी सगळ्यात पहिला टप्पा येतो तो मातीचा नमुना योग्य पद्धतीनं घेण्याचा.

मातीचा नमुना पद्धत

मातीचा नमुना वर्षभरात केव्हाही घेता येतो. पण, बहुतेकदा रब्बी पिकांच्या काढणीनंतर किंवा उन्हाळ्यात नमुना घेतल्यास परीक्षणाचा अहवाल पेरणीपर्यंत उपलब्ध होतो. पिकांच्या काढणीनंतर जमीन कोरडी असताना मातीचा नमुना घ्यावा. पिकांना खत टाकले असेल तर त्यानंतर लगेच मातीचा नमुना घेऊ नये. मातीचा नमुना घेताना शेताचं उतार, रंग, पोत, खोली यानुसार वर्गीकरण करावं. प्रत्येक भागातून एक स्वतंत्र नमुना घ्यावा. पाणथळ जागा, झाडाखालील जमीन, बांधाजवळील जागा, शेतातील गुरे बांधण्याची जागा, शेतातील बांधकामाजवळचा परिसर, अशा ठिकाणाहून मातीचा नमुना घेऊ नये. सपाट पृष्ठभागावर ३०३०३० सें.मी. लांबी, रुंदी व खोलीचा खड्डा तयार करावा. त्यात २ सें.मी. जाडीची माती खुरप्याच्या सहाय्यानं खरडून हातावर काढायची आणि प्लास्टिकच्या बादलीत घ्यावी. अशाप्रकारे प्रत्येक भागातून ५ ते १० नमुने प्रत्येक भागातून घ्यावे. नमुने घेतलेली माती एका कागदावर पसरावी. ती मिसळून घ्यावी. ढिगाचे चार भाग करून समोरासमोरील दोन भाग काढून टाका. उरलेले दोन भाग पुन्हा मिसळावे व पुन्हा चार भाग करावे. ही प्रक्रिया अर्धा किलोग्राम माती शिल्लक राहीपर्यंत करावी.

ही माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी. यासोबत एका कागदावर शेतकऱ्याचं नाव, पत्ता, गट किंवा सर्व्हे नंबर, जमिनीचा प्रकार, नमुना घेतल्याची तारीख, मागील हंगामात घेतलेले पीक व त्याचं उत्पादन, पुढील हंगामात घ्यावयाचे पीक याची माहिती लिहावी आणि हा नमुना स्थानिक कृषी विभागाच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत घेऊन जावा.

प्रयोगशाळेत गेल्यानंतर…

मातीचा नमुना प्रयोगशाळेत नेल्यानंतर तिथं त्याची नोंदणी केली जाते. शेतकऱ्यानं नेमकं हा नमुना कोणत्या घटकांच्या तपासणीसाठी आणला आहे, ते सांगणं आवश्यक असतं. त्यानुसार यासाठीचं शुल्क आकारलं जातं. सर्वसाधारण मातीचा नमुना ज्यात सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद आणि पालाश यांची तपासणी करायची असेल तर ३५ रुपये शुल्क आकारले जाते. आणि ३० दिवसांत मातीची आरोग्य पत्रिका अर्थात अहवाल दिला जातो. विशेष मातीचा नमुना ज्यात सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, मुक्त चुना आणि भौतिक गुणधर्माची तपासणी करायची असेल तर २७५ रुपये शुल्क आकारले जाते व ४५ आरोग्य पत्रिका दिली जाते. जमिनीतील सूक्ष्म मूलद्रव्ये जसं की लोह, जस्त, मंगल, तांबे यांची तपासणी करायची असेल तर २०० रुपये शुल्क आकारुन ३० दिवसांत आरोग्य पत्रिका दिली जाते. एकदा का कागदपत्रांची पूर्तता झाली की, मातीच्या नमुन्याला चाळणीद्वारे स्वच्छ केलं जातं आणि मग ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं जातं. इथं या नमुन्यातील वेगवेगळ्या घटकांची तपासणी केली जाते. त्यानुसार त्या घटकांचं मातीतील प्रमाण कमी आहे, जास्त आहे की पुरेसं आहे, हे संगणकावर नोंदवलं जातं. पुढे ही माहिती आरोग्य पत्रिकेवर नमूद केली जाते आणि ती पत्रिका शेतकऱ्याला सोपवली जाते.

जमिन आरोग्य पत्रिकेचे फायदे 

नंदुरबारचे जिल्हा अधिक्षक कषी अधिकारी राकेश वाणी सांगतात, माती परीक्षण केल्यामुळे शेतकऱ्याला आपल्या जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे किंवा कोणते घटक जास्त प्रमाणात आहे याची माहिती मिळते. यामुळे खतांचं आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचं नियोजनं करणं सोयीचं होतं. माती परीक्षण अहवालानुसार खते दिल्यास रासायनिक खतांवरील अवाजवी खर्च टाळता येतो आणि त्याचे दुष्परिणामही टाळता येतात. माती परीक्षण अहवालानुसार खते दिल्यास ती योग्य, संतुलित आणि शिफारशित प्रमाणात दिली जातात. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारतं आणि तिची उत्पादकता वाढीस लागते. परिणामी, पिकांचं उत्पन्न वाढण्यास मदत होते. माती परीक्षण केल्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म टिकवून ठेवता येतात. क्षारपड, चोपण, आम्लयुक्त जमिनीवर माती परीक्षण अहवालानुसार उपाययोजना करता येतात.

जमीन आरोग्य पत्रिकेचं वाचन

जमिनीची आरोग्य पत्रिका तर मिळाली, पण ती वाचायची कशी, त्यानुसार जमिनीला खतं द्यायची कशी, हे शेतकऱ्यांना अनेकदा लक्षात येत नाही. तुम्हाला जी आरोग्य पत्रिका दिली जाते तिचे साधारत: दोन भाग पडतात. पहिल्या भागात शेतकऱ्याविषयीची माहिती जसं की नाव, गाव, मोबाईल क्रमांक दिलेला असतो. त्यानंतर नमुन्याचा तपशील यात नमुना घेतल्याची तारीख, शेताचं क्षेत्र इ. बाबी नमूद केलेल्या असतात. दुसऱ्या भागात मातीच्या परीक्षणातून समोर आलेले परिणाम नोंदवलेले असतात. यात जमिनीतील १२ अन्नद्रव्यांची नावे आणि त्यासमोर जमिनीतील त्यांचं प्रमाण नमूद केलेलं असतं. तुमच्या जमिनीच्या गट क्रमांकात ही अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत, याची वर्गवारी त्या त्या अन्नद्रव्यासमोर केलेली असते. खूप कमी, कमी, मध्यम, पुरेसं, उच्च, कमतरता अशा प्रकारे अन्नद्रव्यांची वर्गवारी केलेली असते. यानुसार मग आपल्या जमिनीतील मूलद्रव्याचं प्रमाण पाहून खताचा डोस किती वापरायचा, याची माहिती शेतकरी गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून घेऊ शकतात.

रणजितसिंह राजपूत
जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

वणी : बालकाचे प्राण वाचवण्याकरिता आधार माणुसकीचा सेवा भावी संस्थाच्या वतीने आर्थिक मदत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महावितरणच्या गलथान कारभारामुळे लाठी येथील 8 वर्षीय बालक पियुष संभा माहुरे याला विजेचा स्पर्श झाल्यामुळे जखमी झाला.

या 8 वर्षीय बालकाचा लातूर येथे दिनांक 6 मे पासून उपचार चालू आहे. पियुष यांच्या उपचाराकरिता त्यांच्या वडिलांकडे उपचारा करिता पैसे नसल्याची माहिती आधार माणुसकीचा सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष दिपकभाऊ मत्ते यांना मिळाली त्यामुळे "आधार माणुसकीचा सेवा भावी संस्था" वणीच्या वतीने आज माहुरे कुटुंबाला लाठी येथील निवासस्थानी येऊन 20 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आकाश सूर तर सचिव उपेश आवारी ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर,नत्थु बोधे,आशिष माहुरे हे उपस्थित होते.

जाणून घ्या आजचे राशभाविष्य : २८ में २०२३



                   राशीभविष्य : २८ मे रविवार..!

मेष :
मेष राशीच्या लोकांना प्रत्येक बाबतीत काळजीपूर्वक वागावे लागेल. तुमचा परीक्षेचा टप्पा सुरू आहे, तुम्ही तुमच्या कामात जास्त लक्ष दिलेले बरे. काही कारणास्तव तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. अनेक लोकांसाठी आजचा दिवस आळशीपणाचा असेल. किरकोळ तणाव हे तुमच्या समस्येचे कारण असू शकते.

वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस खूप व्यस्त असेल. संध्याकाळपर्यंत तुम्हाला चांगली बातमी मिळेल आणि तुम्हाला फायदा होईल. व्यावसायिक बाबतीत सावध राहून आणि कोणताही निर्णय घेताना सावध राहून नुकसान कमी करू शकता. तुम्हाला गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदा होईल. पैसे गुंतवू शकतात.

मिथुन :
मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस उर्जेने भरलेला असेल. दुपारपर्यंत काही चांगली बातमी मिळू शकते. आपण एखाद्या विशिष्ट प्रकरणात माहिती मिळवू शकता. विद्यार्थ्याने अभ्यासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित केल्यास त्याचा फायदा होईल. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात नवीन तंत्रांचा अवलंब करून नफा मिळू शकेल.

कर्क :
कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक बाबतीत भाग्यवान ठरू शकतो. केवळ एका युक्तीने काम केल्याने तुमचे काम मंद होऊ शकते. कोणतेही धोकादायक पाऊल उचलू नका. कुटुंबातील तुमचे विरोधक काही काळ डोके वर काढू शकणार नाहीत. तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मग सर्व काही ठीक होईल.

सिंह :
सिंह राशीच्या लोकांचा दिवस खूप चांगला जाईल. कोणतीही बाब किंवा नवीन कल्पना हृदयात येऊ शकते आणि ती अंगीकारणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नातेवाईकांच्या जुन्या तक्रारी दूर करण्याची वेळ. मित्रांसोबत राहणे फायदेशीर ठरू शकते. व्यवसायातील काम मनाप्रमाणे असेल तर आनंदाचे वातावरण राहील. कोणाशीही वाद घालणे टाळा.

कन्या :
कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस खूप व्यस्त असेल. मेंदूने केलेले काम फायदेशीर ठरेल आणि त्यामुळे तुमचे काम वेळेवर पूर्ण होऊन तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळेल. जुन्या काळापासून सुरू असलेला तणावही कमी होईल. तुम्ही इतरांना मदत केलीत तर तुम्हाला मदत करणारेही येतील. आज तुम्ही जे काही काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने कराल ते फळ मिळेल.

तूळ :
तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक लाभाचा आहे. दिवसाच्या पहिल्या भागात फोन कॉल येऊ शकतात. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. ऑफिस सोबती देखील टीमवर्कमुळे खूश होतील. व्यवहार आणि व्यवसायातील प्रत्येक काम हिशोबानुसार करा. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. रोमान्सच्या दृष्टीनेही दिवस चांगला आहे. तुमचा खर्चही थोडा जास्त असू शकतो.

वृश्चिक :
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस व्यस्त असेल आणि त्यांना दिवसाच्या पहिल्या भागात जास्त मेहनत करावी लागेल. संध्याकाळपर्यंत शांतता राहील. लाभाच्या अनेक संधी येतील. फिरण्याचीही संधी मिळेल. संध्याकाळीही अशीच संधी आहे. पक्षातील काही चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेट होईल आणि एखादे विशेष कार्य पूर्ण झाल्याने चिंता दूर होईल.

धनु :
धनु राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत वादात पडू नका. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला प्रवासासारखे वाटेल आणि या काळात तुम्हाला काही कामाची माहिती मिळू शकेल. तुम्ही कोणत्याही मोहिमेत जिंकू शकता. आर्थिक बाबतीत अनुभवी लोकांच्या सल्ल्याने फायदा होईल.

मकर :
मकर राशीच्या लोकांनी प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी. तुमचे कोणाशीही मतभेद नाहीत हे ध्यानात ठेवा. नोकरीत तुमची स्थिती चांगली राहील. व्यवसायात चांगला फायदा होईल. वैवाहिक जीवनही यशस्वी होईल. दिवसभरात अनेक कामे करायची आहेत, पण महत्त्वाची कामे प्राधान्यक्रमानुसार पूर्ण करा.

कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांचा दिवस चांगला असून मेहनतीला यश मिळेल. समुहासोबत काम आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत काम केल्याने चांगले परिणाम मिळतील. संभाषणातून नवीन कल्पना येऊ शकते. मित्रासाठी भेटवस्तू खरेदी करताना खिशाची काळजी घ्या.

मीन :
मीन राशीच्या लोकांसाठी दिवस खूप संथ असेल. हळूहळू पुढे जाणे फायदेशीर ठरू शकते. प्रयत्न करत राहिल्यास रखडलेली कामेही पूर्ण होतील. सतर्क राहा आणि तुमच्या कामात सहभागी व्हा. तुम्ही संघर्षातून मुक्त होऊ शकता. अवाजवी खर्च करण्याऐवजी तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा कारण तुमचा खर्च जास्त असेल.


मी असुनही नसल्यासारखीच..., नवरा दुर्लक्ष करत असेल कर 'या' ५ टिप्स वाढवतील संसारात गोडवा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

कधी कधी असं होतं की, समोरच्या व्यक्तीला तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं. मात्र, तो जाणूनबुजून काही गोष्टी सांगणं टाळतो.

'संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच' हे शब्द आपण अनेक वेळा आपल्या आई-वडिलांच्या नातेवाईकांच्या तोंडून ऐकले असतील. कारण, त्यांना संसाराचा अनुभव असतो त्यांचे ते अनुभवाचे बोल असतात. मात्र, सध्याच्या जनरेशनमधील संसारांना लगेच तडा जातो, कित्येक वेळा किरकोळ भांडणं घटस्फोटापर्यंत जातात. नवरा मला वेळ देत नाही, समजून घेत नाही, ही अनेक विवाहित महिलांची तक्रार असते. परंतु अनेकदा ही कारणं खोटी असून शकतात, किंवा गैरसमजुतीतून आलेली असतात.

कारण, लग्नानंतर अनेक पुरुषांना कामाच्या व्यापामुळे इच्छा असून देखील आपल्या पत्नीला वेळ देणं जमतं नाही. त्यामुळे आपला नवरा आपल्याकडे दुर्लक्ष करतोय असं महिलांना वाटायला लागतं. अशा परिस्थितीत काही महिला आपल्या मनातील ही खदखद घरच्यांसमोर किंवा नवऱ्यासमोर बोलून दाखवतात, तर काही मुली या गोष्टी आपल्या मनात ठेवतात आणि तणावात जातात.

मात्र, नवरा लग्नानंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय, तुम्हाला वेळ देत नाही, असं तुम्हाला वाटतं असेल तर या गोष्टींचा सतत विचार करून तणावात न जाता, तुमचं नातं जिवंत कसं ठेवता येईल यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. तर चला जाणून घेऊया तुम्हा दोघांच्या सुखी संसारासाठी काय करावं लागेल.

वेळ द्या :
तुम्हाला तुमचा जोडीदार दुर्लक्ष करतोय, काही बोलत नाही असं वाटत असेल तर तुम्ही काही दिवस शांत रहा. त्याला थोडा वेळ द्या, कारण काही वेळ गेल्यानंतर त्याच्या काही अडचणी दूर झाल्या की, तो स्वतः त्याच्या मनातील गोष्टी तुम्हाला सांगायला सुरुवात करेल. पण त्यासाठी तुम्ही काही दिवस त्याला त्याची स्पेस द्यायला हवी.

शांत रहा :
कधी कधी असं होतं की, समोरच्या व्यक्तीला तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं. मात्र, तो जाणूनबुजून काही गोष्टी सांगणं टाळतो. कारणं तुम्हाला ती गोष्ट सांगण्यासाठी तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. त्याला जेव्हा योग्य वेळ आली आहे असं वाटेल तेव्हा तो मनातलं सर्व काही सांगेल त्यासाठी त्याला काही वेळ द्यायला हवा. त्यामुळे तुम्ही त्याला आपल्या मनातील काहीही सांगत नाही, असं म्हणत ओरडण्यापेक्षा शांत रहा आणि योग्य वेळेची वाट पाहा. असं केल्यामुळे त्याच्या मनातही तुमच्याबद्दलचा आदर वाढेल.

संवाद :
वैवाहिक जीवनात सुसंवाद असणं फार महत्वाचं आहे. संवादाने प्रत्येक गोष्टीवर उपाय सापडतो असं म्हणतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमचा नवरा तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय असं तुम्हाला वाटेल. तेव्हा तुम्ही स्वतः त्याच्याशी संवाद साधा. तो दुर्लक्ष करतोय असा दोष देण्याऐवजी त्याला काही अडचणी आहेत का? हे जाणून घ्या.

नात्यातील प्रेम वाढवा :
जर तुमच्या नात्यातील ओढ कमी झाली असेल तर ती कोणत्याही प्रकारे पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण नात्यात ओलावा राहिला तरच प्रेम वाढेल आणि प्रेम वाढलं तर जोडीदार तुम्हाला कधीच इग्नोर करणार नाही.

समुपदेशकाची मदत घ्या :
वरील सर्व उपाय करुनही जर तुमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे बोलणं होत नसेल, तर अशा गोष्टी दुर्लक्ष करण्यापेक्षा चांगल्या समुपदेशकाची मदत घ्या आणि नात्यातील दुरावा दुर करण्याचा प्रयत्न करा.