त्या निराधार महिलेचे घरावरील छत वादळ वाऱ्याने उडाले

आकांतात घरावरील उडालेले टिनपत्रे 

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यासह शिवणाळा उमरीपोड येथे बुधवारी अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. त्यामुळे वादळ पाऊस वाऱ्याने येथील सुशिला बुतू जुनघरे (33) या निराधार महिलेच्या घरावरील छत पूर्णतः उडून गेले असून ती सध्या बेघर झाली आहे.

परिणामी तालुक्यात रोजच्या होणाऱ्या वादळ पाऊस वाऱ्यामुळे हे जुनगरी कुटुंब भितीखाली वावरत आहेत. दि.26 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार फटका तालुक्याला बसला असताना यात शिवणाळा (उमरीपोड) येथील सुशीला जुनघरे यांच्या राहत्या घराचे छत्र आकांताने हरवले आहे. यात घरातील जीवनाशक्य वस्तू, कपडे त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. महिलेच्या कुटुंबात दोन मुले व ती स्वतः राहते. तसेच सदर महिला ही निराधार  आहे.
गेल्या काही दिवसापासून तालुक्यात अवकाळी पावसाने वादळ वाऱ्याने थैमान घातले आहे. रोज काहींना काही घटना माध्यमातून समोर येत आहे. विशेष म्हणजे विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होत असून काही ठिकाणी वीज पडत असल्याने या निराधार महिलेला प्रशासनाच्या तात्काळ मदतीची अत्यंत गरज असून संबंधित विभाग व स्थानिक प्रशासन घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परंतु सुशीला ला शासनाच्या तात्काळ मदत मिळावी अशी आर्तहाक आहे. 
महाराष्ट्र् राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तरतुदी नुसार आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षितेची जबाबदारी ही संबंधित तालुका व जिल्हा व्यवस्थापन विभागाची आहे. त्या अनुषंगाने सदर घटनांना शह देण्यासाठी आपआपल्या परीने विभाग अधिकारी व कर्मचारी तसेच राजकीय प्रतीनिधी यांची जबाबदारी पाडली पाहिजे. असा सूर सदरील घटनास्थळी झालेल्या नुकसानीकडे पाहता म्हणता येईल. अशावेळी नुकसानग्रस्त कुटुंबाला लवकरात लवकर शासनाची मदत मिळावी हिच अपेक्षा.

- गंगाधर लोणसावळे महाराज
सालेभट्टी ता. मारेगाव 

ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली, महागाई च्या भडक्याने घर खर्चाचे बजेट कोलमडले

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये स्वयंपाक करण्यासाठी पुन्हा चुली पेटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिला आता पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत. ग्रामीण भागात उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस जोडणी देण्यात आल्यावर चुलीचा वापर कमी झाला होता. परंतु सिलेंडरचे दर भडकताच,आता एवढे बजेट आणायचे कुठून हा प्रश्न मजूर वर्ग महिला समोर निर्माण झाल्याने आपली चूलच बरी म्हणत चूली पेटायला लागल्या आहे. त्यामुळे महागाई च्या सतत च्या भडक्याने महिलांचे घर खर्चाचे बजेट डगमगले.

मागील वर्षा पासून गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भीडत उमटत आहे. आहे. या वाढत्या महागाई व गॅस दराची झळ सामान्य कुटुंबाला बसत आहे. मजुरांच्या घरातील घर खर्चाचे बजेट कोलमडत असून, काही भागात तर मिळत असलेल्या फ्री धान्य विकून घरातील तेल मीठ सारख्या गरजा कशा बशा भागवने चालू आहे. परिस्थिती नाजूक असतांना गेल्या काही  महिन्यामध्ये हाताला काम पण नाही, मग मोलमजुरी नसल्याने घर चालवायचे कसे? अशी चिंता कुटुंब प्रमुखांना असतांना दुःख सांगावे कोणाला, असा नाराजीचा सुर महिला वर्गातून उमटत आहे.

मारेगाव महसूल विभागाची दोन ट्रॅक्टर वर कारवाई

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील कोसारा सावंगी पात्रातून अवैधरित्या वाळु चोरून घेवून जाणाऱ्या 2 ट्रॅक्टर चालकाला महसूल विभागाने पकडले. ही कारवाई 26 एप्रिल रोजी सकाळी करण्यात आली.

शासनाने नवीन धोरण आणल्यानमुळे वाळूची चोरटी वाहतूक जोमात सुरु असल्याने याला आळा घालण्यासाठी महसूल विभाग गेल्या काही दिवसापासून ऍक्शन मोडवर दिसत आहे. बुधवारी 11 वाजेच्या सुमारास विना नंबर चे दोन ट्रॅक्टर अवैधरित्या वाळु चोरून घेवून जात असतांना आढळून आले असता मारेगाव नायब तहसीलदार किशोर यादव हे आपल्या पथकासह कोसारा सावंगी परिसरात गस्तीवर असतांना यांनी पकडले.

कारवाई दरम्यान,2 ट्रॅक्टर पैकी एका ट्रॅक्टर ने पोबारा केला अशी माहिती आहे. त्याचे विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तर एक मुद्देमालसह महसूल विभागाने जप्त केले. 

बाजार समितीत परिवर्तन तेजीत, यंदा गुलाल आपलाच..!!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : होऊ घातलेल्या मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. या अनुषंगाने दोन्ही पॅनल कडून यंदा गुलाल आपलाच म्हणत सभा बैठाका, चर्चा, 'या ना त्या' निमित्ताने कार्यक्रमात पुढाकार दर्शविणे सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. सहकार क्षेत्रात कायम काँग्रेस ची पकड असतांना यात बीजेपी पुरस्कृत सर्वसामान्य उमेदवार उतरवल्याने आता पक्षश्रेष्टीना विजय मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार. किंबहुना सत्ताधारी व विरोधक यांच्यात "काटे की टक्कर" होण्याचे संकेत वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या बाजार समिती च्या निवडणुकीत माजी आमदार व माजी सभापती, यांच्या गटाने बहुमतावर निवडुन आणण्याचे रणनीती अखण्यासाठी रणशिंग फुंकले. तर याच निवडणुकीमध्ये आ. संजीवरेड्डी बोदकूरवार, अनिल देरकर व विशाल किन्हेकार यांनी सुद्धा आपले उमेदवार निवडुन कसे आणता येईल यासाठी तेही नियोजन पूर्ण व्हिजिट देत आहे. पण मात्र, यात असंतुष्ट झालेल्या उमेदवारांची भूमिका काय असणार याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहेत.

मारेगाव तालुक्यात माजी सभापती नरेंद्र पा. ठाकरे यांच्या आशिर्वादाशिवाय या खुर्चीचा मानकरी ठरणार नाही. अशी वर्तुळात चर्चा आहे. ते कोणाला आशीर्वाद देतील हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या भाजपा समर्थीत शेतकरी परिवर्तन पॅनल मध्ये कोण होणार सभापती याबाबत अनिश्चितता कायम आहे.

दरम्यान, निवकडणुकीचे दिवस जवळ येत असल्याने परस्परात धाकधूक वाढली असून, मा आ. बोदकुरवार समर्थित मतदारांना पसंती दिली जात असल्याचे वर्तुळात चर्चा आहे. तर विरोधकांच्या वतीने हि बाजार समिती ताब्यात घेण्याकरीता मोठे प्रयत्न केले जात आहे. 

शेवटी "विजयी होणारं निवडणूक येणारं होऊद्या किती बी काय... यंदा गुलाल आपलाच हाय... यंदा धुराळा आपलाच हाय" असे जरी असले तरी निकालाअंती सारं चित्र स्पष्ट होणार आहे. 

'पहिले पाऊल' ठरणार ऐतिहासिक पाऊल...

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : शिक्षण विभागातील 'पहिले पाऊल' हा उपक्रम ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे सांगून मुलांसाठी प्रशासनाने सुरू केलेली ही पूर्वतयारी त्यांच्या भविष्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार असा विश्वास अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केला. 'पहिले पाऊल' या उपक्रमात खारीचा वाटा उचलण्याची अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तयारी दर्शविल्याने मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. येत्या २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असाच कार्यक्रम होणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मान्यवरांनी उपस्थित चिमुकल्यांशी संवाद साधला. सेल्फी घेताना श्री. केसरकर यांनी चिमुकल्यांना उचलून घेतले. त्यामुळे लहानग्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मान्यवरांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रवेशपात्र मुलांच्या क्षमतांची तपासणी करण्यासाठी मांडण्यात आलेल्या विविध संचांना भेट दिली. शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती निशा म्हात्रे यांनी संयोजन केले. किसन पावडे यांनी सूत्रसंचालन केले.