सोयाबीन, कापूस उत्पादकांना योग्य हमीभाव द्या !

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

नागपूर : राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे. योग्य हमीभाव देऊन आणि निर्यात धोरणात योग्य तो बदल करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मागण्यांचे पत्र केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पाठविले आहे.

हमीभाव वाढवण्याची गरज

राज्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी येते. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सोयाबीनला 8 हजार 700 आणि कापसाला 12 हजार 300 रूपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याची मागणी कृषिमंत्री सत्तार यांनी पत्रात केली आहे .

पत्रात या केल्या मागण्या

या पत्रात प्रामुख्याने योग्य हमीभावासह सोयाबीन ढेपीच्या निर्याती संदर्भात धोरणात बदल करावा, निर्यातीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यासह सोयाबीनच्या वायदे बाजारावरील बंदी उठवावी, सोयाबीन वरील 5 टक्के जीएसटी रद्द करावा, खाद्य तेलावरील आयात शुल्क 30 टक्के करावा, कापसाचे आयात शुल्क 11 टक्के करावे, कृषी कर्जासाठी सिबिलची अट रद्द करावी या मागण्यांचाही पत्रात उल्लेख आहे.

आता देशातील कुठल्याही भागातून मतदान करता येणार, निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल करण्याची तयारी...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : बदलत्या काळात अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त आपल्या गाव, शहरापासून दूर राहत असतात. निवडणुकीवेळी बऱ्याचदा त्यांना मतदानासाठी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागते.
अशा मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. आता देशातील कुठल्याही भागातून मतदाराला मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून त्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. 
रिमोट मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी आयोगाने तयारी केली आहे. त्यामुळे कुठूनही मतदान करता येणं शक्य होणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यांकडून याबाबत मतं मागवली आहेत. 31 जानेवारीपर्यंत लिखित स्वरुपात यावरचं मत राज्यांना द्यायचं आहे. तर 16 जानेवारीला 8 राष्ट्रीय पक्ष आणि 57 प्रादेशिक पक्षांच्या प्रतिनिधींना याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे.

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला मागून धडक


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : वणी-यवतमाळ राज्य महामार्गांवर अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज रोजी गुरुवारला साडे सात वाजताच्या दरम्यान, घडली असा कयास आहे.
गणेश बापुराव गुंजेकार (35) रा.बुरांडा (ख) असे अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. गणेश हे गवंडी काम करतात, परंतु तो आज वेगळ्या काही कामासाठी वणी येथे गेला असता तेथील काम आटोपून दुचाकीने गावाकडे कडे परत येत असताना वणी यवतमाळ महामार्गांवरील गौराळा फाट्यापासुन काही अंतरावर वणी कडून यवतमाळ कडे जात असलेल्या भरधाव वाहनाने दुचाकीला मागील बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला जावून आदळला. यात त्याला गंभीर मार लागल्याचे समजते. दरम्यान,घटनास्थळावरून अज्ञात वाहनासह वाहनचालक पसार झाला. अपघातग्रस्ताना लगेच उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला.
सदर घटनेच्या अनुषंगाने काल घडलेल्या घटनेची आठवण ताजी असून वणी यवतमाळ राज्य महामार्गांवरील अज्ञात वाहनाच्या घटनेत दिवासेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. काल बुधवार रोजी वणी वरून साळ्याचे लग्न सोहळा आटोपून मारेगाव कडे जावई लग्न घरी परत येत असतांना नेमका आज घडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर गौराळा फाट्यावर पुन्हा आज दुचाकीचा अपघात घडला.
भरधाव वाहन चालवणे, रस्त्यावर ट्रक उभे ठेवणे, कट मारून पळ काढणे असे सर्रास घटनाबाबत ऐकण्यात येत असून हे प्रकार थांबेल की नाही असे चर्चील्या जात आहे.

गतिरोधकाच्या मागणीसाठी व्हॉईस ऑफ मिडीया संघटना सावली तर्फे तहसीलदारांना निवेदन

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : व्हॉईस ऑफ मीडिया संघ सावली तालुका यांच्या वतीने गडचिरोली–सावली–मुल मार्गावर तसेच सावलीच्या अंतर्गत रस्त्यावर गतिरोधक लावण्यात यावा यासाठी सावली चे तहसीलदार परिक्षीत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

तसेच सततचे होणारे अपघात आणि अपघातात मृत्यू पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता ही मागणी रास्त आहे असे त्यांनी सांगितले. वरिष्ठांची चर्चा करून गतिरोधकाची समस्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन तहसीलदार साहेबांनी दिले.

निवेदन सादर करतांना व्हॉईस ऑफ मिडिया चे अध्यक्ष प्रवीण झोडे,कार्याध्यक्ष प्रा.गायकवाड,उपाध्यक्ष डॉ.शेखर प्यारमवार,सरचिटणीस नासीर अन्सारी, सह.सरचिटणीस उमेश गोलेपल्लीवार,कोषाध्यक्ष नितीन गोहणे,कार्यवाहक रुपचंद लाटेलवार,संघटक टिकाराम म्हशाखेत्री,प्रसिद्धी प्रमुख सौरव गोहणे आणि सदस्य चंद्रकांत प्रधाने उपस्थित होते.

मैत्री कट्टा तर्फे महिलांकरिता खास आगळी मोफत संधी

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेला ढोलताशा ची कमान आता महिलांनीही हाती घेतल्याच दृश्य अलीकडे मोठमोठ्या महानगरात बघावयास मिळते.

मारेगावातही महिलांना असंच हक्काचं व्यासपीठ मिळावं ह्या उदात्त हेतू ने मारेगांव मैत्री कट्टा गृप ने महिलांचा ढोलताशा पथक तयार करण्याचं मानस दाखवत नव्या वर्षात हिरकणी ढोलताशा पथक तयार करण्याचं ठरवलं. यात होतकरू हौशी निवडक तरुणी, महिलांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येणार आहे आणि तेही मोफत.
 मारेगावात प्रथमच ही आगळी संधी उपलब्ध होत असतांना हौशी महिलांनी या संधीचं सोनं करण्याची गरज निर्माण झाली आहे. मोजक्याच रिक्त जागेसाठी इच्छुक महिलांनी ह्या संधीचा लाभ घेण्याकरिता खालील क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दिपक जुनेजा - 8830897245
उदय रायपुरे - 7020615358
बिना दुपारे - 9356035463
प्रतिभा डाखरे - 8999515506
मीरा दुपारे - 9850197557