'पुष्पा'च्या घराला आग; कायर येथील घटना

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : मौजे कायर येथील पुष्पा अर्जुन आवारी यांच्या घराला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले. सदर घटना आज दि.29 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता च्या सुमारास घडली. 

वणी तालुक्यातील कायर येथे वास्तव्यास असलेल्या पुष्पा अर्जुन आवारी ह्यांच्या घराला आज सकाळी अचानक आग लागली, आगी मध्ये घरातल्या जीवनाश्यक वस्तू जळून राख झाल्या आहे. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही.

पुष्पा यांच्या घराला आग शॉट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, या आगीत सौ आवारी यांचे अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले अशी माहिती संबंधित विभागाने दिली आहे. 

गोडावून मधून दीड लाखांचा कापूस पळवीला

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

मुकुटबन : गेल्या काही दिवसापासून या परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.

मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुरदेवी शेत शिवारातून अज्ञात चोरट्यांनी शेतात शिरून 20 क्विंटल कापूस लंपास केला.

झरी तालुक्यातील बोपापूर येथील रहिवाशी रवी प्रभाकर ढेंगळे यांचे सुरदेवी शिवारात शेत आहे. ढेंगळे यांनी त्यांच्या शेतात निघालेल्या कापूस शेतातीलच गोडावून मध्ये ठेवला होता. 26 डिसेंबर च्या सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी हे गोडावून फोडून दीड लाख रुपये किमतीचा 20 क्विंटल कापूस लंपास केला.

याबाबत रीतसर मुकुटबन पोलीस स्टेशन ला तक्रार देण्यात आली असून, पुढील तपास मुकुटबन पोलीस करित आहे. 

सोनापूर येथील होतकरू युवा व्यवसायिकाचा अपघाती मृत्यू

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यातील सोनापूर येथील होतकरू व्यावसायिकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.28 डिसेंबर बुधवारला सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान,वणी-यवतमाळ महामार्गांवरील गौराळा फाट्यावर समोर घडली.
विनोद किसन परचाके (46) असे अपघातात ठार झालेल्या मृतकाचे नाव आहे. वणी वरून साळ्याचे लग्न सोहळा आटोपून दुचाकीने ते मारेगाव ला येत असतांना वाटेत ढाब्या च्या समोर अज्ञात वाहनाने चांदेकर (मारेगाव) यांचे जावई विनोद परचाके (सोनापूर) यांच्या वाहणाला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची वार्ता कळताच लग्न घरी दुःखाचे डोंगर कोसळले.
विनोद यांचे पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

तालुक्यात अज्ञात वाहनाच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रवाशी, दैनिक ये-जा करणाऱ्यांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे. 

मुकूटबन येथे साप्ताहीक धावणाऱ्या रेल्वे गाड्याच्या थांबा देण्यात यावा - उपाध्यक्ष सुरेन्द्र गेडाम

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : मुकूटबन हे झरी जामणी तालुक्यातील सर्वात मोठे गाव असुन परीसरातील लहान मोठे गावे मुकुटबन ला जोडलेले आहेत. मुकुटबन येथे बिर्ला सिमेन्ट कारखाना तसेच कोल माईन्स, डोलोमाईटच्या खाणी आहेत. मुकूटबन येथे मोठ्या प्रमाणात दुसऱ्या राज्यातील लोक कामानिमीत्य व शिक्षणासाठी राज्यात व बाहेर राज्यात जात असतात अशा वेळी व्यापारी व शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मुकूटबनला साप्ताहीक धावणाऱ्या रेल्वे गाड्याचा तसेच नंदीग्राम एक्स्प्रेसचा थांबा देण्यात यावा अशी मागणी तालुका युवक कॉंग्रेस कमेटी कडून करण्यात येत आहे. 

संत्रा गाच्छी (12767) एक्सप्रेस कलकत्ता ते नांदेड, दिक्षाभुमी एक्सप्रेस (11045) धनबाद ते कोल्हापुर, पुर्णा - पटना ( 17610 ) पटना ते पुर्णा तसेच काजीपेठ - दादर (07196 ) धावते. अशा साप्ताहीक गाड्यापैकी सर्वच गाड्याचे थांबा मुकुटबन स्टेशन ला दिले तर झरी जामणी तालुक्यातील नागरीकाच्या फायदा होईल. तसेच नंदीग्राम एक्स्प्रेस (11401) जी कोरोना पासुन फक्त अदिलाबाद पर्यंत येते तिला सुद्धा नागपुर पर्यंत सुरु करून मुकुटबन येथे थांबा देण्यात यावा. तसेच मुकूटबन येथे रेल्वे स्टेशनची मोठी व सुसज्य इमारत बांधण्यात आली आहे तिथे रेल्वेने आरक्षण काऊन्टर सुरू करण्यात यावे जेणेकरून तालुक्यातील लोकांना आरक्षण करण्यासाठी वणी किंवा अदिलाबाद जाण्याची गरज पडणार नाही. या सर्व बाबीवर रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. असे आवाहन झरी जामणी तालुका कॉंग्रेस कमेटी उपाध्यक्ष सुरेन्द्र गेडाम यांनी केले आहे. रेल्वे थांबत नसल्यामुळे लोकामध्ये मोठा रोष निर्माण होत आहे या रेल्वे गाड्या मुकूट बन येथे थांबल्या नाहीत तर भविष्यात मोठे जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका युवक कॉंग्रेस कमेटी कडून देण्यात आला आहे.


शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा- युवक काँग्रेसची मागणी


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : तालुक्यातील 8074 शेतकन्यांनी पिक विमा काढला व 7006 शेतकऱ्याचे पिकांचे पंचनामे झाले आहे. पिक विमा सर्व शेतकऱ्यांना सरसकट व पंचनामा झालेल्या शेतकरी व पंचनामा न झालेले शेतकरी यांना विमा मिळावा यासाठी दिनांक 16 डिसेंबर रोजी तहसीलदार यांना युवक काँग्रेस कडून निवेदन देण्यात आले होते पण अजुनही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. यासाठी तहसीलदार झरी जामणी यांचे मार्फत जिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका समन्वय एग्रीकल्चर इंश्योरेंस कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (एआयसी), पाटण पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले.

झरी जामणी तालुका युवक काँग्रेस कडून तहसीलदार यांना निवेदन दिले होते. तहसील प्रशासना कडुन मदती बाबत व कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. तरी याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण झाले येणाऱ्या काळामध्ये अशीस परिस्थीती झाल्यास शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण होईल. झरी जामणी तालुक्यातील आणेवारी 50% आत आहे. ओला दुष्काळ सुध्दा जाहीर झाला व मागील तिन वर्षीचे आनेवारी 50% आत आहे. तरी मागील वर्षी खुप कमी प्रमाणात विम्याची रक्कम व या वर्षी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. सतत जर तिन वर्ष 50% आत आनेवारी असेल तर पिक विम्याची रक्कम जेवढा काढला तेवढा 100% मिळाले पाहीजे आणी त्वरीत मिळाले पाहीजे. बाजुच्या तालुक्याला भरपुर पिक विमा मिळतो आम्हाला का मिळत नाही, आमचा आदिवासी तालुका आहे. गोरगरीब शेतकरी आहे. खुप पावसाळा झाला शेताचे अतोनात नुकसान झाले तक्रार केल्यानंतर 24 तासाच्या आत पंचनामे करायला पाहीजे तसे न करता 15 दिवसांनी पंचनामा करायचा आणी नुकसानीची पातळी कमी दाखवायची जेणे करुन पिक विमा कमी मिळाला पाहीजे. कारण गरीब शेतकन्यांना ऑनलाईन समजत नाही.

तालुक्यातील पाचही मंडळांना पिक विमा मिळाला पाहीजे कारण मागील वर्षी काही मंडळे सोडण्यात आली तसे झाले नाही पाहीजे व मागील सोडलेल्या सर्व मंडळांना पिक विमा मिळावा. प्रशासनाला निवेदन देऊनही काही होत नाही माझ्या गरीब शेतकरी 8074 लोकांनी पिक विम्याचे पैसे किती भरले व केंद्र शासन किती भरले हा सर्व पैसा कंपणीच्या खिशात गेला आहे. याकडे कोण लक्ष्य देणार आहे. झरी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, राळेगाव या यवतमाळ जिल्यातील तालुक्यांना पिक विमा मिळाला नाही आणी जिल्यातील सर्व तालुक्यांना मिळाला अशी माहीती AIC कंपणीकडुन मिळाली या 5 तालुक्यांना पिक विम्यापासुन वंचीत ठेवण्यामागे का कारण तेलंगाणा राज्यामध्ये शेतकार्यांना वेळोवेळी सरसकट बियाणे लावल्या पासुन तर पिक निघे पर्यंत टप्या टप्याने अनुदान दिले जाते. तेलंगणा सरकारकडुन व आपल्या सरकारकडुन व शेती विमा कंपनीकडुन आम्ही भरलेल्या पिक विम्याची रक्कम आम्हाला मिळाली पाहीजे. हक्काची मिळाला ऐवढा का उशीर होतो. पण तेलंगाना सरकारकडुन कोणतीही अट न लावता सरसकट शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. त्याच प्रकारची मदत महाराष्ट्रातील सर्व शेतकन्यांना मिळाली पाहीजे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000/- रुपये प्रोत्साहनपर अनुदान भेटणार होते अजुन पर्यंत जमा झाले नाही त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बुर्रेवार, दिग्रसचे सरपंच व तालुका सरपंच संघटनाचे अध्यक्ष नीलेश येल्टीवार, राहुल धांडेकर, हरिदास गुर्जलवार, संतोष जंगीलवार, गंगाधर आत्राम, रमेश संकसनवार, प्रतिक गंड्रतवार, राकेश गालेवार, चेतन मॅकलवार, नितिन खडसे, श्रीकांत आनुकुमवार, शंकर आकुलवार यांनी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यासह आम्ही दि. २ जानेवारी पासून आमरण उपोषणास बसण्याचा व या सर्व प्रकाराला प्रशासन व पिक विमा कंपनी जबाबदार राहील. असा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.