उमरखेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करा


सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के

उमरखेड : उमरखेड महागाव - तालुक्यातील यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा कंपनीने अत्यल्प पैसे जमा करून शेतकऱ्यांची विमा कंपनीने फसवणूक केली. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी कंपनीकडे क्लेम केलेला असतांना काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रिमियम पेक्षाही कमी पैसे जमा करण्यात आले. व काही शेतकरी वंचित राहीले आहेत. 

त्यामुळे तहसीलदार यांनी बाबींचा विचार करून उमरखेड महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करून आठवड्यात शेतकन्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात यावी. व तालुक्यातील जे शेतकरी पीक विम्यापसुन वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात यावे अन्यथा 'प्रहार' शेतकरी संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा 'प्रहार' शेतकरी संघटना यांच्या वतीने देण्यात आला, विश्वास पतंगे, (प्रहार शेतकरी ता.अध्यक्ष) बंडू हामंद (प्रहार ता.प्रमुख) लालजी पतंगे, आशिष हामंद, अंकुश पानपट्टे, विवेक जळके, सावन हिंगमिरे, संतोष माने, बबलू जाधव, बालाजी माने, संतोष माने, गोविंदराव सावंत, फकीरराव श्रोते, आबाराव वाघमारे, प्रमोद दवणे, व उमरखेड तालुक्यातील इतर शेतकरी उपस्थित होते.
   (तहसीलदार यांना निवेदन देतांना प्रहार पदाधिकारी)

तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा कंपनीने अत्यल्प पैसे जमा करण्यात आले आहे. यासंदर्भात मी जिल्हाधिकारी येडगे यांना तात्काळ उमरखेड तालुक्यातील पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जी अत्यल्प पैसे जमा करण्यात आले आहे.    
  तालुक्यातील अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीने पैसे जमा करण्यात यावेत व वंचित शेतकरी आहेत. त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी यासंदर्भात अहवाल सादर करण्यात येईल असे सांगितले.

   - आनंद देऊळगावकर

"ए..आपण चहा घ्यायचा?.. दोन अंकी नाटक प्रियदर्शिनी नाट्य गृह चंद्रपूर इथे सादरीकरण

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत अंजना उत्तम बहूऊद्देशिय संस्था चिखलगांव वणी यांनी प्राचार्य हेमंत चौधरी निर्मित च.प्र.देशपांडे लिखित व राधा सोनटक्के दिग्दर्शित नाटक "ए..आपण चहा घ्यायचा? हे दोन अंकी नाटक प्रियदर्शिनी नाट्य गृह चंद्रपूर इथे सादर करण्यात आले.
या नाटकाला चंद्रपूर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला प्रेक्षकांच्या सारख्या टाळ्यांच्या कडकडाटात हे नाटक दोन तास हसवत आणि सामाजिक संदेश देऊन गेलं.
                     (नाट्य प्रयोग सादरीकरण)

या नाटकात मुख्य भूमिका प्राचार्य हेमंत चौधरी,सौ.सिमा सोनटक्के, उमाकांत म्हसे,सौ.मिना वानखडे तसेच वणीचे जेष्ठ कलावंत अशोकराव सोनटक्के यांनी भुमिका उत्कृष्टपणे पार पाडल्या आणि पुन्हा एकदा वणीच्या नाट्य परंपरेला उच्च शिखरावर पोहचवले.

राष्ट्रीय संगीत अकादमीचे कार्य उल्लेखनीय – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : संगीत नाटक क्षेत्राच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय अकादमीच्या माध्यमातून सुरू असलेले काम उल्लेखनीय आहे. डॉ. संध्या पुरेचा येणाऱ्या काळात राष्ट्रीय संगीत अकादमीच्या माध्यमातून नव्या पिढीला या क्षेत्राची ओढ लावण्यात यशस्वी ठरतील असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी काल संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी बांबू निर्मित तिरंगा भेट देऊन डॉ संध्या पुरेचा यांचा सांस्कृतिक मंत्री यांनी सत्कार केला.

संगीत नाटक क्षेत्रातील प्रतिष्ठित मानले जाणारे 3 विविध गटांतील 17 पुरस्कार गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राने पटकावले ही बाब गौरवास्पद असून राज्यात संगीत नाटकास प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यासाठी राज्य शासन कलावंतांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास श्री.मुनगंटीवार यांनी डॉ संध्या पुरेचा यांच्याशी बोलताना व्यक्त केला. यावेळी अकादमीचे कार्यकारी सदस्य डॉ विद्याधर व्यास, डॉ. उमा डोगरा, डॉ. प्रकाश खांडगे उपस्थित होते.

अतिक्रमणधारकांना हक्काची जागा मिळवून देण्याकरीता सावली तहसिल कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

 सावली : आज दिनांक 30/11/2022 ला अतिक्रमण धारकांना हक्काची जागा मिडवून देण्याकरिता सावली तहसील कार्यालयावर धडक मोर्च्या काढण्यात येणार आहे या मोर्च्यात जनतेनी सहभागी होण्याचे आवाहन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले आहे.

याबाबत सविसतर वृत्त असे की, तहसील प्रशासनाने सावली तालुक्यातील जनतेला नोटीस पाठवून सरकारी व गायरान जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवीण्याबाबत बाजवले होते त्यामुळे सावली तालुक्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
सावली तालुक्यातील अनेक गावामध्ये सरकारी व गायरान जागेवर लोकांनी पक्के घरे बांधलेली आहेत सदर घरे ही अनेक वर्षापासून आहेत या जागेवर सरकारच्या माध्यमातून पक्के रस्ते, नाली बांधकाम, विज व्यवस्था, या सारख्या अनेक सोई उपलब्ध झाल्या आहेत मात्र शासनाच्या पत्रामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

दरम्यान,सदर अतिक्रमण बाबत सावली तालुका काँग्रेस कमिटीने राज्यचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सदर बाब लक्ष्यात आणून दिली असता ततकाळ त्यांनी लोकांच्या मागणी बाबत चर्चा करून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. जनतेची घरे पाडू नयेत, व अतिक्रमण धारक गरीब जनतेला घराची कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावीत अश्या प्रमुख मागण्या या मोर्च्यात करण्यात येणार आहेत सावली तालुक्यातील जनतेनी सदर मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन सावली तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले आहे.
सदर मोर्च्याचे नेतृत्व माजी मंत्री आमदार विजय भाऊ वडेट्टीवार हे करणार असून जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष प्रकाश देवतले, संदीप गड्डमवार, दिनेश चिटनूरवार, लता लाकडे, संदीप पुण्यपवार, विजय कोरेवार, यांची उपस्थित राहणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडुन आदिवासी गोंड गोवारींच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब - माधव कोहळे


सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाने सिविल आपिल 4096/2020 दिनांक 18डिसेंबर2020 नुसार ऐतिहासिक निर्णय दिला आहे.यामध्ये मुद्दा क्रमांक 31 व 75 नुसार कालेलकर आयोगाने गोवारींची शिफारस केली असताना संसदेच्या संमतीने नोंद गोंड गोवारी झाल्याचे स्पष्ट नमुद आहे.परंतु मुद्दा क्रमांक 83 व मुद्दा क्रमांक 92 नुसार तेच गोवारी ' गोंड गोवारी' च्या सवलती साठी पाञ आहेत जे ढाल, वाघोबा, नागोबा, भिवसन, मोठा देव यांना पुजतात. ही संस्कृती आपलीच असल्याने आपण त्या सवलतीस पाञ असुन आपल्या गोंड गोवारीं च्या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. असे प्रतिपादन आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष माधव कोहळे यांनी केले.ते चोंदी ता.राळेगाव येथे आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समितीच्या नामफलकाचे उद्घाटन प्रसंगी  प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.सर्वोच्च न्यायालयाचे असे स्पष्ट निर्देश असतांना व शासनाची कोणतीही लेखी मनाई नसताना जिल्ह्यातील प्रशासन गोंड गोवारी जात प्रमाणपञाचे प्रस्ताव व यवतमाळ येथील अनुसुचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समिती जात वैधता प्रस्ताव रद्द करुन गोंड गोवारींची मुस्कटदाबी करीत आहे.परंतु प्रशासनाची ही मुजोरी जास्त दिवस चालणार नाही व आम्ही कायदेशीर मार्गाने ती हानुन पाडू असे कोहळे यांनी यावेळी म्हटले.यावेळी गजानन ठाकरे व प्रविण नागोसे यांनी मनोगत व्यक्त केले.
        
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शरद शेंद्रे हे होते तर धनराज खंडरे, पुंडलिक फुन्ने, सरपंच निता कोवे, किशोर कोवे, दिनेश पेंदोर, रमेश कोवे, विवेक नागापुरे, शंकर रीठे, निखिल नागापुरे, सुनिल नेहारे, राजू राउत, कवडुजी दुधकोहळे, अनिल चांदेकर, देवांगना आडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्तविक दिनेश पेंदोर यांनी केले तर सुञसंचालन धनराज राठोड यांनी केले.आभार  प्रशांत बोटरे यांनी मानले.कार्यक्रमाचे  यशस्वीतेसाठी किशोर शेंद्रे,वाल्मिक बोटरे,उत्तम बोटरे,विजय राऊत,ज्ञानेश्वर राऊत,महादेव शेंद्रे,योगेश वाघाडे,प्रदीप वाघाडे,वासुदेव बोटरे,सुरेश मुरखे,प्रविण बोटरे,,ञ्यंबक ऊईके,पांडुरंग राऊत,शालू शेंद्रे,दुर्गा वाघाडे,गीता वाघाडे यांनी परिश्रम घेतले.