"सदर मार्गांवरून अवजड वाहन नेण्यास मनाई आहे" असे ठिकठिकाणी फलक लागले; मात्र अधिकाऱ्यांच्या आदेशाला ट्रान्सपोर्टरकडून केराची टोपली


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : जिल्हा चंद्रपूर, वरोरा तालुका येथील एकोना कोल माईन्स मधील कोळसा खदान सुरू झाल्यापासून वरोरा मार्ग चंद्रपूर व वणी जात होता. परंतु वरोरा शहरातील जनतेच्या व लोकप्रतिनिधी यांच्या दबावामुळे वरोरा प्रशासनाने वरोरा जनतेच्या हितासाठी वरोरा शहरातून जड वाहुकीस प्रतिबंध केल्यामुळे अंदाजे मागील ८ ते१० महिन्यापासून कोळशाची वाहतूक एकोना, वानोजा, माढेळी मार्गे यवतमाळ जिल्ह्यातील कोसार,खैरी,मार्डी,नांदेपेरा,मजरा,वांजारी,वणी मार्गे-चंद्रपूर, घुगुस, पुनवट कोलवासरी वणी येथे होत आहे.

एकोना, वनोजा, माढेळी हा राज्य महामार्ग ३१७ अस‌ला तरी रोड अरुंद व कमी वाहतूक क्षमतेचा असल्यामुळे येथील नागरिकानी आंदोलन केले. व स्थानिक खासदार यानी हस्तक्षेप करुन वरोरा प्रशासनावर दबाव निर्माण करून एकोना, वनोजा, माढेळी हा मार्ग जड वाहतूकीस बंद असा आदेश मा. उपविभागीय अधिकारी वरोरा यानी दि.२४-०६-२०२२ रोजी काढला त्यानंतर दि ११-०७-२०२२ पर्यंत कोळसा वाहतूक पूर्णता बंद होती पर्यायाने खदान मधला कोळसा पर्यायी मार्ग नसल्यामुळे कोळसा वाहतूक बंद होती. याचा फायदा घेत कोलमाईन्स प्रशासनानी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कडे अपील दाखल केली. मा. जिल्हाधिकारी यांनी वीज निर्मितीसाठी कोळसा आवश्यक असल्याचे कारण दाखवत एकोना, वनोजा, माढेळी हा राज्य महामार्ग असला तरी अरुंद व जड वाळतूकीस योग्य नसल्यामुळे वाहतूकीस शर्ती व अटीवर पुन्हा वाहतूकीस परवानगी दि. ११-०७-२०२२ तारखेपासून दिली. त्यामुळे फक्त २५ टन कोळसा प्रति वाहन याप्रमाणे वाहतूक एकोना खदानमधून वनोजा, माढेळी, कोसरा, खैरी, मार्डी, नांदेपेरा, वणी, वरुन पूनवट कोलवासरी घुगुस व चंद्रपूर येथे सुरु आहे.

वरोरा प्रशासनाने वरोरा शहरातील जनतेच्या सुरक्षेसाठी व शहरातील रोडची काळजी घेण्यासाठी यवमाळ जिल्हातील खैरी, मार्डी, नांदेपेरा, वणी मार्गाचा वापर केल्यामुळे या मार्गावर ८ ते ९ आपघात झाले. त्यात ३ व्यक्ती मरण पावले व ४ ते ५ वक्ती गंभीर जखमी झाले व वणी ते नांदेपेरा हा रस्ता अरुंद असून ८ टन वाहतूक क्षमतेचा असल्यामुळे येथील परिसरातील जनता ४ ते ५ महिन्यापासून संघर्ष करित आहे. त्यामुळे सार्वजनिक बाधकाम विभाग यांनी आदेश काढून सदर मार्गावरुन अवजड वाहने नेण्यास मनाई आहे" असा बोर्ड नांदेपेरा बायपास वणी, वांजरी, मजरा व नांदेपेरा येथे लावला आहे. तरी मुजोर ट्रक मालक नियम मोडत वाहतूक करित आहे. या संदर्भात दि. २६/०९/२०२२ ला मा.आमदार, तहसिलदार, बाधकाम विभाग व ठाणेदार यांच्या सोबत मिटिंग मधील चर्चा नुसार वाहतूक रोखेन व पर्यायी मार्गाने वळविण्यासाठी सक्षम अधिकारी यांचे आदेश आवश्यक असल्याचे सागुन हा आदेश काढण्यासाठी ६/१०/२०२२ पर्यंत प्रशासनी वेळ मागितल्यामुळे दि. २७/९/२०२२ ला होणारे आंदोलन ६/१०/२०२२ पर्यंत स्थगित करण्यात आले.              
          
 वरोरा प्रशासनानी आपल्या शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे यवतमाळ जिल्हातील ३ व्यक्तीचा नाहक जीव गमावला आहे. आपल्या नागरिकाच्या सुरक्षेसाठी वणी प्रशासन योग्य व लवकर निर्णय घेतील का? व लोकप्रतिनिधी यांची दखल घेतील का? या कडे जनतेचे लक्ष लागून आहे. नाहीतर ०६/१०/२०२२ नंतर या रोडवर सुरू अवैध जड वाहतूक जनता स्वता: रोखेल व यांची जबाबदारी संबंधित अधिकारी व लोक प्रतिनिधीची राहील, अशा इशार कॉ.अनिल घाटे व सहकाऱ्यांनी दिला आहे.

महाविद्यालयात रासेयो दिन स्वच्छता अभियान व वृक्ष वाटप कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला

रवी घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : स्थानिक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 24 सप्टेंबर म्हणून राष्ट्रीय सेवा योजना दिन स्वच्छता अभियान व वृक्ष वाटप कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला. कार्यक्रमा मध्ये संबोधित करत असताना प्रा. अक्षय जेनेकर यांनी विद्यार्थी दशेत समाजसेवेची जाण निर्माण झाली पाहिजे व संत गाडगेबाबांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला.

 कार्यक्रमाला आदी मान्यवर उपस्थित होते त्यात प्रामुख्याने महाविद्यालयाचे अधिक्षक श्री. रवींद्र धानोरकर, डॉ. गजानन सोडनर, डॉ. प्रवीण कुलकर्णी, प्रा. रुपेश वांढरे, डॉ. नितेश राऊत डॉ. घोडखांदे मॅडम यांच्यावतीने संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पार पडला.तसेच स्वच्छता अभियान राबवून महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख व सहकार्यक्रमाधिकारी प्रा. विजय भगत, प्रा. माधुरी शेंडे व रासेयो विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

पोक्सो कायद्यामध्ये सुधारणा घडवून बाल लैंगिक अत्याचार रोखता येऊ शकतो -डॉ. गोमासे

रवी घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : स्थानिक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना व साक्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने Stop Child Sexual Abuse POCSO Act 2012 या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेला मार्गदर्शन करण्याकरिता साक्षी फाउंडेशन येथील मार्गदर्शक डॉ. भारती गोमासे मॅडम तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर उपस्थित होते.

डॉ. गोमासे मॅडम बाल लैंगिक अत्याचारा विषयी बोलत असताना आपले मूल सुरक्षित राहील त्याचे भविष्य उज्ज्वल घडेल, याकडे लक्ष देत असतानाच आपल्या मुलांवर अशा प्रकारे कोणी अत्याचार करण्यास धजावणार असेल, तर त्याला कायद्याने कडक शिक्षा देण्यास पालकांनी खंबीर राहायला हवे. तरच बालकांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या या कायद्याचा (पोक्सो कायदा 2012) हेतू सफल होईल. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत असताना डॉ. घरडे सर यांनी समाजामध्ये घडत असलेल्या बाललैंगिक अत्याचार विषयी पालकांना जागरूक राहावे लागेल आणि कायद्यामध्ये शासनाने बदल घडवून आणावा असे आपले मत व्यक्त केले.

सुंदर असे प्रास्ताविक आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गजानन सोडणर यांनी केले तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. श्रीराम खाडे, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. अनिल अडसरे, प्रा. प्रदीप माकडे, प्रा. अक्षय जेणेकर, प्रा. रुपेश वांढरे आदि जण प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो सह कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय भगत, प्रा. माधुरी शेंडे व रासेयो विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

अमरावती: ट्रायबल फोरम वतीने मा. नानाभाऊ पटोले यांना आदिवासी समाजाच्या विविध समस्यांचे निवेदन


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

अमरावती : आज रविवार दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी ""ट्रायबल फोरम जिल्हा शाखा अमरावती"" च्या वतीने मा.श्री.नानाभाऊ पटोले(प्रदेशाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा)यांना आदिवासी समाजाच्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले. १)अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूल मधील मागील १० ते १५ वर्षापासून आदिवासी विकास विभाग (महाराष्ट्र शासनाच्या) वतीने दिले जाणारे अनुदान/ निधी त्याबाबतचे मागील 14 ते 15 वर्षापासून ऑडिट करण्यात यावे.२) अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूलच्या संचालकांनी आदिवासी विद्यार्थ्यांना आतोनात छळ केला आहे व त्यांना शैक्षणिक कामात अडथळा निर्माण करून, शासनाचे अनुदान घेऊन सुद्धा शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे, आदिवासी विद्यार्थ्यांना विविध अडचणी निर्माण करून त्रास दिल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची पिडवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.३) अमरावती कॅम्प परिसर स्थित जुने आदिवासी नगर मधील सार्वजनिक ठिकाणी व वहिवाटीच्या रस्त्यावर केलेले ""ग्रँड हॉटेल महफिल इन"" च्या संचालकांनी केलेले अतिक्रमण तातळीने मोकडे करून सार्वजनिक रस्ता बांधकाम करून देण्यात यावा. तसेच अन्य मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी तिरु.शशिकांतभाऊ आत्राम (जिल्हा सचिव,ट्रायबल फोरम जि.अमरावती), सुमितभाऊ कुंमरे, मुकिंदाभाऊ ऊईके, जगदीश इवाने व जुने आदिवासी नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ट्रकच्या धडकेत महिला ठार


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

गडचिरोली : सुरजागड डोंगरावरुन लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्याने जाणाऱ्या जवळपास ८ ते १० टिप्पर आणि ट्रकना आग लावली.
ही घटना मंगळवारी (दि.२७) संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास आष्टी-आलापल्ली मार्गावरील शांतीग्राम गावाजवळ घडली.
मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथील सुभाष जयदार हे मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पत्नीसह मोटारसायकलने गावाकडे जात असताना लगाम-शांतीग्राम गावादरम्यानच्या रस्त्यावर त्यांना लोहखनिज घेऊन येणाऱ्या ट्रकने मागून धडक दिली. या धडकेत सुभाष जयदार यांची पत्नी बिजोली सुभाष जयदार (४५) या जागीच ठार झाल्या. त्यानंतर नागरिक संतप्त झाले. त्यांनी रस्त्याने लोहखनिज घेऊन येणाऱ्या आठ ते दहा वाहनांना आग लावली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मात्र, परिसरात तणाव कायम आहे.
सुरजागड येथील डोंगरावरुन त्रिवेणी अर्थमूव्हर्स आणि लॉयड मेटल्स कंपनीतर्फे लोहखनिज उत्खनन करण्यात येत आहे. या खनिजाची वाहतूक टिप्पर आणि ट्रकद्वारे होत असून, दररोज चारशे ते पाचशे ट्रक रस्त्यावरुन धावत असल्याने आष्टी-आलापल्ली, आलापल्ली-एटापल्ली हे दोन प्रमुख रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. यामुळे बरेचदा वाहतुकीची कोंडी होते. शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या विरोधात मागील आठवड्यात अहेरी आणि आलापल्ली येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदही ठेवली होती. परंतु प्रशासनाने लोकभावना लक्षात न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.