प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मारेगाव तालुका कार्यकारणी जाहीर


सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची मारेगाव तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी अनंतराव गोवर्धन, मारेगाव तालुका अध्यक्षपदी सचिन मेश्राम तर सचिवपदी कैलास ठेंगणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
   मारेगाव येथील विश्राम गृहात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना भोपळे, मौनोद्दीन सौदागर, जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संघाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मारेगाव तालुका कार्यकारिणी अशी : तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम, कार्याध्यक्ष दिपक डोहणे, सचिव कैलास ठेंगणे, तालुका उपाध्यक्ष अमोल कुमरे, सहसचिव सुनील उताणे, संघटक रवी घुमे, पंकज नेहारे, कैलास मेश्राम, कोषाध्यक्ष जयप्रकाश वनकर, सुरज झोटींग, प्रसिध्दी प्रमुख संतोष बहादूरे, रोहन आदेवार, विवेक तोडासे, राजू पिपराडे, सुदर्शन टेकाम आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. 
पत्रकार व कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असून पत्रकारिता करित असताना पत्रकारांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या समस्या संघटनेकडे मांडाव्यात असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक डोहणे तर आभार अनंतरावं गोवर्धन यांनी मानले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

गुरुकृपा सिमेंट प्रॉडक्ट चे संचालक अनंता भाऊ जुमडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : मारेगाव व मार्डी सर्कल (मनसे)चे माजी तालुका प्रमुख तथा गुरुकृपा सिमेंट प्रॉडक्ट प्रतिष्ठान चे संचालक लोकप्रिय व लाडके जनसेवक अनंता भाऊ जुमडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

मारेगाव तालुका व मार्डी या सर्कल मधील सामाजिक कार्या करिता पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न करणारे व मेहनती च्या बळावर उद्योग उभारणारे व तरुण उद्योजक म्हणून तालुक्याचा नवा चेहरा म्हणून ओळख असलेले धडाडीचे कार्यकर्ते श्री. अनंता भाऊ जुमडे यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !

शुभेच्छुक :- मित्र परिवार मारेगाव व मार्डी सर्कल 

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी,

उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे - जालना, बीड,

शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

गणपती विसर्जनाचा ट्रॅक्टर पलटी; 1 महिला ठार, 27 जण जखमी, 6 महिला गंभीर

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

नागभीड : चिमूर तालुक्यातील काजळसर येथील नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर मिरवणूकीतील भक्तगण परत येत असताना ट्रॅक्टर पलटी होवून झालेल्या अपघातात 1 महिला ठार तर 35 जण जखमी झल्याची घटना आज शनिवारी दूपारी बाराच्या सुमारास घडली. प्रेमीला गुलाब श्रीरामे (वय ४०)असे मृतक महिलेचे नाव आहे. या अपघातामध्ये शाळकरी मुलीसह अनेक महिला जखमी झाल्या असून 6 जणांची प्रकृती चिंताजणक आहे. त्यांना नागपूरला हलविण्यात आले. चिमूर तालुक्यातील काजळसर येथील नवयुवक गणेश मंडळाने गणेशाची स्थापना दहा दिवस पूजाअर्चा करून आज शनिवारी (24 सप्टेंबर) निरोप दिला. वाजतगाजत मिरवणूक काढीत दूपारी बाराच्या सुमारास घोडाझरी शाल्यात गणेशाचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर भाविक भक्तगण घरी ट्रॅक्टरवर बसून घरी परत येत होते. यामध्ये शाळकरी मुलींसह महिलांचा समावेश होता. जंगल नाक्याजवळील घोडाझरी नाल्याजवळ ट्रॅक्टर ट्रालीने पलटी घेतल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये प्रेमीला गुलाब श्रीरामे (वय 45) या महिलेचा जागेच दबून मृत्यू झाला. तर 35 जण जखमी झाले त्यामध्ये 6 गंभीर जखमी आहेत.घरी परत येणा-या ट्रॅक्टर मध्ये शाळकरी मुलींसह महिला व विज पुरवठा करणारा जनरेटर ठेवण्यात आला होता. ट्रक्टर ला ब्रेक लावल्यामुळे जनरेटर व महिला एका बाजूला झाल्याने एकाच बाजूला वजन वाढले. ट्रक्टर ट्राॅलीने पलटी घेतली. अनेक जखमींना डोके,हात, पायाला मार लागला आहे. काहींचे हात, पाय तुटले आहे तर काहींना छातीला जबर मार लागला आहे. या अपघाताची माहिती होताच काजळसर गावात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी घटनास्थळकडे धाव घेतली. या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देताच पोलीस घटनास्थळी येवून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलाविली. दोन रुग्णवाहिकांनी जखमींना चंद्रपूर, नागपूर, ब्रम्हपुरी रेफर करण्यात आले. मृतकाच्या शवाचे पंचनामा करून उत्तरणीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले सदर ट्रॅक्टर उद्धव निकोडे यांच्या मालकीचे असून नरेश नावाचा व्यक्ती वाहन चालवित होता.

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत अडीअडचणी असल्यास त्वरित कळवा – पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजना राज्यांमार्फत चालविल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मात्र यात काही अडचणी निर्माण होत असतील, तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात. जेणेकरून संबंधित यंत्रणेशी बोलून त्या सोडविल्या जातील व त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले.

नियोजन सभागृहात केंद्रीय योजनांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम आदी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये विविध विभागामार्फत केंद्र पुरस्कृत योजना राबविल्या जातात, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री. पुरी म्हणाले, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जेथे कुठे अडचण निर्माण होत असेल, अशा बाबी विभाग प्रमुखांनी तात्काळ निदर्शनास आणून द्याव्यात. जेणेकरून संबंधित यंत्रणेशी बोलून त्यावर तोडगा काढता येईल. केंद्र सरकारने दिलेला 15 व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च केला, काही निधी शिल्लक आहे का, आदींबाबत त्यांनी विचारणा केली.
कोणत्याही योजनेच्या तीन – चार ठळक मुद्यांवरच चर्चा व्हायला पाहिजे. सर्व योजना सांगत बसणे योग्य नाही. या योजनांची माहिती संबंधित मंत्रालयाकडे असतेच. योजनेचे जे उद्दिष्ट कार्यान्वयीन यंत्रणा पूर्ण करू शकली नाही, त्याबाबत अधिका-यांनी माहिती द्यावी. जेणेकरून त्यावर लक्ष केंद्रीत करून त्याची सोडवणूक करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता शहरी स्वराज्य संस्थेला थेट निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचे योग्य नियोजन करावे. पुढील भेटीत यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला जाईल. त्यामुळे अधिका-यांनी पूर्ण तयारीने आणि ठळक मुद्यांवर चर्चा करावी, अशा सुचना केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या.

यावेळी मनपा, जिल्हा परिषद यांनी केंद्र पुरस्कृत योजनांचे सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

शेतक-यांना बियाणे वाटप : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत कृषी विभागातर्फे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते शेतक-यांना ज्वारीच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. यात चकबोर्डा येथील गौतम सागोरे, बोर्डा येथील सुधाकर खोब्रागडे, पिपरी येथील देविदास देवतळे, देविदास येरगुडे आणि बेलसनी येथील आकाश पोले यांचा समावेश होता.