अतिवृष्टीग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा: दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत; एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करणार

सह्याद्री चौफेर न्यूज 

मुंबई : 
गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एनडीआरएफ च्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरची पहिली मंत्रिमंडळ बैठक

राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी आज मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत केले.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगून मंत्र्यांनी आपआपली जबाबदारी गांभिर्यपूर्वक पार पाडावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

स्थानिक कलावंत करत आहे अमृत महोत्सव जनजागृती

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : सागर झेप बहुउद्देशीय संस्थे मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त "हर घर तिरंगा" या अभियानात दिनांक 13 ते 15 आगस्ट दरम्यान देशातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. यासाठी वणी पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील शिरपूर, पुनवट, नायगाव, केसुरली, मंदर या गावात कार्यक्रम करण्यात आला. घरोघरी राष्ट्रीय ध्वज लावून अमृत महोत्सव साजरा करावा असे कला पथका द्वारे जनजागृती करण्यात आली आहे. "हर घर तिरंगा" या अभियाना अंतर्गत समस्त जनतेने राष्ट्रध्वज घेऊन घरी लावावा. तसेच नागरिकांनी राष्ट्रध्वजाची मागणी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, स्वस्त धान्य दुकान, पोस्ट ऑफिस यांच्याकडे नोंदवू शकता किंवा इतर ठिकाणावरून खरेदी करू शकता व प्रत्येकाला खरेदी करण्यासाठी योग्य दरात उपलब्ध करून देण्यात आला असून फक्त 25 रुपये किंमत आहे. अशी माहिती कलावंत अभिनयाद्वारे सांगत आहे. श्रुती कोठे, मयुरी वैद्य, साई दुधलकर, करण ढुरके, सनवर शेख, रवी शेगर, अंकुश झाडे, गौरव नायनवार, साहिल चिंचोलकर, निखिल वाघाडे, मिमिक्री व ढोलक आकाश महादूळे, सागर मुने यांनी कार्यक्रम सादर केला.

4 वर्षापासून शाळेत कायमस्वरुपी एकही गुरुजी नाही

नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर 

महागांव : तालुक्यातील जि.प. प्रा. मराठी शाळा वरोडी (जुनी) येथे मागील 4 वर्षापासून शाळेत कायमस्वरुपी एकही शिक्षक नाही. सद्यस्थितीत शाळेची पटसंख्या 70 च्या जवळपास आहे. शासन नियमानुसार शाळेत 3 शिक्षकांची नियुक्ती असणे गरजेचे आहे. परंतु कायम स्वरुपी एकही शिक्षक नाही.
मागील चार वर्षापासून श्री. के. ई. भोयर हे शिक्षक प्रती नियुक्तीवर दिलेले आहेत परंतु पाच वर्ग मुख्याध्यापक प्रभाग त्यात BLO चे काम माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी त्यांना टेंभी व महागांव येथे जावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच पालकवर्ग सुध्दा आपल्या पाल्याच्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. यापुर्वी सुध्दा आपणांकडे निवेदन सादर केलेले आहे. परंतु अद्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या निवेदनाव्दारे आपणांस पुनश्च आग्रही  विनंती मागणी करण्यात येते की, आमच्या शाळेत अजून एकतरी शिक्षकाची नियुक्ती करुन आम्हाला न्याय देण्यात यावा. असे दिलेल्या निवेदनात नमूद आहे. परंतु गेली पंधरा ते विस दिवस लोटूनही शिक्षण विभागाने दखल घेतली नसल्याने शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय  निवेदन कर्त्यांनी घेतला.
यावेळी उपसरपंच अडकीने यांच्या शी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, बि ओ म्हणतात एक शिक्षक नेमला आहे. नेमला..परंतु तो शाळेवर येत का नाही. असा सवाल उपस्थित करत पुढे म्हणाले, आमच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आणि यांना अजिबात देणंघेणं नाही. त्यामुळे आज कुलूप ठोकले, जर शिक्षक शाळेवर हजर झाले नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ आंदोलनाचा प्रवित्रा लगेचच घेऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग दत्ता चौधरी (शाळा व्य. स. अध्यक्ष), सौ. उषाताई पेंडागळे (शाळा व्य. स. उपाध्यक्ष) तसेच सदस्य अर्चनाताई कोमवाड, सविताताई कांबळे, आरती ताई अडकिने ,पालक वर्ग अरविंद अडकिने, अनिल कदम, जीवन कनवाले, संदीप जाधव, परमेश्वर चंद्रवशी, प्रकाश काळुंके, प्रवीण कोणप्रतिवार, सुनील जाधव, अनंतराव अडकिने, अमोल अडकिने  यांच्या निवेदनावर सह्या आहेत. 

त्यामुळे विद्यार्थ्यांना "गुरुजी" मिळेल का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 


रॅलीतून साकारली 'हर घर तिरंगा' मोहीम..

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा प्राथमिक मराठी पाथ्रड देवी येथे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहीम 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबवली जात आहे त्या अनुषंगाने पाथ्रड देवि येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने दि.10 ऑगष्ट 2022 बुधवारला हर घर तिरंगा उपक्रमाला उत्साह पूर्ण लोक सहभाग मिळावा म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर घरोघरी तिरंगा उत्सव प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचा असून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीतील प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे यावेळी सांगण्यात आले. शेवटी रॅलीची पाथ्रड देवी जिल्हा परिषद शाळा येथे करण्यात आली आहे त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू व चित्रे यांचे प्रदर्शनी आयोजित केली होती.


या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी केलेल्या कौशल्याने व कल्पकतेने वस्तू बाबत जि.प.शाळा समिती व्यवस्थापक ओमशिव राठोड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर जि प शाळेचे मुख्याध्यापिका रोहनकर मॅडम यांनी हर घर तिरंग्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. गावकऱ्यांनी प्रत्येक घरी तिरंगा लावून आपले कर्तव्य पार पाडावे असे यावेळी सांगण्यात आले असून शाळेचे मुख्याध्यापिका रोहनकर मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेत समितीचे सदस्य प्रेम चव्हाण,अंकुश पारीसे,प्रीती गायकवाड पुनम पवार,मनवार,नामदेव जाधव यावेळी जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.


मा. नामदार श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल मिठाई वाटून ढोल ताशाच्या वाद्यावर नाचून जल्लोष, आनंद उत्सव साजरा केला


सह्याद्री चौफेर | न्यूज 

चंद्रपूर : मा. नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी  कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच भारतीय जनता पार्टी तालुका चंद्रपूर च्या वतीने पडोली फाटा चौक चंद्रपूर येथे फटाके फोडून, मिठाई वाटून ढोल ताश्याच्या वाद्यावर नाचून आनंद उत्सव जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी श्री.नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा, श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा, श्री.विजय आगरे तालुका महामंत्री भाजपा, श्री.अजय चालेकर, सौ.दुर्गा बावणे तालुका महामंत्री भाजपा महिला आघाडी, सौ.अन्नू ठेंगणे, सौ.कल्पना गुन्हे, श्री.रणजित सोयाम, श्री.विक्की लाडसे, श्री.विनोद खडसे, श्री. रामू बल्की, श्री.निशु पिसे, श्री.आशिष वाढई, श्री.विनोद खेवले, श्री.मनोज ठेंगणे, श्री.मनोहर राऊत, श्री.प्रकाश अल्लवलवार, श्री.गणपत चौधरी, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.