मारेगाव येथे काँग्रेसचा राज्यव्यापी आंदोलन व रास्ता रोको

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : महागाई, बेरोजगारी अग्निपथ व जीवनावश्यक वस्तू वरील वाढविलेल्या जी एस टी (GST) विरोधात मारेगाव काँग्रेस तर्फे आज शुक्रवार रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. काँग्रेसकडून शुक्रवारी वणी उपविभागात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.
यावेळी मारेगाव येथे स्थानिक नियोजित पेट्रोल पंप समोरील विशाल मंडपात काँग्रेस पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करीत काँग्रेसचे नेते माजी आमदार वामनराव कासावार, नरेंद्र ठाकरे, अरुणाताई खंडाळकर, उत्तमराव गेडाम, धनंजय आसुटकर, मारोती गौरकार आदींनी केंद्र सरकारच्या महागाई व अडेलतट्टू धोरणावर भाषणातून जोरदार प्रहार केला.
काँग्रेस माजी आमदार व नरेंद्र पा. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मारेगाव यवतमाळ महा मार्गांवर महागाई, बेरोजगारी अग्निपथ व जीवनावश्यक वस्तू वरील वाढविलेल्या जी एस टी (GST) विरोधात दरवाढीचा निषेध करित मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. सरकारने घेतलेल्या इंधनदरवाढीच्या निर्णयामुळे गाड्यांना धक्का द्यायची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया यावेळी काँग्रेसकडून देण्यात आल्या. दरम्यान, काही वेळ "रास्ता रोको" आंदोलनानंतर असंख्य आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत सुटका केली. 
या आंदोलनात नंदेश्वर आसुटकर, रमन डोये, तुळशीराम कुमरे, विलास वासाडे, नानाजी डाखरे, अरविंद वखनोर, अनिल आत्राम, वसंत आसुटकर कृषी उत्त्पन्न बाजार समिती उपसभापती, शंकरराव मडावी अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी,मारेगाव, रवी धानोरकर, यादवराव काळे, अंकुश माफूर, यादवराव पांडे, गजानन खापणे, उत्तम दातारकर, वसंतराव लांबट, इस्माईल शेख, छायाताई किनाके नगरसेविका, अनिताताई परचाके, सुषमाताई काळे, बेबीताई बोधले, मालाताई बदकी, माया ताई गाडगे, शकुंतला ताई वैद्य, मंजुषा मडावी, माया ताई पेंदोर, जिजाताई वरारकर, काळे मॅडम आदीं उपस्थित होते.
या आंदोलनाला सखी मंचचा सुद्धा सहभाग व समर्थन  मिळाले हे विशेष...

धक्कादायक! चिंचाळा येथील बोगस बंगाली डॉक्टरावर गुन्हा दाखल

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील चिंचाळा येथे पश्चिम बंगालमधील (बंगाली) बोगस डॉक्टरचा पडदा फाश करून मारेगाव पोलिसांनी सदर बोगस डॉक्टर वर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रणब राधागोविंद मंडल असे आरोपीचे नाव आहे. चिंचाळा येथे बिना डिग्री चे बोगस डॉक्टर हा पेशंट्स तपासणी करीत असल्याची माहिती मारेगाव तालुका आरोग्य अधिकारी अर्चना देठे यांना मिळाली. त्यानुसार आरोग्य पथकाने चिंचाळा येथे बोगस डॉक्टरावर छापा टाकला.
सविस्तर असे की, प्रणब मंडल (30) रा.आसानगर जिल्हा नदीया (पश्चिम बंगाल) हा बोगस डॉक्टर मागील काही महिन्यापासून मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे तपासणी करीत होता. याबाबतची माहिती प्राप्त होताच तालुका आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकला. दरम्यान, या बोगस डॉक्टराकडे नॅचरोपॅथी आणि योगा (Naturopathy & Yoga) हे दोन वर्षाचे डिप्लोमा सर्टफिकेट आढळले. यात केवळ योगा करण्याची परवानगी आहे. सोबतच त्याचेकडे ऑलोपॅथी मेडिसीनही आढळल्याने ते नागरिकांच्या आरोग्याशी खेळत फसवणूक करीत असल्याचा आरोग्य विभागाने ठपका ठेवत स्वतः तालुका आरोग्य अधिकारी देठे यांनी मारेगाव पोलिसात फिर्याद दाखल केली.
तालुक्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरावर मारेगाव तालुका आरोग्य विभागाने छापा टाकून पोलिसांच्या स्वाधीन केल्याने बोगस डॉक्टरावर (4 ऑगस्ट) रोजी गुरुवारला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर डॉक्टरला 1961 कायदा क 33 अंतर्गत ऑलोपॅथी प्रॅक्टिस करण्याचा कोणताही अधिकार नसतांना व ऑलोपॅथी औषध वापरत प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने बोगस डॉक्टर प्रणब मंडल यांचेवर कलम क 33 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनात जमादार राजेंद्र चांदेकर, सुंकुलवार करीत आहे.

विशेष उल्लेखनीय की, असे बोगस डॉक्टर तालुक्यातील खेड्या पाड्यात आपले ठाण मांडून गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळत असतील. यावर संबंधित विभागाने कठोर पाऊले उचलवी अशा प्रतिक्रिया या कारवाईच्या निमित्ताने जनता देत आहे.

भाकप धडकणार वणी कचेरीवर

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : किसान सभा, किसान संयुक्त मोर्चा व भारतीय काम्युनिष्ठ पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 12 रोजी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कॉ अनिल घाटे, प्रा धनंजय आंबटकर, ऋषी उलमाले, कॉ बंडू गोलर, डॉ तांबेकर, वासुदेव गोहणे, दिलीप लांजेवार, मोतीलाल चिरखारे, पांडुरंग पिंपळशेडे, शंकर केमेकर, राकेश खामनकर, संजय चहाणकर, भारत केमेकर, पांडुरंग ठावरी आदींनी केले आहे.
मागील महिन्याभारत अतिवृष्टीने वणी उपविभागीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे 50 हजार रुपये तात्काळ मदत जाहीर करावी, जी घरे पडली ती घरे बांधून देण्यात यावे, व पडक्या घरांना 1 लाखा मदत द्यावी, स्थलांतरीत करण्यात आलेल्या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे, एन डी आर एफ चे निकष बदलण्यात यावे, पूरग्रस्त परिस्थितीबद्दल निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञाची समिती नेमून दोषीवर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा: सर्रास प्लास्टिक विक्री; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश थंडावला

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार प्रथम उपयोगी वापर होणाऱ्या प्लास्टिक बंदीची सक्ती केलेली आहे आणि 1 जुलै 2022 पासून याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिले असतांना देखील सिंगल युज प्लास्टिक चा खुलेआम वापर करण्यात येत आहे. मात्र, यांचे आदेश फक्त बोर्डावर व कागदावरच आहे. 
जिल्ह्यात प्रत्येक पान टपरीवर खऱ्याच्या पण्या, सर्व किराणा दुकान, मोठ्या प्रमाणात वापर दिसतात तसेच सर्व शासकीय विभागातील काही कर्मचारी स्वतः बंदी असलेल्या पण्णी मध्ये खर्रा खातात, त्यामुळे कोणतीच कारवाई करत नाही. लग्नात व सार्वजनिक कार्यक्रमात मोठया प्रमाणात प्लास्टिक चा उपयोग दिसतो. प्लास्टिक च्या प्लेट्स, कप, ग्लासेस, चमचे, प्लास्टिक चाकू, प्लास्टिक झेंडे व इतर ठिकाणी 100 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक चा वापर शासनाच्या समोर होतो, तरीही कोणीही कारवाई करण्याचे सौदार्य दाखवत नाही.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आले की, फक्त गरीब जनतेवर थाथुर मातूर कारवाईचा बडगा उगारतात, श्रीमंत व्यापाऱ्यांवर कारवाई करत नाही व त्यांच्या कडून टेबलाच्याखालून व पार्टी घेऊन खुश होतात. त्यामुळे जिल्ह्यात कुठेच प्लास्टिक बंदी होतांना दिसत नाही. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाबाहेर फक्त प्लास्टिक बंदीचे दाखवण्यासाठी फलक लावले आहे, व प्रत्येक कार्यालयाच्या बाहेरच प्लास्टिक चा वापर होताना दिसते. यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे जर आदेश सरकारी कर्मचारी पाळत नाही, तर सर्व सामान्य जनता कशी पाळणार असा प्रश्न जनतेतुन उपस्थित होत आहे. आदेशानुसार कोणीच का? वागत नाही याचे कारण आता जिल्हाधिकारी शोधणार काय ? अशी चर्चा जनता करत आहे ?

आगामी सण उत्सवानिमित्त वणी पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : शहरात शांतता नांदावी म्हणून मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र दिन, पारशी नूतन वर्ष, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा, श्री गणेश चतुर्थी, या आगामी सणांच्या निमित्ताने वणी पोलिस स्टेशन प्रांगणात शांतता समितीची बैठक (ता.3 ऑगस्ट) रोजी सायंकाळी 6 वाजता घेण्यात आली.
सभेला उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. ठाणेदार रामकृष्ण महल्ले, वाहतूक शाखेचे सपोनी संजय आत्राम, न.प. उपमुख्याधिकारी खुषाल भोंगळे, बांधकाम विभागाचे अधिकारी, विज वितरण कंपनीचे उपस्थित होते.
बैठकीला समितीच्या सभासदांनी पुढील येणाऱ्या सण उत्सवात अडचणी मांडल्या, त्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेण्यात येईल असे आश्र्वासन दिले. सर्व सभासदांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे शांतता समितीच्या वतीने आज बैठकीत सांगण्यात आले. 
या बैठकीत पुरूषोत्तम पाटील, राजाभाऊ पाथ्रटकर, राजाभाऊ बिलोरीया, दिपक कोकास, गजानन कासावार, प्रमोद वासेकर, कुणाल चोरडिया, उमेश पोद्दार, शालीनी रासेकर, निलीमा काळे, आरती वांढरे, मंदा बांगरे या सह पत्रकार, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व उत्सव समितीचे अध्यक्ष, सदस्य, महिला प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीचे संचालन ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी तर आभार प्रदर्शन सपोनी माया चाटसे यांनी केले.