डॉक्टर असोसिएशन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पुरग्रस्त गावात आरोग्य शिबीर

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगाव तालुक्यात पुरग्रस्त गावात आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिर आज (ता.30 जुलै) ला घेण्यात आले आहे. या शिबिरात पशु चिकित्सक सुद्धा उपलब्ध असून, जनावरांची तपासणी व औषधं देण्यात आले आहे.
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने तालुक्यातील सावंगी,कोसारा, शिवणी, आपटी व अन्य गावात पुर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे पीडितांना एक हात मदतीचा म्हणून शिबिर घेण्यात आले. आज शनिवारला सावंगी व कोसारा येथे पुरग्रस्त भागात जावून डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा व क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राकेश भाऊ खुराणा व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आले.
यावेळी कोसारा येथील सरपंच, काँग्रेस तालुका अध्यक्ष मारुती गौरकार, अंकुश माफुर, डॉ धिरज डाहूले, डॉ मालवटकर, डॉ सुबोध अग्रवाल, आशिष आगबत्तलवार, नेहा ठाकरे आदींनी आरोग्य या शिबिराकरिता सहकार्य केले.

ऑगस्ट महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ? - पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

प्रत्येक बँकेच्या ग्राहकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यामध्ये खासगी आणि सार्वजनिक बँकाना एकूण 12 दिवस सुट्टी राहणार आहे.

पहा कश्या असतील सुट्या ?

7 ऑगस्ट रविवार

9 ऑगस्ट मोहरम 

11 ऑगस्ट रक्षाबंधन 

13 ऑगस्ट दुसरा शनिवार 
14 ऑगस्ट रविवार

15 ऑगस्ट स्वातंत्र दिवस  

16 ऑगस्ट पारशी नूतनवर्ष 

21 ऑगस्ट रविवार 

26 ऑगस्ट पोळा  

27 ऑगस्ट चौथा शनिवार  

28 ऑगस्ट रविवार 

31 ऑगस्ट गणेश उत्सव 

असे आहेत ऑगस्ट महिन्यात बँका 12 दिवस बंद राहण्याचे शेड्युल, त्यामुळे नागरिकांची बाजार पेठेत येत्या महिन्यात चांगलीच रेलचेल असणार आहे.

युवा कार्यकर्ते धनंजय आसुटकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : मारेगाव तालुक्यातील युवकांनी आज काँग्रेस मध्ये प्रवेश केला. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या उपस्थितीत त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला. 

यावेळी काँग्रेस नेते माननीय वामनराव कासावार, डॅनी सेंड्रावर, डॉ.महेंद्र लोढा, ओम ठाकूर, इजहार शेख, व महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई आवारी व ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी महिला वर्ग आदी उपस्थित होते.

प्रवेश घेणाऱ्यांमध्ये धनंजय आसुटकर, प्रफुल मानकर, 
अनिकेत काटकर, तेजस वाघमारे, सुमेध तोतडे, पवन सातपुते, आशिष पाटील, नितीन तुरणकर, राजू मेसेकर
शुभम मेश्राम, भुपेंद्र खुलसंगे आदी अनेक युवकांनी प्रवेश केला आहे.

आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत होऊ घातल्या असतांना धनंजय आसुटकर  नुकताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तळागाळातील लोकांशी जुळलेली काँग्रेसची नाळ ती कायम ठेवण्याकरिता व लोकशाही मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाला समर्थन देणे हे कधीही चांगले, तेव्हाच आपली लोकशाही मजबूत राहील असे या प्रसंगी त्यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलतांना आसुटकर यांनी सांगितले. 

माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मारेगाव तालुक्यातील पूर ग्रस्तांच्या जाणून घेतल्या व्यथा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : गेल्या महिनाभरापासून पाऊस विदर्भाला झोडपतो आहे. या पावसाने शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी उप मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज (ता.29 जुलै) त्यांनी मारेगाव तालुक्यातील दापोरा चा दौरा केला. या दरम्यान त्यांनी नुकसानीचे पाहणी केली. ही विदारक परिस्थिती सरकार दरबारी मांडून तात्काळ नुकसान भरपूर व ओला दुष्काळ जाहिर करण्याकरिता देखील त्वरित निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडू असे अजित पवार यांनी सांगितले.  
यावेळी तालुक्यातील पूर परिस्थितीची इत्थंभूत माहिती अजित दादांना दिली. या अतिवृष्टीने झालेले नुकसान, त्याचे होणारे दूरगामी परिणाम आणि करावयाच्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या शासन दरबारी मांडून पूरग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना 75 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मोठी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे यांनी दादांना निवेदनातून करण्यात आली.
वणी मारेगाव झरी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करावे, बेंबळाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले, त्यामुळे बेंबळा सिंचन विभागाकडून नुकसान भरपाई म्हणून सरसकट 75 हजार रुपये मंजूर करण्यात यावे तसेच वणी उपविभागीय ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी प्रशासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी सह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा झंझावत दौरा मारेगाव तालुक्यातील पूर ग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू डोळ्यात साठवून विरोधी पक्ष नेत्याचा ताफा सेलू ता.वणी कडे रवाना झाला.

सरपंच पदाची थेट निवडणूक; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 30 नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमद्वारे आता गावातील पात्र मतदारांकडून पंचायतीच्या सरपंच पदाची थेट निवडणूक करण्याची पद्धती अवलंबिण्यात येणार आहे, असा अध्यादेश ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.
प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीकरिता किंवा पोट-निवडणुकीकरिता सरपंच पदासाठी नामनिर्देशन करणाऱ्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक असून त्याचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी नसावे. ज्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविले नसेल, ती त्या गावाच्या कोणत्याही प्रभागासाठी सदस्य म्हणून किंवा पंचायतीच्या सरपंच पदासाठी पात्र नसेल.
या अधिनियमात थेट निवडून आलेल्या सरपंचाविरूद्धच्या अविश्वास प्रस्तावास ग्रामसभेद्वारे शिरगणना करण्याच्या पद्धतीने साध्या बहुमताने अनुसमर्थन देण्यात येईल, असेही प्रावधान करण्यात आले आहे. या अविश्वास प्रस्तावास अनुसमर्थन दिल्यानंतर सरपंचास देण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार उप-सरपंचाकडे देण्यात येईल.
जर सरपंच आणि उप-सरपंच या दोघांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला असेल तर असा अविश्वास प्रस्ताव निर्णीत होईपर्यंत गट विकास अधिकाऱ्याकडून प्राधिकृत करण्यात येईल आणि हा अधिकार विस्तार अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याकडे देण्यात येईल, असेही या अध्यादेशात नमूद करण्यात आलेले आहे.