कलकम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मुख्य आरोपींना पकडा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : महाराष्ट्र तसेच प्रामुख्याने विदर्भात गाजत असलेला कलकाम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज घोटाळाल्यातील संचालक, कार्यालयीन विदर्भ प्रमुखावर कठोर कार्यवाही करून त्यांना गजआड करा अशी मागणी आज शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष चंद्रपूर निमेश मानकर यांच्या नेतृत्वात भेट घेऊन विरोधी पक्ष नेते मा.अजितदादा पवार साहेब यांना चंद्रपूर दौऱ्यात करण्यात आली.
या अगोदर दादांना मुंबई येथे ९ जून २०२२ ला निवेदन देण्यात आलेले होते. संबंधित विषय गृहविभाग कडे पाठवलेला होता. परंतु अजूनही मुख्य आरोपी मोकाट असल्याने आज दादांना सांगण्यात आले. निवेदन दादांच्या लक्षात येताच त्यांनी सदर बाब वैयक्तिकरित्या माननीय ना.मुख्यमंत्र्यांसमोर नेणार असे सांगितले. त्यामुळे कलकम पीडित लोकांनी सुटकेचा श्वास सोडला.या अगोदर सदर प्रकरनाची तक्रार माजी गृहमंत्री मा.दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे साहेब, मा. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे करण्यात आलेली होती. मा.गृहमंत्र्यांनी स्पेशल स्क्वाड नेमून चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिलेले होते. परंतु मागील एक महिन्यापासून महाराष्ट्र आणि विदर्भात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे, संपूर्ण सरकारी यंत्रणा गुंतून होती. त्यामुळे या प्रकरणाकडे विशेष लक्ष देता आले नाही.परंतु दादांनी लक्ष घातले म्हणजे प्रकरणाला गती मिळेल यात शंका नाही.
निवेदनता सदर फरार आरोपी विजय येरगुडे याला पकडावे तसेच कंपनीचे मुख्य संचालक विष्णू पांडुरंग दळवी व त्यांच्या सहकार्यावर आतापर्यंत कुठल्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही त्यामुळे त्या दिशेने तपास करून त्यांना सुद्धा गजआड करावे आणि आणि पीडिताना न्याय द्यावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. निवेदन देताना शरद पवार विचार मंच प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशकर जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, संजय तूरीले,बाबा सातपुते तसेच पीडित उपस्थित होते.

अभिष्टचिंतन: इजहारभाई शेख यांना यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

                   
                       जनम दिन मुबारक...!!

जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष तथा नगरपरिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष  व सामाजिक नेहमीच सक्रिय होणारे वणी येथील प्रतिष्ठित कार्यकर्ते श्री इजहार भाई शेख यांना  वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...!!

भाई आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत हिच मनस्वी सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक वणी मारेगाव झरी (जामणी) इजहार भाई  शेख मित्र परिवार 

राज्यात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा उपक्रम; राज्य शासनाच्या सर्वसाधारण सूचना जारी

अतुल खोपटकर | सह्याद्री चौफेर 

मुंबई : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांनी सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांसाठी सर्वसाधारण सूचना जारी केल्या आहेत.

‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसार, प्रचार व जाणीव जागृती मोहिमेसाठी सांस्कृतिक कार्य विभागाने जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित, जाहिराती, लघु चित्रपट, सेलिब्रिटीच्या माध्यमातून आवाहन, पोस्टर इ. याची निर्मिती केली आहे. ती शासनाच्या https://mahaamrut या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर याबाबतची माहिती कोणत्याही विभागास /नागरिकाला उपलब्ध होऊ शकते. त्याचा अधिकाधिक उपयोग करून घेण्यात यावा. ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांना सर्वसाधारण सूचना देण्यात आल्या असून याबाबतचे शासन परिपत्रक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्र, रास्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन बाबींशी निगडीत यंत्रणांद्वारे ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.

निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरेल – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

पुणे : निवडणूक प्रक्रियेतील अनुभवाची देवाणघेवाण व भविष्यातील नियोजन करताना तसेच निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचेसाठी आयोजित कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या सभागृहात राज्यातील उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासाठी आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपायुक्त संतोष पाटील आदी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, निवडणुक विषयक कामकाज करताना आलेल्या अनुभवाची देवाण-घेवाण उपयुक्त आहे. निवडणुक प्रक्रियेतील आपले हे अनुभव पुढील निवडणूक कामकाजासाठी दिशादर्शक ठरतील. कार्यशाळेतील विचारमंथनाच्या आधारे पथदर्शी मुद्दे समोर यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्याच्या निवडणुक प्रकियेबाबतचे प्रशासकीय नियोजन, आधार लिंकेज, स्वीप कार्यक्रमात नाविन्यपूर्ण कामकाज, समाज माध्यमांचा वापर, भविष्यातील नियोजन याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा निवडणूक विषयक कामकाजासाठी अधिकाऱ्यांना उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, असे श्री.देशपांडे म्हणाले.

भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय स्तरावरील काही प्रकल्प करण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यावर सोपवली आहे. अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी राज्यावर सोपविणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. देशात निवडणूक विषयक कामकाजात राज्याने चांगली कामगिरी केली आहे. राज्यात निवडणूक यंत्रणेतील सर्वांच्या क्रियाशील सहभागाचे हे यश असल्याचा उल्लेखही श्री. देशपांडे यांनी केला.
सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी भारत निवडणूक आयोगाने केलेल्या कायद्यातील बदलाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले.

दोन दिवसीय कार्यशाळेत विविध तज्ज्ञ निवडणुक विषयक कामकाजाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेला राज्यातील सर्व जिल्ह्यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सहभागी झाले आहेत.

मारेगाव: जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेली तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत आज (ता.28 जुलै) ला जाहीर करण्यात आली. 
मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत बोटोणी - वेगाव गटात सर्व साधारण अनु.जमाती तर कुंभा मार्डी गटात सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले.
      

पंचायत समिती वेगाव गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र ), बोटोणी गणात अनु.जमाती महिला राखीव , कुंभा गण -सर्व साधारण महिला तर मार्डी गणात सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले.
      
या आरक्षण सोडतीने अनेकांचा हिरमोड झाला असून, बहुतांश कार्यकर्त्यांचा मार्गही सुकर झाल्याचे पाहुण मग "काय ते डोंगर काय ते झाडी काय ते हाटील सगळं कसं एकदम ओके" असणार असं बोलले जात आहे. या निवडणूकीच्या धुरळ्यात आपले बाहुबली उमेदवार उभे करून सर्वच राजकीय पक्ष निवडणूक रणधुमाळीत 'जनता जनार्दन'ला खिळवून ठेवणार.