कलकम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मुख्य आरोपींना पकडा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : महाराष्ट्र तसेच प्रामुख्याने विदर्भात गाजत असलेला कलकाम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज घोटाळाल्यातील संचालक, कार्यालयीन विदर्भ प्रमुखावर कठोर कार्यवाही करून त्यांना गजआड करा अशी मागणी आज शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष चंद्रपूर निमेश मानकर यांच्या नेतृत्वात भेट घेऊन विरोधी पक्ष नेते मा.अजितदादा पवार साहेब यांना चंद्रपूर दौऱ्यात करण्यात आली.
या अगोदर दादांना मुंबई येथे ९ जून २०२२ ला निवेदन देण्यात आलेले होते. संबंधित विषय गृहविभाग कडे पाठवलेला होता. परंतु अजूनही मुख्य आरोपी मोकाट असल्याने आज दादांना सांगण्यात आले. निवेदन दादांच्या लक्षात येताच त्यांनी सदर बाब वैयक्तिकरित्या माननीय ना.मुख्यमंत्र्यांसमोर नेणार असे सांगितले. त्यामुळे कलकम पीडित लोकांनी सुटकेचा श्वास सोडला.या अगोदर सदर प्रकरनाची तक्रार माजी गृहमंत्री मा.दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे साहेब, मा. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे करण्यात आलेली होती. मा.गृहमंत्र्यांनी स्पेशल स्क्वाड नेमून चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिलेले होते. परंतु मागील एक महिन्यापासून महाराष्ट्र आणि विदर्भात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे, संपूर्ण सरकारी यंत्रणा गुंतून होती. त्यामुळे या प्रकरणाकडे विशेष लक्ष देता आले नाही.परंतु दादांनी लक्ष घातले म्हणजे प्रकरणाला गती मिळेल यात शंका नाही.
निवेदनता सदर फरार आरोपी विजय येरगुडे याला पकडावे तसेच कंपनीचे मुख्य संचालक विष्णू पांडुरंग दळवी व त्यांच्या सहकार्यावर आतापर्यंत कुठल्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही त्यामुळे त्या दिशेने तपास करून त्यांना सुद्धा गजआड करावे आणि आणि पीडिताना न्याय द्यावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. निवेदन देताना शरद पवार विचार मंच प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशकर जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, संजय तूरीले,बाबा सातपुते तसेच पीडित उपस्थित होते.