बनावट विवाह लावणारी टाेळी गजाआड !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्यातील आैद्याेगिक नगरी म्हणून आेळखल्या जाणा-या बल्लारपूर शहरात स्थानिक पाेलिस स्टेशनच्या पाेलिसांनी एका बनावट विवाह लावून देणा-या टाेळीला नुकतेच गजाआड केले आहे.

येथील पाेलिस स्टेशनच्या हद्दी अंतर्गत विसापूर समिप भिवकुंड हे गांव आहे. त्या गावात एका युवकाचा विवाह हाेता. त्याच ठिकाणी एका घरगुती भांडणाची ठिणगी पडली.अन् त्या नंतर या बनावट विवाह नाट्याचा पडदा उघडला गेला.पाेलिसांनी अधिक व सखाेल चाैकशी नंतर बनावट वधूसह तात्पुरते (बनावट) बनलेल्या सर्व पाहुण्यांना अर्थात आराेपींना पाेलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.घटनास्थळावरुन बनावट वधूने पळून जाण्याचा आटाेकाट प्रयत्न केला परंतु ती त्यात यशस्वी हाेवू शकली नाही. बल्लारपूर पाेलिसांनी आराेपींच्या विराेधात भांदविच्या कलम ४२० व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात पाेलिस पथक अधिक चाैकशी करीत आहे.
पाेलिसांच्या कामगिरीचे केले काैतुक व अभिनंदन ! बल्हापूर पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक उमेश पाटील व त्यांचे पथकांने माेठ्या शिताफीने बनावट लग्न लावणा-या टाेळीस माेठ्या शिताफीने जेरबंद केल्या बद्दल चंद्रपूरच्या राजीव गांधी नगर येथील वैशाली मेश्राम, गाैरी माेहुर्ले, छाया कन्नाके, प्रतिमा ठवरे, पिंकी विश्वास, छाया बाेरकर व मडावी यांनी त्यांचे काैतुक व अभिनंदन केले आहे .

मारेगाव : भूमीअभिलेखविरोधात शेतकऱ्याचे उपोषण

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : येथील शेतकऱ्यांने जमीन एकत्रिकरण योजनेअंतर्गत क्षेत्र दुरुस्ती साठी अर्ज केला. परंतु येथील भूमी अभिलेख कार्यालयाने वारंवार मागणी करून आणि वरिष्ठ कार्यालयाने आदेश देऊनही कोणतीही कार्यवाही न केल्याने लक्ष्मीकांत गिरीजाशंकर तेलंग या शेतकऱ्यांने तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून उपोषण सुरु केले आहे.

लक्ष्मीकांत तेलंग यांनी २०१९ मध्ये कान्हाळगाव शेत शिवारातील गट नंबर १२,१३,१४ चे एकत्रीकरण योजनेअंतर्गत दुरुस्तीबाबत चा अर्ज केला होता. उपसंचालक भूमी अभिलेख यांनी या संदर्भात मारेगाव भूमी अभिलेख कार्यालयाला आदेश देऊन कार्यवाहीचा आदेश दिला होता. परंतु भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणीसाठी उपस्थित झाले नाही. त्यामुळे सदर शेतकरी त्रस्त झाला. काही दिवसापूर्वी शेतकऱ्याने पत्र देऊन मोजणी करा; अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

नवव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचे अपहरण,पोलिसात तक्रार दाखल


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

पांढरकवडा : तालुक्यातील मजुरी करणाऱ्या इसमाच्या 14 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. ती आश्रम शाळेतील 9 व्या वर्गात शिकत होती. शाळा बंद असल्यामुळे ती घरीच होती. 27 नोव्हेंबर रोजी घरासमोर एका स्पर्धेचा कार्यक्रम असल्याने तिचे वडील कार्यक्रम बघण्यासाठी गेले. रात्री 10 च्या नंतर घरी ते परत आल्या नंतर मुलगी दिसली काय म्हणून विचारण्यात आले. ती शौचास जाते म्हणून सांगून गेली, तिचा शोध घेतला असता ती कुठे आढळून आली नाही. नातेवाईक व मैत्रिणीकडे फोन करून विचारपूस केली. परंतु तिचा शोध लागला नाही. काल मुलीच्या वडीलाने पोलिसात या बाबत तक्रार दाखल दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला. 

सिंदेवाही तहसील कार्यालयासमोर धडकली पँथर सेना !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : सिंदेवाही-तालुक्यातील लाडबोरी येथील रहिवासी सुनील गेडाम हे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर दि.२४ नोव्हेंबर २०२१ पासून आपल्या न्यायोचित मागण्या घेऊन आमरण उपोषण करीत आहेत. मात्र, येथील प्रशासन व शासन हे त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच सिंदेवाही तहसीलदार यांना जाब विचारण्याकरिता तहसील कार्यालय सिंदेवाही येथे काल साेमवारी ऑल इंडिया पँथर सेना धडकली.

"सुनील गेडामला न्याय मिळालाच पाहिजे...मिळालाच पाहिजे" "होश मे आयो होश मे आयो, होश मे आके बात करो."अश्या घाेषणांनी तहसील कार्यालय परिसर अक्षरशा दुमदुमला होता. दरम्यान ऑल इंडिया पँथर सेनेने आपल्याकडे उपस्थित नागरिकांचे या वेळी लक्ष वेधून घेतले हाेते. ऑल इंडिया पँथर सेना ही दि. २९ नोव्हेंबर २०२१ ला पँथर सेना तहसीलदार यांना जाब विचारण्याकरीता त्यांच्या कार्यालयात पोहचली.व तहसीलदार गणेश जगदाळे यांच्याशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. चर्चेत तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्या परवानगी घेऊन सुनील गेडाम यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्यांवर जिल्हाधिका-यांशी चर्चा करून लवकरच त्यांना उपोषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे ऑल इंडिया पँथर सेनेला आश्वासन दिले.
त्यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवाध्यक्ष अजयभाऊ झलके, जिल्हा सल्लागार सुरेशजी डांगे, पोंभुर्ना तालुका अध्यक्ष सचिन आत्राम, सिंदेवाही तालुकाध्यक्ष आक्रोश खोब्रागडे, तालुका युवाध्यक्ष तथागत कोवले, तालुका कार्याध्यक्ष अंबादास दुधे, उपाध्यक्ष जितेंद्र नागदेवते, महेंद्र कोवले, तेजेंद्र नागदेवते, उपकार खोब्रागडे तथा समस्त पँथर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सूरमाज फाउंडेशन ने मुस्लिम समाजाच्या वतीने IAS अधिकारी गौरव साळुंखे यांचा सत्कार


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

चोपडा : गौरव रवींद्र साळुंखे, चोपड़ा शहरातील 24 वर्षीय तरुण आहे ज्याने IAS परीक्षेत देशभरात 128 क्रमांक मिळवले. गौरवचे आईवडील खूप साधे लोक आहेत. त्याच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे आज फळ मिळाले आहे. ज्यामुळे चोपड़ा शहरातील सर्व जाती आणि धर्माच्या लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. म्हणूनच चोपड़ा शहराचा सूरमाज फाउंडेशन. सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने. गौरव रवींद्र साळुंखे साहेबांना अभिवंदन दिला. आणि त्यांचे भविष्य आशिष प्रकारे कार्य खरंच राहो अशी शुभेच्छा दिल्या. त्याने आपल्या शहराचे वैभव आणावे. आणि प्रार्थना केली की चोपडा शहरातील प्रत्येक तरुण मेहनत करून सिविल सर्विसेस मध्ये भरती होऊ आणि आपल्या देशाचे आणि गावाचे नाव रोशन करा. गौरव याचा सत्कार करताना हाजी उस्मान शेख यांच्यासह स्जियाउद्दीन काझी, अबुलस शेख, शोएब साहब, डॉ. एम डी रागीब, डॉ. मोहम्मद जुबैर शेख आणि सुरमज फाउंडेशनचे सर्व साथीदार उपस्थित होते.