सुरमाज फाउंडेशनने असिम खानला त्याच्या यशाबद्दल केले अभिनंदन

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नंदुरबार : हे सांगताना आम्हाला खूप आनंद होतो की मुस्लिम समाजातील मूल. ज्याने आपले शिक्षण उर्दू भाषेत पूर्ण केले. आणि सामान्य कुटुंबाचा असून ज्याचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि आई एक साधी घरकामगार आहे. ते मूल दुसरे कोणी नाही. महाराष्ट्र राज्यात धुळे जिल्हा राहणारा असीम किफायत खान आहे हा ज्यांनी 2020 ची UPSC परीक्षा संपूर्ण भारतात 558 रँक मिळवले आणि त्याने ते सिद्ध केले जर आपण मनापासून आणि उत्कटतेने काहीतरी करण्याच्या प्रयत्न केला तर तो आपल्याला मिळते असीम खान त्याच्या समाजासाठी एक उदाहरण बनला आहे. आणि जगातील प्रत्येक मुलाने त्यांना बघून हे समजून घेतले पाहिजे की कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी भाषा अडथळा बनत नाही. जर तुम्ही प्रामाणिक आणि मेहनती असाल जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीत यश मिळेल.
त्यांचे यश पाहून. चोपडा शहराचे सुरमाज फाउंडेशन त्यांना भेटण्यासाठी. आणि या मेहनतीबद्दल त्याचे अभिनंदन करण्यासाठी. त्याच्या घरी पोहोचले. हाजी उस्मान शेख साहब जो सुरमाज फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांनी असीम साहेबांचे अभिनंदन केले पाणी त्यांना सांगितले की आता तुम्ही मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आहात. आणि तुम्ही समाजासाठी एक उदाहरण बनलात. आणि आता या यशाचा लाभ तुमच्या समाजातील आणि भारत देशाला द्या. सुरमाज फाउंडेशनच्या सर्व मित्रांनी प्रार्थना केली की अल्लाह असीम साहेबांना उत्तम आरोग्य आणि उत्तम प्रगती देवो. नंतरचे अभिनंदन.

हाजी उस्मान साहाब यांच्यासोबत झियाउद्दीन काझी साहाब, डॉ. रागीब साहब, अबुलस शेख, डॉ मोहम्मद जुबेर शेख, जुबेर बेग शोएब शेख आणि सहकारी सुरमाज फाउंडेशन उपस्थित होते.

सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती बडगे यांचा सत्कार निरोप समारंभ

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : अनेक वर्षे नौकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृती. शासनाच्या विविध कालमर्यादा नुसार श्रीमती ज्योती बडगे (शिरभये) मॅडम सेवानिवृत्त झाल्या आहे.

मॅडमनी 1988 मध्ये पवित्र शिक्षण सेवा कार्याला शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी जिल्हा यवतमाळ येथून सुरुवात केली आणि आज त्यांच्या शासकीय अध्यापन सेवा कार्याला पूर्णविराम मिळाला आहे. एकूण 33 वर्ष वर्षाची दीर्घ सेवा करून आदरणीय बडगे (शिरभये) मॅडम आज दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा श्री क्षिरसागर सर व उपमुख्याध्यापक मा. श्री तामगाडगे सर यांचा हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

शांत सुस्वभावी असा त्यांचा मनमिळावू स्वभाव असलेल्या संस्कृत या विषयांचे त्या अध्यापन करीत होत्या. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

पत्रकार दिनाच्या औचित्याने न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपुर जिल्हा (DMA) च्या वतीने स्पर्धेचे आयोजन !


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

चंद्रपुर : दरवर्षी सहा जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात "पत्रकार दिन" साजरा केल्या जातो. यावर्षी 6 जानेवारी 2022 पत्रकार दिनाचे औचित्याने रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी डिजिटल मीडिया असोसिएशनच्या (DMA) माध्यमातून न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल साठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये विजेते होणाऱ्यांना प्रथम व द्वितीय व प्रोत्साहन स्तराचे पुरस्कार देण्यात येत आहे. ही स्पर्धा संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्यात मध्ये न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल यांच्यासाठी आयोजित करण्यात आली असून रविवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी एमडीए, चंद्रपुर जिल्हा (DMA) कार्यालयात घेण्यात आलेल्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. आपापल्या न्यूज पोर्टल व यूट्यूब वर या स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्यांना 
(१) चंद्रपूर जिल्ह्यामधील मूळ समस्यांवर आपले वृत्त
(२) यशोगाथा व व्यक्तिविशेष  
(३) वन्यप्राण्यांच्या हमला समस्या व समाधान 

या तीन विषयांवर प्रकाशित वृत्त स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2021 पासून ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत या दिवसांमध्ये प्रकाशित होणाऱ्या वृत्तांनाच प्राधान्य दिले जाईल. तीन वेगवेगळ्या विषयांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून वरील विषयावर वृत्त प्रकाशित करणाऱ्यांना प्रथम पारितोषिक रोख 
₹ रोख रुपये प्रथम, 
₹ रोख रुपये द्वितीय 
शाल, श्रीफळ व सन्मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यासाठी एक परीक्षक मंडळ नेमण्यात येणार असून परीक्षक मंडळाचे निर्णय हा अंतिम राहणार आहे. डिजिटल मीडियाशी संबंधित प्रत्येकानी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 
या परिस्थितीत सोशल मीडिया हा फार जास्त प्रमाणात वापरला जात आहे. सोशल मीडिया ला मान्यता मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्नही करण्यात येत आहे. स्पर्धेच्या युगात आपण सर्वश्रेष्ठ व उत्कृष्ट राहावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन डिजिटल मिडिया असोसिएशन चंद्रपुर जिल्ह्यच्या माध्यमातून करण्यात आले आहे. डिजिटल मीडियाशी संबंधित जास्तीत जास्त न्यूज पोर्टल धारक व यूट्यूब चैनल वाल्यांनी यात सहभागी व्हावे असे आव्हान या माध्यमातून आयोजकांनी केले आहे.

गडचिराेलीत दाेन दिवशीय राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

सह्याद्री | किरण घाटे 

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आदिवासी समाज संस्कृती साहित्य इतिहास ह्या विषयावर दोन दिवस राष्ट्रीय परिसंवाद जनाधिकार मंच, आदिवासी एकता युवा परिषद, नारायण सिंह ऊईके विकास समिती ब्रम्हपूरी यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित केला होता.गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार कै. बाबुरावजी मडावी यांच्या दृष्टीकोनातून या जिल्ह्याचा विकास कसा होता व पुढे या परिसराची विकासाच्या दृष्टीने वाटचाल कशी असावी यावर चिंतन करण्यात आले. गडचिरोली हे देशाचे विकास माँडेल बनावे,

आर्थिक, सामाजिक प्रश्नांना घेऊन आपली विकासात्मक वाटचाल करावी. शिक्षणाची गंगोत्री व्हावी,व देशभरातून अभ्यासक, संशोधक येथे येवून अभ्यास करावे. हे त्यांचे स्वप्न होते. गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकाराने त्यांच्या स्वप्नातील आदिवासी विकासाची पूर्तता होईल असे वक्तव्य कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केले. सदरहु राष्ट्रीय परिसंवादासाठी विद्यापीठाच्या इतिहास विभागाने अथक परिश्रम घेतले.

डॉ .रश्मी बंड, डॉ. नरेश मडावी, डॉ .संतोष सुरडकर यांचा मोलाचा वाटा आहे. कुसुम ताई अलाम यांच्या रान आसवांचे तळे, रान पाखरांची माय, रान जखमांचे गोंदण या तीनही कविता संग्रहावर प्रमोद बोरसरे यांनी विवेचन केले.

चिचोली गावातील आदिवासी व दलितांना बेदम मारहाण करणाऱ्या "त्या" वनअधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करा- राजु झोडेंची मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिचोली येथील दलित व आदिवासी निर्दोष नागरिकांना अमानुषपणे मारहाण करणांऱ्या वन अधिकारी व वन कर्मचारी यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचेवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी आज जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
      
 चिचोली येथील केवळ शिकारीच्या संशयावरून वन विभागाचे अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी निर्दाेष नागरिकांना बेदम व अमानुषपणे मारहाण केली. अमानवीयतेचा कळस गाठून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडितांना विजेचे चटके गुप्तांगाला दिले. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. तरीही अजून पर्यंत प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची मोठी कारवाई केलेली नाही असे दिसून येत आहे. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांना जामीन मिळाला आहे. आठ ते नऊ वन कर्मचाऱ्यांनी अतिशय क्रूरतेची परिसीमा गाठली असून त्यांच्यावर दलित व आदिवासींना जाणीवपूर्वक मारहाण केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करावे व कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे .
    
जर उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली नाही तर या विरोधात जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजु झोडे, हनुमान आसुटकर, सागर कातकर, पियुस चांदेकर, प्रविण साव, सागर दहागांवकर, ऋषभ साव आदि गावकऱ्यानी एका लेखी निवेदनातुन दिला आहे.