विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्याची उत्तम संधी


सह्याद्री न्यूज | सुनील शिरपुरे
झरी, (०१ आक्टो.) : प्रत्येक शिक्षण संस्थेला चालू शैक्षणिक सत्रातील पटसंख्या पूर्ण करणे गरजेचं असते. त्यासाठी रिक्त जागा भरून काढावेच लागते. त्या अनुषंगाने बेलोरा स्थित जवाहर नवोदय विद्यालयात नववीतील रिक्त जागा भरून काढण्यासाठी आवेदन पत्र मागविण्यात आले आहे. त्यामुळे आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ही उत्तम संधी मिळाली आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. 
          
हे ऑनलाईन आवेेदन पत्र आपणास 31 ऑक्टोबर पर्यंत भरता येईल. त्यानंतर 9 एप्रिल 2022 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. या परीक्षेत बाजी मारणा-या विद्यार्थांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणार आहे. आपणास माहितच आहे की, जवाहर नवोदय विद्यालय ही नावाजलेली शिक्षणसंस्था आहे. या संस्थेत सहजासहजी प्रवेश मिळत नाही. त्यामुळे ही संधी आपल्याकडे चालून आलेली आहे. तर ही संधी हातातून निसटता कामा नये.
          
या शिक्षण संस्थेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर आरुढ झालेले आहे. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचायला हवी. जेणेकरून आपल्याकडून काही विद्यार्थ्यांचं भविष्य घडविल्या जाईल. आपल्या या अप्रत्यक्ष कृतीतून अनेक विद्यार्थ्यांचं जीवनमान उंचावल्या जाईल. त्यामुळे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के.डी. धोपटे यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आवेदन पत्र भरण्याचे आवाहन केले आहे.

श्री.बा.दे.पारवेकर महाविद्यालयात पंडित विष्णू नारायण भातखंडे यांची पुण्यतिथी साजरी


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (०१ आक्टो.) : श्री.बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय, पांढरकवडा येथे दिनांक २३/०९/२०२१ रोजी सांस्कृतिक व IQAC विभागातर्फे पंडित विष्णूशास्त्री भातखंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर ए जलतारे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे संगीत विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक सरोदे सर. बाल गायिका कुमारी श्रुती सरोदे ही उपस्थित होती. तसेच तबला वादक म्हणून अथर्व सरोदे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर ए जलतारे यांनी कार्यक्रमाची भूमिका आणि प्रास्ताविक स्पष्ट करून तसेच विष्णुशास्त्री भातखंडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून आपले मनोगत पूर्ण केले या संगीतमय मैफिलीचा श्रीगणेशा बाल गायिका कु.श्रुती सरोदे हिने गणेश वंदनेच्या मधुर गायनातून केली. सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जलतारे सर, प्रा.मानेकर मॅडम, प्रा.सरोदे सर यांनी आपल्या मधुर आवाजात भावगीत व सिनेमा गीत सादर केले.

या मैफिलीच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत तसेच भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी सिनेमाच्या गायनाच्या माध्यमातून पंडित विष्णू नारायण भातखंडे यांना आदरांजली देण्यात आली. सदर कार्यक्रम फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे प्रा.नितीन टेकाम यांनी केले. तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. संदीप सत्तुरवार यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्रा.रेळे सर, प्रा.वांढरे सर, प्रा. ढाले सर, प्रा.डॉ.सोरे सर, प्रा.कनाके सर, प्रा.गव्हाणे सर, प्रा.मानेकर मॅडम, प्रा.खंडारे सर, डॉ. चौधरी मॅडम, प्रा.महाजन मॅडम महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. सुनील महल्ले, श्री. आनंद, श्री. सतीश पवार, श्री.श्रीराम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कमळवेल्ली गावाची प्रगतीकडे वाटचाल



    
सह्याद्री न्यूज | सुनील शिरपूरे 
झरी, (०१ आक्टो.) : तालुक्यातील कमळवेल्ली हे गाव पाटणबोरी ते पाटण या मुख्य रोडपासून एक किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. या गावाची गावठाण वसलेल्या काळापासून आजपर्यंत मुख्य रोडपासून तर गावात प्रवेश करण्यापर्यंत अजिबात वीज व्यवस्था नव्हती. त्यामुळे रात्रीला बाहेरगावहून येणा-या लाेकांच्या मनामध्ये एक भीती असायची. त्यांना जीव धोक्यात घालून यावं लागत असे किंवा बसस्टाॅपवर कुणालातरी घ्यायला बोलवावं लागत असे.
          
गावाचा विकास करणा-या यंत्रणेत कित्येक सरपंच होऊन गेले. त्यांच्याकडे बरेचदा गावातील लोकांनी मुख्य रोडपासून गावाच्या प्रवेशापर्यंत वीज व्यवस्थेची मागणी केली होती. परंतु आज पर्यंतच्या सर्व सरपंचांनी करू म्हणत केवळ फुशारक्या मारत लोकांना बनवत आले व निधीवर डल्ला मारत गेले. पण आजपर्यंत एकाही सरपंचानी यासाठी पुढाकार घेऊन ठोस पाऊल उचलले नाही.
          
आज रोजी कार्यरत महिला सरपंच श्रीमती पुष्पाबाई चुक्कलवार, उपसरपंच वामन हलवेले व समस्त सदस्यगण यांच्या पुढाकाराने ही समस्या प्रत्यक्षात कार्यान्वित करून निकाली काढण्यात आले आहे. अशाप्रकारे प्रकाशमय कार्याचा श्रीगणेशा करून प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्या या कार्याला गावातील समस्त जनतेकडून व बाहेरगावच्या लोकांकडून अभिनंदन व पुढील वाटचालीच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महागाव तालुक्यातील शौर्यांचा किसान सभेनी केला गौरव



सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के    
महागांव, (०१आक्टो.) : दिनांक ३०/९/२०२१ रोजी किसान सभेनी तालुक्यातील विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या तिन भुमीपुत्राचा एकाच मंचावर गौरव करुन त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले, बाजार समिती च्या प्रांगणात हे शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी चळवळीत काम करणारे किसान सभेचे नेते अॅड, कॉ. डी.बी. नाईक होते. सर्व प्रथम वाकान येथील अविनाश सवाई राठोड यांचा डी.बी.नाईक मा.सभापती पं.स.महागाव यांचे हस्ते गौरव शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन करण्यात आले यावेळी गौरव मुर्ती अविनाश यांनी मनोगत व्यक्त करताना जीवाचीपर्वा न करता, दहागाव येथील एस. टी. अपघातात (पुरात ) वाहुन जात असलेल्या प्रवाशांचे प्राण वाचविले. या धाडसी युवकाने मदत करत असताना जात, धर्म, न पाहता केवळ मानव समाज या एकाच उद्देशाने मी हे काम केले, असे उद्गगार काढताच उपस्थितीतांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
सेवा नगर येथील गरिब कुटुंबातील कबड्डीपटू सुवर्ण पदक विजेता राजकुमार भिकु जाधव या दुसऱ्या नवयुवकांचा कॉ. देवीदास मोहकर मा.जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन गौरव करण्यात आले. यावेळी राजकुमार यांनी आपल्या आर्थिक कठीण परिस्थिती मध्ये उमरखेड ते रोहतक हरियाणा राष्ट्रीय स्तरापर्यंत (वयोगट २२ वर्ष) ऑलराउंडर खेळाडू चा प्रवास व महाराष्ट्र चमुचे नेत्रुत्व करुन गोल्ड मेडल प्राप्त करून राज्याला सन्मान मिळवून दिले पुढे बोलताना भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू बनण्याची मनिषा जाहीर करतात उपस्थिताचे स्वाभिमानाने उर भरुन आले.
शेवटी वयोगट केवळ १७ कबड्डीपटू बेलदरी येथील अमण संदीप आडे यांचा श्री मोहन पांडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन गौरव करण्यात आले. बेलदरी येथील पाटील घराण्यातील चमकता तारा यानेही रोहतक हरियाणा येथील राष्ट्रीय स्तरावर प्रविण जाधव कबड्डीपटू यांचे योग्य मार्गदर्शनात राज्य चमुचे कप्तानी करून रौप्यपदक मिळविले व भविष्यात देशपातळीवर नेत्रुत्व करण्याचे चिमुकल्या अमनने मनोगत व्यक्त करताच या वाक्याने सर्वांना एक वेगळीच उर्जा मिळाली.

यानंतर प्रा, शरदचंद्र डोगरे सरांनी बोलताना सत्कार्याचाच सत्कार होतो,धन व संपतीधारकांचा नाही, यापुढे आम्ही सर्व जन अविनाश, राजकुमार, अमन यांच्या अडचणी त आवाज द्या, सदैव तत्पर राहून मदत करु असे म्हटले. सोबतच कॉ. देवीदास मोहकर यांनी या तिन्ही नवतरुणाचा शौर्यवान व तालुक्याची शान जाहीर करुन तुम्ही तालुक्यातील नवतरुणाचे आदर्श व्हा आम्ही सर्वतोपरी मदत करु असे अभिवचन दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. बी. नाईक यांनी  शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या महागाव च्या मातीची ताकद उंच शिखरावर ज्या वीरांनी नेली त्यांचे कौतुक शेतकरी सभेने करायला पाहिजे या साठीच हे जिवाळ्याचे आयोजन केल्याचे सांगुन अविनाश नी मदत करतांना त्यांचा मानवी दृष्टीकोन हा मनावर कोरलं गेल आणि आता अविनाशला (गव्हर्नमेंट डिझायर) विषेश बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून  घेण्यासाठी लोकप्रतिनिधी मार्फत प्रयत्नास मदत करु असा विश्वास दिला, पुढे नाईक बोलताना म्हणाले की, राजकुमार यांनी सुध्दा प्रतिकुल परिस्थिती वर जिद्दीने मात करता येत, हे जीवनाचा मूलमंत्र दिला आहे. परिस्थीती कीतीही बिकट असो जगायचं तर नावाप्रमाणे राजकुमार सारखंच हा निर्धार या तरुणांने केल्यामुळे याची प्रेरणा ग्रामीण भागातील अनेक तरुणाना मिळत आहे. छोट्याशा अमनने तर बालपणातच नेत्रुत्व करुन भविष्याची उज्वल झलक दाखविल्या मुळे तालुक्याचा लिटल मास्टर झाला आहे. एकंदरीत अविनाश, राजकुमार, आणि अमन हे महागाव तालुक्याचे आन, बान, आणि शान ठरले आहे आणि महागाव च्या मातीचा पराक्रम देश पातळीवर गाजवला आहे. म्हणून या तिन्ही विक्रमवीरांनी कोणत्याही प्रशासकीय अडचणीत किसान सभेला हाक द्यावी, आम्ही ओ म्हणून हजर राहु असेही शेवटी डी.बी. नाईक यांनी या तिन्ही गौरव मुर्तीचे मनोबल वाढविले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे, उमरखेडचे श्री.देवहरी पवार, नि. बॅक अ.प्रा. शरदचंद्र डोगरे,सामाजिक कार्यकर्ते, श्री मोहन पांडे मा, उपसरपंच भांब, कॉ.नाना पानपट्टे, कॉ.गणेश तिघलवाड, कॉ. विनोद आडे, कॉ. प्रकाश ढगे, कॉ. बाळासाहेब रणमल्ले, कॉ. कैलास राठोड, बाळु राठोड, अंकुश आडे, सह अनेक जन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपकराव देशमुख ता. अध्यक्ष किसान सभा यांनी केले आणि कॉ. नानाभाऊ पानपट्टे यांनी मानले.

अमरावतीत "आम्ही सिद्ध लेखिका" संस्थेच्या कार्यकारणीच्या पदग्रहण सोहळा संपन्न


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०१ आक्टो.) : आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेची अमरावती शाखा स्थापन करण्यात आली. सदरहु कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा नुकताच प्रा. विजया मारोतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. संस्थेच्या अध्यक्ष प्रा. प्रज्ञाताई हुशिंग उपाध्यक्ष प्रा. विजया मारोतकर यांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या या संस्थेच्या सुपरिचित अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड ह्या मानद सचिव आहेत. विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये "आम्ही सिध्द लेखिका" ही संस्था गेल्या काही कालावधीपासून कार्य करत आहे. या संस्थेच्या कार्यकारिणीची निर्मिती प्रा.विजया मारोतकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. अध्यक्षपदी प्रा.विजया कडू उपाध्यक्षपदी प्रा. विजया भांगे सचिव पदी शिल्पा ढोक कार्य अध्यक्षपदी रश्मी कुळकणी कोषाध्यक्षपदी वृषाली वानखेडे निमंत्रक म्हणून वसुंधरा खंबाईतकर संचालक म्हणून संजीवनी काळे, प्रतिभा देशमुख, शारदा मालपाणी, रेखा जाफरी, निलिमा भोजने, आधीच्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. या वेळी स्वागत गीत शिल्पा ढोक यांनी सादर केले. प्रास्ताविक प्रा. विजया कडू यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन विजया भांगे यांनी केले.