'नेहरू युवा केंद्र' बीड कार्यालयाच्या व रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाचा आरंभ


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (०१ ऑगस्ट) : नेहरू युवा केंद्र कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार रयत सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने आज संपूर्ण जिल्ह्यात नेहरू युवा केंद्रा ची संलग्न असलेल्या युवा मंडळाच्या माध्यमातून आपापल्या गावात सार्वजनिक ठिकाणी, बस स्टँड, शाळा, सार्वजनिक आरोग्य केंद्र, मैदाने आदी ठिकाणी शुभारंभ करण्यात आला. या पंधरवड्यात विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये स्वच्छता विषयावर निबंध प्रतियोगिता स्लोगन प्रतियोगिता व्याख्याने सार्वजनिक ठिकाणी श्रमदान आधी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आज नेहरू युवा केंद्र बीड कार्यालयात स्वच्छते विषयी नाना पाटील यांनी शपथ वाचन करून सर्वाना देण्यात आली असून, कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली.

 याप्रसंगी रयत सामाजिक प्रतिष्ठानचे बीड सचिव आर. जी. माने, व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान चे नानाभाऊ गव्हाणे, स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचेअमोल जगताप, गहू बाई महिला बहुउद्देशीय संस्थेचे वैजनाथ खोडवे, याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे नानाभाऊ पाटील, प्रमोद जव्हेरी, उदय देशमुख संतोष देवकर, विकास धोत्रे, मनोज पतंगे, जयराज सुरवसे एस. डी. माने आदींची उपस्थिती होती.

परस्त्रीच्या नादाने केला सुखी संसाराचा घात, शारीरिक शोषणाच्या आरोपात जावे लागले ना आत !

                         (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०१ ऑगस्ट) : अलगद निर्माण झालेली ओळख मोबाईल वरील संवादावरून आणखीच फुलत गेली. व्हाट्सअप चॅटिंग वरून तर ती आणखीच बहरात आली. शब्दांनी शब्द वाढले. नंतर भावनिक शब्दांनी जवळीक वाढली. संवादातून नात घट्ट होत गेलं. एकमेकांविषयी ओढ वाढली. वयाचं भान हरपलं. मन हपापलं व मर्यादा सुटल्या. संयमाचे बांध फुटले. संगतीतून रंगतीत आलेल्या जवळकीने व्याकुळता संपली, व देहभान हरपून ते एकमेकांत लिन झाले. सहवासातील आनंद अनुभवल्यानंतर कायम सोबत राहण्याची गळ घातल्या गेली. महिलेचा कायम हक्काचा दर्जा देण्याचा हट्टाहास वाढला. तिने दोघात निर्माण झालेले बंध विवाह बंधनात बांधण्याचा आग्रह धरला. नंतर विवाह करण्याचा तगादाच लावून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्या गेला. आनंद लुटतांना भान हरपलेल्या व्यक्तीची चिंता वाढली. कारण आनंद लुटणाऱ्यांचे आधीच संसार थाटलेले. तो समजदार वयातील मुलाबाळांचा पालक व शासकीय नोकरदार व्यक्ती. त्यामुळे त्याने एकांतातील सहवासाला जगापुढे आणण्यास कायम नकार दिला. स्वतः केलेल्या मौजमजेमुळे कुटूंब अडचणीत येऊ नये, म्हणून त्याने लग्नाची शक्यताच नाकारली. ती त्याच्याशी लग्न करण्यावर ठाम राहिल्याने त्याचे सामंजस्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तिने तीन चार दिवसांआधी त्याचे घर गाठून तिथेच राहण्याचा आग्रह धरला. पण त्याने नकार देताच तिने विष प्राशन केले. नंतर खाजगी रुग्णालयात उपचार झाले. त्याचा लग्न करण्यास नकारच राहिल्याने तिने त्याच्या विरुद्ध शारीरिक शोषण केल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. दोघांमध्ये उठलेलं शारीरिक वादळ पोलिस स्टेशनला येऊन धडकलं. व त्यांच्यातील शारीरिक संबंध चव्हाट्यावर आले. तिच्या नवऱ्याचा तर पताच नाही पण त्याची बायको लाजिरवाणी होऊनही आपल्या पतीला अटकेपासून वाचाविण्याकरिता धडपडत होती. तक्रार न करण्यास तिच्या समोर पदर पसरत होती. पण तिने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पतीला तिच्याशी लग्न करण्यास संमती देण्याची अटच पत्नी समोर ठेवल्याने तिची मनधरणी करणच कठीण झालं. मान, मर्यादा, प्रतिष्ठा क्षणिक सुखाचे बळी ठरले. सावज हेरला, सावजाला फासतही अडकवलं पण सावजाची शिकार करण्यात अपयश आल्याचं शल्य कुठं तरी बोचत होतं. सुखाचा संसार सुरु असतांना पर स्त्रीचा नाद सुखी संसाराचा घात करून गेला. घरचं सुख सोडून बाहेर तोंड मारणं त्याच्या चांगलच अंगलट आलं. आपुलकीच छत सोडून त्याला आता तुरुंगात जावं लागलं.

चिटमोगरा येथील ग्रामपंचायत कार्यालय व लहुजी साळवे चौकात झाली साठे जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | कपिल भेदेकर
बिलोली, (०1 ऑगस्ट) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची दि. ०१/०८/२०२१ रोजी सकाळी ०९:०० वा. १०१ वी साठे जयंती ग्रामपंचायत कार्यालय चिटमोगरा ता. बिलोली येथे साजरी करण्यात आली. 
    
नियमित दर वर्षी प्रमाने लहुजी साळवे चौक व साठे नगर येथे अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लहुजी साळवे, अण्णा भाऊ च्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले जयंती च्या वेळी सोशल डिस्टन्सचा नियम पाळत श्री. हांडे सर ( ग्रामसेवक), श्रीआकाश कोकणे(सरपंच), शिवराज शेळके (उपसरपंच),दिलीप डोईवाड( सामाजिक कार्यकर्ते), माधव शेळके (मा.ग्रा.प.सदस्य), कपिल भेदेकर ( पत्रकार तथा ग्रा. प.सदस्य ), भास्कर भेदेकर (मा.उपसरपंच ), यशवंत भेदेकर (मा.ग्रा.सदस्य),उध्दव शेळके (पत्रकार), धम्मा भेदेकर (पत्रकार),गंगाधर भेदेकर (पत्रकार),दयानंद भेदेकर(पत्रकार), मिथुन भेदेकर,साहेबराव बक्कावाड, लक्ष्मण बक्कावाड, राजु बक्कावाड, रामा बक्कावाड, खंडु बोईवार, रमेश भेदेकर, अमोल भेदेकर, प्रकाश भेदेकर, सुमित भेदेकर, मनोहर शेळके, सह गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पडद्यामागच्या सरपंचपतीला चाप : महिला सक्षमीकरणाला चालना


• सरपंच असलेल्या पत्नीच्या कारभारात आता पतीराजांची ढवळाढवळ चालणार नाही ?

• पत्नीचे कामकाज पहाणार्‍यावर कारवाई होणार!


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (०१ ऑगस्ट) : ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच्,सदस्य यांच्या नातेवाईकांकडून कामात हस्तक्षेप झाल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य यांच्याविरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९ (१) अन्वये चौकशीनंतर विभागीय आयुक्तांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

दिनांक १५ जुलै -२०२१ महिला सरपंचांच्या कामात त्यांचे पती सर्वत्र सर्रासपणे लूडबूड करताना दिसतात. पण,यापुढे त्यांच्या कामात त्यांचे पती अथवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप चालणार नाही. शिवाय,संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या नातेवाईकांना बसताही येणार नाही,असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. या निर्णयामुळे सरपंच असलेल्या पत्नीच्या कारभारात आता पतीराजांची ढवळाढवळ चालणार नाही. असे वृत्त १४ जुलै रोजी सरकार नामा या वेबसाईट ने उरुळी कांचन येथून प्रकाशित केली आहे. हवेली पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर,सदस्य सचिन धुमाळ यांनी गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्याकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेत सरकारने वरील आदेश दिला आहे.

नव्या आदेशामुळे ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच तसेच सदस्य या पदाधिकाऱ्यांनी त्यांची कामे स्वतः करणे गरजेचे आहे. गावाचा कारभारी म्हणून सरपंचांचा लौकिक असतो. सरपंचांचा त्याच्या गावांत वेगळाच तोरा असतो. एक वेगळाच सन्मान असतो.मात्र,महिला सरपंच असल्यास कामकाजामध्ये बऱ्याचदा त्यांच्या पतीचा अथवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप कायम असतो. या संदर्भातच बडेकर,सचिन धुमाळ यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सरकारने वरील आदेश दिला आहे. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये नातेवाईकांनी मुळीच बसता कामा नये,असेही सरकारी आदेशात म्हटले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच्, सदस्य यांच्या नातेवाईकांकडून कामात हस्तक्षेप झाल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य यांच्याविरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९ (१) अन्वये चौकशीनंतर विभागीय आयुक्तांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

यासंदर्भात तक्रारदार आणि हवेली पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर म्हणाल्या की, हल्ली ग्रामपंचायतीमध्ये साधारण २० ते २५ लोक बसलेले असतात. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जातात. तसेच,ग्रामपंचायत सभागृहात सरपंच आणि सदस्य सकाळी गप्पा मारत बसले की ते दुपारीच उठतात.अशा वेळी कोणत्याही नागरिकाची किंवा महिलेची तेथे या सगळ्यांना समोरे जाताना घुसमटच होते. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनास वारंवार सांगून देखील दुर्लक्ष केले जात हेाते. बऱ्याचदा ग्रामपंचायत महिला सदस्यांचे पतीराज येथे विराजमान असतात. ग्रामपंचायत कामकाजामध्ये ग्रामपंचायत महिला सदस्यांचे योगदान दिसत नव्हते. पण नव्या निर्णयामुळे त्याला चाप बसेल.

पत्नीचे कामकाज पाहणाऱ्या पतींवर कारवाई होणार ?

महिला सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने जिल्हा तालुका आणि गावपातळीवर महिला आरक्षण लागू केले आहे. जिल्हा परिषद महिला सदस्य या स्वतः कार्यालयात जाऊन कामकाज पाहतात. त्याप्रमाणे ग्रामपंचायत महिला सदस्यांनी देखील ग्रामपंचायत प्रशासनाचे कामकाज पाहावे. त्यांचे कामकाज त्यांचे पती पाहत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल,असे हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी सांगितले.पत्नीचे कामकाज पाहणाऱ्या पतींवर कारवाई होणार.

(एम. आय. एम.) कळंब शहर अध्यक्ष पदी शेख सलीम यांची निवड

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (०१ ऑगस्ट) : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा एम आय एम पक्षाचे एकनिष्ठ सक्रिय कार्यकर्ते शेख सलीम हे सुरवाती पासुन एम आय एम पक्षात कार्य करीत असुन पक्ष वाढविणे,एम आय एम पार्टीचे उद्देश व ध्येय पुर्ण करण्याकरीता तसेच समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्या करीता सदैव प्रामाणिक व निस्वार्थ पणे कार्य करीत असतात. 

या त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने एम आय एम कळंब शहर अध्यक्ष पदी निवड करून यवतमाळ येथील दि. २८ जूलै बुधवारी रोजी विश्राम गृह येथे झालेल्या एका सभे मध्ये डॉ. गफार कादरी औरंगाबाद एम आय एम महाराष्ट्र प्रमुख, जनरल सेक्रेटरी फिरोज लाला नांदेड यांच्या उपस्थितीत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले . 

 यावेळी यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी चांद मोहम्मद शेख वसीम शेर खान, कृष्णा जाधव पुसद अन्य पद अधिकारी उपस्थित होते . 

पक्षाने माझ्या वर टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही तसेच समाजातील उपेक्षीत घटकाला न्याय देण्या करीता व पक्षाचे ध्येय, धोरण ची योग्यरित्या अमलबजावणी करण्यास प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया एम आय एम चे नवनिर्वाचित कळंब शहर अध्यक्ष शेख सलीम यांनी आमचे प्रतिनिधी रूस्तम शेख याच्या कडे व्यक्त केली .

शेख सलीम यांची निवड झाल्या मुळे समाजित समस्याचे निवारण नक्कीच होईल अशी शहरात चर्चा आहे .
एम आय एम कळंब शहर अध्यक्ष पदी शेख सलीम यांची नियुक्ती झाल्या बद्दल राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख, जिल्हा संयोजक शाहरुख काजी, कळंब तालुका संयोजक अनवर अली ,कळंब शहरातील युवक शेख वसीम, उस्मान भाई, रफिक भाई तसेच मित्र मंडळींनी अभिनंदन व्यक्त केले.