कार्ड धारकांना राशन देण्यात यावे : युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

सह्याद्री न्यूज | राजविलास 
यवतमाळ, (ता.३०) : तालुक्यात येणार्‍या वाई गावात राशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर नवीन प्रश्‍न निर्माण झाला आहे.

लाभार्थ्यांना स्वस्त धान्य देण्यात यावे, यासाठी आक्रमक झालेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. अंत्योदय कार्ड धारकांना शेतकरी दाखविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा

यावेळी कोरोना महामारीच्या संकट काळात लाभार्थ्यांना धान्य देण्याची मागणी करण्यात यावी, अशी मागणी कुणाल जतकर व युवक काँग्रेस पदाधिकारी  यांच्याकडून करण्यात आली आहे.

ओबीसी आरक्षण पूर्ववत करा - ओबीसी न्यायहक्क समितीची मागणी

सह्याद्री न्यूज नेटवर्क
महागांव, (ता. ३०) : ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण पुर्ववत लागू करावे, बहुजन समाजास त्या पासुन वंचित ठेऊ नये, पदोन्नती देण्यात यावी. नॉनक्रिमीलियर अट हटविणे, विमुक्त जातीय भटक्या जमातीच्या मुला मुलींना प्रत्येक क्षेत्रात नोकरीची संधी देण्यात यावी.

बहुजन समाजास त्या पासुन वंचित ठेवू नये. अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. अशा आशयाच्या मागणीचे लेखी निवेदन ओबीसी न्यायहक्क समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी महागांव तहसीलदार नामदेव इसाळकर यांना दिले.

 यावेळी नरेंद्र जाधव,युवराज राठोड, रविंद्र पवार,मोहन राठोड, श्रीनिवास जाधव, सुधाकर राठोड, दिलीप चव्हाण, डॉ. तोळाराम चव्हाण, मा.नगरसेवक राजु राठोड महागांव व अन्य बांधव उपस्थित होते.

फ्लिपकार्टकडून ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता. ३०) : कोविडचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या फ्लिपकार्ट कंपनीने राज्य शासनाला ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत दिली असून ती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज स्वीकारली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक रजनीश कुमार उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी फ्लिपकार्टने दिलेली ही मदत नक्कीच उपयुक्त ठरेल. कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना यामुळे जीवदान मिळेल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

फ्लिपकार्टने यापूर्वी विविध राज्यांना १८० आयसीयू व्हेंटिलेटर्स दिले आहेत, असे रजनीश कुमार यांनी यावेळी सांगितले.

तलाठी संवर्गाच्या बदल्यांना २०१९ च्या शासन निर्णयातून वगळण्यासाठी सकारात्मक

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.३०) : तलाठी संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्यांना दि. १५ मे, २०१९ च्या शासन निर्णयातून वगळण्याबाबत महसूल विभागाने सविस्तर प्रस्ताव करून सामान्य प्रशासन विभागाला पाठवावा तसेच या प्रस्तावावर सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

तलाठी संवर्गाच्या बदल्यांबाबतच्या समस्यांविषयी श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव श्रीमती गीता कुलकर्णी, अवर सचिव दि. बा. मोरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शासकीय कर्मचाऱ्याच्या विनंतीनुसार संवर्गाअंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशनाबाबतचा शासन निर्णय दि. १५ मे, २०१९ रोजी जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयात जिल्हा अंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर बदलीने कायमस्वरूपी समावेशन करता येणार नाही अशी तरतूद आहे.

 त्यामुळे तलाठी संवर्गाची विनंती बदली जिल्ह्यातल्या जिल्ह्यात एका उपविभागीय अधिकाऱ्याच्या आस्थापनेवरून दुसऱ्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या आस्थापनेवर होत नाही. या कारणाने न्याय मिळत नसल्याची भावना तलाठी महासंघाने राज्यमंत्री श्री. भरणे यांच्याकडे व्यक्त केली. त्याची तात्काळ दखल घेऊन या शासन निर्णयातून तलाठी संवर्गाला वगळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश श्री. भरणे यांनी दिले.

आमदार संदीप धुर्वे साहेबांच्या हस्ते गरीबांसाठी जिवनाशक वस्तुचे वाटप


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
घाटंजी, (ता. ३०) : आज रोजी बस स्टॅन्ड घाटंजी येथे माननीय आमदार डॉ.संदीप धुर्वे यांच्या स्थानिक विकास निधीतून गोर गरीब जनतेसाठी व प्रवासींसाठी अल्कलाईन,जीवनावश्यक क्षारयुक्त, जीवाणू मुक्त शितलीकरण युक्त अनेक स्तर आधुनिक शुद्धीकरण जल संयत्राचे लोकार्पण त्यांचे हस्ते संपन्न झाले.

यावेळी पंचायत समिती सभापती सौ निताताई जाधव, पंचायत समिती उपसभापती सुहास भाऊ पारवेकर, सचिन भाऊ पारवेकर, श्री प्रकाश पाटील डंभारे माजी नगराध्यक्ष श्रीराम खांडरे एसटी आगार प्रमुख देशमुख साहेब भरत पोतराजे प्रशांत उगले प्रकाश खरतडे विद्याधर राऊत सर संदीप माटे अंकुश ठाकरे आकाश जाधव मदन देऊळकर गजानन धांदे संदीप बोबडे ऊजाला संयंत्र वितरक वर्धमान लूनावत संजय अग्रवाल शेख मेहमूद भाई श्रीहरी निबुदे गजानन मांडवगडे बाबाराव महल्ले विलास ढवळे गजानन नव्हते शेख इक्बाल व इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.