कार्ड धारकांना राशन देण्यात यावे : युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

सह्याद्री न्यूज | राजविलास 
यवतमाळ, (ता.३०) : तालुक्यात येणार्‍या वाई गावात राशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर नवीन प्रश्‍न निर्माण झाला आहे.

लाभार्थ्यांना स्वस्त धान्य देण्यात यावे, यासाठी आक्रमक झालेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. अंत्योदय कार्ड धारकांना शेतकरी दाखविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा

यावेळी कोरोना महामारीच्या संकट काळात लाभार्थ्यांना धान्य देण्याची मागणी करण्यात यावी, अशी मागणी कुणाल जतकर व युवक काँग्रेस पदाधिकारी  यांच्याकडून करण्यात आली आहे.