शिवजयंती मोठ्या उत्साहात पिसगांव येथे साजरी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील पिसगांव येथे काल दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोज सोमवार ला रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.

सायंकाळी 6:30 वाजता सुमारास शिवराय मित्र परिवार यांच्या वतीने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन केले, दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोष एकत्रितपणे सर्वत्र निनादला.

या वेळी गावातील शिवभक्त युवा कार्यकत्ते व महिला मंडळ तसेच गावातील जेष्ठ नागरिक, तथा युवक युवती व बाल गोपाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नरसाळा येथे शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथे सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोज सोमवार ला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सायंकाळी 6:30 वाजता सुमारास गावातील आदिवासी जनजागृती युवा संघटना यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष: लक्ष्मण भाऊ कनाके यांनी बस स्टॉप जवळील बाबुराव शेडमाके प्रतिमा फलक या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी समाजाला खूप मोलाचे मार्गदर्शन केले.

त्यावेळी गावातील शिवभक्त युवा कार्यकत्ते व महिला मंडळ तसेच गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन नियमाप्रमाणे खाजगी शिकवणी कायमच्या बंद कराव्यात- डॉ. राजन माकणीकर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : महाराष्ट्र राज्यात खाजगी शिकवणीचे स्तोम माजले असून केंद्र शासनाच्या नवीन नियमावलीनुसार वयाच्या 16 वर्षा पर्यंत च्या विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी कायमची बंद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे राज्यातील सर्व शिकवणी केंद्र बंद करण्यात येण्याची मागणी विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

समाजभूषण पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी मोदी सरकारच्या खाजगी शिकवणी केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले असून तत्काळ महाराष्ट्रातील खासगी शिकवणी केंद्रे बंद व्हावीत अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. दीपक केसरकर यांच्या कडे निवेदणाद्वारे केली आहे.

मुंबई सह महाराष्ट्र राज्यामध्ये खाजगी शिकवणी केंद्र अवाच्या सव्वा फीस पूर्ण रोकड स्वरूपात आकारत आहेत, यामुळे शिक्षणाचे पूर्णपणे बाजारीकरण झालेले आहे. रोख रकमेत फीस आकारली गेल्यामुळे शासनाचा कर सुद्धा ही शिकवणी केंद्र चोरत आहेत. 

निवेदनात पुढे असं म्हटले आहे की, लवकरात लवकर मुंबई सह महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी शिकवणी बंद करण्यात याव्यात. जेणेकरून शाळेतील शिकवणीचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना मैदानी खेळासाठी वेळ मिळू शकेल. व विद्यार्थी कसरती करून निरोगी आरोग्य राखू शकतील.

मुंबई सह महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शिकवणी केंद्र विध्यार्थी वर्गास व त्यांच्या पालकांना चांगल्या गुणांनी पास होण्याचे आमीष दाखवून पालकांचे आर्थिक शोषन केले जातं आहे. विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले तर उलट पालकांना दोष देऊन गृहपाठ करवून घेण्याचा सल्ला दिला जातो. अभ्यासात चांगली असणारे विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन, स्वतःच्या नावाचा उदोउदो करून पालकांना लुबाडण्याचे काम या खाजगी शिकवणी करत आल्या आहेत.

अभ्यासात कमी असणारा एखादा विदयार्थी घेऊन त्याला मोठ्या गुणांकाने पास करूनं दाखवण्याचे फार कमी उदाहरण आहेत. अश्या विद्यार्थी वर ही शिकवणी केंद्रे संस्कार व शिक्षण देत नाहित. शिवाय नापास झाल्यास ही शिकवणी केंद्रे हाथ झटकून घेतात आम्ही तर शिकवतो विद्यार्थी शिकत नसेल तर आमचा काय दोष. पण प्रेवेश देतांना भलिमोठी फीस आकारतांना पालकांना मात्र मोठमोठ्या गोष्टी आस्वासित करतात.

त्यामुळे केंद्र सरकारने 16 वर्ष पर्यंतच्या सर्व खाजगी शिकवणी बंद करण्याचा कायदा बनवला असून तो महाराष्ट्र राज्यात लवकरात लवकर लागू करावा,असेही डॉ. माकणीकर आपल्या मागणी निवेदनातं म्हटले आहे.

पहिल्यांदा समाजकारण, नंतर धर्मकारण त्याच्यानंतर राजकारण - मार्शल अविनाश दिग्विजय

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : समाजकारण करण्यासाठी बाबासाहेब सांगतात,आणि त्याच्या शिवाय राजकारणाची जी सत्ता ती निरर्थक असल्याचे त्यांच म्हणणं आहे. Annihilation of Caste मध्ये बाबासाहेब म्हणतात की, पहिल्यांदा समाजकारण, नंतर धर्मकारण आणि त्यांच्या नंतर राजकारण, असे मत प्रमुख वक्ते मार्शल, अविनाश दिग्विज यांनी देवाळा येथे आयोजित त्यागमूर्ती आई रमाई जयंतीनिमित्ताने व्यक्त केले. शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी येथील तथागत बुद्ध विहार प्रांगणात देवाळा च्या वतीने आई रमाई जयंती साजरी करण्यात आली होती.

विचारपीठावर अध्यक्ष म्हणून नवनाथ नगराळे (वणी), प्रमुख वक्ते मार्शल मा.अविनाश दिग्विजय, स. सै. दल राज्य प्रवक्ते मा. विलास नरांजे सर, हे उपस्थित होते. 

पुढे बोलताना दिग्विजय म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते ह्या स्टेप सांगतात, आपण प्रामाणिकपणे आपल्या हृदयावर हात ठेऊन सांगावं की, बाबासाहेबांनी सांगितलेल्या ह्या स्टेपनुसार, बाबासाहेब गेल्यानंतर त्या दिशेने काम झाले का?.. हा प्रसंग बाबासाहेब समजावून सांगताना ते म्हणतात की,पहिल्यांदा समाजकारण नंतर धर्मकारण त्यांच्या नंतर राजकारण, त्याच्यानंतरच राजकारण.. असेही ते म्हणाले.

स.सै.दल राज्य प्रवक्ते विलास नरांजे सर यांनी आपल्या भाषणात समर्पित रमाई वर्तमान परिस्थिती आणि महिलांची जबाबदारी यावर सखोल असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अश्विनी साठे, प्रास्ताविक रमेश भगत यांनी तर आभार जयेश हस्ते यांनी मानले, या कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समस्त बौद्ध उपासक आणि उपासिका देवाळा यांनी परिश्रम घेतले.

उपसरपंच अविनाश लांबट यांच्या हस्ते महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज दि.19 फेब्रुवारी 2024 ला महागाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
आज देशभरात 'शिवजयंती' हर्ष उल्हासात साजरी होत असताना तालुक्यातील महागांव ह्या छोट्याश्या गावात अतिशय थाटात अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्ताने उपसरपंच अविनाश भाऊ लांबट यांच्या हस्ते महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी महीला पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना उपसरपंच अविनाश लांबट यांनी ह्या पुढे महाराजांची जयंती थाटात साजरी करावी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालावे, असे मत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वांनी भेदभाव विसरून एकत्रित राहावे, गावासाठी कुठलीही मदत लागली, तर मी तत्पर आहो, अशी त्यांनी ग्वाही यावेळी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पवन मिलमिले यांनी केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले मनोहर नेहारे, प्रमुख पाहुणे मुरलीधर बल्की, देविदासजी लांबट, गणेश खुसपुरे, नारायण बल्की, भास्कर आत्राम, महीला ग्रामपंचायत सदस्य संगीता वाघाडे व सर्व महागाववासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.