सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : समाजकारण करण्यासाठी बाबासाहेब सांगतात,आणि त्याच्या शिवाय राजकारणाची जी सत्ता ती निरर्थक असल्याचे त्यांच म्हणणं आहे. Annihilation of Caste मध्ये बाबासाहेब म्हणतात की, पहिल्यांदा समाजकारण, नंतर धर्मकारण आणि त्यांच्या नंतर राजकारण, असे मत प्रमुख वक्ते मार्शल, अविनाश दिग्विज यांनी देवाळा येथे आयोजित त्यागमूर्ती आई रमाई जयंतीनिमित्ताने व्यक्त केले. शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी येथील तथागत बुद्ध विहार प्रांगणात देवाळा च्या वतीने आई रमाई जयंती साजरी करण्यात आली होती.
विचारपीठावर अध्यक्ष म्हणून नवनाथ नगराळे (वणी), प्रमुख वक्ते मार्शल मा.अविनाश दिग्विजय, स. सै. दल राज्य प्रवक्ते मा. विलास नरांजे सर, हे उपस्थित होते.
पुढे बोलताना दिग्विजय म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते ह्या स्टेप सांगतात, आपण प्रामाणिकपणे आपल्या हृदयावर हात ठेऊन सांगावं की, बाबासाहेबांनी सांगितलेल्या ह्या स्टेपनुसार, बाबासाहेब गेल्यानंतर त्या दिशेने काम झाले का?.. हा प्रसंग बाबासाहेब समजावून सांगताना ते म्हणतात की,पहिल्यांदा समाजकारण नंतर धर्मकारण त्यांच्या नंतर राजकारण, त्याच्यानंतरच राजकारण.. असेही ते म्हणाले.
स.सै.दल राज्य प्रवक्ते विलास नरांजे सर यांनी आपल्या भाषणात समर्पित रमाई वर्तमान परिस्थिती आणि महिलांची जबाबदारी यावर सखोल असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अश्विनी साठे, प्रास्ताविक रमेश भगत यांनी तर आभार जयेश हस्ते यांनी मानले, या कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समस्त बौद्ध उपासक आणि उपासिका देवाळा यांनी परिश्रम घेतले.