आधार कृषी केंद्राचे संचालक प्रफुल धंदरे यांचे निधन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील आधार कृषी केंद्राचे संचालक प्रफुल धंदरे यांचे रविवारी नागपूरात उपचारादरम्यान निधन झाले. ते 40 वर्षाचे होते.

शहरात आधार कृषी केंद्र असे त्यांचे प्रतिष्ठान होते. ते तालुक्यातील मांगरूळ येथील मुळचे होते. मागील 12 दिवसापूर्वी त्यांची प्रकृत अचानक बिघडली, प्रफुल्ल यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तिथे दहा दिवस अतिदक्षता विभागात उपचार घेत असतांना प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नव्हती.

दरम्यान, शनिवार ला रात्री 11 वाजता त्यांना मेडिकल मध्ये हलविण्यात आले. मात्र, येथेही उपचाराला प्रतिसाद मिळत नसतांना प्रकृती अधिकच नाजूक होत, आज रविवार (ता.27 ऑगस्ट) ला सकाळी 8.25 वाजताचे दरम्यान, प्रफुल्ल गोरखनाथ धंदरे यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज सायंकाळी चार वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह मांगरूळ येथे आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती्यांनी दिली. प्रफुल्ल यांच्या पाठीमागे आई वडील, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा बराच मोठा आप्त परीवार आहे.

"जन्मदिन मुबारक हॊ...शाहरुख शेख भाई"



      "जन्मदिन मुबारक हॊ...शाहरुख शेख भाई"

व्हावास तूम्ही शतायुषी,
व्हावास तूम्ही दीर्घायुषी,
ही एकच आमची इच्छा,
तुमच्या भावी जीवनासाठी.
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी, 
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी 
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, मंगलमय हीच सदिच्छा!

अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष (मारेगाव तालुका) मा.शाहरुख शेखभाऊ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक अगणित लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा...
भाऊ आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! 


शुभेच्छुक :- काँग्रेस कमिटी परिवार, मारेगाव (तालुका)
                 •  महिला काँग्रेस कमिटी, मारेगाव (तालुका)
                 •  युवक काँग्रेस कमिटी, मारेगाव (तालुका)
       •  अनुसूचित जाती सेल विभाग, मारेगाव (तालुका)
               •   आदिवासी सेल विभाग मारेगाव, (तालुका)
                •   सर्व फ्रंटल पदाधिकारी व कार्यकर्ते
                • सेवा दल व एन एस यु आय अध्यक्ष,       पदाधिकारी  कार्यकर्ते तथा सर्व सेल अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते, मारेगाव (तालुका) 

वरोरा येथे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी ई-अभ्यासिकेचे लोकार्पण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरा : शिक्षण हे केवळ पुस्तकी नव्हे तर संस्कारी असावे. आपण समाजाचे कोणीतरी लागतो, या भावनेतून संस्कारी शिक्षण घेऊन ऋण फेडणारा विद्यार्थी या अभ्यासिकेतून घडावा, अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

वरोरा येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन भोयर, देवराव भोंगळे, डॉ.भगवान गायकवाड, माजी नगराध्यक्ष एहतेशाम अली, श्रीमती जोगी, रमेश राजुरकर आदी उपस्थित होते.

श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी ई-अभ्यासिकेचे लोकार्पण झाले, असे सुरुवातीला घोषित करून पालकमंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले, नगरपालिकेने अतिशय चांगले नियोजन करून ही अभ्यासिका उभी केली आहे. रस्ता, पूल या भौतिक सुविधेच्या गोष्टी थोड्या उशिरा तयार झाल्या तरी जास्त फरक पडत नाही, मात्र देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थी जेथे तयार होतात, अशा शैक्षणिक सुविधा त्वरित उभ्या करणे आवश्यक आहे. इतर देशात आर्थिक संपन्नता, भौतिक संसाधने आदी गोष्टी मुबलक प्रमाणात असल्या, तरी तेथील जीवन हे सुखी- संपन्नच राहील, याची शाश्वती नाही. मात्र आपला देश, आपला समाज हा कुटुंबवत्सल आहे. हेच संस्कार आपल्याला सुरुवातीपासून मिळाले आहेत. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना अशा संस्कारी शिक्षणाची गरज आहे. शेवटी देशाच्या गुणसंपन्नतेवरच आनंदाचा इंडेक्स ठरत असतो.
पुढे पालकमंत्री म्हणाले, चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी शिक्षणात वाघासारखाच पराक्रम करावा. राज्याचा मंत्री व या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चंद्रपूर, बल्लारशा, पोंभुर्णा येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सुरू करण्यात आले आहे. आपण निर्माण केलेल्या वास्तूमधून प्रशासकीय अधिकारी घडतात, याचा आपल्याला मनापासून आनंद आहे. विद्यार्थ्यांनो, खूप मोठे होऊन या शहराचे तसेच या जिल्ह्याचे नाव रोशन करा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

शैक्षणिक सोयी सुविधांना प्राधान्य :
आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात एकूण 205 विकास कामे करण्यात आली आहे. जिल्ह्यात शैक्षणिक सोयीसुविधांना विशेष प्राधान्य असून बाबा आमटे अत्याधुनिक अभ्यासिका तयार करण्यात आली आहे. बल्लारपूर तयार करण्यात आलेल्या सैनिक शाळेतून भविष्यात देशासाठी लष्करी अधिकारी तयार होतील. बल्लारशा येथे सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र, चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावर 50 एकर मध्ये 560 कोटी रुपये खर्च करून एस. एन. डी. टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, चंद्रपुरात गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, कृषी महाविद्यालय, चंद्रपूर येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा नवनवीन गोष्टी पूर्णत्वास येत आहे. एवढेच नाही तर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आज येथे घेतलेली पंचप्रण शपथ हा केवळ कार्यक्रम नाही, तर आपल्या हातून उत्तोमत्तम कार्य घडावे, त्यासाठी हा संकल्प करण्यात आला आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी वरोरा येथील शहीद योगेश डाहूले यांची वीरमाता पार्वताबाई आणि वीरपिता वसंतराव डाहूले यांचा ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी अभ्यासिकेच्या परिसरात ना.मुनगंटीवार यांनी वृक्षारोपण करून श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

प्रास्ताविकात मुख्याधिकारी गजानन भोयर म्हणाले, या ई - अभ्यासिकेसाठी पालकमंत्री यांनी खनिज विकास निधी अंतर्गत 3 कोटी 66 लक्ष रुपये मंजूर केले. या अभ्यासिकेमध्ये 30 संगणक, पेंटिंग कक्ष, प्रतिक्षालय, ग्रंथालय स्टोअर रूम आदी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेश खुळे यांनी केले. यावेळी अभिजित मोटघरे, सूरज पूनवटकर, बाबासाहेब भागडे, आकाश वानखेडे, अमित गुंडावार, ओम मांडवकर, अमित चवले, सुरेश महाजन, सागर वझे, आकाश भागडे यांच्यासह माजी नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाला दिली पुस्तकं भेट


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : संगणक, मोबाईल चे युग जरी असले तरी या युगात ऑफलाईन वाचनाची आवड लागावी हा उद्दात हेतू बाळगून येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला अध्यक्ष संजय जिवने यांनी दोन पुस्तकं भेट दिली.

युगसाक्षी बहुउद्देशीय संस्था टाकरखेडा, चे संस्थापक अध्यक्ष संजय जिवने यांनी माधव नगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, येथे दि.26 ऑगस्ट रोजी लेखक भानुदास पोपटे गुरुजी यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अलिखित संदर्भ.. खंड (1) खंड (2) असे दोन पुस्तकं भेट देण्यात आली.

दरम्यान, वाचनालयाची भेट घेतली, यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मा. बाबाराव ढवस हे उपस्थित होते. अध्यक्ष ढवस यांनी वाचनालयाचे सर्व कार्यकारिणीच्या वतीने अध्यक्ष संजय जिवने यांचे आभार मानले.

वणी मध्ये प्रथमच...सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांचा भजन संध्या कार्यक्रम

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणी च्या विद्यमाने शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक, भाजपचे नेते व सामाजिक कार्यकर्ते मा. विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सुविधा मंगल कार्यालय मारेगाव येथे करण्यात आले आहे. तर 1 सप्टेंबर ला कायर येथील कोळी समाज मंदिर येथे मोफत नेत्र शस्त्रक्रिया व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, 2 सप्टेंबर ला जैताई मंदीरात सकाळी 10 ते 4 या वेळात नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तर, 4 सप्टेंबर ला "मुझे चढ गया भगवा रंग...” फेम सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांचा भजन संध्या सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भजन संध्या रंगणार आहे.

भजन गायिका शहनाज अख्तरांच्या गाजलेल्या हिंदी मराठी भजन गीतांचा कार्यक्रम येथील शासकीय पाण्याची टाकी मैदानावर रंगणार आहे. तरी श्रोत्यांनी विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीने केले आहे.